मुख्य सामग्रीवर वगळा

अस्वस्थ मनाची न सुटलेली गणितं अन् भटकंती..!

अस्वस्थ मनाची न सुटलेली गणितं अन् भटकंती..!

दौंड कोर्ड लाईन स्टेशन मला नेहमीच गूढ वाटत आलं आहे. काही वेळापूर्वी तिथून महाराष्ट्र एक्सप्रेसने घराच्या दिशेनं निघालो आहे. ही वेळ मोजली तर या स्टेशनवरून तिसऱ्यांदा घरी निघालो आहे.

आज जरा फावला वेळ जास्त असल्यामुळे सायंकाळी सहा वाजताच स्टेशनला आलेलो होतो. आलेलो म्हणजे, खूप भटकंती करत आलेलो होतो. मला वाटलेले चाळीसगांव ट्रेन दौंडचं शहरातील स्टेशन आहे तिथून असावी म्हणून पायी तिथपर्यंत गेलो.
तिथं कळलं की, इथे ट्रेन लागत नाही. मग मोबाईलवर गुगल मॅप चालू केलं चार साडेचार की.मी अंतर गुगल मॅप दाखवत होतं. मग काय पायीच जायचं ठरवलं. दिवसभर भटकलो ते एकूण अंतर १३ की.मी झालं होतं.

नवीन शहर म्हंटले की मला फारसे अर्जंट असेल तरच मी तेथील स्थानिक साधनांनी प्रवास करतो. नाहीतर माझा कल असतो की पायीच फिरून इथली लोकं, हा परिसर ओळखीचा करून घ्यावा, नजरेखाली घालून घ्यावा. म्हणजे पुढे कधी आलं तर कुठलेही प्रॉब्लेम्स येत नाही.

असंच साधारण महिन्याभरापूर्वी पुणे स्टेशनवर जाताना केलेलं अन् दिवसभर जेव्हा मोबाईलवर किती फिरलो हे चेक केलं तर १९ की.मी मी या अनोळखी शहरात पाठीला बॅग, शर्टींग केलेला ड्रेस, ब्लॅक ऑफीशियल शूज घातलेला मी मनुष्य भटकत होतो. घामाघूम झालेला, केस विस्कटलेले, फिरत होतो.

तो परिसरही बराच सधन म्हणावा अश्या लोकांचा होता. कल्याणी नगर अख्खं पायी भटकून न्यू गुगलच्या ऑफीसपर्यंत जाऊन, सेरेब्रम आयटी पार्कमधील काही ऑफीस अश्या अवतारात धुंडाळून, भेट देऊन मी भटकत होतो.

माझ्याच वयातील पाच-सहा मुलामुलींच्या असलेल्या घोळक्याला या ऑफीसेसचा पत्ता विचारला तेव्हा त्यांनी काय काम..? असं विचारलं. अश्यावेळी मी सहज सांगून जातो इंटरव्ह्यूसाठी आलो आहे. पण ते कितपत खरं असतं मलाच माहिती.

ती मुलं माझा चेहरा बघून मला शिक्षण विचारता एम.बी.ए सांगितलं की त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मी पुढे तीन-चार मिनिटं बघत राहतो. त्यांच्या बोलण्यातून त्यांना न्याहाळत असतो. मग मीच आवरते घेऊन पाय काढतो, ती मुलंमुली मला कॉफी घेणार का..? विचारता मी त्यांना विचारतो पहिल्या भेटीत कॉफी..? पुढे ते बोलतात तुम्ही इथे जॉईन केलं तर आमचे सिनियर असाल.

आता काय बोलावं मग मीच त्यांना कॉफी प्यायला घेऊन जातो अन् औपचारिक गप्पा करून ऑफीसची भेट घेऊन भटकंती करत राहतो. जी निरर्थक वाटेल कित्येकांना.

असो, तर असं आजही भटकत होतो. सायंकाळचं उतरतीचं ऊन आज अजूनच रौद्र रूप धारण केलेलं होतं. अन् मी उड्डाणपुलावरून पायी भटकंती करून तो उतरून, त्याच्या खालच्या पुलाखालून स्टेशनकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रेकच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या रस्त्यानं हे सगळं न्याहाळत चालत होतो.

दूरपर्यंत एकटा-एकटा सगळं कसं प्री प्लेन वाटावं असं पॉश केलेलं रस्त्याचं काम. चहुबाजूने केलेल्या उंच भिंती एक अनामिक भीती इथे देऊन जातात. 
पण स्टेशन आलं की मिळणारा सुखद गारवा काही और आनंद देऊन जातो.

मग स्टेशनवर असलेल्या नळावर फ्रेश होऊन एकमेव प्लॅटफॉर्म असलेल्या या स्टेशनवर आपली हक्काची खुर्ची मिळवून बसून रहायचं, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना न्याहाळत रहायचं. शहराच्या मानाने इथे फार गर्दी नसते. दहा-पंधरा मिनिटांनी एखादी ट्रेन येते डोळ्यांसमोरून निघून जाते.

अनेक परप्रांतीय कामगार वर्ग प्लॅटफॉर्मवरच झोपलेला असतो. माझ्या वयाचा तरुण दारू पिऊन तर्र होऊन त्याच प्लॅटफॉर्मवर झोपलेला असतो. वीस-एकवीस वर्षांची त्याची तरणी बायको तिच्या लहानग्याला घेऊन निर्विकारपणे आपल्याकडे बघत बसलेली असते. का बघत असेल..? याला उत्तर नाही.

आपल्यासारखी शहरं जवळ केलेली माणसं अश्या व्यक्तींना टाळता. पण; माझ्याच्याने हे होत नाही अन् मी बोलून घेतो तिच्याशी. तिचं दुःख आपल्या बोलण्यानं जर रितं होत असेल तर काय हासिल करायचं आहे.

पुढे पाच-सहा तासांच्या या बैठकीत अख्खं स्टेशन फिरून होतं. त्या विशी-एकविशीतल्या स्त्रीसोबत एखादा चहा घेऊन लहानग्याला एखादा बिस्कीट पुडा देऊ करतो अन् बघत बसतो शून्यात नजर लाऊन येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना. जसं ती मला बघत असते.

वेटींग रुममध्ये विश्रांती घेतो मोबाईल चार्ज करतो, पाणी पितो, फ्रेश होतो अन् माझी ट्रेन आली की जनरल डब्यात जागा मिळवून त्याने प्रवास करतो. कारण हेच की पुन्हा इथे अनेक कथा उलगडल्या जातात, भेटत जातात.

पाठमोहरं वळून बघितलं की ती स्त्री अजूनही आपल्याला निर्विकारपणे न्याहाळत राहते, जोवर ट्रेन स्टेशनपासून वळसा घेऊन निघत नाही. 
अन् मग माझ्या जाण्याने स्टेशन तिला अजूनच एकाकी झालेलं असतं अन् मला हे सगळं भयाण गूढ वाटावं असं काही वाटत असतं.

अनेक कथा आहे, फक्त माणसं भेटायला हवी मग त्या अश्या उलगडत जातात.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड