मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ८

सुगीचे दिस..! भाग - ८

पाटलांचे पाटीलकी तोऱ्यात बोलणं चालू होतं. पाटलांच्या मोठ्या गप्पा अन् त्यांचा तो तालेवार बाजपणा बघून आता मी अन् इस्माईलसुद्धा थोडे सावरलो होतो. पाटलांच्या गप्पा आम्ही काम करत करत ऐकत होतो. हळू हळू विषय पाटील बाईकडे सरला अन् मग बायका त्यांच्या गप्पात जश्या चुगल्या करतात,तश्या पाटील पाटील बाईंच्या चुगल्या करायला लागले, आम्ही सगळे हसायलो लागलो. भोळ्या राजू पण पाटलांच्या हो मध्ये हो मिसळत पाटलांची री ओढू लागला अन् पाटील बाईंना नावे ठेऊ लागला होता.

शांता मामी, इस्माईलची आई अन् माय हे सगळे पाटलांच्या गप्पा ऐकत काम करत होते. चारचा पार कलला तसं पाटील गावात काम निघालं म्हणून गावात निघून गेले. अन् ; आम्ही उक्त्यात काम असल्यानं कामाचा जोर उतरत्या उन्हात वाढवून घटकाभर उद्यासाठी दोन सऱ्यांचे कांदे काढून ठेवले म्हणजे उद्या पहाटे आलं की सकाळच्या पहारे ती चराचर चिरून पातीपासून वेगळी केली जातील. बरच काम उरकून घेतल्या जाईल.

पाटील चारचा पार कलला तेव्हा निघून गेले, तसं; दिवसभर पात वाहणारा भोळ्या राजू त्यांच्या संगतीने झुळक्या बावडीकडे निघून गेला अन् गोठ्यात शेणखुर करू लागला. मी अन् इस्माईल थोडं भटकून आलो अन् दोन्ही खिश्यात शिगोशिग भरून बोरं घेऊन आलो. अन् खात खात काम करू लागलो होतो. दोघांना आता भोमारा आला होता.
भोमाऱ्याने दोघांची नाके गळू लागली होती. अन् नाक पुसून मात्र आता सदऱ्याच्या बाह्या कडक झाल्या होत्या अन् तरीही आम्ही काम करत असताना बोरं खात होतो.

भोळ्या राजूने गव्हणीत असलेल्या सर्व गुरांना पाणी दाखवले अन्; गव्हाण झाडून घेत त्यांना व्यवस्थित बांधून ठेवले. आमची पण कामाची सुट्टी थोड्यावेळाने होणार होती. त्यांच्या झोपडीवजा घरासमोर राजूने तुराट्याच्या झाडूने सांच्याला खराखर झाडून घेतलं.
गाई म्हशींचे दूध काढायला म्हणून तो त्याच्या कामाला लागला, सहाचा पार कलला तसं आम्ही काम आवरते घेतले. अन् माय, शांता मामी अन् इस्माईलच्या मायने डब्ब्याच्या पिशवीत थोडी थोडी पात सांजच्या पिठल्यात टाकून गरम गरम पिठले करण्यासाठी घेतली

सांज ढळली तसं आम्ही घराच्या वाटा जवळ केल्या. शांता मामी, इस्माईलची माय अन् मायकडे कांद्याची पातीच्या जुड्या होत्या. त्यांनी त्या डोक्यावर घेतल्या होत्या अन् अंधार पडायच्या आत घर जवळ करायचं म्हणून आम्ही सगळेजन पाऊले उचलून भराभर चालत होतो. हिवाळ्याचे दिवस असल्यानं दिवस लवकरच मावळून येत होता अन् पहाटे सकाळीसुद्धा लवकर उगवत होता.

त्यामुळं उक्त्यात फार काम ओढले जात नव्हते. सूर्य अस्ताला गेला तसं आम्ही घराच्या वाटा जवळ जवळ करत गावात येऊन पोहचलो होतो. गावात सप्ताह असल्यानं गावात सडा रांगोळ्या टाकून झाल्या होत्या. भजन कीर्तन संपून सांजेचा हरिपाठ सुरू झाला होता. म्हातारी माणसं हरिपाठ करायला जात असताना हातात दोन अगरबत्त्या घेऊन चालली होती होती.

तर विणेकरी तुळसा आबा एका पायावर टेकू देऊन, उभे राहू वीणा वाजवत होते. मंडपाला चहूबाजूंनी गावातल्या बायकांनी सडा रांगोळ्या घातल्या होत्या आज सांजेला गावात असलेल्या भामासाद महाराज यांच्या पादुकांची मिरवूनक साऱ्या गावातून निघणार होती.सारा गाव सडा रांगोळ्यांनी सजुन गेला होता. 
गावात ठिकठिकाणी रांगोळी अन् फुलांच्या आरासी करून छान छान रांगोळ्या काढल्या होत्या. 

शेतात जाणारी लोकं फार महत्त्वाचं काम असेल तरच शेतात जात होती, नाहीतर हफ्ताभर सगळ्या लोकांनी शेतातील कामे पुढे ढकलली होती. अंधार झाला तसा सारा गाव विठ्ठल रखुमाईच्याभक्तीत रममाण झाला होता

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...