मुख्य सामग्रीवर वगळा

नदी तिरावरची रात....

 अलीकडे एक विचार सहज मनात येऊन जातो की,वेळेनुसार सर्व काही बदलत गेले माणसे बदलले,सोबतीने राहणीमान,आवडीनिवडी सर्वच बदलले.वेळेनुसार होणारे बदल स्वीकारणे हे खूप महत्त्वाचे असते पण काही गोष्टींच्या बाबतीत आपण वेळेनुसार बदलूनही त्या बाबतीत आपण आपल्या आवडीनिवडी जपवायला हव्या असे वेळोवेळी मला वाटते.


अलीकडे शहरात कधीतरी नकळत फेरफटका मारतांना जुन्या इमारतींना न्याहाळत बघत राहणे,त्यातील झालेला बदल लक्षात घेऊन ती इमारत पूर्वी कशी होती अन् आता कशी,शहरातील जुनी कामे ज्यांच्या बाबतीत त्यावेळी माझ्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती की ही कामे असेच राहतील पुढे बरीच वर्ष बिनकामाचे खंडहर बनुन.मग ते त्यांना कल्पनेत कथा रुपात सांगणे कसे असेल हे कल्पनेत उत्रवणे मला खूप आवडते... 


साधारण बारा-तेरा वर्षापूर्वी साऱ्या शहरात मुक्तपणे फिरत राहणारा मी गेलं दशक शहरात फक्त गरजेच्या ठिकाणी कामानिमित्त फिरलो असेल.अलीकडे जेव्हा रिकामपणात शहराकडे बारकाईने किंवा बदल होणे,झालेला बदल या नजरेतून बघितलं जातं तेव्हा आश्चर्य वाटायला लागते...


कौलाची ती मोडकळीस आलेली घरे उभ्या हयातीत परिस्थितीमूळे बदलणार नाही असे वाटायचे मग नकळत भविष्यातले चलचित्र नजरेसमोर येऊन जायचं.आज जेव्हा पुन्हा कधीतरी त्याच मार्गाने जात असतो तेव्हा त्याच ठिकाणी उभी असलेली टोलेजंग इमारत लक्ष वेधुन घेत असते,मग पुन्हा त्या मोडकळीस आलेल्या घराची आकृती आठवते.परसदारच्या लोखंडी गेटचा उघडत्या वेळचा करकर आवाज मग पुन्हा एकदा एका दशका नंतर कानी घुमायला लागतो...घराला सुगीचे दिवस अनुभवायला मिळाले हे बघुन आनंद होतो पण जुन्या त्या अडगळीच्या जागेत आजही मन मला शोधत असते त्याचं काय..? डोळ्यांना हे क्षणिक सुख भावणारे असते पण मनाची झालेली द्विधा अवस्था तिचं काय..?


Written by

Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...