मुख्य सामग्रीवर वगळा

रेल लाईन अन् प्रवास..!

रेल लाईन अन् प्रवास..!

पुणे मागं पडलं अन् झेलम एक्सप्रेस तिच्या मर्यादित वेगानं चालू लागली, आता आठ तास मी निवांत होतो. रात्रीचे दहा वाजले होते, दौंडच्या जवळपास रेल्वे रुळावर चालत होती. वेळीच तिकीट काढलं असल्याने, जनरलचं तिकीट खिश्यात घेऊन मी स्लीपर कोचमध्ये मला जागा शोधत होतो.

म्हटलं नशीब आजमावून बघूया भेटली जागा तर प्रवास सुखाचा होईल पण; तसले काही चिन्हं दिसत नव्हते. अन् मी काही तोंडानं जागा द्या..! असं प्रवाश्यांना म्हणणार नव्हतो, जरी रेल्वे संपूर्ण मोकळी होती.

मलाही कारण हवं होतं. शेवटी दोन डब्ब्यांना जोडणाऱ्या जागेमध्ये मी डब्याच्या दरवाच्याजवळ बसून प्रवास सुरू केला. छान वातावरण होतं, झेलम एक्सप्रेस मला आवडण्याचं कारण होतं की ती माणसाला तिच्या धावण्याचं जीवावर येईल इतकीही जोरात धावत नाही. की, इतकंही हळुवार चालत नाही की आपण झोप येऊन तिथेच पेंगुळलेल्या अवस्थेत झोपून राहू. ती तिचं चालत होती ठरलेल्या स्टेशनवर प्रवाश्यांना तिच्या आत भरून घेत होती.

अधून मधून चहा, जेवणाचे कंटेनर, इतर तत्सम पदार्थ, वॉटर बॉटल विकणारे विक्रेते येत होते. रेल्वेचा प्रवास नवा असला तरी आता बरीच ओळख या प्रवासाची झाली आहे. त्यामुळं विक्रेते कसे प्रवाश्यांना फसवतात, हे माहीत असल्याने रेल्वेत मी खरेदी जरा आवरतीच घेत असतो.

दोन तास झाले एक सुफी अंकल जवळ येऊन बसले इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्या. कदाचित ते विनातिकीट प्रवास करत असावे किंवा त्यांचं स्टेशन आलं ते त्यांच्या मोरपिसांना माझ्या डोक्यावर ठेऊन मला आशीर्वाद देऊन निघुन गेले.

पुढच्या स्टेशनला पुन्हा एक यूपीची वडीलधारी व्यक्ती जवळ बसली. ट्रेनचा प्रवास करण्यासाठी नवखी असावी असं वाटून गेलं. कारण तिने मला तिकीट दाखवलं ते जनरलचं होतं, त्यांना म्हंटले हा स्लीपर क्लास आहे,ते घाबरले त्यांना माझं तिकीट दाखवत शांत केलं अन् पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला.

रेल नीलची एक बॉटल घेऊन पाणी पित मी दरवाजाजवळ बसून प्रवास करत होतो. जवळच बाथरूम असल्यानं येणारी-जाणारी लोकं जवळून जात होती. तो वास सगळं असह्य होतं पण; हे सगळं जगणं अनुभवायचं म्हणून माझा हा प्रवास होत होता. 

पुढे काही बिहारी दहा-बारा तरुण मुलं आमच्या जवळ येऊन बसले. मी आपलं बाहेर निवांत चालणारी रेल्वे अन् बाहेर काळोखात दिसणारं निसर्गसौंदर्य बघत माझ्या प्रवासात रममान होतो. अधूनमधून ते अंकल माझ्याशी गप्पा करत होते अन् आम्ही बोलत बसलो होतो.

साधारण एकच्या दरम्यान टीसी आला त्याला तिकीट दाखवलं. ज्या अदबीने मी तिकीट दाखवलं अन् ज्या पद्धतीने मी त्यांच्याशी बोललो त्यांनी मला सांगितलं अभी तुम दोनो जनरल डिब्बे मे चले जाओ क्यू की यह रेल्वे नियम मे नहीं बैठता. आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता, त्यानं आम्हाला फाईन दिला नाही अन् शेवटी त्याची नोकरी होती. मग आम्ही दोघे ते अंकल अन् मी ती मुलं का माहित नाही पण पुढच्या स्टेशनला उतरली.

आता सहा डब्बे पास करून आम्ही जनरल डब्ब्यात आलो होतो, अजून चार तास प्रवास करायचा होता. डब्ब्यात बसायला नाहीतर उभे रहायला जागा नव्हती, पण; इथे खऱ्या अर्थाने दुनियादारी कळते म्हणून मी शांतपणे पुन्हा दाटीवाटी करून दरवाज्याच्या बाजुला बसून राहीलो.

श्वास कोंडावा इतकी गर्दी आता ट्रेनमध्ये होती, कित्येक माणसं स्वतःला adjust करू जशी जागा भेटेल तसे बसले होते. कित्येक स्त्रिया बर्थवर सीटच्या खाली पाय लांबून झोपून गेल्या होत्या. कित्येक लहानगे घामाने थपथप होऊन आईच्या कुशीत विसावले होते.

एक तरुण पंचविशीतील स्त्री नुकतीच अपत्य नको म्हणून करत असलेलं ऑपरेशन होऊन दोन दिवस उलटल्या नंतर रेल्वेतून तिच्या दादल्या अन् दोन लेकांसोबत जनरल डब्ब्यातून प्रवास करत होती. तिला प्रवास करणं असह्य होत होतं, अगदी पोटावर हात ठेऊन ती आळोखे पिळोखे देत सीटवर मान खाली घालून झोपण्याचा प्रयत्न करत होती.तिचा दादला दोन्ही लहानग्या मुलांना सांभाळत होता जी जरा आचपळ अशी होती.

अधून मधून तिच्या नजरेशी नकळत नजर भिडायची तिचं त्रस्त होणं नकोसं वाटायचं अन् तिला त्या त्रासामुळे होत असलेली तिची नको ती अवस्था. अखेर न राहून उठलो तिच्या बाजूला असलेल्या चाळीशीतील दोन पुरुषांना उठवलं अन् तिला तिथं झोपायला सांगितलं, तिचा दादला बघत होता त्याला तिचा आधार होण्यासाठी तिच्याजवळ बसायला सांगितलं. गर्दी कमी होत नव्हती अन् प्रवास काही केली संपत नव्हता.

एका स्टेशनवर ट्रेन थांबली सोबत असलेल्या वडील माणसाने दोन वडापाव त्याच्या पैश्यातून आणले. त्याला पैसे द्यायला लागलो तर बोलला आप जैसे मेरे बेटे जैसे है, शरमिंदा ना करो हमे..! काय बोलणार होतो. निःशब्द होतो अगदी.

दिवसभराची भटकंती, रेल्वेचा असा हा प्रवास पाववडा हातात घेतला, घास घेतला पण गळ्यातून तो काही खाली उतरत नव्हता. इतका त्रास झाला की अक्षरशः डोळ्यांनी आसवांना मोकळी वाट करून दिली. पाणी प्यायलो मग कुठं बरं वाटलं, संपूर्ण वडापाव खाऊन घेतला आता जरा बरे वाटत होते. 

वडीलधाऱ्या त्या माणसाला बिडी पिण्याची तलफ होती, त्यानं सांगितलं बाथरूम पासून बाजूला झालो. तो आत जाऊन बिडी पिऊन आला. होणारा त्रास, डब्ब्यात घडणाऱ्या घटना मला माझं उत्तर भेटलं होतं प्रवास सफल झाला होता.

एक तासाने माझं स्टेशन येईल हे कळलं अन् मग निवांत बघत राहिलो. सगळ्या प्रवाश्यांना बघत, ऑपरेशन झालेली ती तरुणी शांत पहुडली तिचे लहानगे अन् तिचा दादला खिडकीतून येणाऱ्या हवेत शांत झोपले होते.

ती डोळ्यांनी माझ्याशी बोलत होती, बराच वेळ हा डोळ्यांशी डोळ्यानं बोलण्याचा खेळ चालला. वेगळं काही केलं नव्हतं मी पण: सामान्य लोकांना जे करायला हवं होतं ते त्यांनी केलं नव्हतं. 

माझं स्टेशन आलं तिला येतो म्हणून तिच्या उश्याला ठेवलेली माझी बॅग तिच्याकडून घेतली अन् बॅग घालून गेटजवळ आलो. वडीलधारी ती व्यक्ती बाथरूमच्या दरवाजा जवळ असलेल्या मोकळ्या जागेत झोपली होती. तितकीच निर्धास्त जितकी ती स्त्री. कारण आल्यावर त्याला शब्दाने आधार दिला होता, वाटलं बोलावं त्याचाशी पण नको म्हटलं कारण त्याला अजून पूर्ण अठरा तास प्रवास करून त्याच्या कामाच्या ठिकाणी जायचं होतं. 

माझं स्टेशन आलं मी उतरलो चेहऱ्यावर एक अनामिक सुख झळकत होतं, आजचा हा प्रवास छान झाला होता. रात्रीचे दीड झाले होते अन् आता पुन्हा एसटी स्टँडवर उघड्यात पहाट होईपर्यंत झोपायचं होतं....

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...