मुख्य सामग्रीवर वगळा

विचारांच्या गर्तेत आपल्याशा झालेल्या वाटा.


विचारांच्या गर्तेत आपल्याशा झालेल्या वाटा..!

रणरणत्याउन्हात पावले फुफाट्याच्या मातडीने माखलेल्या रस्त्याने गरम-गरम मातडीत पायाच्या पंज्याने मातड उधळीत मी चाललो होतो,नव्हता कुठला त्रास चेहऱ्यावर का नव्हता सुख दुःखाचा विचार,मनात येणाऱ्या प्रत्येक सेकंदाला फक्त उत्सव करून जगत होतो  एव्हढ्या उन्हातही काय तो उत्सव असावा या फुफाट्यात चालण्यात हे ही उमगणारे नव्हते...

पण प्रॅक्टिकली जीवन जगायचं म्हंटले की सुखाची,सुखात जीवन जगण्याची गणिते खुप उंचीची असतात,हे खुप थोडक्यात उमगल होते.यामुळेच की काय या क्षणिक सुखात सुख भासवत समाधानी जीवन जगण्याच कोडं उमग्ल्यागत,शहाणं होवुन जगायचं ठरवलं होत.

तेव्हा हेच सोयीचं वाटायचं मग काही क्षण का होईना मानसिक समाधान त्या काही क्षणात खुप काही भेटायचं हे ही खरे होत...


पण,पण...

प्रॅक्टिकली म्हंटले की मग तिथे कुठल्याही लिमिटेशन्स नसतात सर्व उंचीच भासत असते,दिसत असते...

मग हे सर्व काहीही नको वाटतं भटकंती एके भटकंती हेच काय खरं हे मनाला पटते,

मग सुरू होतो खेळ भटकंतीचा,भटकने कुठं नवीन ठिकाणी नसते ज्या ठिकाणाला हजारवेळा बघुन झालंय पण तिथं जावून एक वेगळं मनाला समाधान,हायसं वाटायला लागते तिकडे मन शारिराला अनवाणी पावलांनी घेऊन भटकायला लागते...


किती,कितीवेळ पावले त्या वाटेनं अनवाणी चालत राहतात.मग पुढे कुठे एका वळणाला येणारं ते निलगिरीच्या झाडांचं वन उंच-उंच निलगिरीची सरळसोट वाढलेली झाडं,जिथवर नजर पुरेल तिथवर बघत राहायचं,खाली असलेल्या हिरव्या गवतात पानझडीच्या दिवसात निलगिरीच्या पानाला येणाऱ्या सुगंधाला अनुभवत शरीर जमिनीवर झोकुन द्यायचं... 

कितीवेळ हवाहवासा वाटणारा गार वारा,सोबतीला असलेला तो सुगंध अजुन काय हवंय खूपच एकटं भासायला लागल की निलगिरीच्या पिवळ्या छोट्या-छोट्या गिल्लासाला जमा करत राहायचं अन् त्याच्या राशीत स्वताला शोधायचं.

छोट्या गोष्टीत समाधान बघायला शिकले की हे सर्व अनुभवता येतं...


पुढे जावून बोडक्या बाभळीवर प्रेम करायचं,तिच्याशी सुख दुःखाच्या दोन गोष्टी करायच्या...

सकाळ-सकाळी तिनं केलेल्या पिवळ्या फुलांच्या मुक्त उधाळण्याच्या साक्षीला म्हणुन हातात फुलांची ओंजळ घेऊन त्या फुलांना हृदयाशी घ्यायचं बोलू बघतात ती आपल्याशी,अनुभवायला जमलं की आपुलकीनं आपण या झाडांना आपलेसे करत असतो...

ही बोडखी बाभुळ अशीच कायम सोबत भासते कधी आईवर आजवर कविता करू शकलो नाही पण तिच्यावर कविता केलीय,कंबरेतून वाकलेली हे बोडखी बाभूळ जगण्याच्या या स्पर्धेत तग धरून जगायला लढायला शिकवत असते.कायम म्हणून असा अधून-मधून तिचा सहवास हवहवासा वाटतो अनेकदा वाटतं तिने भेटायला यावं दरवेळी मीच का..?


पण हे तिच्या सोयीचं नाही मग कधीतरी पावले इकडेही वळतात...

 

पुढं भटकत-भटकत अनवाणी पायांनी पाण्याच्या उखळापाशी येऊन थांबावं,गुडघ्यावर बसून डायरेक्ट उखळ्यात तोंड टाकून गार,नितळ पाणी पिण्याचं सुख आताच्या क्वचित माणसांच्या नशिबाला अनुभवायला येतं ते माझ्या नशिबाला आजवर आहे म्हणून आनंद होतो.नाहीतर पाण्याचे हे स्त्रोत केव्हाच जगण्याच्या या कसोटीत मागे पडले असते,त्यांची जागा आधुनिक फिल्टर नावाच्या उपकरणाने घेतली तो ही भारी भासतो पण उखळाचे उखळणारे पाणी पिण्याचे सुख काही औरच...

पाणी पिलं की कितीवेळ गरम-गरम मातीत चालून लाले लाल झालेले अनवाणी पाय उखळात बुडून थंडगार पाण्याला अनुभवावं आणि चालतं व्हावं.टेकडीवरच्या लक्ष्मी आईचं देऊळ तुटत्या झळाईतही तुटक-तुटक दिसत जे अनोखं आहे नाय...

अन् सर्व गावातल्या लोकांना सुखाच छप्पर देऊन माऊली पडत्या उन्हात टेकडीच्या आश्रयाला येऊन बसल,.

अगाद आहे गं माऊली हे सर्व...


धरण पाळीवरून फिरायच म्हंटले की,एकांगाला झोंबणारे गरम वारे अन्  एकांगाला थंड पाण्याच्या लहरीतून अनुभवायला येणारा गारवा,उन्हाच्या या दिवसात गारवा अनुभवायला येतो.आटलेल्या धरणात फक्त दूर दूर आटलेला गाळही दिसू लागतो दूरवर पाळेवर कुठेतरी पाण्याचं बारमाही झिरपनं चालू असते तितकेच काय ते नजरेत भरणारे सुख,मग सटकत्त्या शेवाळ्यात जीवाला सांभाळत चालणे हो मग कधीतरी अधून मधुन नळ्यात असलेलं खेकुड तेव्हढं नजर चोरून बिळातून आपल्याला बघत असते,ती दिसले की भारी वाटतं...


भारी आहे ही दुनिया,अनुभवता यायला हवं फक्त अन् तितकंच तिला आपलसं करूनही घेता यायला हवं,मग सुख काय ते उमगते....


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...