मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - १०

सुगीचे दिस..! भाग - १०

मायने चुल्हीवर पिठलं आळायला टाकून दिलं होतं अन्; एका अंगाला माय भाकरी थापायचा बेत करीत होती. शेकारलेल्या झोपडीत चिमणी वाऱ्याच्या झोताने विझायला करत होती अन् माय तिला सावरून भाकरी करत बसली होती. रात्री बरसाद झाली तर उद्याचं काम भांडळले असं दिसून येत होतं. पण सध्याच्या पाटलाच्या जीवाची वरखाली होणारी अवस्था मला बसल्याजागी अनुभवायला येत होती.

कारण आज जर पाऊस झाला तर पाटलांच्या वावरात असलेल्या सर्व कांद्याचा चिखल होणार होता. त्यात आता सुरू असलेलं वावधन बघता भोळ्या राजूची कांदे झाकण्यासाठी होत असलेली फजिती माझ्या डोळ्यासमोर येऊन गेली.

भाकरी खाऊन मी अन् माय निपचित पडून राहिलो रात्रभर गोंघवणारा वारा रात्रभर वाहत होता. पाऊस काही आला नाही पण वाऱ्याचे वावधन काही केल्या कमी होत नव्हते. गावकरी मंडळी निपचित पडली होती. सारा गाव शांत झाला होता. सावता माळ्याच्या देवळात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात आज रातच्याला बारीवर कुणीही नव्हतं.

तेव्हढी विनेकारी, टाळकरी अन् आमचे माय माउली माळकरी लोकं तिथं मंडपाच्या एका अंगाला मोडकळीस आलेल्या खोलीत झोपी गेली होती. विनेकरी बाबा पारीच्या वेळा लाऊन घंटा-घंटा उभे राहून विना वाजवत बसले होते. पण; त्यांच्या सेवेत वावधनामुळे कुठलाही खंड पडला नव्हता. रात्र पहाटेच्या अंगाला सरू लागली तसं सोसाट्याच्या वाऱ्यासह असलेलं वावधन एकाकी कमी होऊ लागलं अन् पहाटे कोंबड्याने बांग देऊस्तोवर सगळं कसं शांत शांत झालं.

रात्री पाऊस काही पडला नव्हता, त्यामुळे शेतात पिकांचा हातातोंडाशी असलेला घास काही देवाच्या कृपेने निसर्गाने हिरावून घेतला नव्हता. पण; गावातील टेकडीवरच्या परिसरात असलेल्या संतूक नानांचे पत्र्याचे छप्पर असलेले शेड मात्र या वावधनात मोडळीस आले, परंतु गुरढोरं यांना कुठली ईजा झाली नव्हती त्यामुळं संकट थोडक्यात निस्तरले होते.

पहाट झाली तशी सावता माळ्याच्या देवळात गावची मायमाउली काकड्यासाठी राजी झाली, काकडा सुरू झाला. गावातली तरणी पोरं दूध काढायला म्हणून वावरात आली होती. माय पहाटे कोंबड्याच्या बांगेसरशी उठली अन् अंगण झाडू लागली, चूल्हीवर पाणी इस्नाला ठेऊन सडा रांगोळी करत माय तिचं आवरत होती. मी उठलो अन् परसदारी असलेल्या आमच्या चूल्हीजवळ जाऊन बसलो, वारा जरी शांत झाला होता पण गारठा मात्र हवे अजूनही जाणवत होता. त्यामुळं गावातली म्हातारी माणसं ठिकठिकाणी शेकोट्या करून शखत बसली होती. 

मी ही चुल्हीजवळ बसून शखत बसलो होतो अन् शखत शखत चूल्हीतील राखुंडा काढून त्याने दात घासत बसलो होतो. पहाटेचा काकडा कधीच संपून गेला होता, लोकं घराच्या वाटा जवळ करत होती. दूध काढायला म्हणून शेतात गेलेली माणसं घरच्या वाटेनं येत होती. सूर्योदय झाला होता अन् माय अंघोळपाणी करून लवकर कामाला जायचं म्हणून भाकरी थापत बसली होती.

माझं अंघोळ पाणी झालं अन् मी पण पहाटेची न्याहारी करून लिंभाऱ्याला लावलेल्या फुटक्या आरश्यात बघत भांग पाडत बसलो होतो. तितक्यात दुरून पाटलांच्या राजदूत गाडीचा आवाज आला अन् पाटलांच्या मागारी सीटवर बसलेल्या भोळ्या राजू पाटलांची गाडी जशी आमच्या घराजवळ येऊन थांबली तसं तो बोलू लागला.
आक्का आजच्याला लवकरच वावरात या तेव्हढी राहिलेली उक्त्याची कांदे काढून घ्या पटकन वाऱ्या वावधनाची म्हणजे आपली कांदे कोरडे ठाक मार्केटला जातीला अन् दोन पैका चांगला येतीला. पाटलांचे हे पाटीलकी बोलणं भोळ्या राजू मस्त बोलत होता अन् पाटलांनी दिलेला सांगावा ऐकून मी आणि मायना पण मान हलवली अन् बिगीने आवरू लागलो.

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...