मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - १०

सुगीचे दिस..! भाग - १०

मायने चुल्हीवर पिठलं आळायला टाकून दिलं होतं अन्; एका अंगाला माय भाकरी थापायचा बेत करीत होती. शेकारलेल्या झोपडीत चिमणी वाऱ्याच्या झोताने विझायला करत होती अन् माय तिला सावरून भाकरी करत बसली होती. रात्री बरसाद झाली तर उद्याचं काम भांडळले असं दिसून येत होतं. पण सध्याच्या पाटलाच्या जीवाची वरखाली होणारी अवस्था मला बसल्याजागी अनुभवायला येत होती.

कारण आज जर पाऊस झाला तर पाटलांच्या वावरात असलेल्या सर्व कांद्याचा चिखल होणार होता. त्यात आता सुरू असलेलं वावधन बघता भोळ्या राजूची कांदे झाकण्यासाठी होत असलेली फजिती माझ्या डोळ्यासमोर येऊन गेली.

भाकरी खाऊन मी अन् माय निपचित पडून राहिलो रात्रभर गोंघवणारा वारा रात्रभर वाहत होता. पाऊस काही आला नाही पण वाऱ्याचे वावधन काही केल्या कमी होत नव्हते. गावकरी मंडळी निपचित पडली होती. सारा गाव शांत झाला होता. सावता माळ्याच्या देवळात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात आज रातच्याला बारीवर कुणीही नव्हतं.

तेव्हढी विनेकारी, टाळकरी अन् आमचे माय माउली माळकरी लोकं तिथं मंडपाच्या एका अंगाला मोडकळीस आलेल्या खोलीत झोपी गेली होती. विनेकरी बाबा पारीच्या वेळा लाऊन घंटा-घंटा उभे राहून विना वाजवत बसले होते. पण; त्यांच्या सेवेत वावधनामुळे कुठलाही खंड पडला नव्हता. रात्र पहाटेच्या अंगाला सरू लागली तसं सोसाट्याच्या वाऱ्यासह असलेलं वावधन एकाकी कमी होऊ लागलं अन् पहाटे कोंबड्याने बांग देऊस्तोवर सगळं कसं शांत शांत झालं.

रात्री पाऊस काही पडला नव्हता, त्यामुळे शेतात पिकांचा हातातोंडाशी असलेला घास काही देवाच्या कृपेने निसर्गाने हिरावून घेतला नव्हता. पण; गावातील टेकडीवरच्या परिसरात असलेल्या संतूक नानांचे पत्र्याचे छप्पर असलेले शेड मात्र या वावधनात मोडळीस आले, परंतु गुरढोरं यांना कुठली ईजा झाली नव्हती त्यामुळं संकट थोडक्यात निस्तरले होते.

पहाट झाली तशी सावता माळ्याच्या देवळात गावची मायमाउली काकड्यासाठी राजी झाली, काकडा सुरू झाला. गावातली तरणी पोरं दूध काढायला म्हणून वावरात आली होती. माय पहाटे कोंबड्याच्या बांगेसरशी उठली अन् अंगण झाडू लागली, चूल्हीवर पाणी इस्नाला ठेऊन सडा रांगोळी करत माय तिचं आवरत होती. मी उठलो अन् परसदारी असलेल्या आमच्या चूल्हीजवळ जाऊन बसलो, वारा जरी शांत झाला होता पण गारठा मात्र हवे अजूनही जाणवत होता. त्यामुळं गावातली म्हातारी माणसं ठिकठिकाणी शेकोट्या करून शखत बसली होती. 

मी ही चुल्हीजवळ बसून शखत बसलो होतो अन् शखत शखत चूल्हीतील राखुंडा काढून त्याने दात घासत बसलो होतो. पहाटेचा काकडा कधीच संपून गेला होता, लोकं घराच्या वाटा जवळ करत होती. दूध काढायला म्हणून शेतात गेलेली माणसं घरच्या वाटेनं येत होती. सूर्योदय झाला होता अन् माय अंघोळपाणी करून लवकर कामाला जायचं म्हणून भाकरी थापत बसली होती.

माझं अंघोळ पाणी झालं अन् मी पण पहाटेची न्याहारी करून लिंभाऱ्याला लावलेल्या फुटक्या आरश्यात बघत भांग पाडत बसलो होतो. तितक्यात दुरून पाटलांच्या राजदूत गाडीचा आवाज आला अन् पाटलांच्या मागारी सीटवर बसलेल्या भोळ्या राजू पाटलांची गाडी जशी आमच्या घराजवळ येऊन थांबली तसं तो बोलू लागला.
आक्का आजच्याला लवकरच वावरात या तेव्हढी राहिलेली उक्त्याची कांदे काढून घ्या पटकन वाऱ्या वावधनाची म्हणजे आपली कांदे कोरडे ठाक मार्केटला जातीला अन् दोन पैका चांगला येतीला. पाटलांचे हे पाटीलकी बोलणं भोळ्या राजू मस्त बोलत होता अन् पाटलांनी दिलेला सांगावा ऐकून मी आणि मायना पण मान हलवली अन् बिगीने आवरू लागलो.

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...