मुख्य सामग्रीवर वगळा

अस्वस्थ मनाची न सुटलेली गणितं अन् भटकंती..!

अस्वस्थ मनाची न सुटलेली गणितं अन् भटकंती..!

दौंड कोर्ड लाईन स्टेशन मला नेहमीच गूढ वाटत आलं आहे. काही वेळापूर्वी तिथून महाराष्ट्र एक्सप्रेसने घराच्या दिशेनं निघालो आहे. ही वेळ मोजली तर या स्टेशनवरून तिसऱ्यांदा घरी निघालो आहे.

आज जरा फावला वेळ जास्त असल्यामुळे सायंकाळी सहा वाजताच स्टेशनला आलेलो होतो. आलेलो म्हणजे, खूप भटकंती करत आलेलो होतो. मला वाटलेले चाळीसगांव ट्रेन दौंडचं शहरातील स्टेशन आहे तिथून असावी म्हणून पायी तिथपर्यंत गेलो.
तिथं कळलं की, इथे ट्रेन लागत नाही. मग मोबाईलवर गुगल मॅप चालू केलं चार साडेचार की.मी अंतर गुगल मॅप दाखवत होतं. मग काय पायीच जायचं ठरवलं. दिवसभर भटकलो ते एकूण अंतर १३ की.मी झालं होतं.

नवीन शहर म्हंटले की मला फारसे अर्जंट असेल तरच मी तेथील स्थानिक साधनांनी प्रवास करतो. नाहीतर माझा कल असतो की पायीच फिरून इथली लोकं, हा परिसर ओळखीचा करून घ्यावा, नजरेखाली घालून घ्यावा. म्हणजे पुढे कधी आलं तर कुठलेही प्रॉब्लेम्स येत नाही.

असंच साधारण महिन्याभरापूर्वी पुणे स्टेशनवर जाताना केलेलं अन् दिवसभर जेव्हा मोबाईलवर किती फिरलो हे चेक केलं तर १९ की.मी मी या अनोळखी शहरात पाठीला बॅग, शर्टींग केलेला ड्रेस, ब्लॅक ऑफीशियल शूज घातलेला मी मनुष्य भटकत होतो. घामाघूम झालेला, केस विस्कटलेले, फिरत होतो.

तो परिसरही बराच सधन म्हणावा अश्या लोकांचा होता. कल्याणी नगर अख्खं पायी भटकून न्यू गुगलच्या ऑफीसपर्यंत जाऊन, सेरेब्रम आयटी पार्कमधील काही ऑफीस अश्या अवतारात धुंडाळून, भेट देऊन मी भटकत होतो.

माझ्याच वयातील पाच-सहा मुलामुलींच्या असलेल्या घोळक्याला या ऑफीसेसचा पत्ता विचारला तेव्हा त्यांनी काय काम..? असं विचारलं. अश्यावेळी मी सहज सांगून जातो इंटरव्ह्यूसाठी आलो आहे. पण ते कितपत खरं असतं मलाच माहिती.

ती मुलं माझा चेहरा बघून मला शिक्षण विचारता एम.बी.ए सांगितलं की त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मी पुढे तीन-चार मिनिटं बघत राहतो. त्यांच्या बोलण्यातून त्यांना न्याहाळत असतो. मग मीच आवरते घेऊन पाय काढतो, ती मुलंमुली मला कॉफी घेणार का..? विचारता मी त्यांना विचारतो पहिल्या भेटीत कॉफी..? पुढे ते बोलतात तुम्ही इथे जॉईन केलं तर आमचे सिनियर असाल.

आता काय बोलावं मग मीच त्यांना कॉफी प्यायला घेऊन जातो अन् औपचारिक गप्पा करून ऑफीसची भेट घेऊन भटकंती करत राहतो. जी निरर्थक वाटेल कित्येकांना.

असो, तर असं आजही भटकत होतो. सायंकाळचं उतरतीचं ऊन आज अजूनच रौद्र रूप धारण केलेलं होतं. अन् मी उड्डाणपुलावरून पायी भटकंती करून तो उतरून, त्याच्या खालच्या पुलाखालून स्टेशनकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रेकच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या रस्त्यानं हे सगळं न्याहाळत चालत होतो.

दूरपर्यंत एकटा-एकटा सगळं कसं प्री प्लेन वाटावं असं पॉश केलेलं रस्त्याचं काम. चहुबाजूने केलेल्या उंच भिंती एक अनामिक भीती इथे देऊन जातात. 
पण स्टेशन आलं की मिळणारा सुखद गारवा काही और आनंद देऊन जातो.

मग स्टेशनवर असलेल्या नळावर फ्रेश होऊन एकमेव प्लॅटफॉर्म असलेल्या या स्टेशनवर आपली हक्काची खुर्ची मिळवून बसून रहायचं, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना न्याहाळत रहायचं. शहराच्या मानाने इथे फार गर्दी नसते. दहा-पंधरा मिनिटांनी एखादी ट्रेन येते डोळ्यांसमोरून निघून जाते.

अनेक परप्रांतीय कामगार वर्ग प्लॅटफॉर्मवरच झोपलेला असतो. माझ्या वयाचा तरुण दारू पिऊन तर्र होऊन त्याच प्लॅटफॉर्मवर झोपलेला असतो. वीस-एकवीस वर्षांची त्याची तरणी बायको तिच्या लहानग्याला घेऊन निर्विकारपणे आपल्याकडे बघत बसलेली असते. का बघत असेल..? याला उत्तर नाही.

आपल्यासारखी शहरं जवळ केलेली माणसं अश्या व्यक्तींना टाळता. पण; माझ्याच्याने हे होत नाही अन् मी बोलून घेतो तिच्याशी. तिचं दुःख आपल्या बोलण्यानं जर रितं होत असेल तर काय हासिल करायचं आहे.

पुढे पाच-सहा तासांच्या या बैठकीत अख्खं स्टेशन फिरून होतं. त्या विशी-एकविशीतल्या स्त्रीसोबत एखादा चहा घेऊन लहानग्याला एखादा बिस्कीट पुडा देऊ करतो अन् बघत बसतो शून्यात नजर लाऊन येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना. जसं ती मला बघत असते.

वेटींग रुममध्ये विश्रांती घेतो मोबाईल चार्ज करतो, पाणी पितो, फ्रेश होतो अन् माझी ट्रेन आली की जनरल डब्यात जागा मिळवून त्याने प्रवास करतो. कारण हेच की पुन्हा इथे अनेक कथा उलगडल्या जातात, भेटत जातात.

पाठमोहरं वळून बघितलं की ती स्त्री अजूनही आपल्याला निर्विकारपणे न्याहाळत राहते, जोवर ट्रेन स्टेशनपासून वळसा घेऊन निघत नाही. 
अन् मग माझ्या जाण्याने स्टेशन तिला अजूनच एकाकी झालेलं असतं अन् मला हे सगळं भयाण गूढ वाटावं असं काही वाटत असतं.

अनेक कथा आहे, फक्त माणसं भेटायला हवी मग त्या अश्या उलगडत जातात.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...