मुख्य सामग्रीवर वगळा

कॉर्पोरेट क्षेत्र आणि संधी..!

कॉर्पोरेट क्षेत्र आणि संधी..!

भर दुपारच्या वेळेला मनाला जेव्हा जरासे हलके झाल्यासारखे वाटते...
सकाळपासून ऑफिस मध्ये आले की दिवसभराच्या रूटींग मीटिंग,समोरच्या व्यक्तीला त्यात तोंड देणं,कामाचं नियोजन आखत दिलेलं टार्गेट पूर्ण करणे मग यासाठी चालू असलेली ती तडजोड,सर्व काही सोयीस्कर वाटते तोच आपल्या पेक्षा उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीचा कॉम्प्युटर स्क्रीनवर मेसेज आणि पुन्हा हेच सर्व शुन्यातून सुरू होणे...
काम काम आणि फक्त काम..!

इथे हजारदा आपल्याला स्वताला,स्वतःमध्ये असलेल्या पेशन्सना साध्य करून दाखवायचं असते,या स्पर्धेच्या युगात टिकाव धरून रहायचं असते,नेहमीच आपले ते 100% द्यायचे असते ज्यामुळे आपण या उंचीवर पोहचलेलो असतो.
कारण आपल्याला पर्याय म्हणून त्यांच्यासाठी 100 व्यक्ती आपल्या मागे सरळ रेषेत उभे असतात म्हणून त्यांच्यापेक्षा आपले काम कसे योग्य हे दाखवणे वेळोवेळी येतच असतं...

कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरीच्या संधी जितक्या सहज उपलब्ध झाल्या तितक्या  त्या नोकऱ्या टिकवण्यासाठी आपला अभ्यास,आपले कौशल्य आणि समोरच्या कंपनीला आपण कसं present करतोय यावर आपल्या जॉबचे कायम राहणे,प्रोमोशन होणे अवलंबुन आहे,असते...अलीकडे जेव्हा विचार करतो तेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रात वाढलेल्या नोकरीच्या संधी, आकर्षक पगार,फॅसिलिटी यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राकडे तरुणांचा कल झुकता दिसत आहे.
त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती बघता काही अंशी भविष्यात तरुण पिढीची चिंता वाटते...

या सर्व प्रोसेसमध्ये मुळातच काही चुकीचं नाहीये,जो आपसातच हुशार आहे तो या सर्व परिस्थितीत आणि या competition असलेल्या जाळ्यात तग धरून,टिकुन त्याची स्वतःची एक उंचीची जागा कायम ठेवणार आहे जी अढळ असणार आहे...

कॉर्पोरेट क्षेत्र म्हंटले की,Joining होतांनी तुम्हाला काय येतं..?
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्याबद्दल तुमचं शिक्षण अन् याही पुढे जाऊन विचार केला जातो तो तुमचा त्या फील्डमध्ये असलेला अनुभव,तुम्ही स्वतःला तुम्ही कसे Present करतात या बाबींचा...

आता हे इथे लिहायची गरज काय..?
हे तर कुणीही माध्यमिक शाळेत शिकणारे मुल आपल्याला सांगेल,पण प्रत्यक्षात 30% व्यक्तीही कॉर्पोरेट क्षेत्रात जॉब करण्यासाठी जाताना यावरील सर्व बाबींचा विचार करत नाही आणि मग पुढे त्रास होतो. 

सांगायचे हेच की या क्षेत्रात निभाव त्याचाच लागणार,सातत्य तोच कायम टिकवून ठेवणार जो या सर्व गोष्टींचा अभ्यास अन् त्यानुसार तयारी करेल.कारण इथे Second Options नाहीत,असेलही तरी त्याचा सारासार परिणाम आपल्या भविष्यावर करीयरच्या बाबतीत होत असतो.
मग पुढेही खुप अवाहने असतातच पण मग ते सातत्य आले की सवयीचं होत जाते आणि आपण ते स्वीकारायला लागतो आणि आपण कॉर्पोरेट क्षेत्राचा एक हिस्सा बनुन जातो....


Written by,
Bharat.L.Sonawane.
MBA-(PRODUCTION AND OPERATIONS).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ