मुख्य सामग्रीवर वगळा

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!

विचारांच्या गर्तेत माणसे जागायला होतात अन् कित्येक प्रयत्नांना अपेक्षित उत्तरे नाही भेटले की नैराश्याच्या गर्तेत सापडले जातात,काय होतं..?,
कुणामुळे होतं..?
का बरं होत आहे..? 
प्रत्येकवेळा पूर्णपणे फोल ठरले जाणं याची कारणं काय..?
किंवा उत्तरे नसेल तर थोडक्यात आहे त्या परिस्थितीला बळजबरीचं स्वीकारणं,म्हणजे शेवट काय आहे हे माहीत असूनही ते स्वीकारणं म्हणजेच ..... 
इतकं सहज अन् सोप्पं असतं का निर्णय घेणं..?
ती भावना जी खुप वाईट आहे...

भर दुपारची वेळ अन् ढळणारी सांज,सूर्याचे अस्ताला जाणे,अस्ताला जाणाऱ्या सूर्याला कितीवेळ टिपत राहणे या वर्तुळाच्या भोवताली गेले काही दिवस मन भटकत असते...
                                                     विचारांच्या गर्तेत एकदाका स्वतःला झोकुन दिले की,मग पडणारी प्रश्न आपलीच असतात अन् मिळणारी उत्तरं सुद्धा आपलीच असतात.कधीतरी वाटतं की,काहीतरी चुकतंय तरीही  आपले मन मनाच्या असंख्य हालचाली अन् पडणारी प्रश्न त्या चुकत्या उत्तराला प्रश्न करायला धजावत नाही...

मनाची मनानेच खोटी समजुत घातली की होतं सगळं व्यवस्थित हे तोवर उमगायला लागलेलं असतं,अन् मग या खोट्या उत्तरांच्या आशेवर आपण बघत राहावी अस्थाला जाणाऱ्या त्या सूर्याची अन् नैराश्येच्या गर्तेतुन स्वतःला सावरत भानावर यायची वेळ..!

भानावर येणं कदाचित अवघड अन् जिक्रीचे वाटते पण वेळ मारून न्यायला इतकं खुप आहे,कारण एकदाका वेळ टळली की पडलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊनही फायदा नसतो किंवा अर्थही नाही.मग नकळत शून्यात नजर लावुन आपलेच आपल्याला शोधणे होते,आपण खूप काही वेगळं करतोय वाटत नाही अन् नको ते करायला लागतो...

मग चुकतात घेतलेली निर्णय,पडलेली चुकीची प्रश्न अन् त्याला मिळालेली चुकीची उत्तरे मग अस्ताला गेलेल्या सूर्या बरोबरच आपलं अंधारलेल्या वाटा चाचपडत अनवाणी पायांनी चालणं होतं,कुठेतरी आशेची लकेर भर अंधारात दिसावी अन् गोंधळलेल्या मनाने तिकडे धाव घ्यावी...
पुन्हा एकदा मार्ग चुकावा अन् पुन्हा खोल गर्तेत आपण सापडावे मग पुन्हा पडलेली प्रश्न,मिळालेली उत्तरं यांची वजाबाकी,गुणाकार,भागाकार,बेरीज जगण्याचे सूत्र हरवून बसले की मग उत्तरे भेटत नाही...
मग कितीवेळ तेच तेच अन् तेच...

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!

सांज ढळून गेली
अस्ताला सूर्य गेला आहे,
नजर शोधते गर्तेत सापडलेल्या मला..!

शून्यात मिळाली उत्तरे 
नैराश्याचे भाव जपुन ठेवायला,
अंदाज न आता जीवनी सुत्र कसे ते जुळावे..!

अनवाणी पावलांनी व्हावा शोध
अंधारलेल्या त्या चुकल्या वाटांना,
मार्ग चुकला,चुकली उत्तरे गुनील्यात भटकतांना..!

लकेर ती दिसावी अन्
काळोखात डोळ्यांना नजर यावी,
चुकली ती वाट पुन्हा एकदा गर्तेत मी सापडावे..!

गर्तेत खोल भटकतसे
विचारांच्या तंद्रीत मना माझ्या,
जुळले जावे सुत्र,व्हावे वजा एकदा नैराश्य मनच्या वाटेतुनी 
एकदा आता..!

Written by,
Bharat sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...