मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ९

सुगीचे दिस..! भाग - ९

दिवसभर पाटलांच्या वावरात ऊक्त्यात कांदे काढायचे काम करून मी थकून गेलो होतो. अस्ताला गेलेल्या सूर्या बरोबर मी घरी पोहचलो अन् बाहेर ठेवलेल्या रांजनातील गार झालेल्या पाण्याने मी हातपाय धुवून परसदारी असलेल्या आमच्या चुल्हीजवळ येऊन बसलो. अंगात हुडहुडी भरून आली होती, हवेत गारवा होता.

मायना माझ्या आधीच हातपाय धुतले होते अन् देव्हाऱ्यात दिवाबत्ती करून तिने बाहेर असलेल्या तुळशी वृंदावनात अगरबत्ती खोचली. अन् चुल्हीवर कोरा चहा करायला ठेवला, धगधगत्या आगीची झळ माझ्या बसल्यापर्यंत येत होती अन् दिवसभर काम करून अवघडून गेलेले शरीर या गरमगरम शखाने उजळून निघावे तसं हरकले होते. 

चहा उकळत होती, तिचा मंद कोरा सुगंध नाकाशी दरवळत होता. आई अधूनमधून उकळ आलेल्या चहाला सांडशीत पकडुन हलवत होती अन् वाफाळलेला चहा मग अजूनच दरवळत होता. चहा उकळून पार काळाठीक्क झाला अन् मायने एका पेल्यात तो मला ओतून दिला, पिठाच्या डब्यातून तो बटर माझ्यासमोर धरले.
अनपेक्षित बटर समोर आल्याने मला आनंद झाला, मी चुल्हीच्या शखा मोहरे बसून पेल्यात ती बटर कोंबली अन् चमच्याने त्यांना खात बसलो. मायने बशीत चहा ओतला अन् नथीचा अंदाज घेत ती ही नथ सावरत चहा घेत बसली.

चहा घेऊन झाला तसं मी दहा-पाच मिनिटं चुल्हीजवळ बसून पुन्हा परसदारी असलेल्या आमच्या खाटेवर येऊन लोळत बसलो. अगरबत्तीचा दरवळ साऱ्या अंगणात घुमू लागला होता. सांजेला सुरू झालेला गावातील सावत्या माळ्याच्या देवळातील हरिपाठ आता संपला होता अन् गावची हरिपाठ म्हणणारी माझी माऊली ज्याच्या त्याच्या घराच्या वाटा जवळ कर होती.

थंडीचे दिवस सुरू असल्याने गावात जागोजागी शेकोट्या पेटल्या होत्या. गावातली तरणी पोरं चौकात शेकोटी पेटवून गावातल्या लोकांची मापे काढत बसली होती. तर गावातली म्हातारी लोकं देवळाजवळ असलेल्या पारावर शेकोटी पेटवून त्यांच्या भूतकाळातील आठवणींशी वर्तमान काळाचा अन् भविष्य काळाचा संबंध जोडून जुन्यानव्या गोष्टींचे अनुमान लावत गप्पा करत बसले होते.

आकाशात आभाळ दाटून आलं होतं, कदाचित वाऱ्याच्या सोसाट्यासह पाऊस बरसतो की काय असं झालं होतं अन् वाऱ्याच्या झोताने वातावरणात फार गारठाही निर्माण झाला होता. झाडांवर नव्याने फुटलेल्या अन् शिशिरात पानगळ झालेल्या पानांची सर्वत्र सळसळ परिसरात ऐकू येऊ लागली होती. 

पावसाचा अंदाज येतो की काय असं वाटू लागल्याने गावातील लोकांची पुन्हा एकदा वावराच्या वाटा जवळ करायला लागतात की काय या विचाराने लोकं भयभीत होऊन आकाशाकडे बघत बसले होते. कोणी ताडपत्र्या घेऊन रात्रीची भाकर खाण्या आधीच आल्या रस्त्याने पुन्हा वावराच्या वाटेला लागले होते, सोसाट्याचा वारा मी म्हणत होता. 

सावता माळ्याच्या देवळात असलेला सभामंडप वाऱ्याच्या झोताने पार उडून जातो की काय असं झालं होतं. सप्त्याची सारी मंडळी ज्याच्या त्याच्या घरी गेली होती, तितकी विनेकरी म्हातारी माणसं अन् टाळकरी माय माउली उधाणलेल्या वाऱ्याच्या झुळका बघत सावता माळ्याच्या देवळाच्या एका अंगाला असलेल्या अन् मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या खोलीत देवाचा धावा करत बसली होती. वाऱ्याचा झोत वाढला की खोलीवरचे पत्र मोडल्यासारखे कडकड वाजायची अन् आता जर वावधनाने पत्र उडून गेली तर गावात दरसाल सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाचे नियोजन बिघडेल असं सगळ्यांना वाटू लागलं होतं.

वावधनामुळे साऱ्या गावाची लईन गेली होती, सारा गाव एकाकीच एखाद्या भूकंपात किंवा काहीतरी मोठ्या नैसर्गिक आपत्तीत गुडूप होऊन कायमचा लुप्त व्हावा तसा अंधारात गुडूप झाला होता. वावधन आलं तसं काही लोकं बनिम झाकायला म्हणून वावरात निघून गेली अन् काही भाकर कुटका खाऊन चिमणीच्या अंधुक अंधुक उजेडात झोपी गेले. 

वावधानाचा जोर काही केल्या ओसरत नव्हता मी ही आता आमच्या कुडाने शेकारलेल्या झोपडीत बाज टाकून निपचित सोसाट्याचा वारा शांत होण्याची वाट बघत बसलो होतो. 

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड