मुख्य सामग्रीवर वगळा

After long time Cricket..!

After long time Cricket..!

#Afterlongtime..!

आता सध्या मला असलेलं रिकामपण अन् लहानपणीची दोन्ही हातांवर मोजता येईल इतकी मित्र सध्या रोजच्या माझ्या आयुष्यात सोबती असल्यानं आयुष्यातील काही आठवणींना उजाळा दिला जातोय.होय,तब्बल नऊ ते दहा वर्षांनी पुन्हा एकदा क्रिकेटची बॅट हातात धरली आहे,गेले आठ-पंधरा दिवस वेळ भेटल तसं खेळत असतो....

आता पूर्वीसारखं खेळता येत नाही पण आयुष्याच्या या वळणावर जसं समजून घेणारी ही मित्र भेटली आहे अगदी तितकंच अन् तसच क्रिकेट मध्येही ती सांभाळून घेतात...
१३-१४ व्या वर्षी आमच्या टीमचा असलेलो मी युवराज आता खरंच नाही खेळत पहिल्यासारखं,पहिल्यासारखे सहज बाँड्रीपार सिक्स नाही जात माझ्याकडून किंवा नाही टीमच्या अडीअडचणीवेळी विकेट घेऊन टीमला संकटातून तेव्हाच बाहेर काढता येतं मला आता.आता एक छान आहे हेच मित्र समजदार झाल्यानं समजून घेतात हल्ली अश्यावेळी मला...

सुरुवातीच्या चार-पाच दिवस तर हातात धरलेली बॅट पहिल्यासारखी घुमवतासुद्धा येत नव्हती,की बाँड्रीत गेलेला बॉल बॉलरपर्यंत सुद्धा फेकता येत नव्हता,हात खांद्यापासून दुखायला लागायचा. फिल्डींग करतांना कित्येक हातातल्या कॅचेस सहज सुटून गेलेल्या पण नऊ-दहा वर्षांनी मी पुन्हा खेळतांना दिसतोय हेच त्यांना आनंद देणारं होतं,त्यामुळे सांभाळुन घेतलं त्यांनी अजून काय हवं असतं मित्रांकडून...

जेव्हा इतक्या वर्षांनी मी खेळतोय पण त्याच अन् तेव्हाचाच माझ्यावर असलेल्या विश्र्वासानं निर्णायक ओव्हरीतसुध्दा माझ्याकडे बाॅलींगसाठी बाॅल सोप्पवला जातोना तेव्हा माझ्या पहिल्या बाॅलवर सिक्स गेला तरी समजुन घेणारे अन् माझे बॉलींग करतांना अजुनही काही सरावाने तसेच बॉल पडतील हे सांगायला मित्र विसरले नाहीत..!

त्यामुळं हल्ली सर्वांना वेळ भेटल तेव्हा शहराच्या बाहेर कुणाला त्रास नको,लहानपणी फोडलेल्या घरांच्या काचा,अन् आपल्याच माणसांची खाल्लेली बोलणी नको म्हणून शहराच्या बाहेरील भागात मस्त ग्राऊंड करुन त्याच लहानपणीच्या वेडानं दगडांची बाँड्री करून आता पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला लागलो आहे...
आता फार कुणी काका,मावशी रागवत नाही कारण अलिकडे दिवसभर क्रिकेट खेळणं आम्हालाही झेपत नाही,सात-आठ मॅचेस झाल्यात की खूप होवून जाते पण त्यातही तितकाच आनंद मिळतो जितका पूर्वी मिळायचा...

आता सात-आठ दिवसांच्या सरावानंतर बऱ्यापैकी क्रिकेट खेळायला जमायला लागलं आहे.पुन्हा एकदा आमचा युवराज फॉर्ममध्ये आला म्हणून मित्र बोलत असतात हल्ली मला.फार नाही पण प्रत्येक एखाद्या मॅचमध्ये एखादा सिक्स,फोर मारतोय हल्ली बऱ्यापैकी सिंगल,डबल रन काढत असतो आता...

अन् हो तशीच बॉलिंगसुद्धा करायला लागलो आहे,बोटांवर बॉलची स्विंग करायला पुन्हा एकदा जमायला लागलं आहे,मग ती लेग असो किंवा ऑफ.एखादी विकेट भेटून जाते अन् तितकच मानसिक समाधान भेटून जातं...

माझ्या बॉलिंगला फार सिक्स नाही जात आता पण माझ्यापेक्षा तीन-चार वर्षांनी लहान असलेली मित्र छान क्रिकेट खेळतात आता,प्रत्येकात विराट,रोहित,गंभीर बघावा असे खेळता,त्यामुळं त्यांच्यासमोर आमचा निभाव लागत नाही अलिकडे...

आमच्या बाबतीत क्रिकेट खेळासाठी असलेली व्याख्या बदलली आहे,आता आम्ही स्पर्धा म्हणून कधीच क्रिकेट खेळत नाही.आता फक्त त्यातून आनंद भेटतो अन् जुने मित्र पुन्हा एकदा भेटतात पुन्हा कुणीतरी युवराज भाई या बोलला सिक्स मार..! असे म्हणणारे भेटतात,त्यामुळं आनंद वाटतो खेळायला पुन्हा इतक्या वर्षांनी...!

बाकी युवराजसारखी फिल्डींग पुन्हा जमायला लागली आहे,हातात असलेली कॅच असो किंवा दूरपर्यंत पळत जावून धरायला लावणारी कॅच आता हातातून सहज सुटत नाही अन् मिसफिल्डींगसुद्धा कधी होत नाही...
बाकी शिकतोय अजून आयुष्यातसुद्धा अन् कित्येक वर्षांनी क्रिकेट खेळतो आहे यातसुद्धा..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड