मुख्य सामग्रीवर वगळा

नदी तिरावरची रात....

 अलीकडे एक विचार सहज मनात येऊन जातो की,वेळेनुसार सर्व काही बदलत गेले माणसे बदलले,सोबतीने राहणीमान,आवडीनिवडी सर्वच बदलले.वेळेनुसार होणारे बदल स्वीकारणे हे खूप महत्त्वाचे असते पण काही गोष्टींच्या बाबतीत आपण वेळेनुसार बदलूनही त्या बाबतीत आपण आपल्या आवडीनिवडी जपवायला हव्या असे वेळोवेळी मला वाटते.


अलीकडे शहरात कधीतरी नकळत फेरफटका मारतांना जुन्या इमारतींना न्याहाळत बघत राहणे,त्यातील झालेला बदल लक्षात घेऊन ती इमारत पूर्वी कशी होती अन् आता कशी,शहरातील जुनी कामे ज्यांच्या बाबतीत त्यावेळी माझ्या मनात एक गोष्ट पक्की झाली होती की ही कामे असेच राहतील पुढे बरीच वर्ष बिनकामाचे खंडहर बनुन.मग ते त्यांना कल्पनेत कथा रुपात सांगणे कसे असेल हे कल्पनेत उत्रवणे मला खूप आवडते... 


साधारण बारा-तेरा वर्षापूर्वी साऱ्या शहरात मुक्तपणे फिरत राहणारा मी गेलं दशक शहरात फक्त गरजेच्या ठिकाणी कामानिमित्त फिरलो असेल.अलीकडे जेव्हा रिकामपणात शहराकडे बारकाईने किंवा बदल होणे,झालेला बदल या नजरेतून बघितलं जातं तेव्हा आश्चर्य वाटायला लागते...


कौलाची ती मोडकळीस आलेली घरे उभ्या हयातीत परिस्थितीमूळे बदलणार नाही असे वाटायचे मग नकळत भविष्यातले चलचित्र नजरेसमोर येऊन जायचं.आज जेव्हा पुन्हा कधीतरी त्याच मार्गाने जात असतो तेव्हा त्याच ठिकाणी उभी असलेली टोलेजंग इमारत लक्ष वेधुन घेत असते,मग पुन्हा त्या मोडकळीस आलेल्या घराची आकृती आठवते.परसदारच्या लोखंडी गेटचा उघडत्या वेळचा करकर आवाज मग पुन्हा एकदा एका दशका नंतर कानी घुमायला लागतो...घराला सुगीचे दिवस अनुभवायला मिळाले हे बघुन आनंद होतो पण जुन्या त्या अडगळीच्या जागेत आजही मन मला शोधत असते त्याचं काय..? डोळ्यांना हे क्षणिक सुख भावणारे असते पण मनाची झालेली द्विधा अवस्था तिचं काय..?


Written by

Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ