मुख्य सामग्रीवर वगळा

"परका" - "अवधूत डोंगरे"

"परका" - "अवधूत डोंगरे"


गेले चार पाच दिवस वेळ भेटेल तसं "आल्बेर काम्यू" यांच्या "द आऊटसायडर" या कादंबरीचा "अवधूत डोंगरे" यांनी केलेला मराठी अनुवाद "परका" वाचत होतो. 

खूप सुंदर अन् लेखकाचं आयुष्याला गूढ वलय प्राप्त असल्यासारखं आयुष्य, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना सामान्य लोकांना रोजच्या व्यवहारात जन्म, मृत्यू या गोष्टींचं असलेलं सोयरसूतुक अन् लेखकाला या गोष्टींचं कुठलंही नसलेलं आकर्षण यामुळं आल्बेर काम्यू पहिल्या काही समासातच जवळचा वाटला अन् हे पुस्तकही जवळचं वाटलं. 

आल्बेर काम्यूसारखं एक वेगळं आयुष्य जगणारे माणसं पृथ्वीतलावर विरळच असतील. त्यांनी आयुष्यात काय केलं, किंवा लोकं काय म्हणतील हा प्रश्न त्यांना कधी पडत नाही. एकाकी राहून आयुष्य जगणं, एक आगळेवेगळे नकळत आयुष्याला वळण देऊन आयुष्य जगणं यात सुखून आहे. अन् हे गेली काही वर्ष मी अनुभवतो आहे, त्यामुळं आल्बेर काम्यूचं हे जगणं अन् त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला खूप पसंतीस पडला.

आपल्या कमाईमधून आपण आईला खुश नाही ठेऊ शकत म्हणून तिला वृद्ध आश्रमात ठेवणारा, आईच्या अंतिम संस्काराला गेलेला पण तिच्या जाण्याचं त्याला कुठलंही न झालेलं दुःख किंव्हा त्याच्या राहणीमानातून तसं दिसून येणे. आईचा अंतिमविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या प्रिय मैत्रिणी बरोबर चित्रपट बघायला जाणारा, तिच्या समवेत समुद्र किनाऱ्यावर जाणारा अन् अजून बरच काही यामुळे आल्बेर काम्यू वेगळा वाटला. तो खास लक्षात राहतो ते त्याच्या गूढ जगण्यामूळे.

अवधूत डोंगरे यांनी केलेला अनुवादही छान झाला आहे.
थोडक्यात पुस्तकाबद्दल,
आल्बेर काम्यू यांची ही कादंबरी फ्रेंच भाषेत "ले त्रांज" १९४२ साली भाषांतरित झाली, इंग्रजीत "द आऊटसायडर" म्हणून तिचं भाषांतर झालं अन् १९५७ साली साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळालेली ही कादंबरी. ही कादंबरी आजही वेळोवेळी कौतुकाचा, टीकेचा, चिकित्सेचा विषय होत राहिली आहे. तिच्या प्रकाशनाला ऐंशी वर्ष झाली असली तरी आजसुद्धा ही कादंबरी वेगवेगळ्या अर्थाना वाव देणारी ठरत आहे.

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड