मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ७

सुगीचे दिस..! भाग - ७

भोळ्या राजू त्याची कपडे अन् त्याची बासनं धुवून, झुळक्या बावडीतून पाणी काढून घमील्यात ओतून गुरांना दाखवीत होता. सोबतच पाटलांशी कामाच्या बाबतीत बोलत होता, पाटील त्याला प्रश्न करत अन् तो दोन- चार शब्दात पाटलांच्या प्रश्नांचे उत्तर देत असे.

एरवी भोळ्या राजू फार बडबड्या साऱ्या गावाला बोलून गाभण करेल इतका बडबड करत असे. बरं त्याला बोलायला कुठले विषय शोधायची गरज नसे की, कुणी मित्र शोधायचीही गरज नसे. चालत्या बोलत्या अनोळखी वाटेवर चालणाऱ्या माणसांशी लगट करून तो बोलत असे. त्याचा भोळसर चेहरा बघून मग गावच्या वाटेला जाणारे लोकंही थांबून मग त्याच्याशी दोन-चार गोष्टी करून घेत असे.

गप्पा करायला कुणी नाहीच भेटलं तर मग तो हनुमान देवाच्या मंदिराला असलेल्या ओट्यावर जाऊन बसे अन् मोठ्यानं हनुमान चालीसा घोकीत असे. दोन-चार अक्षरंही धड न येणारा भोळ्या राजू हनुमान चालीसा तर इतकी सुंदर म्हणत असे की, लोकं त्याच्या तोंडाकडे बघून हा काहीतरी दैवी चमत्कार आहे असं समजत. पण; त्याला हनुमान भक्तीचे खूप वेड होते, त्याला वाटायचं माझी ही प्रामाणिक भक्ती कधीतरी फळाला येईल अन् माझी सर्व प्रश्न नकळत सुटत जाईल. त्यामुळं तो हे सगळं खूप मनोभावे करत असायचा.

दर शनिवारी शिवनामायच्या एका अंगाला असलेल्या मुरमट खदानीत असलेल्या ढवळ्या रुईच्या फुलांचा अन् त्या झाडाच्या पानांचा हार करून तो देवाला वाहत असे. दर शनिवारी पहिला हार घालण्याचा मान गावाने भोळ्या राजूला दिला होता, एरवी मग इतर दिवशी गावची लोकं हार घालीत. 

दर शनिवारी पहाटेच सात वाजता भोळ्या राजू मंगळी आईच्या डोहात अंघोळ करायचा एरवी हाफ चड्डी अन् बंडी घातलेला राजू शनिवारी मात्र सोवळे नेसायचा. मग एका हातात ती माळ, फुलं अन् एका हातात दोन अगरबत्त्या घेऊन तो हनुमान देवाच्या देऊळकडे जायचा, मग मनोभावे हनुमान देवाची पूजाअर्चा करायचा.

पहाटेच माईक न घेता खूप गोड आवाजात हनुमान चालीसा पठण करायचा. मग मागुन येणारी लोक त्याच्या या हनुमान चालीसा पठनाला उपस्थित राहायचे. मग कुणी नारळ अन् कुणी साखर घेऊन आलेलं असायचं हनुमानाला नारळ फोडले की त्याची खांडकं करून त्यात साखर टाकून भोळ्या राजू सगळ्या उपस्थित लोकांना वाटून द्यायचा, मग तिथेच पारगभर गप्पा झोडीत बसायचा.पाटलांच्या वावरात सुरू असलेल्या कामाचे गणितं जुळवत लोकांना सांगायचा.

लोकं पाटलांची गुपितं त्याच्या भोळ्या स्वभावामुळे भोळ्या राजूकडून काढून घ्यायची अन् मग भोळ्या राजूची पाटील बोल लाऊन खरडपट्टी काढीत असे.

दुपारचा पार कलून गेला उतरतीची उन्हं मळ्याला आली होती अन् इतकावेळ झुळक्या बावडीपाशी पसरलेले पाटील वावरात भटकत भटकत आम्ही कांदे काढीत होतो तिथं आले. भोळ्या राजू मागे पडलेल्या कांद्याच्या पाथीला माळरानात गंजी करून ठेवत होता. पुढे पाथीचे ते गवत वाळून गेलं की कांदा काढल्यावर त्याला उभ्या वावरात तो जाळून टाकणार होता. पण आम्हाला काही दोन जुड्या तो पाथीच्या देणार नव्हता. पाटलांनी त्याला तसं सांगितलं असावं, नाहीतर भोळ्या राजू त्यांची चड्डीसुद्धा लोकांनी गोड बोललं तर काढून देईल इतका भोळा होता.

पाटील आमच्या कांदे काढायच्या टोळीकडे आले तसं सगळे गपगुमान होऊन कांदे काढू लागले. आमच्या टोळीच्या मुकरदंम बाई म्हणजे शांता मामीला पाटील बोलते झाले अन् मी अन् इस्माईल नजर खाली घालून जमिनीतील कांदे उपटू लागलो होतो. काय शांता अक्का कसा हायसा यंदाच्या सालाला कांदा पाटलांचा, हाय का साऱ्या गावात टाप पाटलांच्या कांद्यासारखी पोचायची कुणाच्या कांद्यात. यंदाच्या सालाला मोप खर्च केला आहे शांता मामी कांद्याला लाखूच्या वर खर्च झाला हाय. बस तुमच्या आशीर्वादाने पाटलाचा पैका व्हावा कांद्याचा. पुन्हा दोन तीन बीघे जमीन घेतो बघा यंदाच्या सालाला मामी.

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड