मुख्य सामग्रीवर वगळा

World Poetry Day..!

World Poetry Day..!


"कविता इतिहासापेक्षा चांगली आणि तात्विक आहे,
कारण कविता सार्वत्रिक आणि इतिहासाला विशिष्ट 
व्यक्त करते."
- अॅरीस्टॉटल.

संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक,वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) १९९९ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ३०व्या सर्वसाधारण परिषदेदरम्यान २१ मार्च रोजी दरवर्षी जागतिक कविता दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.ऑक्टोबरमध्ये यापूर्वी बर्‍याच ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला जो युनेस्कोच्या १९९९ च्या अधिवेशनानंतरही चालू होता. १५ ऑक्टोबर रोजी रोमन कवी व्हर्जिन यांच्या वाढदिवसानिमित्त काही देश कविता दिन साजरे करतात.

पुस्तक प्रेमींना माहीत असलेले संघर्षही खुप आहे यात प्रेम,सहवास,विद्रोह,एकाकीपण हे फक्त कवितेतून खूप छान वाटते कारण कविता अप्रतिम,अलवार आहे.ही माझी कवितेसाठी माझ्याच मनातील शुद्ध भावना अन् ते तितकेच सत्यही आहे.

जेव्हा एखादा वाचक कवितेच्या पुस्तकाच्या पृष्ठांमध्ये प्रवेश करतो,तेव्हा तो अशा जगामध्ये प्रवेश करते जिथे स्वप्ने भूतकाळाला विद्यमान ज्ञानाने रूपांतरित करतात आणि जिथे भविष्यासाठी विलक्षण संभाव्यतेत ती कविता रूपांतरित करत असते,हे सर्व फक्त वर्तमान काळामध्ये घडत असते.

त्यावेळी हे जे सर्व कवितेतून शब्दबद्ध होते तेव्हा आपण कोण आहोत याची पर्वा नाही,
तेव्हा तेथे एक कविता आहे जी आपल्याला स्पर्श करेल,आपल्या हृदयाशी मनाशी अन् अंगावर येऊन जाणाऱ्या शहार्यांशी स्वगत करेल ही सुंदर भावना मनावर अधिराज्य करत असते...

#मग_कधीतरी..!

कधीतरी माझी कविता होते आठवणीतल्या बापावर
तर कधी मला पदराआड घेऊन दुध पाचणार्या आईवर...!

कधीतरी माझी कविता होते माझ्या शोर्य सांगणार्या भारत मातेवर तर कधी माझ्या तिरंग्यात शहिद झालेल्या माझ्या फौजीवर...!

कधीतरी माझी कविता होते समाजाने रांड ठरवलेल्या माझी माय वेश्येवर तर कधी समाजाने गैरसमजुतीतुन दुर केलेल्या माझ्या कीन्नर भावा बहिणींवर...!

कधीतरी माझी कविता होते स्त्री सौंदर्यावर,तिच्या नयनांवर तर कधी करावी लागते बळजबरीच कविता बलात्कारावर,अत्याचारावर...!

कधीतरी माझी कविता होते हिरव्या गर्द शालुने पांघरलेल्या निसर्गराजावर तर कधी झाडावर लटकणार्या माझ्या शेतकरी बापाच्या फाशीवर...!

तुला विसरून कसे चालेल...!

कधीतरी माझी कविता होते तुझ्यावर तर कधी माझ्या एकतर्फी प्रेमावर तर कधी आपल्या अव्यक्त आठवणीतल्या क्षणांवर...!

अन् मग शेवट....

कधीतरी अधांतरी जगलेल्या अलवार जीवनावर तर कधी कल्पेनील माझ्याच त्या आसवांसाठी कोरड्याठाक राहीलेल्या माझ्याच चितेवर...!

#Happy_poetry_Day...

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड