मुख्य सामग्रीवर वगळा

कवी.ग्रेस कळतांना..!

कवी.ग्रेस कळतांना..!
आज सांध्यपर्वाचा कवी,कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन.दिवसभर त्यांच्या आयुष्यावर केलेले लेख विविध माध्यमातून वाचनात आले अन् मन दुःखात,एकांतात जाणवणाऱ्या एकटेपणात बुडत गेले....
काय बोलावं कवी ग्रेस यांच्याविषयी खरच अनोखं रसायन आहे,एक असं रसायन जे आजवर त्यांच्या अनोख्या शैलीतून मराठी साहित्याला,काव्य लिखनाला एक वेगळं वळण देणारे ठरलं आहे... 

खरं तर आपल्या सारख्या सामान्य माणसानं काय बोलावं या साहित्यातील ध्रुव ताऱ्याबद्दल,हो ध्रुव ताराच भासतात ते मला मराठी साहित्य विश्वातील.
कारण,मराठी साहित्यात ध्रुव तार्यासारखं त्यांच स्थान अढळ व त्या एक ठीकांणच आहे,जिथवर कुणीही जाऊ शकत नाही अन् कुणी जाणारही नाही.कारण त्यांनी ते आपल्या अनोख्या कवितेच्या लिखाणातून, व्यक्त करण्याच्या धाटनितून ते मिळवलं आहे ....

१९६० नंतरच्या कालखंडात आपल्या अनोख्या बहारदार काव्यशैलीने हा कालखंड ज्या प्रतिभासंपन्न कवीने उजाळुन टाकला ते कवी म्हणजेच कविवर्य कवी ग्रेस.

या काळात अनेक कवी होऊन गेले,परंतु कविवर्य ग्रेस हे नेहमीच उजवे अन् अनोखे ठरत राहिले.त्यांच्या कवितांमधून एका आगळ्यावेगळ्या स्वरूपाची अनुभूती येते,कधीतरी इतकी सहज की अलवार भाव त्यांच्या कवितेतून उमटी पडायचे पण कधीतरी ग्रेसांची एखादी कविता इतकी सुंदर,अलंकारिक स्वरूपाची, शब्दांची असायची की वाचाणाऱ्याला चांदणं भुल पडावं ....

त्यांचं वेगळेपण त्यांच्या लिखानातून खुणावत राहते वेळोवेळी,१९५८ते २०१२ असा प्रदीर्घ काळ ग्रेस यांच्या अनोख्या कवितांनी व्यापला रसिकांच्या मनावर राज्य गाजवले.सायंकाळची प्रत्येक कविता वाचावी ग्रेसांची जिथं एक कवी प्रत्येकदा नव्याने उलगडत जातो....

कविवर्य ग्रेस हे वेगळंच रसायन आहे कुणी त्याला मिश्रण म्हणो की संयुग त्याला फरक पडत नाही,हर्षल देशपांडेंनी केलेलं हे वर्णन खरंखुर ठरतं,काळजाला ठाव घालणारं ठरतं....

"संदिग्ध घराच्या ओळी,
आकाश ढवळतो वारा,
माझ्या कीनाय्रावरती लाठांचाच आज पहारा"

जिथं शब्द भांडार संपते,माणसाचे विचार करणे थांबते तिथुन सुरू होतो ग्रेसांचा काळ...खरच दुःखाचा महामेरू आहे हा कवी,अलीकडच्या आयुष्यात कवी ग्रेसांना खुप वाचनातून अनुभवलं. 

काल एका मैत्रिणीच्या पोस्टमध्ये वाचले की ज्यांना दुःख कळतं,त्यांनीच कवी ग्रेसांच्या कविता वाचाव्या खरं आहे.कारण सुखाचा अनुभव घेत असणारी व्यक्ती ग्रेसांची कविता समजुच शकत नाही,इतकं अफाट अन् अनोखं लेखन ते करतात....

"अंगणात गमले मजला,
संपले बालपण माझे,
खिडकीत कंदील तेव्हा धुरकट एकटा होता"

काय बोलावे या तीन ओळींतुन आयुष्यातील सर्व दुःख त्यांनी मांडलं आहे.आयुष्यातुन जेव्हा बाप कायमचा ऊठुन गेला,तेव्हा कायम या ग्रेसांच्या कवितांनी मला जगतं ठेवलं.जेव्हा कधीतरी रात्र,रात्र जागून दुःखाला कवटाळून घेत असायचो तेव्हा कविवर्य ग्रेस त्यांच्या लिखाणातून कायम सोबत असायचे....

संध्याकाळच्या कविता त्यांना खरच सांध्यपर्वाचा कवी ठरवता,मग त्यांच्यासाठी वापरलेलं हे विशेषण कुठेतरी योग्य वाटते....

"भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते,
मी संध्याकाळी गातो तु शिकवलेली गीते." 

या कवितेतुन त्यांच वेगळेपण सहज स्पष्ट होते,त्यांचे  असे हे लेखन त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.त्यांच्या हक्काच्या स्थानी जिथे मराठी साहित्यात कुणीही जाऊ शकत नाही....

त्यांच्यातला माणूस,ललित लेखक,संपादक,प्राध्यापक ही रूपे एकात एक मिसळून गेलेली भासावीत अशीच होती.
त्यांच्या स्मृतिदिना निमित्त हे स्मरणाचे चांदणे……

लेखन-भारत सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ