मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ७

सुगीचे दिस..! भाग - ७

भोळ्या राजू त्याची कपडे अन् त्याची बासनं धुवून, झुळक्या बावडीतून पाणी काढून घमील्यात ओतून गुरांना दाखवीत होता. सोबतच पाटलांशी कामाच्या बाबतीत बोलत होता, पाटील त्याला प्रश्न करत अन् तो दोन- चार शब्दात पाटलांच्या प्रश्नांचे उत्तर देत असे.

एरवी भोळ्या राजू फार बडबड्या साऱ्या गावाला बोलून गाभण करेल इतका बडबड करत असे. बरं त्याला बोलायला कुठले विषय शोधायची गरज नसे की, कुणी मित्र शोधायचीही गरज नसे. चालत्या बोलत्या अनोळखी वाटेवर चालणाऱ्या माणसांशी लगट करून तो बोलत असे. त्याचा भोळसर चेहरा बघून मग गावच्या वाटेला जाणारे लोकंही थांबून मग त्याच्याशी दोन-चार गोष्टी करून घेत असे.

गप्पा करायला कुणी नाहीच भेटलं तर मग तो हनुमान देवाच्या मंदिराला असलेल्या ओट्यावर जाऊन बसे अन् मोठ्यानं हनुमान चालीसा घोकीत असे. दोन-चार अक्षरंही धड न येणारा भोळ्या राजू हनुमान चालीसा तर इतकी सुंदर म्हणत असे की, लोकं त्याच्या तोंडाकडे बघून हा काहीतरी दैवी चमत्कार आहे असं समजत. पण; त्याला हनुमान भक्तीचे खूप वेड होते, त्याला वाटायचं माझी ही प्रामाणिक भक्ती कधीतरी फळाला येईल अन् माझी सर्व प्रश्न नकळत सुटत जाईल. त्यामुळं तो हे सगळं खूप मनोभावे करत असायचा.

दर शनिवारी शिवनामायच्या एका अंगाला असलेल्या मुरमट खदानीत असलेल्या ढवळ्या रुईच्या फुलांचा अन् त्या झाडाच्या पानांचा हार करून तो देवाला वाहत असे. दर शनिवारी पहिला हार घालण्याचा मान गावाने भोळ्या राजूला दिला होता, एरवी मग इतर दिवशी गावची लोकं हार घालीत. 

दर शनिवारी पहाटेच सात वाजता भोळ्या राजू मंगळी आईच्या डोहात अंघोळ करायचा एरवी हाफ चड्डी अन् बंडी घातलेला राजू शनिवारी मात्र सोवळे नेसायचा. मग एका हातात ती माळ, फुलं अन् एका हातात दोन अगरबत्त्या घेऊन तो हनुमान देवाच्या देऊळकडे जायचा, मग मनोभावे हनुमान देवाची पूजाअर्चा करायचा.

पहाटेच माईक न घेता खूप गोड आवाजात हनुमान चालीसा पठण करायचा. मग मागुन येणारी लोक त्याच्या या हनुमान चालीसा पठनाला उपस्थित राहायचे. मग कुणी नारळ अन् कुणी साखर घेऊन आलेलं असायचं हनुमानाला नारळ फोडले की त्याची खांडकं करून त्यात साखर टाकून भोळ्या राजू सगळ्या उपस्थित लोकांना वाटून द्यायचा, मग तिथेच पारगभर गप्पा झोडीत बसायचा.पाटलांच्या वावरात सुरू असलेल्या कामाचे गणितं जुळवत लोकांना सांगायचा.

लोकं पाटलांची गुपितं त्याच्या भोळ्या स्वभावामुळे भोळ्या राजूकडून काढून घ्यायची अन् मग भोळ्या राजूची पाटील बोल लाऊन खरडपट्टी काढीत असे.

दुपारचा पार कलून गेला उतरतीची उन्हं मळ्याला आली होती अन् इतकावेळ झुळक्या बावडीपाशी पसरलेले पाटील वावरात भटकत भटकत आम्ही कांदे काढीत होतो तिथं आले. भोळ्या राजू मागे पडलेल्या कांद्याच्या पाथीला माळरानात गंजी करून ठेवत होता. पुढे पाथीचे ते गवत वाळून गेलं की कांदा काढल्यावर त्याला उभ्या वावरात तो जाळून टाकणार होता. पण आम्हाला काही दोन जुड्या तो पाथीच्या देणार नव्हता. पाटलांनी त्याला तसं सांगितलं असावं, नाहीतर भोळ्या राजू त्यांची चड्डीसुद्धा लोकांनी गोड बोललं तर काढून देईल इतका भोळा होता.

पाटील आमच्या कांदे काढायच्या टोळीकडे आले तसं सगळे गपगुमान होऊन कांदे काढू लागले. आमच्या टोळीच्या मुकरदंम बाई म्हणजे शांता मामीला पाटील बोलते झाले अन् मी अन् इस्माईल नजर खाली घालून जमिनीतील कांदे उपटू लागलो होतो. काय शांता अक्का कसा हायसा यंदाच्या सालाला कांदा पाटलांचा, हाय का साऱ्या गावात टाप पाटलांच्या कांद्यासारखी पोचायची कुणाच्या कांद्यात. यंदाच्या सालाला मोप खर्च केला आहे शांता मामी कांद्याला लाखूच्या वर खर्च झाला हाय. बस तुमच्या आशीर्वादाने पाटलाचा पैका व्हावा कांद्याचा. पुन्हा दोन तीन बीघे जमीन घेतो बघा यंदाच्या सालाला मामी.

क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...