मुख्य सामग्रीवर वगळा

सुगीचे दिस..! भाग - ३

सुगीचे दिस..! भाग - ३ 

रात सरली तसं पहाटे पाचच्या ठोक्याला नेहमीपेक्षा लवकरच माय उठून अंगण झाडून शेणाने तिनं सारवून घेतलं. चुल्हीला पोचारायला गावच्या मधोमध असलेल्या जनाईच्या पांढऱ्या मातीच्या मढीला कोरून काही डेपूड घेऊन आली. अन् त्यांना जोत्याच्या एका पोत्यात ठेऊन दिलं अन् काही डेपूडचा भुगा करून, त्यात पाणी ओतून मायनं चुल्हील पोचारून घेतलं. जोत्याच्या पोत्यात ठेवलेला बाकी डेपूड मायनं माझ्यापासुन लपून कावडाच्या मागे लपून ठेवला.

कारण मला माहीत झालं की, मी वेड्याखुळ्या येताजाता मायची नजर चुकवून तो डेपूडच मूठ मूठ काढून खात बसलो असतो. त्याची कोरट माती खायला खूप कोरट अन् हवीहवीशी वाटते म्हणून मी किती मोठी माती खाऊन घ्यायचो. पण बरसदीच्या दिवसांत एकदा एकाकी माझं पोट दुखायला लागलं अन् डॉक्टरकडे मला नेलं. तेव्हा डॉक्टरांना मी खरं सांगितलं मी माती खातो असं तेव्हा त्यांनी मला खूप बोल लावले अन् मग सात इंजेक्शन मला देणार म्हणून तिथेच गडबडा लोळत मोठ्यानं भोकाड पसरून मी रडायला लागलो.

मायच्या कुशीत जाऊन रडायला लागलो. काही दिवस ही मातड खायची सवय सुटली पण; नंतर पुन्हा जैसे थे. पांढऱ्या मातीचा डेपूड दिसला की मी गटकन एक तुकडा काढून तोंडात टाकीत असत. अशी ही पांढऱ्या मातीचा ढेपूड खाण्याची माझी कथा साऱ्या गावाला माहित होती.

मायनं चुल्हीला पोचारा घेतला अन् अंघोळपाणी करून देवपूजा केली, तेव्हा तिच्या चहूबाजूंनी रांगोळी काढून मायने तिला हळदी कुंकू वाहिले. अन् पाणी इस्नाला आलं तसं माय मला उठवायला आली. थंडीचे दिवस असल्यानं पहाटे सूर्य उशाशी येऊनही उठायला नकोसं वाटायचं म्हणून मी अंगावर दोन गोधड्या घेऊन अंगाचा मुटकुळा करून झोपलो होतो. घटकाभरच्या मायने दिलेल्या सततच्या आवाजाला जरा त्रासूनच मी अंगावरल्या गोधड्या बाजूला सारल्या अन् अंग खाजवत उठलो.

आठचा पार कलला तसं मी इस्नाला आलेलं पाणी घेऊन सर्व पाणी अंघावर उभारून घेत अंघोळ पूर्ण केली. मायना दिलेली गरमागरम पोळी चहात बुडवून खात बसलो, थंडीचा दिवसांत अशी चहापोळी खाण्याचा सुख काही और होतं. माय आता मस्त भरल्या वांग्यासोबत म्हणून हातावर भाकरी करत होती. पहाटेची न्याहारी झाली तस घरातील कामे आवरती करून माय केस विंचरत परसदारी बसली होती अन् मी बुट घालून लांब बाह्याचा शर्ट घालून त्याच्या बाह्या वर ओढत होतो.

तितक्यात शांता मामी, इस्माईलची माय अन् इस्माईल आमच्या घराच्या रस्त्यानं आले अन् मला आवाज देऊ लागले. ओय छोटू हो गया क्या तेरा काम..!
पाटील के खेत मे प्याजा निकालने को जाना है..!

इस्माईलचा हा आवाज कानी येताच मी भाकरीचे पेंडके अन् कोड्यासचा डब्बा घेऊन वाटेला आलो. मायने दोन कवाड असलेलं आमचे परसदारचे कवाड कोंड्यात अडकवले अन् त्याला कुलूप लावून उटूळू उंबऱ्याला असलेल्या तुळशी वृंदावनात बादलीमध्ये लावलेल्या तुळशीत पुरून ठेवलं. तितक्यात शांता मामीने मायला आवाज दिला चला ओ भावजय बाई बिगिने लवकर गेलं म्हंजे दुपारची उन्हं येवोस्तोवर बरच काम आवरती घेता येईल.

मायना बिगिनेच वाहना पायात घातल्या अन् माय डोक्यावर कांदे वहायला म्हणून एक घमिले, विळा घेऊन निघाली. पुढे शांता मामी, इस्माईलची माय अन् त्यामागे माय असं सर्व चालत होते. मी अन् इस्माईल रस्त्याने बोराटीला, पेरूच्या झाडाला दगडे मारत चालत होतो, अधूनमधून चप्पलमध्ये दगड घेऊन भिरकावत होतो अन् कोणाचा दूर जातो हे बघून खिदळत होतो. 

रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या पाटात दगड भिरकावीत खापर्यांचा खेळ खेळत होतो. जेव्हा पाट मागे पडला अन् पांदीची वाट लागली, तेव्हा इस्माईलने मक्काचं बुडूख एका अंगाला मोडून मला दिलं अन् त्यानेही घेतलं अन् आम्ही रस्त्यानं ते बुडूख वाटेवर असलेल्या मातडीवर घसडत घसडत चालू लागलो. तारेची खेळायची गाडी करावी तसं हे बुडूख आम्ही खेळत होतो.


क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...