मुख्य सामग्रीवर वगळा

"सुखन"

"सुखन"


लेखिका, कवयित्री, ब्लाॅगर आणि एक सह्रदयी व्यक्तीमत्व असलेल्या "तन्वी अमित" यांचं "सुखन" हे ललित गद्य प्रकारातील पुस्तक ३० नोव्हेंबरला मला मनस्वी, सप्रेम भेट मिळाले. "आर्ष पब्लिकेशन्स, पुणे" यांनी प्रकाशित केलेले "१४४" पृष्ठसंख्या असलेलं हे सुंदर असं पुस्तक.

साधारण जानेवारीमध्ये कुठल्याश्या दोन दिवसांच्या उसवत्या सांजवेळी हे पुस्तक मी वाचून संपवलं. परंतू वेळेअभावी या पुस्तकाबद्दल लिहायला काही जमत नव्हतं, अखेरीस काल सायंकाळी वेळ काढून हे असं लिहायला घेतलं अन् लिहत राह्यलो.

खरंतर मी काय लिहतो मला माहित नाही. ते ना धड पुस्तक परीक्षण ठरेल किंवा ना धड पुस्तक अभिप्राय. पण मनात आलं की आपण ह्या पुस्तकाबद्दल लिहायला हवं अन् लिहायला घेतलं.

पुस्तक येण्यापूर्वी पुस्तकाची वाट मी बघतच होतो. पुस्तक जेव्हा हातात पडले तेव्हा प्रथमतः तर मला पुस्तकाची हार्डबाउंड, हार्डकव्हर रुपात केलेली बांधणी खूप आवडली. जी पुस्तकाची शोभा वाढवते. मला स्वतःला हार्डबाउंड, हार्डकव्हर स्वरूपातील पुस्तके खूप आवडत असल्याने, हे पुस्तक नेहमीच अजूनच अधिकच जवळचे वाटणारे असेल.

थोडक्यात पुस्तकाबद्दल ;

लेखिका, कवयित्री, ब्लाॅगर आणि एक सह्रदयी व्यक्तीमत्व असलेल्या "तन्वी अमित" यांचे हे ललित गद्य प्रकारातील पुस्तक "सुखन" माझ्या हाती पडले अन् पुढे कित्येक दिवस ते माझ्या बुकशेल्फशी खेळत राहिलं. कारण हेच की पुस्तकाचं खूप सुंदर असलेलं मुखपृष्ठ.

प्रेम करायला शिकवणारी भाषा व उर्दू भाषेतील, गोडवा, लहेजा, अदब यामुळे उर्दू भाषा त्यातील शेरो शायरी मला पसंत होतीच अन् कित्येकदा वाचनाच्या माध्यमातून मी ती शिकण्याचा, आधिकाआधिक जाणून, समजून घेण्याचाही प्रयत्न करत असतो.
ही संधी मला पुन्हा नव्याने "तन्वी अमित" यांच्या "सुखन" माध्यमातून मिळाली. 

या ललित गद्य प्रकारातील पुस्तकांतून एकाचवेळी आपल्याला  जिंदगी गुलजार है..! च्या माध्यमातून गुलजार भेटत असतात, माहलका चंदा भेटत असते, जावेद अख्तर, साहिल सहरी नैनीताली, कफिल आजर अमरोहवी, कैफी आझमी, गुलाम रब्बानी ताबाॅ, निदा फाजली, जौन एलिया, मेहंदी हसन, आशुफ्ता चंगेजी अश्या अनेक शायर अन् गझलकरांचे लेखन, शेरो शायरी आपल्याला या पुस्तकातून वाचायला भेटते.

हे सगळं कधीतरी आपल्या आयुष्यातील आठवणींचा पट उलगडत, त्याच्याशी जुळवून घेत लेखिका "तन्वी अमित" या शायरीशी जोडू बघतात. अन् ललित माध्यमातून ते लिखित आपल्या समोर त्या मांडतात.

मग त्यातून कधीतरी उलगडत जाणारा त्यांचा भूतकाळ असो किंवा लेखिकेचा भविष्यकाळ, वर्तमानकाळ शेरो शायरी, गझल लिहून आपल्या समोर ज्यांनी आपली उभी हयात लिखित स्वरूपात ठेवली ते हे शायर, गझलकार यांचं आयुष्य आपल्याला "तन्वी अमित" या उर्दू भाषेचा आधार घेत शेरो-शायरीच्या माध्यमातून त्यास ललित लेखनाची जोड देत सोबतीने त्यांच्या आयुष्यातील काही घटनांचे खुलासे देत आपल्या समोर मांडू बघतात.
जे काही हे सर्व खूप सुहृदय असं काहीसं वाटणारं आहे.

यामुळेच हे पुस्तक हळूवार खुलत जाते अन् आपण त्याला समजून घेत वाचत राहतो. आपण वाचत राहतो अन् आपल्याला भेटत राहता वरील सर्व शायर, गझलकार,लेखिका "तन्वी अमित" यांचं उर्दू शायरी, भाषेप्रतीचं प्रेम अन् खूप काही..!

"तन्वी अमित" यांचं सुखन मधील उर्दू भाषेला जोडून केलेलं ललित लेखन हे खूप सुहृदय अन् संवेदनशील, काळजाचा ठाव घेणारं असं आहे. इथे अनेकवेळा त्यांच्या लेखणीतून आपल्या माणसांप्रती, आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांप्रती त्यांचं मन शायरीचा आधार घेत जेव्हा हे ललित लेखन करतं तेव्हा कुठेतरी हळवेपणाची लकेर त्यांच्या लिखाणात येते अन् हेच त्यांच्या लिखाणाला उजवं ठरवते.

त्यांचं ललित गद्य प्रकारातील हे पुस्तक शायरीला जोडून केलेल्या प्रगल्भ विचारांच्या विचारसरणीने ओतप्रोत भरलेले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार, त्यांच्या संवेदनशील,हळव्या मनाची लकेर, छटा त्यांच्या लिखाणातून वेळोवेळी दिसून येते.

उर्दू भाषेप्रती असलेली जवळीक, गोडवा अन् तन्वी अमित यांचं लेखन उर्दू अन् शायरी, त्यांचं त्यांना उजवं ठरवणारं ललित अश्या एकूण सर्व गोष्टींना एकत्रित घेऊन त्यांनी केलेलं हे ललित गद्य शायरीपर लेखन उर्दू भाषेच्या नवख्या चाहता वर्गाला एक नवीन समंजस पायवाट देतं आणि एक छानशी भेट "सुखन" माध्यमातून देत आहे..

Written by, 
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...