मुख्य सामग्रीवर वगळा

अस्वस्थ मनाची न सुटलेली गणितं अन् भटकंती..!

अस्वस्थ मनाची न सुटलेली गणितं अन् भटकंती..!

दौंड कोर्ड लाईन स्टेशन मला नेहमीच गूढ वाटत आलं आहे. काही वेळापूर्वी तिथून महाराष्ट्र एक्सप्रेसने घराच्या दिशेनं निघालो आहे. ही वेळ मोजली तर या स्टेशनवरून तिसऱ्यांदा घरी निघालो आहे.

आज जरा फावला वेळ जास्त असल्यामुळे सायंकाळी सहा वाजताच स्टेशनला आलेलो होतो. आलेलो म्हणजे, खूप भटकंती करत आलेलो होतो. मला वाटलेले चाळीसगांव ट्रेन दौंडचं शहरातील स्टेशन आहे तिथून असावी म्हणून पायी तिथपर्यंत गेलो.
तिथं कळलं की, इथे ट्रेन लागत नाही. मग मोबाईलवर गुगल मॅप चालू केलं चार साडेचार की.मी अंतर गुगल मॅप दाखवत होतं. मग काय पायीच जायचं ठरवलं. दिवसभर भटकलो ते एकूण अंतर १३ की.मी झालं होतं.

नवीन शहर म्हंटले की मला फारसे अर्जंट असेल तरच मी तेथील स्थानिक साधनांनी प्रवास करतो. नाहीतर माझा कल असतो की पायीच फिरून इथली लोकं, हा परिसर ओळखीचा करून घ्यावा, नजरेखाली घालून घ्यावा. म्हणजे पुढे कधी आलं तर कुठलेही प्रॉब्लेम्स येत नाही.

असंच साधारण महिन्याभरापूर्वी पुणे स्टेशनवर जाताना केलेलं अन् दिवसभर जेव्हा मोबाईलवर किती फिरलो हे चेक केलं तर १९ की.मी मी या अनोळखी शहरात पाठीला बॅग, शर्टींग केलेला ड्रेस, ब्लॅक ऑफीशियल शूज घातलेला मी मनुष्य भटकत होतो. घामाघूम झालेला, केस विस्कटलेले, फिरत होतो.

तो परिसरही बराच सधन म्हणावा अश्या लोकांचा होता. कल्याणी नगर अख्खं पायी भटकून न्यू गुगलच्या ऑफीसपर्यंत जाऊन, सेरेब्रम आयटी पार्कमधील काही ऑफीस अश्या अवतारात धुंडाळून, भेट देऊन मी भटकत होतो.

माझ्याच वयातील पाच-सहा मुलामुलींच्या असलेल्या घोळक्याला या ऑफीसेसचा पत्ता विचारला तेव्हा त्यांनी काय काम..? असं विचारलं. अश्यावेळी मी सहज सांगून जातो इंटरव्ह्यूसाठी आलो आहे. पण ते कितपत खरं असतं मलाच माहिती.

ती मुलं माझा चेहरा बघून मला शिक्षण विचारता एम.बी.ए सांगितलं की त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मी पुढे तीन-चार मिनिटं बघत राहतो. त्यांच्या बोलण्यातून त्यांना न्याहाळत असतो. मग मीच आवरते घेऊन पाय काढतो, ती मुलंमुली मला कॉफी घेणार का..? विचारता मी त्यांना विचारतो पहिल्या भेटीत कॉफी..? पुढे ते बोलतात तुम्ही इथे जॉईन केलं तर आमचे सिनियर असाल.

आता काय बोलावं मग मीच त्यांना कॉफी प्यायला घेऊन जातो अन् औपचारिक गप्पा करून ऑफीसची भेट घेऊन भटकंती करत राहतो. जी निरर्थक वाटेल कित्येकांना.

असो, तर असं आजही भटकत होतो. सायंकाळचं उतरतीचं ऊन आज अजूनच रौद्र रूप धारण केलेलं होतं. अन् मी उड्डाणपुलावरून पायी भटकंती करून तो उतरून, त्याच्या खालच्या पुलाखालून स्टेशनकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रेकच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या रस्त्यानं हे सगळं न्याहाळत चालत होतो.

दूरपर्यंत एकटा-एकटा सगळं कसं प्री प्लेन वाटावं असं पॉश केलेलं रस्त्याचं काम. चहुबाजूने केलेल्या उंच भिंती एक अनामिक भीती इथे देऊन जातात. 
पण स्टेशन आलं की मिळणारा सुखद गारवा काही और आनंद देऊन जातो.

मग स्टेशनवर असलेल्या नळावर फ्रेश होऊन एकमेव प्लॅटफॉर्म असलेल्या या स्टेशनवर आपली हक्काची खुर्ची मिळवून बसून रहायचं, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना न्याहाळत रहायचं. शहराच्या मानाने इथे फार गर्दी नसते. दहा-पंधरा मिनिटांनी एखादी ट्रेन येते डोळ्यांसमोरून निघून जाते.

अनेक परप्रांतीय कामगार वर्ग प्लॅटफॉर्मवरच झोपलेला असतो. माझ्या वयाचा तरुण दारू पिऊन तर्र होऊन त्याच प्लॅटफॉर्मवर झोपलेला असतो. वीस-एकवीस वर्षांची त्याची तरणी बायको तिच्या लहानग्याला घेऊन निर्विकारपणे आपल्याकडे बघत बसलेली असते. का बघत असेल..? याला उत्तर नाही.

आपल्यासारखी शहरं जवळ केलेली माणसं अश्या व्यक्तींना टाळता. पण; माझ्याच्याने हे होत नाही अन् मी बोलून घेतो तिच्याशी. तिचं दुःख आपल्या बोलण्यानं जर रितं होत असेल तर काय हासिल करायचं आहे.

पुढे पाच-सहा तासांच्या या बैठकीत अख्खं स्टेशन फिरून होतं. त्या विशी-एकविशीतल्या स्त्रीसोबत एखादा चहा घेऊन लहानग्याला एखादा बिस्कीट पुडा देऊ करतो अन् बघत बसतो शून्यात नजर लाऊन येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना. जसं ती मला बघत असते.

वेटींग रुममध्ये विश्रांती घेतो मोबाईल चार्ज करतो, पाणी पितो, फ्रेश होतो अन् माझी ट्रेन आली की जनरल डब्यात जागा मिळवून त्याने प्रवास करतो. कारण हेच की पुन्हा इथे अनेक कथा उलगडल्या जातात, भेटत जातात.

पाठमोहरं वळून बघितलं की ती स्त्री अजूनही आपल्याला निर्विकारपणे न्याहाळत राहते, जोवर ट्रेन स्टेशनपासून वळसा घेऊन निघत नाही. 
अन् मग माझ्या जाण्याने स्टेशन तिला अजूनच एकाकी झालेलं असतं अन् मला हे सगळं भयाण गूढ वाटावं असं काही वाटत असतं.

अनेक कथा आहे, फक्त माणसं भेटायला हवी मग त्या अश्या उलगडत जातात.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...