मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - १०

सुगीचे दिस..! भाग - १०

मायने चुल्हीवर पिठलं आळायला टाकून दिलं होतं अन्; एका अंगाला माय भाकरी थापायचा बेत करीत होती. शेकारलेल्या झोपडीत चिमणी वाऱ्याच्या झोताने विझायला करत होती अन् माय तिला सावरून भाकरी करत बसली होती. रात्री बरसाद झाली तर उद्याचं काम भांडळले असं दिसून येत होतं. पण सध्याच्या पाटलाच्या जीवाची वरखाली होणारी अवस्था मला बसल्याजागी अनुभवायला येत होती.

कारण आज जर पाऊस झाला तर पाटलांच्या वावरात असलेल्या सर्व कांद्याचा चिखल होणार होता. त्यात आता सुरू असलेलं वावधन बघता भोळ्या राजूची कांदे झाकण्यासाठी होत असलेली फजिती माझ्या डोळ्यासमोर येऊन गेली.

भाकरी खाऊन मी अन् माय निपचित पडून राहिलो रात्रभर गोंघवणारा वारा रात्रभर वाहत होता. पाऊस काही आला नाही पण वाऱ्याचे वावधन काही केल्या कमी होत नव्हते. गावकरी मंडळी निपचित पडली होती. सारा गाव शांत झाला होता. सावता माळ्याच्या देवळात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात आज रातच्याला बारीवर कुणीही नव्हतं.

तेव्हढी विनेकारी, टाळकरी अन् आमचे माय माउली माळकरी लोकं तिथं मंडपाच्या एका अंगाला मोडकळीस आलेल्या खोलीत झोपी गेली होती. विनेकरी बाबा पारीच्या वेळा लाऊन घंटा-घंटा उभे राहून विना वाजवत बसले होते. पण; त्यांच्या सेवेत वावधनामुळे कुठलाही खंड पडला नव्हता. रात्र पहाटेच्या अंगाला सरू लागली तसं सोसाट्याच्या वाऱ्यासह असलेलं वावधन एकाकी कमी होऊ लागलं अन् पहाटे कोंबड्याने बांग देऊस्तोवर सगळं कसं शांत शांत झालं.

रात्री पाऊस काही पडला नव्हता, त्यामुळे शेतात पिकांचा हातातोंडाशी असलेला घास काही देवाच्या कृपेने निसर्गाने हिरावून घेतला नव्हता. पण; गावातील टेकडीवरच्या परिसरात असलेल्या संतूक नानांचे पत्र्याचे छप्पर असलेले शेड मात्र या वावधनात मोडळीस आले, परंतु गुरढोरं यांना कुठली ईजा झाली नव्हती त्यामुळं संकट थोडक्यात निस्तरले होते.

पहाट झाली तशी सावता माळ्याच्या देवळात गावची मायमाउली काकड्यासाठी राजी झाली, काकडा सुरू झाला. गावातली तरणी पोरं दूध काढायला म्हणून वावरात आली होती. माय पहाटे कोंबड्याच्या बांगेसरशी उठली अन् अंगण झाडू लागली, चूल्हीवर पाणी इस्नाला ठेऊन सडा रांगोळी करत माय तिचं आवरत होती. मी उठलो अन् परसदारी असलेल्या आमच्या चूल्हीजवळ जाऊन बसलो, वारा जरी शांत झाला होता पण गारठा मात्र हवे अजूनही जाणवत होता. त्यामुळं गावातली म्हातारी माणसं ठिकठिकाणी शेकोट्या करून शखत बसली होती. 

मी ही चुल्हीजवळ बसून शखत बसलो होतो अन् शखत शखत चूल्हीतील राखुंडा काढून त्याने दात घासत बसलो होतो. पहाटेचा काकडा कधीच संपून गेला होता, लोकं घराच्या वाटा जवळ करत होती. दूध काढायला म्हणून शेतात गेलेली माणसं घरच्या वाटेनं येत होती. सूर्योदय झाला होता अन् माय अंघोळपाणी करून लवकर कामाला जायचं म्हणून भाकरी थापत बसली होती.

माझं अंघोळ पाणी झालं अन् मी पण पहाटेची न्याहारी करून लिंभाऱ्याला लावलेल्या फुटक्या आरश्यात बघत भांग पाडत बसलो होतो. तितक्यात दुरून पाटलांच्या राजदूत गाडीचा आवाज आला अन् पाटलांच्या मागारी सीटवर बसलेल्या भोळ्या राजू पाटलांची गाडी जशी आमच्या घराजवळ येऊन थांबली तसं तो बोलू लागला.
आक्का आजच्याला लवकरच वावरात या तेव्हढी राहिलेली उक्त्याची कांदे काढून घ्या पटकन वाऱ्या वावधनाची म्हणजे आपली कांदे कोरडे ठाक मार्केटला जातीला अन् दोन पैका चांगला येतीला. पाटलांचे हे पाटीलकी बोलणं भोळ्या राजू मस्त बोलत होता अन् पाटलांनी दिलेला सांगावा ऐकून मी आणि मायना पण मान हलवली अन् बिगीने आवरू लागलो.

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड