मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस भाग -१

सुगीचे दिस भाग -१

सूर्य अस्ताला गेला तसे गाव, रानात दिवस मावळतीला आला. अंधार पडायच्या आत शेतातून घराकडे जायची ओढ लागली. ढोरांना हौदावर पाणी पाजून, वैरण टाकून, गोठ्यात बांधली. गायीचे दूध वासराला पाजून,काही सांच्या चहाला म्हणून केटलीत काढून घेतलं. हातपाय धुवून वावरातले कापडंबदलून तो विष्णू म्हातार बाबा घराच्या दिशेनं निघाला होता.
अंगात इरलेला सदरा, चार ठीकाणी ठीगळं दिलेल धोतर घालून तो उरे दिवस पुरे करत होता. वाहनाला चिंदकाने बांधुन एकएक दिवस काढत होता, त्याला नको होत सुटर अंगाला की नाही वाजली त्याला कधी थंडी. हा पण हल्ली दिसायला कमी झालं होतं विष्णू म्हातार बाबाला की काय म्हणुन लेकानं शहरातल्या सरकारी दावखण्यातून त्याला एक चष्मा आणला होता.
विष्णू म्हातार बाबा त्याला जीवापाड जपत होते, गळ्यात तुळशी माळ अन् आता उतारवयात त्या तुळशी माळेच्या सोबत ही या चष्म्याची सुतळी होती. विष्णू म्हातार बाबा त्याचा तो निघला होता सावकाश केटलीला हातात घेऊन, मी न्याहाळत राहिलो दूरपर्यंत जास्तोवर त्याला. मी पण निघणारच होतो आता इतक्यात पण; आता कुठं बोर पिकली होती, मग गेलो बोरं खायला. अजून म्हणा तशी बोरं पिकली नव्हती पण खालीच कच्ची पची, हातात बोरटीचा काटा घालून घेतला.
दिवस मावळतीला आल्यानं थंडी सुटली होती, दिवसभर मक्काची कंस भरून, वाहून माझेही पाय पार जड पडले होते, अंग दुखत होते. कसेतरी निघालो घरच्या वाटेला विष्णू म्हातारं चालत होत बिगीबीगी न्याहाळत वस्त्यावरील लोकांची ती बडबड, दुरूनच येणारा तो बोंबलाच्या खुडीचा वास. आम्ही दोघे चालत होतो एरवी मी घरी पोचलो, विष्णू म्हातारं बाबा वाटेनं घरला जाता जाताच रस्त्यावर चपला काढून देवळाची पाय पडून घराच्या रस्त्यान निघायचं.
मी घरला आलो अन् मायना चुलीवर पाणी तापून ठेवलच होत, ते घेऊन मी मोरीत गेलो हातपाय धुतले,तुटक्या आरश्यात बघत बघत वाढलेले केस फनीने मागे घेऊन विंचरले आणि मलाच हसू लागलो. मायन आवाज दिला, मी आलो चुलीजवळ बसलो चुलीचा लालभडक शख अंगाला लागत असल्यानं चेहरा प्रसन्न झाला होता.
मग मायने गिल्लासभर चहा दिला, माझ्यासाठी पिठाच्या डब्ब्यात लपऊन ठेवलेले बटर मला दिले. मी चहा बटर खाऊन घेतले. चिमणी पुढं बसून शिंगाडे मास्तराने दिलेला काहीतरी अभ्यास फाटलेल्या वहीत खरडत बसलो. ते झालं अन् काहीतरी पाठीवर, शिकत हुतो बाप गेला अन् शाळा नावलच राहिली. मला काम करायला लागलं पोटासाठी पोटाची भूक कुठ शाळा शिकू देतीया, पण; आता बसतो काहीवेळ पाटी घेऊन.
ढनाढना आग लागलेल्या चुल्हीवर माय थपथप भाकरी थापवत होती पहिली भाकर भाजायला म्हणून विस्तवाला लागली अन् दुसरी भाकर जेव्हा आई तव्यावर गिरवू लागली तेव्हा मायने मला शिक्यात असलेलं अन् नुकतेच गरम करून ठेवलेले दूध घेऊन भाकर खायला बोलावते, आवाज मारते. शिल्प्यातून साखरेचा डब्बा अन् दूध घेऊन मी चुल्हीसमोर बसतो अन् ताटात भाकर मोडून दूध घेऊन त्या साखर टाकून, कांद्याची पात घालून केलेलं बेसन तोंडी लावत पोटभर जेऊन घेतो.
सोबतीला मायही दोन भाकरी झाल्या की भाकर खायला बसते अन् मग आमच्या कामधंद्याच्या, उद्याच्याला कुठे कामाला जायचं या गप्पा सुरू होत्या. मायीच्या बोलण्यात कळलं की उद्या पहाटे शांता मामी, इस्माईलची माय अन् इस्माईल,मी अन् माय अशी सगळे शिवनामायच्या पल्ल्याड असलेल्या पाटलाच्या वावरात कांदे काढायला उकते ठरून घेतलं हाय.
अन् त्यात मायने माझा बी वाटा केला हाय म्हणून आता आठ दिस कामाची चिंता नव्हती दोन पैकं जास्तीचे हाताला लागणार होतेपण या आठ दिवसात जिवाचं रानही तितकं करायला लागणार होतं. वर भरीस भर की आठ दिसाची शाळा बुडणार होती पण सध्या पैका महत्त्वाचा होता म्हणून म्या माय संगतीने आठ दिस उक्त्यात जायचं ठरवलं अन् माझ्या न बोलण्यानं काही होणारही नव्हतं मायने माझा वाटा केला होता मग जाणं आलं होतच.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...