मुख्य सामग्रीवर वगळा

सहेला रे..!

सहेला रे..!

काही आठवणींना आठवांचा दरवळ असतो, अशीच ही एक सुगंधी आठवण. आज पुन्हा प्रवासात विचार करत असताना सिग्नल लागला अन् मन आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत आठवांच्या कुप्पीतून त्या गोड आठवणीला अलगद सामोरे घेऊन आले.

असंच एकदा पुण्यातील मोशी येथील Exhibition साठी रात्री अकरा-बाराच्या दरम्यान औरंगाबादवरून निघालो. तेव्हा मी एका छोट्या कंपनीत सिनियर प्रॉडक्शन सुपरवायझर या हुद्द्यावर काम करत होतो. प्रवास सुरू झाला आकाशात असलेल्या चंद्राच्या मंद प्रकाशाच्या साक्षीने प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर, कंपनीचे हौशी मालक, मी अन् अजून काही कंपनीतील मित्र असे आम्ही प्रवास करत होतो. 

कुठल्याश्या टोलनाक्यावर गाडी थांबली अन् रात्रीच्या तीन- साडेतीन वाजेच्या वेळी एक विशीतली तरुणी रातराणीच्या फुलांचा गजरा घेऊन आमच्या होंडासिटी कारकडे आली. ती फुलं विकणारी तरुणी कदाचित स्वतःच्या जागेतील तिने लावलेली फुलं विकत नसावी. कारण काही दहा-पंधरा मिनिटांपूर्वीच तिची ही गजऱ्याची टोपली तिनं उघडली असावी असं वाटत होतं. अन् ही रेडीमेड तयार गजरे तिला विकत कुठून भेटत असावी असंही वाटून गेलं. ड्रायव्हर अन् ती तरुणी यांच्यातील संवाद मी झोपल्याजागी ऐकत होतो.

यापूर्वी याच ड्रायव्हर बरोबर बऱ्याचवेळा प्रवास केला असल्यानं, त्याला माहित होते मला रातराणीच्या फुलांचा गजरा, त्याचा दरवळ किती आवडतो. मग त्याने दोन गजरे विकत घेतले, मस्त पान स्टॉलवर पान घडी घालून द्यावं तसे तिनं ती गजरे आम्हाला बांधून दिली. अन्; मग दोन्ही एका हातात बसतील असे नाजूक गजरे ड्रायव्हरच्या पुढे असलेल्या जागेवर लाऊन ड्रायव्हर मस्त गाडी चालवू लागला. संपूर्ण गाडीमध्ये त्याचा मंद सुगंध,दरवळ वाऱ्याच्या झुळकेसरशी येऊन जात होता. अन् रातराणीचा हा सुगंध आमची होणारी पहाट त्या फुलांच्या दरवळाने अजूनच खूलून गेली होती.

असंच पुढे त्या प्रवासात सकाळच्या सहा दरम्यान आम्ही पुन्हा एकदा एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो तिथं पुन्हा एका दहा-बारा वर्षांच्या मुलाने आमच्यासमोर टोपली धरली. मी काही बोलायच्या आत पुन्हा ड्रायव्हरने एक मोठा गजरा त्याच्याकडून घेतला अन्; तो ही त्या मुलाने सुरेख पॅकींग करून दिला. तो तसाच गाडीमध्ये ठेवला.

अपेक्षित वेळेच्या आदी जेव्हा आम्ही Exhibition स्थळी पोहचलो तेव्हा त्या गजऱ्याचं काय करायचं ?कारण तो खराब होऊन जाईल. असा प्रश्न मला आमच्या ड्रायव्हरने केला अन् पुढे त्यानेच या प्रश्नाचे उत्तर शोधले. 

अन्; तो रातराणीचा दरवळ असलेला सुगंधी गजरा त्याने आमच्या ओळखीत असलेल्या कंपनीच्या मार्केटींग विभागात अन् Exhibition ठिकाणी त्यांच्या कंपनीची मार्केटींग करत असणाऱ्या ट्रेनी असिस्टंट मॅनेजर असलेल्या तरुणीला केसांत पिनअप करायला दिला. तिनंही कुठला प्रश्न न करता तो गजरा अलगद स्वीकारला अन् तो तिच्या मोकळ्या केसांत पिनअप केला.

तिच्या त्या कंपनीशी आमचे पूर्वीचे बरेच व्यवहार होत असत, पुढे मी तीन वर्ष या कंपनीत काम केलं. या काळात तिच्याशी कित्येकदा कॉलवर बोलणं झालं, कित्येक तिच्यासोबत डील झाल्या. तिचा ट्रेनी असिस्टंट मॅनेजरपासून सुरू झालेला प्रवास ते कंपनीतील Management विभागात एक महत्त्वाची तिनं पटकावलेली जागा हा प्रवास मी जवळून बघितला.

जेव्हा केव्हा तिच्याशी बोलणं व्हायचं, तेव्हा कित्येकदा या रातराणीच्या गजऱ्याच्या आठवणी आमच्या बोलण्यातून येऊन जायच्या अन् मग बरेच बोलणं विषयाला घेऊन पुढे होऊन जायचं. पुढे मी ती कंपनी सोडली अन् तेथील असे बरेच संपर्कही कायमचे संपुष्टात आले, ज्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.

कधी कधी कॉर्पोरेट विश्वात असं लिमिटेड असणं जिव्हारी लागतं अन् मग असे काही सुगंधी क्षण आठवणींच्या कप्प्यात कैद होऊन जातात कायमसाठी. त्यांच्या आठवांचा दरवळ मग कायम आठवण स्वरूपात सोबत असतो.

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड