मुख्य सामग्रीवर वगळा

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!

विचारांच्या गर्तेत माणसे जागायला होतात अन् कित्येक प्रयत्नांना अपेक्षित उत्तरे नाही भेटले की नैराश्याच्या गर्तेत सापडले जातात,काय होतं..?,
कुणामुळे होतं..?
का बरं होत आहे..? 
प्रत्येकवेळा पूर्णपणे फोल ठरले जाणं याची कारणं काय..?
किंवा उत्तरे नसेल तर थोडक्यात आहे त्या परिस्थितीला बळजबरीचं स्वीकारणं,म्हणजे शेवट काय आहे हे माहीत असूनही ते स्वीकारणं म्हणजेच ..... 
इतकं सहज अन् सोप्पं असतं का निर्णय घेणं..?
ती भावना जी खुप वाईट आहे...

भर दुपारची वेळ अन् ढळणारी सांज,सूर्याचे अस्ताला जाणे,अस्ताला जाणाऱ्या सूर्याला कितीवेळ टिपत राहणे या वर्तुळाच्या भोवताली गेले काही दिवस मन भटकत असते...
                                                     विचारांच्या गर्तेत एकदाका स्वतःला झोकुन दिले की,मग पडणारी प्रश्न आपलीच असतात अन् मिळणारी उत्तरं सुद्धा आपलीच असतात.कधीतरी वाटतं की,काहीतरी चुकतंय तरीही  आपले मन मनाच्या असंख्य हालचाली अन् पडणारी प्रश्न त्या चुकत्या उत्तराला प्रश्न करायला धजावत नाही...

मनाची मनानेच खोटी समजुत घातली की होतं सगळं व्यवस्थित हे तोवर उमगायला लागलेलं असतं,अन् मग या खोट्या उत्तरांच्या आशेवर आपण बघत राहावी अस्थाला जाणाऱ्या त्या सूर्याची अन् नैराश्येच्या गर्तेतुन स्वतःला सावरत भानावर यायची वेळ..!

भानावर येणं कदाचित अवघड अन् जिक्रीचे वाटते पण वेळ मारून न्यायला इतकं खुप आहे,कारण एकदाका वेळ टळली की पडलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊनही फायदा नसतो किंवा अर्थही नाही.मग नकळत शून्यात नजर लावुन आपलेच आपल्याला शोधणे होते,आपण खूप काही वेगळं करतोय वाटत नाही अन् नको ते करायला लागतो...

मग चुकतात घेतलेली निर्णय,पडलेली चुकीची प्रश्न अन् त्याला मिळालेली चुकीची उत्तरे मग अस्ताला गेलेल्या सूर्या बरोबरच आपलं अंधारलेल्या वाटा चाचपडत अनवाणी पायांनी चालणं होतं,कुठेतरी आशेची लकेर भर अंधारात दिसावी अन् गोंधळलेल्या मनाने तिकडे धाव घ्यावी...
पुन्हा एकदा मार्ग चुकावा अन् पुन्हा खोल गर्तेत आपण सापडावे मग पुन्हा पडलेली प्रश्न,मिळालेली उत्तरं यांची वजाबाकी,गुणाकार,भागाकार,बेरीज जगण्याचे सूत्र हरवून बसले की मग उत्तरे भेटत नाही...
मग कितीवेळ तेच तेच अन् तेच...

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!

सांज ढळून गेली
अस्ताला सूर्य गेला आहे,
नजर शोधते गर्तेत सापडलेल्या मला..!

शून्यात मिळाली उत्तरे 
नैराश्याचे भाव जपुन ठेवायला,
अंदाज न आता जीवनी सुत्र कसे ते जुळावे..!

अनवाणी पावलांनी व्हावा शोध
अंधारलेल्या त्या चुकल्या वाटांना,
मार्ग चुकला,चुकली उत्तरे गुनील्यात भटकतांना..!

लकेर ती दिसावी अन्
काळोखात डोळ्यांना नजर यावी,
चुकली ती वाट पुन्हा एकदा गर्तेत मी सापडावे..!

गर्तेत खोल भटकतसे
विचारांच्या तंद्रीत मना माझ्या,
जुळले जावे सुत्र,व्हावे वजा एकदा नैराश्य मनच्या वाटेतुनी 
एकदा आता..!

Written by,
Bharat sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड