मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ८

सुगीचे दिस..! भाग - ८

पाटलांचे पाटीलकी तोऱ्यात बोलणं चालू होतं. पाटलांच्या मोठ्या गप्पा अन् त्यांचा तो तालेवार बाजपणा बघून आता मी अन् इस्माईलसुद्धा थोडे सावरलो होतो. पाटलांच्या गप्पा आम्ही काम करत करत ऐकत होतो. हळू हळू विषय पाटील बाईकडे सरला अन् मग बायका त्यांच्या गप्पात जश्या चुगल्या करतात,तश्या पाटील पाटील बाईंच्या चुगल्या करायला लागले, आम्ही सगळे हसायलो लागलो. भोळ्या राजू पण पाटलांच्या हो मध्ये हो मिसळत पाटलांची री ओढू लागला अन् पाटील बाईंना नावे ठेऊ लागला होता.

शांता मामी, इस्माईलची आई अन् माय हे सगळे पाटलांच्या गप्पा ऐकत काम करत होते. चारचा पार कलला तसं पाटील गावात काम निघालं म्हणून गावात निघून गेले. अन् ; आम्ही उक्त्यात काम असल्यानं कामाचा जोर उतरत्या उन्हात वाढवून घटकाभर उद्यासाठी दोन सऱ्यांचे कांदे काढून ठेवले म्हणजे उद्या पहाटे आलं की सकाळच्या पहारे ती चराचर चिरून पातीपासून वेगळी केली जातील. बरच काम उरकून घेतल्या जाईल.

पाटील चारचा पार कलला तेव्हा निघून गेले, तसं; दिवसभर पात वाहणारा भोळ्या राजू त्यांच्या संगतीने झुळक्या बावडीकडे निघून गेला अन् गोठ्यात शेणखुर करू लागला. मी अन् इस्माईल थोडं भटकून आलो अन् दोन्ही खिश्यात शिगोशिग भरून बोरं घेऊन आलो. अन् खात खात काम करू लागलो होतो. दोघांना आता भोमारा आला होता.
भोमाऱ्याने दोघांची नाके गळू लागली होती. अन् नाक पुसून मात्र आता सदऱ्याच्या बाह्या कडक झाल्या होत्या अन् तरीही आम्ही काम करत असताना बोरं खात होतो.

भोळ्या राजूने गव्हणीत असलेल्या सर्व गुरांना पाणी दाखवले अन्; गव्हाण झाडून घेत त्यांना व्यवस्थित बांधून ठेवले. आमची पण कामाची सुट्टी थोड्यावेळाने होणार होती. त्यांच्या झोपडीवजा घरासमोर राजूने तुराट्याच्या झाडूने सांच्याला खराखर झाडून घेतलं.
गाई म्हशींचे दूध काढायला म्हणून तो त्याच्या कामाला लागला, सहाचा पार कलला तसं आम्ही काम आवरते घेतले. अन् माय, शांता मामी अन् इस्माईलच्या मायने डब्ब्याच्या पिशवीत थोडी थोडी पात सांजच्या पिठल्यात टाकून गरम गरम पिठले करण्यासाठी घेतली

सांज ढळली तसं आम्ही घराच्या वाटा जवळ केल्या. शांता मामी, इस्माईलची माय अन् मायकडे कांद्याची पातीच्या जुड्या होत्या. त्यांनी त्या डोक्यावर घेतल्या होत्या अन् अंधार पडायच्या आत घर जवळ करायचं म्हणून आम्ही सगळेजन पाऊले उचलून भराभर चालत होतो. हिवाळ्याचे दिवस असल्यानं दिवस लवकरच मावळून येत होता अन् पहाटे सकाळीसुद्धा लवकर उगवत होता.

त्यामुळं उक्त्यात फार काम ओढले जात नव्हते. सूर्य अस्ताला गेला तसं आम्ही घराच्या वाटा जवळ जवळ करत गावात येऊन पोहचलो होतो. गावात सप्ताह असल्यानं गावात सडा रांगोळ्या टाकून झाल्या होत्या. भजन कीर्तन संपून सांजेचा हरिपाठ सुरू झाला होता. म्हातारी माणसं हरिपाठ करायला जात असताना हातात दोन अगरबत्त्या घेऊन चालली होती होती.

तर विणेकरी तुळसा आबा एका पायावर टेकू देऊन, उभे राहू वीणा वाजवत होते. मंडपाला चहूबाजूंनी गावातल्या बायकांनी सडा रांगोळ्या घातल्या होत्या आज सांजेला गावात असलेल्या भामासाद महाराज यांच्या पादुकांची मिरवूनक साऱ्या गावातून निघणार होती.सारा गाव सडा रांगोळ्यांनी सजुन गेला होता. 
गावात ठिकठिकाणी रांगोळी अन् फुलांच्या आरासी करून छान छान रांगोळ्या काढल्या होत्या. 

शेतात जाणारी लोकं फार महत्त्वाचं काम असेल तरच शेतात जात होती, नाहीतर हफ्ताभर सगळ्या लोकांनी शेतातील कामे पुढे ढकलली होती. अंधार झाला तसा सारा गाव विठ्ठल रखुमाईच्याभक्तीत रममाण झाला होता

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड