मुख्य सामग्रीवर वगळा

सिमांतनी भाग - ४

सिमांतनी - भाग-४

सिमांतनी - ४

सिमांतनीचे नऊ महिने नऊ आठवड्यासारखे सरून गेले अन् ऐन बोचनाऱ्या थंडीत सिमांतनीचे दिवस भरले असल्याचे गावच्या सुईनीने सांगितले.सिमांतनी आता कुठल्याही वखताला बाळंत होईल,हे सहा बाळंतपण झालेल्या तिच्या सासुबाईला कळलं...
आता मात्र सिमांतनीच्या दादला असलेला जो एकुलता एक मुलगा असा तरी या पहिल्या खेपेला सिमांतनीला व्हावा अन् तिला देवानं मोकळं करावं अन् मलाही हा नातूच व्हावा म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी,असं सिमांतनीची सासू सांच्याला भांडे घासत स्वतःशीच बडबडत होती...

सांच्याला जेवणं आवरून,सिमांतनीची सासू भांडे घासून तिने,सिमांतनीला अंथरूण टाकून दिलं.
थंडी खूप असल्यानं अन् शेणानं सांजवेळी सारलेल्या भिंती असल्यानं घरात अजूनच हुडहुडी भरून आल्यासारखे तिला वाटत होते.तिच्या सासूने तिला खाली अंथरायला दिलेली घोंगडी चांगली उबदार असल्यानं तिनं गरमट धरली होती अन् अंगावर पांघरूण म्हणून लेपड्याची केलेली गोधडी अंगावर असल्यानं आता तिला बर वाटत होतं...

सासरा महुरच्या पडवीत टाकलेल्या खाटेवर खोकत-खोकत बिड्या फुंकीत सिमांतनीच्या सासुबाईच्या आई-बापाच्या नावाचा उद्धार करत होता.म्हाताऱ्याच्या गौऱ्या म्हसणात गेल्या पण म्हातारा काही डोक्यात आला नाही,असं म्हणत सासूबाई तिच्या लेकाचे एक अंगाला अंथरूण घालत होती अन् तिचंही.
सिमांतनीच्या या आडीनडीच्या रात्रीला म्हणून तिची सासूबाईसुध्दा आता तिच्या जवळ पहुडली होती...

बाहेर अंधारून आलं होतं,काळोख चहूकडे पडला होता,वाहत्या नदीतून थंड्या पाण्यात वाहणाऱ्या वाफा मात्र दरवाज्यातून दिसू लागल्या होत्या.झोपायला म्हणून सिमांतनीचा दादला चार लोकाचे घरं पुंजून ओसरीला आला,कडाक्याची थंडी वाजत असल्यानं त्यानं पेटीतून सिमांतनीचे तिच्या माहेरून मायना दिलेलं सेटुर काढून घालायला म्हणुन सिमांतनीला दिलं अन् सिमांतनीचा चेहरा खुलून आला....

तोही आता त्याच्या आईच्या अन् बायकोच्या पायथ्याला अंथरलेल्या अंथरुणाला झोपला.रोजचा एक दिवस आजही कलला होता,सिमांतीनीचे बाळंतपण पुन्हा एक दिवसाने जवळ आले होते.आत मात्र त्याची त्याला चिंता सतावत होती,तिचं असलेलं कमी वय अन् तिला हे सर्व सोसल का..? या विचाराने तो या उश्यावरून त्या उश्यावर आपली कुस बदलत होता...

काळोख आधिका-आधिक गडद होत चालला होता.यात कमी की काय म्हणून फळीवर असलेल्या दिवा आता विझायला करत होता अन् एका वख्ताला तो विझला,घरात सर्वत्र काळोख झाला होता...
सासूबाई निवांत पहुडली होती,सासरा अधूनमधून खोकलत बरतळत होता,सिमांतनीचा दादला आता मस्त काळोखाच्या राती घोरत होता...

थंडी अजुन वाढत होती,नदीला असलेलं मोप पाणी अन् चहुकडे असलेली हिरवळ त्यामुळे या सालाला नेहमीपेक्षा जास्तीची थंडी जाणवत होती.देऊळात कीर्तन,अभंग चालू होती टाळ,मृदंग,पखाचा आवाज सिमांतनीच्या कानापहुर येत होता अन् ती हे सर्व मन लावून ऐकत होती...

तिच्या होणाऱ्या बाळावर याचा परिणाम होत होता की काय म्हणून ते पोटातल्या पोटात रांगल्यासारखे करत होते अन् हे सुखद क्षण अनुभवत सिमांतनी निपचित देवाचा धावा करत अंथरुणात मायनं दिलेलं माहेरचं सेटुर घालून निपचित पहुडली होती,निपचित पहुडली होती...

( लेखन भरत सोनवणे नावाने ©® कॉपी राईट असल्या कारणाने नावासहित शेअर करा.)

क्रमशः

Written by,
©®Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड