मुख्य सामग्रीवर वगळा

कॉर्पोरेट क्षेत्र आणि संधी..!

कॉर्पोरेट क्षेत्र आणि संधी..!

भर दुपारच्या वेळेला मनाला जेव्हा जरासे हलके झाल्यासारखे वाटते...
सकाळपासून ऑफिस मध्ये आले की दिवसभराच्या रूटींग मीटिंग,समोरच्या व्यक्तीला त्यात तोंड देणं,कामाचं नियोजन आखत दिलेलं टार्गेट पूर्ण करणे मग यासाठी चालू असलेली ती तडजोड,सर्व काही सोयीस्कर वाटते तोच आपल्या पेक्षा उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीचा कॉम्प्युटर स्क्रीनवर मेसेज आणि पुन्हा हेच सर्व शुन्यातून सुरू होणे...
काम काम आणि फक्त काम..!

इथे हजारदा आपल्याला स्वताला,स्वतःमध्ये असलेल्या पेशन्सना साध्य करून दाखवायचं असते,या स्पर्धेच्या युगात टिकाव धरून रहायचं असते,नेहमीच आपले ते 100% द्यायचे असते ज्यामुळे आपण या उंचीवर पोहचलेलो असतो.
कारण आपल्याला पर्याय म्हणून त्यांच्यासाठी 100 व्यक्ती आपल्या मागे सरळ रेषेत उभे असतात म्हणून त्यांच्यापेक्षा आपले काम कसे योग्य हे दाखवणे वेळोवेळी येतच असतं...

कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीच्या संधी जितक्या सहज उपलब्ध झाल्या तितक्या  त्या नोकऱ्या टिकवण्यासाठी आपला अभ्यास,आपले कौशल्य आणि समोरच्या कंपनीला आपण कसं present करतोय यावर आपल्या जॉबचे कायम राहणे,प्रोमोशन होणे अवलंबुन आहे,असते...अलीकडे जेव्हा विचार करतो तेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रात वाढलेल्या नोकरीच्या संधी, आकर्षक पगार,फॅसिलिटी यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राकडे तरुणांचा कल झुकता दिसत आहे.
त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता काही अंशी भविष्यात तरुण पिढीची चिंता वाटते...

या सर्व प्रोसेसमध्ये मुळातच काही चुकीचं नाहीये,जो आपसातच हुशार आहे तो या सर्व परिस्थितीत आणि या competition असलेल्या जाळ्यात तग धरून,टिकुन त्याची स्वतःची एक उंचीची जागा कायम ठेवणार आहे जी अढळ असणार आहे...

कॉर्पोरेट क्षेत्र म्हंटले की,Joining होतांनी तुम्हाला काय येतं..?
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्याबद्दल तुमचं शिक्षण अन् याही पुढे जाऊन विचार केला जातो तो तुमचा त्या फील्डमध्ये असलेला अनुभव,तुम्ही स्वतःला तुम्ही कसे Present करतात या बाबींचा...

आता हे इथे लिहायची गरज काय..?
हे तर कुणीही माध्यमिक शाळेत शिकणारे मुल आपल्याला सांगेल,पण प्रत्यक्षात 30% व्यक्तीही कॉर्पोरेट क्षेत्रात जॉब करण्यासाठी जाताना यावरील सर्व बाबींचा विचार करत नाही आणि मग पुढे त्रास होतो. 

सांगायचे हेच की या क्षेत्रात निभाव त्याचाच लागणार,सातत्य तोच कायम टिकवून ठेवणार जो या सर्व गोष्टींचा अभ्यास अन् त्यानुसार तयारी करेल.कारण इथे Second Options नाहीत,असेलही तरी त्याचा सारासार परिणाम आपल्या भविष्यावर करीयरच्या बाबतीत होत असतो.
मग पुढेही खुप अवाहने असतातच पण मग ते सातत्य आले की सवयीचं होत जाते आणि आपण ते स्वीकारायला लागतो आणि आपण कॉर्पोरेट क्षेत्राचा एक हिस्सा बनुन जातो....


Written by,
Bharat.L.Sonawane.
MBA-(PRODUCTION AND OPERATIONS).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...