मुख्य सामग्रीवर वगळा

मावडी..!

मावडी..!

बाभळीच्या झाडावर असलेल्या सुगरणीच्या खोप्यातून तिच्या नुकत्याच डोळे उघडलेल्या पिल्लांचा चिवचिव आवाज कानी पडू लागला होता. त्यांची आई इतक्या भल्या पहाटेच त्यांच्या पोटासाठी किटूकमिटूक शोधायला म्हणून बाहेर पडली असावी. त्यांच्या चिवचिव आवाजाला, कोंबड्याच्या बांगेने साथ दिली. मांगखेडा गावाला पूर्वेच्या बाजूला असलेल्या भल्या मोठ्या टेकडीच्या माथ्यावर पहाटेचा सूर्य उदय होतांना दिसू लागला.

सूर्योदय झाला तसं मरून, मरगळून पडलेलं गाव पुन्हा जागं झालं. कोणी दूध काढायला म्हणून आपल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बिगाभर रानात असलेल्या झोपडीच्या दिशेनं सरसावले. कोणी पहाटेच परसाला म्हणून गावच्या एका अंगाला असलेल्या तुराट्या वाढलेल्या खडकाळ रानात हातात पाण्याचे डबडे घेऊन भुरभूरलेल्या मातीत चप्पल घाशीत अन् डोळे चोळीत परसाकडे चालले होते.

कुण्या अनोळख्या माणसाने दोन-चार दिवसांपूर्वी एका दुर्धर आजाराने मेलेल्या एका म्हशीचे धुड या गुखडीच्या रानात आणून टाकले होते. परसाला बसलं की त्या धुडाचा त्याच्यातील आळ्या पडलेल्या, सडलेल्या मासाचा वास यायचा अन् बसल्या बसल्याजागी नाक दाबून गिधाडांचा, रानकुत्र्यांचा त्या धुडावर सडलेले मास खाण्यासाठी सुरू असलेला तगादा बघत बसायचं.

नुकतंच झालेल्या सैन्यदलाच्या भरतीमद्ये गावातील संपत नानाचा पोऱ्या मोहित महार रेजिमेंटमध्ये भरती झाला होता. तो भरती झाल्यानंतर होत असलेलं खडतर प्रशिक्षण करण्यासाठी वरणगाव मार्गे कुठे दोनशे कोस दूर जाणार होता. अन् आता मोहित सहा महिने गावाला पुन्हा येणार नाही, यामुळे त्याच्या घरच्यांनी अन् गावकऱ्यांनी त्याची केलेली पाठवणी. खूप मोठा केलेला सत्कार.

गावात बावीस वर्षांच्यानंतर कोणी सैन्य दलात झालेलं भरती. त्यामुळं गावातील तरुणांचे सळसळते रक्त मोहितचा आदर, सत्कार बघून पुढच्या भरतीत गावातील आठ-दहा पोरं लागायला हवे या जिद्दीखातर अंग मोडेस्तोवर, पायाचा तुकडा पडेस्तोवर धावत, पळत मेहनत करत होती. गावाच्या एका अंगाला लागून असलेल्या रस्त्यावर लावलेल्या मोहितच्या बॅनरला बघून रोज सलाम ठोकीत, राष्ट्रगीत म्हणत होती. जणू की काय ती मुलंही सैन्य दलात भरती झाली होती. असं त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसून येत होते.

पूर्वी दिवसेंदिवस कट्टयावर गप्पा मारणारी ही तरुण पोरं आता फक्त अंगमेहनत अन् गावाच्या चौकात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या बाजूला असलेल्या एका खोलीत अभ्यास करू लागली होती. सगळी पोरं गरीब घरची असल्यानं त्यांना पूर्णवेळ फक्त ही तयारी करून जमणार नव्हतं.

पैसा कमविणे पण महत्त्वाचे होते, जेणेकरून घराला हातभार लावला जाईल अन् दोन पैसे स्वतःच्या तब्येतीवर, वह्या पुस्तकांवर होणारा खर्च यावर केला जाईल. अन्; यासाठी त्यांना घरून पैसे घेणं योग्य वाटायचं नाही, मग कधीतरी लोकांच्या शेतात खत टाकायचं काम असो की मिस्तरीच्या हाताखाली म्हणून ती पोरं मजुरीला जात असत.

या तरुण पोरांच्यात प्रवीण हा एक मुलगा तल्लख बुद्धीचा, उंच शरीरबांधा असलेला तरुण होता. की ज्याच्यावर त्याच्या घरच्यांना अन् गावकऱ्यांना आशा होती की हे पोरगं नक्की सैन्यात भरती होईल. अन्; त्याच्यासाठी प्रवीणसुद्धा रात्रंदिवस मेहनत घेत होता ,अभ्यास करत होता. मागच्या सालाला दोन गुणांनी प्रवीण महाराष्ट्र पोलीस दलात भरती होण्यापासून राहून गेला होता. 

त्यामुळं तो ढोर मेहनत करून आपण कुठे कमी पडत आहोत, आपण काय करायला पाहिजे, या सगळ्याचा विचार करत तो रोज परिस्थितीशी लढून भरतीसाठी तयारी करत होता. प्रवीणच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच प्रवीण मूळचा ढोल्यावाडीचा पण पोटापाण्यासाठी, रोजंदारीवर काम करण्यासाठी गेले कित्येक वर्ष मांगखेडा गावात टेकडीच्या माथ्यावर असलेल्या महारवस्तीला एका कुडाने शाकारलेल्या झोपडीत राहत होता. घरची परिस्थिती तशी अत्यंत बेताचीच घरात अठरा विश्व दारिद्य्र नेहमीचं होतं. त्यात प्रवीणची आई जराशी भोळसर असल्याने घरची जबाबदारी त्याच्यावर होती.

क्रमशः
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड