मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस भाग -१

सुगीचे दिस भाग -१

सूर्य अस्ताला गेला तसे गाव, रानात दिवस मावळतीला आला. अंधार पडायच्या आत शेतातून घराकडे जायची ओढ लागली. ढोरांना हौदावर पाणी पाजून, वैरण टाकून, गोठ्यात बांधली. गायीचे दूध वासराला पाजून,काही सांच्या चहाला म्हणून केटलीत काढून घेतलं. हातपाय धुवून वावरातले कापडंबदलून तो विष्णू म्हातार बाबा घराच्या दिशेनं निघाला होता.
अंगात इरलेला सदरा, चार ठीकाणी ठीगळं दिलेल धोतर घालून तो उरे दिवस पुरे करत होता. वाहनाला चिंदकाने बांधुन एकएक दिवस काढत होता, त्याला नको होत सुटर अंगाला की नाही वाजली त्याला कधी थंडी. हा पण हल्ली दिसायला कमी झालं होतं विष्णू म्हातार बाबाला की काय म्हणुन लेकानं शहरातल्या सरकारी दावखण्यातून त्याला एक चष्मा आणला होता.
विष्णू म्हातार बाबा त्याला जीवापाड जपत होते, गळ्यात तुळशी माळ अन् आता उतारवयात त्या तुळशी माळेच्या सोबत ही या चष्म्याची सुतळी होती. विष्णू म्हातार बाबा त्याचा तो निघला होता सावकाश केटलीला हातात घेऊन, मी न्याहाळत राहिलो दूरपर्यंत जास्तोवर त्याला. मी पण निघणारच होतो आता इतक्यात पण; आता कुठं बोर पिकली होती, मग गेलो बोरं खायला. अजून म्हणा तशी बोरं पिकली नव्हती पण खालीच कच्ची पची, हातात बोरटीचा काटा घालून घेतला.
दिवस मावळतीला आल्यानं थंडी सुटली होती, दिवसभर मक्काची कंस भरून, वाहून माझेही पाय पार जड पडले होते, अंग दुखत होते. कसेतरी निघालो घरच्या वाटेला विष्णू म्हातारं चालत होत बिगीबीगी न्याहाळत वस्त्यावरील लोकांची ती बडबड, दुरूनच येणारा तो बोंबलाच्या खुडीचा वास. आम्ही दोघे चालत होतो एरवी मी घरी पोचलो, विष्णू म्हातारं बाबा वाटेनं घरला जाता जाताच रस्त्यावर चपला काढून देवळाची पाय पडून घराच्या रस्त्यान निघायचं.
मी घरला आलो अन् मायना चुलीवर पाणी तापून ठेवलच होत, ते घेऊन मी मोरीत गेलो हातपाय धुतले,तुटक्या आरश्यात बघत बघत वाढलेले केस फनीने मागे घेऊन विंचरले आणि मलाच हसू लागलो. मायन आवाज दिला, मी आलो चुलीजवळ बसलो चुलीचा लालभडक शख अंगाला लागत असल्यानं चेहरा प्रसन्न झाला होता.
मग मायने गिल्लासभर चहा दिला, माझ्यासाठी पिठाच्या डब्ब्यात लपऊन ठेवलेले बटर मला दिले. मी चहा बटर खाऊन घेतले. चिमणी पुढं बसून शिंगाडे मास्तराने दिलेला काहीतरी अभ्यास फाटलेल्या वहीत खरडत बसलो. ते झालं अन् काहीतरी पाठीवर, शिकत हुतो बाप गेला अन् शाळा नावलच राहिली. मला काम करायला लागलं पोटासाठी पोटाची भूक कुठ शाळा शिकू देतीया, पण; आता बसतो काहीवेळ पाटी घेऊन.
ढनाढना आग लागलेल्या चुल्हीवर माय थपथप भाकरी थापवत होती पहिली भाकर भाजायला म्हणून विस्तवाला लागली अन् दुसरी भाकर जेव्हा आई तव्यावर गिरवू लागली तेव्हा मायने मला शिक्यात असलेलं अन् नुकतेच गरम करून ठेवलेले दूध घेऊन भाकर खायला बोलावते, आवाज मारते. शिल्प्यातून साखरेचा डब्बा अन् दूध घेऊन मी चुल्हीसमोर बसतो अन् ताटात भाकर मोडून दूध घेऊन त्या साखर टाकून, कांद्याची पात घालून केलेलं बेसन तोंडी लावत पोटभर जेऊन घेतो.
सोबतीला मायही दोन भाकरी झाल्या की भाकर खायला बसते अन् मग आमच्या कामधंद्याच्या, उद्याच्याला कुठे कामाला जायचं या गप्पा सुरू होत्या. मायीच्या बोलण्यात कळलं की उद्या पहाटे शांता मामी, इस्माईलची माय अन् इस्माईल,मी अन् माय अशी सगळे शिवनामायच्या पल्ल्याड असलेल्या पाटलाच्या वावरात कांदे काढायला उकते ठरून घेतलं हाय.
अन् त्यात मायने माझा बी वाटा केला हाय म्हणून आता आठ दिस कामाची चिंता नव्हती दोन पैकं जास्तीचे हाताला लागणार होतेपण या आठ दिवसात जिवाचं रानही तितकं करायला लागणार होतं. वर भरीस भर की आठ दिसाची शाळा बुडणार होती पण सध्या पैका महत्त्वाचा होता म्हणून म्या माय संगतीने आठ दिस उक्त्यात जायचं ठरवलं अन् माझ्या न बोलण्यानं काही होणारही नव्हतं मायने माझा वाटा केला होता मग जाणं आलं होतच.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड