मुख्य सामग्रीवर वगळा

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!

विचारांच्या गर्तेत माणसे जागायला होतात अन् कित्येक प्रयत्नांना अपेक्षित उत्तरे नाही भेटले की नैराश्याच्या गर्तेत सापडले जातात,काय होतं..?,
कुणामुळे होतं..?
का बरं होत आहे..? 
प्रत्येकवेळा पूर्णपणे फोल ठरले जाणं याची कारणं काय..?
किंवा उत्तरे नसेल तर थोडक्यात आहे त्या परिस्थितीला बळजबरीचं स्वीकारणं,म्हणजे शेवट काय आहे हे माहीत असूनही ते स्वीकारणं म्हणजेच ..... 
इतकं सहज अन् सोप्पं असतं का निर्णय घेणं..?
ती भावना जी खुप वाईट आहे...

भर दुपारची वेळ अन् ढळणारी सांज,सूर्याचे अस्ताला जाणे,अस्ताला जाणाऱ्या सूर्याला कितीवेळ टिपत राहणे या वर्तुळाच्या भोवताली गेले काही दिवस मन भटकत असते...
                                                     विचारांच्या गर्तेत एकदाका स्वतःला झोकुन दिले की,मग पडणारी प्रश्न आपलीच असतात अन् मिळणारी उत्तरं सुद्धा आपलीच असतात.कधीतरी वाटतं की,काहीतरी चुकतंय तरीही  आपले मन मनाच्या असंख्य हालचाली अन् पडणारी प्रश्न त्या चुकत्या उत्तराला प्रश्न करायला धजावत नाही...

मनाची मनानेच खोटी समजुत घातली की होतं सगळं व्यवस्थित हे तोवर उमगायला लागलेलं असतं,अन् मग या खोट्या उत्तरांच्या आशेवर आपण बघत राहावी अस्थाला जाणाऱ्या त्या सूर्याची अन् नैराश्येच्या गर्तेतुन स्वतःला सावरत भानावर यायची वेळ..!

भानावर येणं कदाचित अवघड अन् जिक्रीचे वाटते पण वेळ मारून न्यायला इतकं खुप आहे,कारण एकदाका वेळ टळली की पडलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊनही फायदा नसतो किंवा अर्थही नाही.मग नकळत शून्यात नजर लावुन आपलेच आपल्याला शोधणे होते,आपण खूप काही वेगळं करतोय वाटत नाही अन् नको ते करायला लागतो...

मग चुकतात घेतलेली निर्णय,पडलेली चुकीची प्रश्न अन् त्याला मिळालेली चुकीची उत्तरे मग अस्ताला गेलेल्या सूर्या बरोबरच आपलं अंधारलेल्या वाटा चाचपडत अनवाणी पायांनी चालणं होतं,कुठेतरी आशेची लकेर भर अंधारात दिसावी अन् गोंधळलेल्या मनाने तिकडे धाव घ्यावी...
पुन्हा एकदा मार्ग चुकावा अन् पुन्हा खोल गर्तेत आपण सापडावे मग पुन्हा पडलेली प्रश्न,मिळालेली उत्तरं यांची वजाबाकी,गुणाकार,भागाकार,बेरीज जगण्याचे सूत्र हरवून बसले की मग उत्तरे भेटत नाही...
मग कितीवेळ तेच तेच अन् तेच...

अंधारलेल्या वाटांच्या ओळी..!

सांज ढळून गेली
अस्ताला सूर्य गेला आहे,
नजर शोधते गर्तेत सापडलेल्या मला..!

शून्यात मिळाली उत्तरे 
नैराश्याचे भाव जपुन ठेवायला,
अंदाज न आता जीवनी सुत्र कसे ते जुळावे..!

अनवाणी पावलांनी व्हावा शोध
अंधारलेल्या त्या चुकल्या वाटांना,
मार्ग चुकला,चुकली उत्तरे गुनील्यात भटकतांना..!

लकेर ती दिसावी अन्
काळोखात डोळ्यांना नजर यावी,
चुकली ती वाट पुन्हा एकदा गर्तेत मी सापडावे..!

गर्तेत खोल भटकतसे
विचारांच्या तंद्रीत मना माझ्या,
जुळले जावे सुत्र,व्हावे वजा एकदा नैराश्य मनच्या वाटेतुनी 
एकदा आता..!

Written by,
Bharat sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...