मुख्य सामग्रीवर वगळा

"परका" - "अवधूत डोंगरे"

"परका" - "अवधूत डोंगरे"


गेले चार पाच दिवस वेळ भेटेल तसं "आल्बेर काम्यू" यांच्या "द आऊटसायडर" या कादंबरीचा "अवधूत डोंगरे" यांनी केलेला मराठी अनुवाद "परका" वाचत होतो. 

खूप सुंदर अन् लेखकाचं आयुष्याला गूढ वलय प्राप्त असल्यासारखं आयुष्य, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना सामान्य लोकांना रोजच्या व्यवहारात जन्म, मृत्यू या गोष्टींचं असलेलं सोयरसूतुक अन् लेखकाला या गोष्टींचं कुठलंही नसलेलं आकर्षण यामुळं आल्बेर काम्यू पहिल्या काही समासातच जवळचा वाटला अन् हे पुस्तकही जवळचं वाटलं. 

आल्बेर काम्यूसारखं एक वेगळं आयुष्य जगणारे माणसं पृथ्वीतलावर विरळच असतील. त्यांनी आयुष्यात काय केलं, किंवा लोकं काय म्हणतील हा प्रश्न त्यांना कधी पडत नाही. एकाकी राहून आयुष्य जगणं, एक आगळेवेगळे नकळत आयुष्याला वळण देऊन आयुष्य जगणं यात सुखून आहे. अन् हे गेली काही वर्ष मी अनुभवतो आहे, त्यामुळं आल्बेर काम्यूचं हे जगणं अन् त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला खूप पसंतीस पडला.

आपल्या कमाईमधून आपण आईला खुश नाही ठेऊ शकत म्हणून तिला वृद्ध आश्रमात ठेवणारा, आईच्या अंतिम संस्काराला गेलेला पण तिच्या जाण्याचं त्याला कुठलंही न झालेलं दुःख किंव्हा त्याच्या राहणीमानातून तसं दिसून येणे. आईचा अंतिमविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या प्रिय मैत्रिणी बरोबर चित्रपट बघायला जाणारा, तिच्या समवेत समुद्र किनाऱ्यावर जाणारा अन् अजून बरच काही यामुळे आल्बेर काम्यू वेगळा वाटला. तो खास लक्षात राहतो ते त्याच्या गूढ जगण्यामूळे.

अवधूत डोंगरे यांनी केलेला अनुवादही छान झाला आहे.
थोडक्यात पुस्तकाबद्दल,
आल्बेर काम्यू यांची ही कादंबरी फ्रेंच भाषेत "ले त्रांज" १९४२ साली भाषांतरित झाली, इंग्रजीत "द आऊटसायडर" म्हणून तिचं भाषांतर झालं अन् १९५७ साली साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळालेली ही कादंबरी. ही कादंबरी आजही वेळोवेळी कौतुकाचा, टीकेचा, चिकित्सेचा विषय होत राहिली आहे. तिच्या प्रकाशनाला ऐंशी वर्ष झाली असली तरी आजसुद्धा ही कादंबरी वेगवेगळ्या अर्थाना वाव देणारी ठरत आहे.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...