मुख्य सामग्रीवर वगळा

विचारांच्या गर्तेत आपल्याशा झालेल्या वाटा.


विचारांच्या गर्तेत आपल्याशा झालेल्या वाटा..!

रणरणत्याउन्हात पावले फुफाट्याच्या मातडीने माखलेल्या रस्त्याने गरम-गरम मातडीत पायाच्या पंज्याने मातड उधळीत मी चाललो होतो,नव्हता कुठला त्रास चेहऱ्यावर का नव्हता सुख दुःखाचा विचार,मनात येणाऱ्या प्रत्येक सेकंदाला फक्त उत्सव करून जगत होतो  एव्हढ्या उन्हातही काय तो उत्सव असावा या फुफाट्यात चालण्यात हे ही उमगणारे नव्हते...

पण प्रॅक्टिकली जीवन जगायचं म्हंटले की सुखाची,सुखात जीवन जगण्याची गणिते खुप उंचीची असतात,हे खुप थोडक्यात उमगल होते.यामुळेच की काय या क्षणिक सुखात सुख भासवत समाधानी जीवन जगण्याच कोडं उमग्ल्यागत,शहाणं होवुन जगायचं ठरवलं होत.

तेव्हा हेच सोयीचं वाटायचं मग काही क्षण का होईना मानसिक समाधान त्या काही क्षणात खुप काही भेटायचं हे ही खरे होत...


पण,पण...

प्रॅक्टिकली म्हंटले की मग तिथे कुठल्याही लिमिटेशन्स नसतात सर्व उंचीच भासत असते,दिसत असते...

मग हे सर्व काहीही नको वाटतं भटकंती एके भटकंती हेच काय खरं हे मनाला पटते,

मग सुरू होतो खेळ भटकंतीचा,भटकने कुठं नवीन ठिकाणी नसते ज्या ठिकाणाला हजारवेळा बघुन झालंय पण तिथं जावून एक वेगळं मनाला समाधान,हायसं वाटायला लागते तिकडे मन शारिराला अनवाणी पावलांनी घेऊन भटकायला लागते...


किती,कितीवेळ पावले त्या वाटेनं अनवाणी चालत राहतात.मग पुढे कुठे एका वळणाला येणारं ते निलगिरीच्या झाडांचं वन उंच-उंच निलगिरीची सरळसोट वाढलेली झाडं,जिथवर नजर पुरेल तिथवर बघत राहायचं,खाली असलेल्या हिरव्या गवतात पानझडीच्या दिवसात निलगिरीच्या पानाला येणाऱ्या सुगंधाला अनुभवत शरीर जमिनीवर झोकुन द्यायचं... 

कितीवेळ हवाहवासा वाटणारा गार वारा,सोबतीला असलेला तो सुगंध अजुन काय हवंय खूपच एकटं भासायला लागल की निलगिरीच्या पिवळ्या छोट्या-छोट्या गिल्लासाला जमा करत राहायचं अन् त्याच्या राशीत स्वताला शोधायचं.

छोट्या गोष्टीत समाधान बघायला शिकले की हे सर्व अनुभवता येतं...


पुढे जावून बोडक्या बाभळीवर प्रेम करायचं,तिच्याशी सुख दुःखाच्या दोन गोष्टी करायच्या...

सकाळ-सकाळी तिनं केलेल्या पिवळ्या फुलांच्या मुक्त उधाळण्याच्या साक्षीला म्हणुन हातात फुलांची ओंजळ घेऊन त्या फुलांना हृदयाशी घ्यायचं बोलू बघतात ती आपल्याशी,अनुभवायला जमलं की आपुलकीनं आपण या झाडांना आपलेसे करत असतो...

ही बोडखी बाभुळ अशीच कायम सोबत भासते कधी आईवर आजवर कविता करू शकलो नाही पण तिच्यावर कविता केलीय,कंबरेतून वाकलेली हे बोडखी बाभूळ जगण्याच्या या स्पर्धेत तग धरून जगायला लढायला शिकवत असते.कायम म्हणून असा अधून-मधून तिचा सहवास हवहवासा वाटतो अनेकदा वाटतं तिने भेटायला यावं दरवेळी मीच का..?


पण हे तिच्या सोयीचं नाही मग कधीतरी पावले इकडेही वळतात...

 

पुढं भटकत-भटकत अनवाणी पायांनी पाण्याच्या उखळापाशी येऊन थांबावं,गुडघ्यावर बसून डायरेक्ट उखळ्यात तोंड टाकून गार,नितळ पाणी पिण्याचं सुख आताच्या क्वचित माणसांच्या नशिबाला अनुभवायला येतं ते माझ्या नशिबाला आजवर आहे म्हणून आनंद होतो.नाहीतर पाण्याचे हे स्त्रोत केव्हाच जगण्याच्या या कसोटीत मागे पडले असते,त्यांची जागा आधुनिक फिल्टर नावाच्या उपकरणाने घेतली तो ही भारी भासतो पण उखळाचे उखळणारे पाणी पिण्याचे सुख काही औरच...

पाणी पिलं की कितीवेळ गरम-गरम मातीत चालून लाले लाल झालेले अनवाणी पाय उखळात बुडून थंडगार पाण्याला अनुभवावं आणि चालतं व्हावं.टेकडीवरच्या लक्ष्मी आईचं देऊळ तुटत्या झळाईतही तुटक-तुटक दिसत जे अनोखं आहे नाय...

अन् सर्व गावातल्या लोकांना सुखाच छप्पर देऊन माऊली पडत्या उन्हात टेकडीच्या आश्रयाला येऊन बसल,.

अगाद आहे गं माऊली हे सर्व...


धरण पाळीवरून फिरायच म्हंटले की,एकांगाला झोंबणारे गरम वारे अन्  एकांगाला थंड पाण्याच्या लहरीतून अनुभवायला येणारा गारवा,उन्हाच्या या दिवसात गारवा अनुभवायला येतो.आटलेल्या धरणात फक्त दूर दूर आटलेला गाळही दिसू लागतो दूरवर पाळेवर कुठेतरी पाण्याचं बारमाही झिरपनं चालू असते तितकेच काय ते नजरेत भरणारे सुख,मग सटकत्त्या शेवाळ्यात जीवाला सांभाळत चालणे हो मग कधीतरी अधून मधुन नळ्यात असलेलं खेकुड तेव्हढं नजर चोरून बिळातून आपल्याला बघत असते,ती दिसले की भारी वाटतं...


भारी आहे ही दुनिया,अनुभवता यायला हवं फक्त अन् तितकंच तिला आपलसं करूनही घेता यायला हवं,मग सुख काय ते उमगते....


Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ