मुख्य सामग्रीवर वगळा

सिमांतनी भाग - ४

सिमांतनी - भाग-४

सिमांतनी - ४

सिमांतनीचे नऊ महिने नऊ आठवड्यासारखे सरून गेले अन् ऐन बोचनाऱ्या थंडीत सिमांतनीचे दिवस भरले असल्याचे गावच्या सुईनीने सांगितले.सिमांतनी आता कुठल्याही वखताला बाळंत होईल,हे सहा बाळंतपण झालेल्या तिच्या सासुबाईला कळलं...
आता मात्र सिमांतनीच्या दादला असलेला जो एकुलता एक मुलगा असा तरी या पहिल्या खेपेला सिमांतनीला व्हावा अन् तिला देवानं मोकळं करावं अन् मलाही हा नातूच व्हावा म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी,असं सिमांतनीची सासू सांच्याला भांडे घासत स्वतःशीच बडबडत होती...

सांच्याला जेवणं आवरून,सिमांतनीची सासू भांडे घासून तिने,सिमांतनीला अंथरूण टाकून दिलं.
थंडी खूप असल्यानं अन् शेणानं सांजवेळी सारलेल्या भिंती असल्यानं घरात अजूनच हुडहुडी भरून आल्यासारखे तिला वाटत होते.तिच्या सासूने तिला खाली अंथरायला दिलेली घोंगडी चांगली उबदार असल्यानं तिनं गरमट धरली होती अन् अंगावर पांघरूण म्हणून लेपड्याची केलेली गोधडी अंगावर असल्यानं आता तिला बर वाटत होतं...

सासरा महुरच्या पडवीत टाकलेल्या खाटेवर खोकत-खोकत बिड्या फुंकीत सिमांतनीच्या सासुबाईच्या आई-बापाच्या नावाचा उद्धार करत होता.म्हाताऱ्याच्या गौऱ्या म्हसणात गेल्या पण म्हातारा काही डोक्यात आला नाही,असं म्हणत सासूबाई तिच्या लेकाचे एक अंगाला अंथरूण घालत होती अन् तिचंही.
सिमांतनीच्या या आडीनडीच्या रात्रीला म्हणून तिची सासूबाईसुध्दा आता तिच्या जवळ पहुडली होती...

बाहेर अंधारून आलं होतं,काळोख चहूकडे पडला होता,वाहत्या नदीतून थंड्या पाण्यात वाहणाऱ्या वाफा मात्र दरवाज्यातून दिसू लागल्या होत्या.झोपायला म्हणून सिमांतनीचा दादला चार लोकाचे घरं पुंजून ओसरीला आला,कडाक्याची थंडी वाजत असल्यानं त्यानं पेटीतून सिमांतनीचे तिच्या माहेरून मायना दिलेलं सेटुर काढून घालायला म्हणुन सिमांतनीला दिलं अन् सिमांतनीचा चेहरा खुलून आला....

तोही आता त्याच्या आईच्या अन् बायकोच्या पायथ्याला अंथरलेल्या अंथरुणाला झोपला.रोजचा एक दिवस आजही कलला होता,सिमांतीनीचे बाळंतपण पुन्हा एक दिवसाने जवळ आले होते.आत मात्र त्याची त्याला चिंता सतावत होती,तिचं असलेलं कमी वय अन् तिला हे सर्व सोसल का..? या विचाराने तो या उश्यावरून त्या उश्यावर आपली कुस बदलत होता...

काळोख आधिका-आधिक गडद होत चालला होता.यात कमी की काय म्हणून फळीवर असलेल्या दिवा आता विझायला करत होता अन् एका वख्ताला तो विझला,घरात सर्वत्र काळोख झाला होता...
सासूबाई निवांत पहुडली होती,सासरा अधूनमधून खोकलत बरतळत होता,सिमांतनीचा दादला आता मस्त काळोखाच्या राती घोरत होता...

थंडी अजुन वाढत होती,नदीला असलेलं मोप पाणी अन् चहुकडे असलेली हिरवळ त्यामुळे या सालाला नेहमीपेक्षा जास्तीची थंडी जाणवत होती.देऊळात कीर्तन,अभंग चालू होती टाळ,मृदंग,पखाचा आवाज सिमांतनीच्या कानापहुर येत होता अन् ती हे सर्व मन लावून ऐकत होती...

तिच्या होणाऱ्या बाळावर याचा परिणाम होत होता की काय म्हणून ते पोटातल्या पोटात रांगल्यासारखे करत होते अन् हे सुखद क्षण अनुभवत सिमांतनी निपचित देवाचा धावा करत अंथरुणात मायनं दिलेलं माहेरचं सेटुर घालून निपचित पहुडली होती,निपचित पहुडली होती...

( लेखन भरत सोनवणे नावाने ©® कॉपी राईट असल्या कारणाने नावासहित शेअर करा.)

क्रमशः

Written by,
©®Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...