मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग- २

सुगीचे दिस..! भाग- २

सांज सरली भाकर खाऊन झाली तसं मी अंगावर रग घेऊन खाटेवर पडलो होतो अंगणात न्याहाळत ये-जा करणाऱ्या वाटसरूंना. आज शेतात जरा जास्तच काम झालं असल्याने पाय खूप दुखायला लागले होते. इतक्यात मागे भेटलेल विष्णू म्हातारं बाबा मला पुन्हा दिसलं. मी राहूनच त्याला आवाज दिला ये बाबा कुट निघालासा थंडीवाऱ्यात..?
त्यानं हातानं खूनवलं सावत्या माळ्याच्या देवळात जातोय असं..!

झोप काय येत नव्हती, कितीवेळ आकाशात तार्यांना पाहत बसलो, अंगात हुडहुडी भरून आली. तसं अंगात सुटर घालून गल्लीत पोरांनी शेकोटी पेटीली हुती तिथं मी जाऊन बसलो. गावकुसाच्या सतरा लोकांच्या, सतरा विषयांच्या सतरा गोष्टी तिथं चालू होत्या. मी काहीवेळ थांबलो अन् पुन्हा झोपेने डोळे लागायला लागले तसे घराच्या दिशेने आलो.

सारी मुलं घराच्या वाटा जवळ करून घरी झोपायला निघून गेली होती. ज्या तरण्या पोरांची आज मंदिर राखायची पाळी होती, ती पोरं मंदीर राखायला म्हणून मंदिराच्या चहूबाजूंनी असलेल्या ओट्यावर बसून हातात तंबाखू घेऊन तिला चोळीत गप्पा झोडीत बसली होती. संत्या, रामू, जगण्या यांच्या गप्पा तर विझून गेलेल्या शेकोटी पुढे फतकल मारून बसून निवांत चालू होत्या. मस्त मफलरने मुंडासे बांधून अन् अंगात विनीचं स्वेटर घालून ती सगळी निवांत बसली होती. 

त्यांना नव्हते सतावत भविष्य की त्यासाठी नव्हती त्यांना कुठली चिंता जे आहे ते छान आयुष्य ती सगळीच मुलं जगत होती अन् मी अजूनही जगण्यासाठी आयुष्याची गणितं जुळवत बसलो होतो. जी इतक्या लहान वयातच मला जुळवायला लागत होती.हा सगळा विचार करत थंडीत अंगावर रग घेऊन बाहेर अंथरलेल्या खाटेवरच झोपून होतो.

आभाळ भरले आकाश काही वेळापूर्वी निवांत मोकळं झालं होतं अन् आता आकाशात टिपूर चांदण्यानी गर्दी केली होती. चंद्राची कोर तिचं काम करत होती अन् काळोखातही तिचा प्रकाश देऊन जंगलातील प्राण्यांना रातीच्या मुक्त भटकंतीसाठी मदत करत होती. मी हा विचार करत करत डोळा लागला म्हणून झोपी गेलो. तितक्यात काठीच्या ठोक्याचा आवाज आला अन् मी अंगावर असलेली चादर घेऊन चहूकडे बघू लागलो.

बघतोय तर घटकाभरानं विष्णू म्हातारं बाबा पुन्हा देवळातून निघालं होतं. थरथत्या हातानं डाव्या हातातील काठी उजव्या अंगाला टेकवत टेकवत विष्णू म्हातारं बाबा त्याच्या घरच्या रस्त्याला चालत गेलं. अधून मधून थंडीचे दिस असल्यानं अन् विष्णू म्हातारं बाबाला भोमारा आला असल्यानं ते रस्त्यानं खोकरत खाकरत चालत होतं.

अन् रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोकल्याच्या एखाद्-दुसऱ्या उबाळे सरशी तोंडात येणारा बेडका जोरात खोकरून तोंडात जमा करायचं अन् नियम लाऊन पाण्याची पिचकारी फेकावी तसं तो विष्णू म्हातारं बाबा तो तोंडातील बेडका फेकायचा. कधीतरी त्याचं हे असं वागणं बघुन त्याला हे नवीन खूळ तर सुचले नसल असं वाटून जायचं.

विष्णू म्हातारं बाबा रस्त्यानं चालत होतं तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती, सारं गाव शांत निद्रेत पहुडले होते अन् देवळात सुरू असलेला देवाच्या नावाचा धावा हळूहळू आवाजातून ओसरला होता. गावाच्या उत्तरेला असलेल्या स्मशानातून कोल्ह्याची अन् कुत्र्याची झुंज झुंपावी इतका मोठ्यानं भुंकल्याचा आवाज कानावर पडत होता अन् यातील बहुतांश कुत्रे आता पंधरा वीस मिनिटांच्या झटपटीनंतर मोठ्यानं आकाशाकडे तोंड करून इवळत असल्याचा आवाज येत होता.

कदाचित एखाद दोन कुत्र्यांची नरडी कोल्ह्याच्या टोळीने फोडली असतील. आता त्यांच्या झटापटीने आकाशात उधळलेली धूळ मला बसल्या खाटेवरून दिसून आली. गाव जसं एखाद्या दुष्काळात ओसाड पडावं असं वाटू लागलं होतं. गावाच्या रस्त्यानं धुकं चौफेर साऱ्यागावात शिवाशिवीचा खेळ खेळत असावी असं वाटून गेलं.

मी पुन्हा पाहिलं तेव्हा विष्णू म्हातारं बाबा घरी पोहचले होते अन् कव्हरभर त्याच्या घरच्या ओट्यावर त्या लेकाने दिलेल्या चष्म्याला बघत बसल होत. अन् मनातच काहीतरी बडबड करत हातवारे करत होतं. मी त्याला न्याहाळत बसलो तेव्हा त्यानं एकवार उठून त्याच्या खाटेजवळ असलेल्या केळीतून पेलाभर पाणी वरून तोंडात पिण्यासाठी धरलं होतं पेल्यातील अर्धे अधिक पाणी ओघळत त्याच्या ढेरीपर्यंत आलं होतं.अन् असं दोन पेले पाणी पिऊन विष्णू म्हातारं बाबा खाटेवर जाऊन विसावले.

मी ही उठून सिलपर पायात घालून घराच्या मांगच्या भिंतीवर धार मारून काही आकृत्या काढून चड्डी कर्धुड्यात गुंतवून पुन्हा खाटेवर येऊन झोपलो.मी अंगावर रग घेऊन डोळे बंद केले, पण विष्णू म्हातारं बाबा अजून चष्म्याकडेच पाहत होतं. कधी आकाशाकडं पाहत होते, त्याला नव्हती वाजत थंडी की नव्हते दुखत त्याचे पाय दिवसभर काम करूनही. मी मात्र फार दमलो होतो आता त्या कारणानं मला झोप आवरत नव्हती, मी डोळे बंद करून त्या विष्णू म्हातारं बाबाबद्दल विचार करत झोपी गेलो.

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड