मुख्य सामग्रीवर वगळा

World Poetry Day..!

World Poetry Day..!


"कविता इतिहासापेक्षा चांगली आणि तात्विक आहे,
कारण कविता सार्वत्रिक आणि इतिहासाला विशिष्ट 
व्यक्त करते."
- अॅरीस्टॉटल.

संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक,वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) १९९९ मध्ये पॅरिस येथे झालेल्या ३०व्या सर्वसाधारण परिषदेदरम्यान २१ मार्च रोजी दरवर्षी जागतिक कविता दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.ऑक्टोबरमध्ये यापूर्वी बर्‍याच ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला जो युनेस्कोच्या १९९९ च्या अधिवेशनानंतरही चालू होता. १५ ऑक्टोबर रोजी रोमन कवी व्हर्जिन यांच्या वाढदिवसानिमित्त काही देश कविता दिन साजरे करतात.

पुस्तक प्रेमींना माहीत असलेले संघर्षही खुप आहे यात प्रेम,सहवास,विद्रोह,एकाकीपण हे फक्त कवितेतून खूप छान वाटते कारण कविता अप्रतिम,अलवार आहे.ही माझी कवितेसाठी माझ्याच मनातील शुद्ध भावना अन् ते तितकेच सत्यही आहे.

जेव्हा एखादा वाचक कवितेच्या पुस्तकाच्या पृष्ठांमध्ये प्रवेश करतो,तेव्हा तो अशा जगामध्ये प्रवेश करते जिथे स्वप्ने भूतकाळाला विद्यमान ज्ञानाने रूपांतरित करतात आणि जिथे भविष्यासाठी विलक्षण संभाव्यतेत ती कविता रूपांतरित करत असते,हे सर्व फक्त वर्तमान काळामध्ये घडत असते.

त्यावेळी हे जे सर्व कवितेतून शब्दबद्ध होते तेव्हा आपण कोण आहोत याची पर्वा नाही,
तेव्हा तेथे एक कविता आहे जी आपल्याला स्पर्श करेल,आपल्या हृदयाशी मनाशी अन् अंगावर येऊन जाणाऱ्या शहार्यांशी स्वगत करेल ही सुंदर भावना मनावर अधिराज्य करत असते...

#मग_कधीतरी..!

कधीतरी माझी कविता होते आठवणीतल्या बापावर
तर कधी मला पदराआड घेऊन दुध पाचणार्या आईवर...!

कधीतरी माझी कविता होते माझ्या शोर्य सांगणार्या भारत मातेवर तर कधी माझ्या तिरंग्यात शहिद झालेल्या माझ्या फौजीवर...!

कधीतरी माझी कविता होते समाजाने रांड ठरवलेल्या माझी माय वेश्येवर तर कधी समाजाने गैरसमजुतीतुन दुर केलेल्या माझ्या कीन्नर भावा बहिणींवर...!

कधीतरी माझी कविता होते स्त्री सौंदर्यावर,तिच्या नयनांवर तर कधी करावी लागते बळजबरीच कविता बलात्कारावर,अत्याचारावर...!

कधीतरी माझी कविता होते हिरव्या गर्द शालुने पांघरलेल्या निसर्गराजावर तर कधी झाडावर लटकणार्या माझ्या शेतकरी बापाच्या फाशीवर...!

तुला विसरून कसे चालेल...!

कधीतरी माझी कविता होते तुझ्यावर तर कधी माझ्या एकतर्फी प्रेमावर तर कधी आपल्या अव्यक्त आठवणीतल्या क्षणांवर...!

अन् मग शेवट....

कधीतरी अधांतरी जगलेल्या अलवार जीवनावर तर कधी कल्पेनील माझ्याच त्या आसवांसाठी कोरड्याठाक राहीलेल्या माझ्याच चितेवर...!

#Happy_poetry_Day...

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...