मुख्य सामग्रीवर वगळा

"सुखन"

"सुखन"


लेखिका, कवयित्री, ब्लाॅगर आणि एक सह्रदयी व्यक्तीमत्व असलेल्या "तन्वी अमित" यांचं "सुखन" हे ललित गद्य प्रकारातील पुस्तक ३० नोव्हेंबरला मला मनस्वी, सप्रेम भेट मिळाले. "आर्ष पब्लिकेशन्स, पुणे" यांनी प्रकाशित केलेले "१४४" पृष्ठसंख्या असलेलं हे सुंदर असं पुस्तक.

साधारण जानेवारीमध्ये कुठल्याश्या दोन दिवसांच्या उसवत्या सांजवेळी हे पुस्तक मी वाचून संपवलं. परंतू वेळेअभावी या पुस्तकाबद्दल लिहायला काही जमत नव्हतं, अखेरीस काल सायंकाळी वेळ काढून हे असं लिहायला घेतलं अन् लिहत राह्यलो.

खरंतर मी काय लिहतो मला माहित नाही. ते ना धड पुस्तक परीक्षण ठरेल किंवा ना धड पुस्तक अभिप्राय. पण मनात आलं की आपण ह्या पुस्तकाबद्दल लिहायला हवं अन् लिहायला घेतलं.

पुस्तक येण्यापूर्वी पुस्तकाची वाट मी बघतच होतो. पुस्तक जेव्हा हातात पडले तेव्हा प्रथमतः तर मला पुस्तकाची हार्डबाउंड, हार्डकव्हर रुपात केलेली बांधणी खूप आवडली. जी पुस्तकाची शोभा वाढवते. मला स्वतःला हार्डबाउंड, हार्डकव्हर स्वरूपातील पुस्तके खूप आवडत असल्याने, हे पुस्तक नेहमीच अजूनच अधिकच जवळचे वाटणारे असेल.

थोडक्यात पुस्तकाबद्दल ;

लेखिका, कवयित्री, ब्लाॅगर आणि एक सह्रदयी व्यक्तीमत्व असलेल्या "तन्वी अमित" यांचे हे ललित गद्य प्रकारातील पुस्तक "सुखन" माझ्या हाती पडले अन् पुढे कित्येक दिवस ते माझ्या बुकशेल्फशी खेळत राहिलं. कारण हेच की पुस्तकाचं खूप सुंदर असलेलं मुखपृष्ठ.

प्रेम करायला शिकवणारी भाषा व उर्दू भाषेतील, गोडवा, लहेजा, अदब यामुळे उर्दू भाषा त्यातील शेरो शायरी मला पसंत होतीच अन् कित्येकदा वाचनाच्या माध्यमातून मी ती शिकण्याचा, आधिकाआधिक जाणून, समजून घेण्याचाही प्रयत्न करत असतो.
ही संधी मला पुन्हा नव्याने "तन्वी अमित" यांच्या "सुखन" माध्यमातून मिळाली. 

या ललित गद्य प्रकारातील पुस्तकांतून एकाचवेळी आपल्याला  जिंदगी गुलजार है..! च्या माध्यमातून गुलजार भेटत असतात, माहलका चंदा भेटत असते, जावेद अख्तर, साहिल सहरी नैनीताली, कफिल आजर अमरोहवी, कैफी आझमी, गुलाम रब्बानी ताबाॅ, निदा फाजली, जौन एलिया, मेहंदी हसन, आशुफ्ता चंगेजी अश्या अनेक शायर अन् गझलकरांचे लेखन, शेरो शायरी आपल्याला या पुस्तकातून वाचायला भेटते.

हे सगळं कधीतरी आपल्या आयुष्यातील आठवणींचा पट उलगडत, त्याच्याशी जुळवून घेत लेखिका "तन्वी अमित" या शायरीशी जोडू बघतात. अन् ललित माध्यमातून ते लिखित आपल्या समोर त्या मांडतात.

मग त्यातून कधीतरी उलगडत जाणारा त्यांचा भूतकाळ असो किंवा लेखिकेचा भविष्यकाळ, वर्तमानकाळ शेरो शायरी, गझल लिहून आपल्या समोर ज्यांनी आपली उभी हयात लिखित स्वरूपात ठेवली ते हे शायर, गझलकार यांचं आयुष्य आपल्याला "तन्वी अमित" या उर्दू भाषेचा आधार घेत शेरो-शायरीच्या माध्यमातून त्यास ललित लेखनाची जोड देत सोबतीने त्यांच्या आयुष्यातील काही घटनांचे खुलासे देत आपल्या समोर मांडू बघतात.
जे काही हे सर्व खूप सुहृदय असं काहीसं वाटणारं आहे.

यामुळेच हे पुस्तक हळूवार खुलत जाते अन् आपण त्याला समजून घेत वाचत राहतो. आपण वाचत राहतो अन् आपल्याला भेटत राहता वरील सर्व शायर, गझलकार,लेखिका "तन्वी अमित" यांचं उर्दू शायरी, भाषेप्रतीचं प्रेम अन् खूप काही..!

"तन्वी अमित" यांचं सुखन मधील उर्दू भाषेला जोडून केलेलं ललित लेखन हे खूप सुहृदय अन् संवेदनशील, काळजाचा ठाव घेणारं असं आहे. इथे अनेकवेळा त्यांच्या लेखणीतून आपल्या माणसांप्रती, आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांप्रती त्यांचं मन शायरीचा आधार घेत जेव्हा हे ललित लेखन करतं तेव्हा कुठेतरी हळवेपणाची लकेर त्यांच्या लिखाणात येते अन् हेच त्यांच्या लिखाणाला उजवं ठरवते.

त्यांचं ललित गद्य प्रकारातील हे पुस्तक शायरीला जोडून केलेल्या प्रगल्भ विचारांच्या विचारसरणीने ओतप्रोत भरलेले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार, त्यांच्या संवेदनशील,हळव्या मनाची लकेर, छटा त्यांच्या लिखाणातून वेळोवेळी दिसून येते.

उर्दू भाषेप्रती असलेली जवळीक, गोडवा अन् तन्वी अमित यांचं लेखन उर्दू अन् शायरी, त्यांचं त्यांना उजवं ठरवणारं ललित अश्या एकूण सर्व गोष्टींना एकत्रित घेऊन त्यांनी केलेलं हे ललित गद्य शायरीपर लेखन उर्दू भाषेच्या नवख्या चाहता वर्गाला एक नवीन समंजस पायवाट देतं आणि एक छानशी भेट "सुखन" माध्यमातून देत आहे..

Written by, 
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड