मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ७

सुगीचे दिस..! भाग - ७

भोळ्या राजू त्याची कपडे अन् त्याची बासनं धुवून, झुळक्या बावडीतून पाणी काढून घमील्यात ओतून गुरांना दाखवीत होता. सोबतच पाटलांशी कामाच्या बाबतीत बोलत होता, पाटील त्याला प्रश्न करत अन् तो दोन- चार शब्दात पाटलांच्या प्रश्नांचे उत्तर देत असे.

एरवी भोळ्या राजू फार बडबड्या साऱ्या गावाला बोलून गाभण करेल इतका बडबड करत असे. बरं त्याला बोलायला कुठले विषय शोधायची गरज नसे की, कुणी मित्र शोधायचीही गरज नसे. चालत्या बोलत्या अनोळखी वाटेवर चालणाऱ्या माणसांशी लगट करून तो बोलत असे. त्याचा भोळसर चेहरा बघून मग गावच्या वाटेला जाणारे लोकंही थांबून मग त्याच्याशी दोन-चार गोष्टी करून घेत असे.

गप्पा करायला कुणी नाहीच भेटलं तर मग तो हनुमान देवाच्या मंदिराला असलेल्या ओट्यावर जाऊन बसे अन् मोठ्यानं हनुमान चालीसा घोकीत असे. दोन-चार अक्षरंही धड न येणारा भोळ्या राजू हनुमान चालीसा तर इतकी सुंदर म्हणत असे की, लोकं त्याच्या तोंडाकडे बघून हा काहीतरी दैवी चमत्कार आहे असं समजत. पण; त्याला हनुमान भक्तीचे खूप वेड होते, त्याला वाटायचं माझी ही प्रामाणिक भक्ती कधीतरी फळाला येईल अन् माझी सर्व प्रश्न नकळत सुटत जाईल. त्यामुळं तो हे सगळं खूप मनोभावे करत असायचा.

दर शनिवारी शिवनामायच्या एका अंगाला असलेल्या मुरमट खदानीत असलेल्या ढवळ्या रुईच्या फुलांचा अन् त्या झाडाच्या पानांचा हार करून तो देवाला वाहत असे. दर शनिवारी पहिला हार घालण्याचा मान गावाने भोळ्या राजूला दिला होता, एरवी मग इतर दिवशी गावची लोकं हार घालीत. 

दर शनिवारी पहाटेच सात वाजता भोळ्या राजू मंगळी आईच्या डोहात अंघोळ करायचा एरवी हाफ चड्डी अन् बंडी घातलेला राजू शनिवारी मात्र सोवळे नेसायचा. मग एका हातात ती माळ, फुलं अन् एका हातात दोन अगरबत्त्या घेऊन तो हनुमान देवाच्या देऊळकडे जायचा, मग मनोभावे हनुमान देवाची पूजाअर्चा करायचा.

पहाटेच माईक न घेता खूप गोड आवाजात हनुमान चालीसा पठण करायचा. मग मागुन येणारी लोक त्याच्या या हनुमान चालीसा पठनाला उपस्थित राहायचे. मग कुणी नारळ अन् कुणी साखर घेऊन आलेलं असायचं हनुमानाला नारळ फोडले की त्याची खांडकं करून त्यात साखर टाकून भोळ्या राजू सगळ्या उपस्थित लोकांना वाटून द्यायचा, मग तिथेच पारगभर गप्पा झोडीत बसायचा.पाटलांच्या वावरात सुरू असलेल्या कामाचे गणितं जुळवत लोकांना सांगायचा.

लोकं पाटलांची गुपितं त्याच्या भोळ्या स्वभावामुळे भोळ्या राजूकडून काढून घ्यायची अन् मग भोळ्या राजूची पाटील बोल लाऊन खरडपट्टी काढीत असे.

दुपारचा पार कलून गेला उतरतीची उन्हं मळ्याला आली होती अन् इतकावेळ झुळक्या बावडीपाशी पसरलेले पाटील वावरात भटकत भटकत आम्ही कांदे काढीत होतो तिथं आले. भोळ्या राजू मागे पडलेल्या कांद्याच्या पाथीला माळरानात गंजी करून ठेवत होता. पुढे पाथीचे ते गवत वाळून गेलं की कांदा काढल्यावर त्याला उभ्या वावरात तो जाळून टाकणार होता. पण आम्हाला काही दोन जुड्या तो पाथीच्या देणार नव्हता. पाटलांनी त्याला तसं सांगितलं असावं, नाहीतर भोळ्या राजू त्यांची चड्डीसुद्धा लोकांनी गोड बोललं तर काढून देईल इतका भोळा होता.

पाटील आमच्या कांदे काढायच्या टोळीकडे आले तसं सगळे गपगुमान होऊन कांदे काढू लागले. आमच्या टोळीच्या मुकरदंम बाई म्हणजे शांता मामीला पाटील बोलते झाले अन् मी अन् इस्माईल नजर खाली घालून जमिनीतील कांदे उपटू लागलो होतो. काय शांता अक्का कसा हायसा यंदाच्या सालाला कांदा पाटलांचा, हाय का साऱ्या गावात टाप पाटलांच्या कांद्यासारखी पोचायची कुणाच्या कांद्यात. यंदाच्या सालाला मोप खर्च केला आहे शांता मामी कांद्याला लाखूच्या वर खर्च झाला हाय. बस तुमच्या आशीर्वादाने पाटलाचा पैका व्हावा कांद्याचा. पुन्हा दोन तीन बीघे जमीन घेतो बघा यंदाच्या सालाला मामी.

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...