मुख्य सामग्रीवर वगळा

देवळाच्या वाटा..!

#देवळाच्या_वाटा...


सकाळ धरल्या पहाट होते,आवरासावरी करून पावले हनुमानाच्या आणि मग महादेवाच्या देऊळाकडं कुच करतात.
मंदिराचा क्रम चुकतोय पण मनात भाव असले की देवाला सर्व चालतंय,कोण श्रेष्ठ अन् कोण कसा हा विचार करायला त्याच्याकडे वेळ नाहीच व मलाही त्या भानगडीत पडायचं नाही.ठरल्या वेळेला अनवाणी पावलांनी मी चालत राहतो,गावाची वेस ओलांडायला काही अंतर बाकी असले की मारुतीरायाचं देऊळ लागतं.

फुलाला देवाच्या सानिध्यात रहायला आवडत की काय म्हणून नदीच्या थडीला लागुन बेसरमाच्या झाडालगत एक पांढर्या फुलांच्या रुईचे झाड आहे.दोन-चार फुलं दोन-चार पाने घेतली की देउळ गाठायला पावले लागतात,मारुतीरायाच्या चरणाशी पानफुल वाहुन,भोळ्याभाबड्या मनाच्या चार गोष्टी त्याला सांगायच्या देऊळाला चहूकडे तीन चकरा मारायच्या अन् सभामंडपात येऊन काही वेळ शांत बसून राहायचं...

यांचसाठी होतो अट्टहास रोजच्याला देऊळात जायचं..!
सभामंडपात बसल्यावर देवाच्या सानिध्यात छान वाटतं,लॉकडाऊन लागलं अन् लोकं देऊळाकडे येणं विसरली.माझ्यासारखा हौशी येत असतो अधूनमधून कधीतरी माझं ठरल्यावेळी येणं असते,देव बोलत नाय तो फक्त ऐकतो आपण सांगत राहायचं पण आपलं सांगणं आयुष्यभर संपणारे नाही म्हणुन मी देवाला काही बोलतही नाय अन् सांगतही नाही. आलं,दर्शन घेतलं की या सभामंडपात येऊन बसायचं गेले काही दिवस सभामंडप कोणी झाडलाच नाही म्हणून माझ्या पावलांच्या प्रतिकृती त्या धुळीत दिसु लागतात,जसा मारुतीरायचा भला मोठ्ठा पाय गावाच्या काळ्या टेकडीवर मी पाहत असतो...

आपलं कुणी सोबत नसताना काय बसून राहायचं एकटं-एकटं,मला हा एकटेपणा खुप भावतो म्हणूनच हे रोजचं येणं असते.
देऊळात मंडपात पक्षांची चिवचिव,माकडांची या फांदीवरून त्या फांदीवर खेळणे बागडणे चालू असते,कधीतरी वेड्या अशोक माऊली सारखी एखादी वृध्द व्यक्ती देऊळात येते.माझं आपल चालू असते वाऱ्याच्या झुळकेसोबत,मनाच्या लहरीशी,विचारांशी एकरूप होणं वाऱ्याच्या झुळके बरोबर आपोआपच डोळे बंद होतात अन् विचारांची काही काळ समाधी लागते...
हा अनुभव पूर्ण आयुष्य जगायला प्रेरक ठरत असतो...

मग नकळत तंद्री लागते अन् मारुतीरायला दुरून नमस्कार करून सभामंडपातून पावले माघारी फिरतात,महादेवाच्या देऊळाच्या मार्गाला लागतात.हे देऊळ म्हंटले की गावकुसाच्या बाहेर नदी थडीला एकांगाला,हल्ली क्वचितच कुणीतरी जातं या देऊळात.काळ बदलला काळा बरोबर माणसंही,का कुणास ठाऊक मनास नको ते प्रश्न छळ लागतात पण मग स्वतःच त्याला सावर घालत सावरत मी मार्गाने चालू लागतो जोवर होतंय तोवर यायचं मग नंतरच काय मी एकटा माझ्या मार्गाला अन् देऊळ त्याचं त्याच्या जागेवर.असंही माझ्याने देवाला काय फरक पडतो पण मला फरक पडतो...

मनाचं समाधान,मनाला शांतता,भक्ती हे कुठेतरी पिढीजात मला भेटल माझ्या गुणसूत्रात ते मला मिळाले,म्हणून ही ओढ अन् गोडी नाहीतर कसले काय...
असो अनवाणी पावले ठरल्या मार्गाने चालत राहतात,एरवी नदीच्या थडीला असलेले बेशरमाची झाडे दाट,चहूकडे पहुडलेली भासू लागतात.अधून-मधून बेलाच्या झाडांचं दर्शन होते,कधीतरी पिंपळ,साग,लिंब आहे असंख्य झाडे यांच्या पड सावलीत चालतांना पावलाला हवाहवासा थंडावा वाळूत मिळत असतो अन् स्वर्गसुखाचा अनुभव पावलोपावली अनुभवायला मिळत असतो...

मग नकळत साजेश्या पिंपळाच्या पानाला मी शोधू लागतो आणि सोबतच साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तका मधला श्याम मला आठवतो...
पिंपळाच्या साजेश्या पानाला शोधून त्याला टाक लावून छान डवणे तयार केले जाते,त्याने नदी किनाऱ्यावरून पाणी भरून आणून महादेवाच्या पिंडीवर टाकत तिचा अभिषेक माझ्या हाताने मी करतो हे सवयीचं अन् नेहमीचं आहे म्हणून यात मला कुठल कुतूहल वाटत नाही...

 भक्ती भावाने नमस्कार करणे होते,देवाला मनाच्या चार गोष्टी मी सांगू लागतो पिंडीला स्पर्शून नमस्कार केला की झालं महादेवाचं दर्शन इतकचं.नंतर पुन्हा सभा मंडपात येऊन परिसराला अनुभवणे होतं तो परिसर अन् हा परिसर फरक दिसून येतो,येथील शांतता भेटणारा एकांत दरवेळेला त्याचं करून टाकतो मग म्हणुन हे अधूनमधून येणं त्याचं आपल्याला बोलवणच भासते....

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ