मुख्य सामग्रीवर वगळा

सांजवेळ अन् निसर्गाशी गप्पा..!

सांजवेळ अन् निसर्गाशी गप्पा..!

 
दुपार सांजवेळीकडे कलायला लागलेली असते,सांजवेळीकडे ढळणाऱ्या उतरत्या उन्हाच्या तिरपेला नजरेसमोर ठेवून अनवाणी पायांनी पाऊलवाटेने चालत रहावं,कधीतरी पावलं मोजत रहावी सोबतीला तर कधी मनात येऊन जाणारे असंख्य प्रश्न मोजत रहावी अन् त्यांना वेळोवेळी उत्तरेही देत रहावी....

पाऊलवाट जिकडे नेईल तिकडे पावलांसोबत आपणही मिरत राहायचं, कारण काहीही नसतांना,अलिकडे रिकामेच मिरायला आपल्याला आवडायला लागलं आहे,मग त्याला कधी कारणही नसते तर कधी त्यामागचा कुठलाही नसलेला दृष्टीकोन.मुळातच आता ही अशी अलंकारिक शब्द  तोंडातून यावी इतकाही समतोल नाही आपल्यात हा परका भास वेळोवेळी होतच असतो...

अनवाणी पायांनी पाऊलवाटेने चालत चालत येऊन बसावं त्या भकास भासणाऱ्या टेकडीवर अन्  बसावं शून्यात नजर लावुन ते म्हणतातना तीमिराकडूनी तेजाकडे अगदी तसंच पण तेजाकडे इथे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होणार आहे. 
मग नजरेने न्याहाळत रहावं उन्हाच्या पाऱ्यात वाळून गेलेल्या तनास,तरुस अन् बघत रहावी पानगळ झालेल्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या झाडांच्या फांदीला...

कधीतरी मधुनच कुणीतरी अनोळखी त्याच पाऊलवाटेने यावा अन् आपल्या झुकत्या नजरेत नजर घालून अनोळखी असून ओळखीचा कटाक्ष त्यानं टाकावा.पुन्हा एक प्रश्न द्विधा मनस्थिती झालेल्या मनाचा,स्वत:ला सावरायला हवं की एक नवीन मैत्री फुलवायला हवी..? 

मनाचे येणारे उत्तर तुर्तच नको असावे.मग पुन्हा एकदा न्याहाळत राहावं आसमंतात घिरट्या घालणाऱ्या  पक्षांना...

एकांतात काळया खडकांशी हितगुज घालत बसावं आणि त्यांच्या समीप येऊन कितीतरी वेळ बोलत रहावं त्यांच्याशी,माणसांच्या या गर्दीत माणसे हरवायला लागली की हा आधार जवळचा वाटतो किंबहुना तो जवळचा केला जातो,बाकी सर्व अलबेल आहे...
 अनवाणी पावलांना मार्ग तो पुन्हा एकदा फक्त आता सापडावा तोवर हे तरून न्यावं लागणार इतकचं...

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ