मुख्य सामग्रीवर वगळा

कवी.ग्रेस कळतांना..!

कवी.ग्रेस कळतांना..!
आज सांध्यपर्वाचा कवी,कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन.दिवसभर त्यांच्या आयुष्यावर केलेले लेख विविध माध्यमातून वाचनात आले अन् मन दुःखात,एकांतात जाणवणाऱ्या एकटेपणात बुडत गेले....
काय बोलावं कवी ग्रेस यांच्याविषयी खरच अनोखं रसायन आहे,एक असं रसायन जे आजवर त्यांच्या अनोख्या शैलीतून मराठी साहित्याला,काव्य लिखनाला एक वेगळं वळण देणारे ठरलं आहे... 

खरं तर आपल्या सारख्या सामान्य माणसानं काय बोलावं या साहित्यातील ध्रुव ताऱ्याबद्दल,हो ध्रुव ताराच भासतात ते मला मराठी साहित्य विश्वातील.
कारण,मराठी साहित्यात ध्रुव तार्यासारखं त्यांच स्थान अढळ व त्या एक ठीकांणच आहे,जिथवर कुणीही जाऊ शकत नाही अन् कुणी जाणारही नाही.कारण त्यांनी ते आपल्या अनोख्या कवितेच्या लिखाणातून, व्यक्त करण्याच्या धाटनितून ते मिळवलं आहे ....

१९६० नंतरच्या कालखंडात आपल्या अनोख्या बहारदार काव्यशैलीने हा कालखंड ज्या प्रतिभासंपन्न कवीने उजाळुन टाकला ते कवी म्हणजेच कविवर्य कवी ग्रेस.

या काळात अनेक कवी होऊन गेले,परंतु कविवर्य ग्रेस हे नेहमीच उजवे अन् अनोखे ठरत राहिले.त्यांच्या कवितांमधून एका आगळ्यावेगळ्या स्वरूपाची अनुभूती येते,कधीतरी इतकी सहज की अलवार भाव त्यांच्या कवितेतून उमटी पडायचे पण कधीतरी ग्रेसांची एखादी कविता इतकी सुंदर,अलंकारिक स्वरूपाची, शब्दांची असायची की वाचाणाऱ्याला चांदणं भुल पडावं ....

त्यांचं वेगळेपण त्यांच्या लिखानातून खुणावत राहते वेळोवेळी,१९५८ते २०१२ असा प्रदीर्घ काळ ग्रेस यांच्या अनोख्या कवितांनी व्यापला रसिकांच्या मनावर राज्य गाजवले.सायंकाळची प्रत्येक कविता वाचावी ग्रेसांची जिथं एक कवी प्रत्येकदा नव्याने उलगडत जातो....

कविवर्य ग्रेस हे वेगळंच रसायन आहे कुणी त्याला मिश्रण म्हणो की संयुग त्याला फरक पडत नाही,हर्षल देशपांडेंनी केलेलं हे वर्णन खरंखुर ठरतं,काळजाला ठाव घालणारं ठरतं....

"संदिग्ध घराच्या ओळी,
आकाश ढवळतो वारा,
माझ्या कीनाय्रावरती लाठांचाच आज पहारा"

जिथं शब्द भांडार संपते,माणसाचे विचार करणे थांबते तिथुन सुरू होतो ग्रेसांचा काळ...खरच दुःखाचा महामेरू आहे हा कवी,अलीकडच्या आयुष्यात कवी ग्रेसांना खुप वाचनातून अनुभवलं. 

काल एका मैत्रिणीच्या पोस्टमध्ये वाचले की ज्यांना दुःख कळतं,त्यांनीच कवी ग्रेसांच्या कविता वाचाव्या खरं आहे.कारण सुखाचा अनुभव घेत असणारी व्यक्ती ग्रेसांची कविता समजुच शकत नाही,इतकं अफाट अन् अनोखं लेखन ते करतात....

"अंगणात गमले मजला,
संपले बालपण माझे,
खिडकीत कंदील तेव्हा धुरकट एकटा होता"

काय बोलावे या तीन ओळींतुन आयुष्यातील सर्व दुःख त्यांनी मांडलं आहे.आयुष्यातुन जेव्हा बाप कायमचा ऊठुन गेला,तेव्हा कायम या ग्रेसांच्या कवितांनी मला जगतं ठेवलं.जेव्हा कधीतरी रात्र,रात्र जागून दुःखाला कवटाळून घेत असायचो तेव्हा कविवर्य ग्रेस त्यांच्या लिखाणातून कायम सोबत असायचे....

संध्याकाळच्या कविता त्यांना खरच सांध्यपर्वाचा कवी ठरवता,मग त्यांच्यासाठी वापरलेलं हे विशेषण कुठेतरी योग्य वाटते....

"भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते,
मी संध्याकाळी गातो तु शिकवलेली गीते." 

या कवितेतुन त्यांच वेगळेपण सहज स्पष्ट होते,त्यांचे  असे हे लेखन त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.त्यांच्या हक्काच्या स्थानी जिथे मराठी साहित्यात कुणीही जाऊ शकत नाही....

त्यांच्यातला माणूस,ललित लेखक,संपादक,प्राध्यापक ही रूपे एकात एक मिसळून गेलेली भासावीत अशीच होती.
त्यांच्या स्मृतिदिना निमित्त हे स्मरणाचे चांदणे……

लेखन-भारत सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...