मुख्य सामग्रीवर वगळा

Different ways...

Different ways...
कित्येक दिवस झाले हवाहवासा वाटणारा कोरड्या शुष्क वाऱ्यांचा स्पर्श अंगाला झाला नाहीये डोळ्यांनाही तो अनुभवायला,बघायला भेटला नाहीये.मुळात निसर्ग सर्वदूर सुंदर हिरवाईने नटलेला आहे,थंडीची चाहूल रोज दिवसेंदिवस आधिक स्पष्टपणे जाणवते आहे.

हे सर्व सुख स्पर्शात अनुभवायचं सोडून मी कोरड्या शुष्क वाऱ्याचा विचार करत बसलोय असे का..? तर आमचं हे असच काहीतरी वेगळे चालू असते हा कोरडा शुष्क वारा,वाळलेली झाडांची पाने,फुले,वाळलेले गवत,सोसाट्याचा सुटलेला तो गरम वारा भरउन्हात नजरेला फक्त दूरवर दिसणाऱ्या वाऱ्याच्या तुटत्या झळया जिथवर नजर जाईल तिथवर फक्त वाळलेली उंच उंच सागाची,निलगिरीची,आवळ्याची,चंदनाची,बेहडा,हिरडा यांची झाडे बघायला,त्यांचा स्पर्श अनुभवण्यासाठी मला खूप आवडते.मुळात ही झाडे हिरवाईच्या ऋतुपेक्षा पानगळतीच्या या दिवसात मला बघायला खूप आवडतात त्यांच सौदर्य,निसर्गानं त्यांना दिलेलं त्यांचं वेगळपणही या दिवसात आधीकच खुलून दिसत असते फक्त ते आपल्या नजरेस न्याहाळता,अनुभवता यायला हवं...

वाळलेली,अंगाने पूर्णपणे झुकलेली बोडखी झालेली बाभूळ,गुलमोहराच्या वाळलेल्या फुलांचा किंवा नवीन पालवी फुटणाऱ्या फुलांचा या कोरड्या वाऱ्यात येणारा सुगंध,आसमंतात झळाया तुटणाऱ्या गरम वाऱ्यात उडणारा पालापाचोळा अंगावर घेत कित्येक रानात वणवण करत भटकत राहणं,नाल्या खोल्यात जावून आटलेल्या खोऱ्यात दिसणारी पाण्याची शेवाळ,उंचीवर दिसणारी पाणी कुठवर चढले याची चिन्ह बघत अंदाज घेत मनाची एक वेगळीच अवस्था निर्माण करून जंगलाबद्दल आधिकच समजुन घेत राहणं...

यात त्याच्या माझ्यात कुणी नसते तो दाखवत राहतो मी कसा आहे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे समजुन घेत ते डोक्यात फिट्ट करत चालायचं बस इतकंच...
खरच माणसाच्या सहवासापेक्षा मला निसर्गाचा हा सहवास कधीही खुप जवळचा वाटला आहे,नाही वाटत कधीच इथे एकटेपणाची जाणीव की काही अपूर्ण असल्याची मनाला हुरहूर की कुणाचं दडपण.या निसर्गाच्या सान्निध्यात त्याच्या सोयीनुसार आपल्याला जगायला जमलं की सर्व होते,म्हणुनच की काय कोरड्या शुष्क वाऱ्यातला हा निसर्ग अनुभवायला इतका आवडतो...

नशिबाने हा सहवास मनाला वाटल तेव्हा अनुभवायला भेटत असतो,त्यामुळे कधीतरी जगण्याचे फासे अधिकच चुकीचे पडायला लागले की कधीतरी हे सर्व अनुभवत असतो.हे सर्व खुप सोयीचं आहे,फार काही विशेष नियम नाही हे अनुभवण्यासाठी पण परतीची जाणिव अन् ध्येय स्वस्त बसू देत नाही,कितीही केलेतरी 'स्व' या परिघात जगायला खुप काही गमवावे लागते नाहीतर खुप काही कमवावे दोन्ही बाबतीत अजून तरी आपण परिपूर्ण नाही म्हणून अधून मधून हा सहवास होतो इतकंच...
एवढे मात्र नक्की की,कधीतरी यात पूर्णत्व येईल अन् हे सर्व कायमचं कृतीत होवुन जाईल कधीही न बदलण्यासाठी,तोवर हे अधून मधून भटकणे सोबतीला असणार वेळीच मनाचे डोहाळे पूर्ण करण्यासाठीचा हा सहवास हे कोरडे शुष्क वारे अनुभवत राहणं अजून खूप काही....

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...