मुख्य सामग्रीवर वगळा

जगण्याची गणितं सुटलेला अवलिया..!

जगण्याची गणितं सुटलेला अवलिया..!


भर दुपारच्या या रणरणत्या उन्हात अस्वस्थतेच्या नोंदी मनाशी आधिकच वाढत जाता. आजचा दिवस मनाच्या या अवस्थांचा विचार केला की रोजच्या दिवसांसारखा नॉर्मल नाही याची प्रचिती येते.
अश्या दिवसाची सुरुवातच काही करावसं वाटत नाही या कारणाने होते अन् मी निरुद्देश फक्त भटकंती करत राहतो.

अश्या वाटांवरून जिथून क्वचितच माणसे जात असतील. भटकत असतो दिवसभर या चौकातून त्या चौकात, मनाशी काही मनाचे थांबे ठरवून. अश्यावेळी इतकं भटकूनही भूक लागत नाही. फक्त हे भटकणं चालू राहतं.
भर उन्हाच्या झळांना सोसत मी चालत राहतो. अवाढव्य वाढलेल्या चकमकीत वाढलेल्या शहराच्या एकांगाला असलेल्या बाभळीच्या रानांनी. 

काय हवं आहे..? का भटकत आहे..? याला उत्तरही नसतं ; पण मी भटकत राहतो जोवर थकत नाही तोवर.
या भटकंतीत एखाद्या पॉश वस्तीला लागून गेलो की मला तेथील पॉश आयुष्य जगणारी माणसं भंगार गोळा करणारा मुलगाही समजत असतील, नव्हे तर समजतातच.

कारण एक दोन वेळा त्यांचे बोल खाल्यावर हे कळूनही आलं होतं. पण मला याचं अखेर सायंकाळी फ्लॅटवर पोहचल्यावर विचार केला तर काहीसं वाईटही वाटलं नाही. भर दुपारच्या उन्हात हे आठ-दहा किमी निरुद्देश भटकत राहणं, माझं घामाघूम झालेलं शरीर बघून कोणीही मला काय समजतील याची मला त्यावेळी फिकीर नसतेच.

कधीतरी तहान लागली की शहरात असलेल्या पाणपोई मी जवळ करतो. साखळीत असलेल्या गल्लासात त्या रांजणातून पाणी घेऊन पोटभरून पिऊन घेतो‌. अगदी पोटाच्या आत जात असताना त्याचा गारवा पार आतापर्यंत जाणवत राहतो.

उंच असल्यानं गिल्लासाला बांधलेली साखळी माझ्यापर्यंत पोहचत नाही अन् मी खाली वाकून पाणी पिण्याचीही तसदी घेत नाही. अर्ध पाणी तोंडातून ओघळत खाली पडत राहते अन् माझी तहान क्षमत राहते.

तहान क्षमली की घटकभरचा विसावा म्हणून कोण्या मंदिरात, मशिदीत तात्पुरता आसरा भेटल किंवा एखाद्या बाभळीच्या रानात बाभळीच्या पडसावलीत अर्धवट हातातून निसटत्या सावलीत झोपून राहतो. 

कोण बघत असेल, कोण काय विचार करेल मला याची फारशी फिकीर नसते. कुठल्या अनामिक विचारांना घेऊनही हे होत नाही पण हे असं निरुद्देश भटकणं जेव्हा होतं तेव्हा खूप काही हाती लागलं असतं. मी अजूनच विचारांचा विचारांशी आधीन झालो असतो.

मग एखाद्या गल्लीतून शहरात वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या या गर्दीचा मी हिस्सा होऊन जातो. मानेशी ओघळणारा घाम टिपत मी चालत राहतो.
वेलसेटल्ड लोकांच्या गाड्या माझ्या जवळून मला हुलकावणी देऊन जात राहता. कंपनीत उभे आयुष्य फर्स्ट,सेकंड,थर्ड करणाऱ्या पन्नाशीतील माणसांची दुचाकी जवळून निघून जाते.

ती जितक्या हळूवार माझ्या जवळून निघते तितक्याच सहज मी त्या माणसांच्या आयुष्याची परिमाणे लाऊन मोकळा होऊन जातो. या परिमाणात चुकीचं असं काही खरतर नसतं, कारण आयुष्याची गणितं जुळवता जुळवता एखाद्या दिवशी हे निरुद्देश भटकणं मला अजूनच जगण्यासाठी आवश्यक असलेली कारणे स्पष्ट करणारी असतात.

असच पहाटेपासून भटकत नुकतच सेव्हन हीलवरून पायी भटकत निघालो होतो. पायी चालत राहणं म्हणजे उड्डाण पुलाच्या खालून चालणे असा अनेकांचा समज आहे. मी या रस्त्यानं भटकत असलो की उड्डाणपुलाच्या वरच्या बाजूने भटकंती करत राहतो. 

कारण काहीच नाही छान वाटतं शहराच्या हवेत असलेला गारवा उड्डाणपुलावर आलं की आधिकच सुखद क्षण देऊ करणारा ठरतो. अवाढव्य वाढलेल्या शहराचे मग दर्शन होते, आजवर फक्त या शहराकडून दुःख वाट्याला आलं असूनही मला या शहरावर जीवापाड प्रेम आहे.

अन् त्यामुळं मनाची ही अशी अवस्था झाली की मनभरून हे शहर भटकून घेतो. कधीतरी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एक अन् एक कंपनीच्या गेटवर जाऊन बसून राहतो‌. तेथील ये-जा करणाऱ्या लोकांना बघत राहतो,अंदाज लावत राहतो.

वसाहतीत बंद पडलेल्या टपऱ्याशी सलगी करून तिथं जवळपास बाटलीभर पाणी भेटलं की ते पिऊन घेतो अन् भटकत राहतो भटकत राहतो.

भर दुपारचं हे वाहणारं शहर मग मला आधिकच उलगडू लागतं‌. दिवसा शहरात असणाऱ्या मोठमोठाल्या फ्लेक्स मग दिवसाच या भर उन्हात माझ्याशी बोलू लागतात.

शहराच्या उंच-उंच इमारती त्यांची मजले मोजून होतात, एखाद्या फ्लॅटच्या पेसेजमध्ये कपडे वाळत असतात, एखाद्या फ्लॅटच्या पेसेजमध्ये फुल झाडं नुकत्याच दोन-तीन वर्षांपूर्वी उमललेल्या मुलांशी गप्पा करत असतात.

एखाद्या ठिकाणी कोणी कुणाची वाट बघत असतं, कुणी कुणाची कुणाच्या आयुष्याची गणितं जुळवत असतं, मी त्या उड्डाणपुलाची खालपर्यंत उंची काढत असतो.

पडलो की संपलो ही गणितं येथे सहज जुळतात कित्येकांची, म्हणून कधीतरी दुतर्फा असलेल्या या उड्डाणपुलावरून चालताना अनामिक भिती वाटते.

(औरंगाबादमध्ये असूनही भेटत का नाहीस तू आम्हाला असा प्रश्न करणाऱ्यांना कदाचित हे उत्तरही असेल)

Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...