मुख्य सामग्रीवर वगळा

Different ways...

Different ways...
कित्येक दिवस झाले हवाहवासा वाटणारा कोरड्या शुष्क वाऱ्यांचा स्पर्श अंगाला झाला नाहीये डोळ्यांनाही तो अनुभवायला,बघायला भेटला नाहीये.मुळात निसर्ग सर्वदूर सुंदर हिरवाईने नटलेला आहे,थंडीची चाहूल रोज दिवसेंदिवस आधिक स्पष्टपणे जाणवते आहे.

हे सर्व सुख स्पर्शात अनुभवायचं सोडून मी कोरड्या शुष्क वाऱ्याचा विचार करत बसलोय असे का..? तर आमचं हे असच काहीतरी वेगळे चालू असते हा कोरडा शुष्क वारा,वाळलेली झाडांची पाने,फुले,वाळलेले गवत,सोसाट्याचा सुटलेला तो गरम वारा भरउन्हात नजरेला फक्त दूरवर दिसणाऱ्या वाऱ्याच्या तुटत्या झळया जिथवर नजर जाईल तिथवर फक्त वाळलेली उंच उंच सागाची,निलगिरीची,आवळ्याची,चंदनाची,बेहडा,हिरडा यांची झाडे बघायला,त्यांचा स्पर्श अनुभवण्यासाठी मला खूप आवडते.मुळात ही झाडे हिरवाईच्या ऋतुपेक्षा पानगळतीच्या या दिवसात मला बघायला खूप आवडतात त्यांच सौदर्य,निसर्गानं त्यांना दिलेलं त्यांचं वेगळपणही या दिवसात आधीकच खुलून दिसत असते फक्त ते आपल्या नजरेस न्याहाळता,अनुभवता यायला हवं...

वाळलेली,अंगाने पूर्णपणे झुकलेली बोडखी झालेली बाभूळ,गुलमोहराच्या वाळलेल्या फुलांचा किंवा नवीन पालवी फुटणाऱ्या फुलांचा या कोरड्या वाऱ्यात येणारा सुगंध,आसमंतात झळाया तुटणाऱ्या गरम वाऱ्यात उडणारा पालापाचोळा अंगावर घेत कित्येक रानात वणवण करत भटकत राहणं,नाल्या खोल्यात जावून आटलेल्या खोऱ्यात दिसणारी पाण्याची शेवाळ,उंचीवर दिसणारी पाणी कुठवर चढले याची चिन्ह बघत अंदाज घेत मनाची एक वेगळीच अवस्था निर्माण करून जंगलाबद्दल आधिकच समजुन घेत राहणं...

यात त्याच्या माझ्यात कुणी नसते तो दाखवत राहतो मी कसा आहे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे समजुन घेत ते डोक्यात फिट्ट करत चालायचं बस इतकंच...
खरच माणसाच्या सहवासापेक्षा मला निसर्गाचा हा सहवास कधीही खुप जवळचा वाटला आहे,नाही वाटत कधीच इथे एकटेपणाची जाणीव की काही अपूर्ण असल्याची मनाला हुरहूर की कुणाचं दडपण.या निसर्गाच्या सान्निध्यात त्याच्या सोयीनुसार आपल्याला जगायला जमलं की सर्व होते,म्हणुनच की काय कोरड्या शुष्क वाऱ्यातला हा निसर्ग अनुभवायला इतका आवडतो...

नशिबाने हा सहवास मनाला वाटल तेव्हा अनुभवायला भेटत असतो,त्यामुळे कधीतरी जगण्याचे फासे अधिकच चुकीचे पडायला लागले की कधीतरी हे सर्व अनुभवत असतो.हे सर्व खुप सोयीचं आहे,फार काही विशेष नियम नाही हे अनुभवण्यासाठी पण परतीची जाणिव अन् ध्येय स्वस्त बसू देत नाही,कितीही केलेतरी 'स्व' या परिघात जगायला खुप काही गमवावे लागते नाहीतर खुप काही कमवावे दोन्ही बाबतीत अजून तरी आपण परिपूर्ण नाही म्हणून अधून मधून हा सहवास होतो इतकंच...
एवढे मात्र नक्की की,कधीतरी यात पूर्णत्व येईल अन् हे सर्व कायमचं कृतीत होवुन जाईल कधीही न बदलण्यासाठी,तोवर हे अधून मधून भटकणे सोबतीला असणार वेळीच मनाचे डोहाळे पूर्ण करण्यासाठीचा हा सहवास हे कोरडे शुष्क वारे अनुभवत राहणं अजून खूप काही....

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ