मुख्य सामग्रीवर वगळा

सीमांतनी भाग-३

सिमांतनी भाग-३

रात्रीची भाकर खावून झाली अन् सिमांतनीने भांड्यांचा गराडा परसदारच्या अंगणात घेऊन ती भांडे घासायला बसली.तिच्या जोडीला आता सासूबाई भांडे नारळाच्या काथीने रखुंड्यात घासून देत होती अन् सिमांतनी ते भांडे हिसळून भांड्याच्या घमिल्यात टाकत होती...

एरवी सिमांतनीचा सासरा बाहेर टाकलेल्या लाकडी बाजीवर खोकलत निपचित पडला होता,बिड्यांच व्यसन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजण्यापर्यंत त्याला घेऊन आलं होतं.तो चेहऱ्यानं पार कृश झाला होता,काळा पडला होता,खोकून खोकून पार छातीचा भाता झाल्यागत त्याची छाती उघडी पडली होती...

सिमांतनीच्या दादल्याने मधल्या घराच्या वळकटीत चटई अंथरली अन् गादी टाकून,अंगावर गोधडीचे पांघरूण घेऊन तो दिव्याच्या उजेडाकडे तर कधी त्याच्या सावलीकडे बघत सिमांतनीची वाट बघत लोळत पडला होता...
दिवसभराच्या बकऱ्या राखणीच्या कामामुळे त्याला त्याच्या बायकोशी बोलायलासुद्धा फुरसद नसायची अन् रानात दिवसभराचा वखत कसा निघुन जातो याचीही त्याला कल्पना यायची नाही...

अलिकडे सिमांतनीच्या या अडेलतडेल दिवसांत मात्र त्याला आपली तिला वेळ न देण्याची चुकी कळू लागली होती अन् तिला कमीतकमी या दिवसांत तरी आपल्याकडून हे शब्दांचे प्रेम मिळावे म्हणून तो प्रयत्नशील असायचा.गेले काही दिवस ते दोघेही हा प्रेमाचा सहवास अनुभवत खुश होते,त्यातच येणाऱ्या बाळाची लागलेली चाहूल बाळाचा विषय निघाला की दोघेही या आनंदाने,कल्पनेने खुश होवून जायचे...

सिमांतनीचे भांडी घासून झाले अन् तिने सासूबाईंना बैठकीच्या खोलीत रजई अंथरूण त्यावर अंथरूण टाकून दिले,झोपेच्या वेळेला लागणारा लिंबाचा काढा देऊन सिमांतनीने सासूबाई झोपी गेल्यावर थंडी वाजू नई म्हणून सिमांतनीच्या आईनं दिलेली रघ सासूबाईंच्या अंगावर टाकून तिनं मोहरल्या दारचे कडी कोंडे लावून दिवा मालवला अन् ती झोपायला म्हणून तिच्या खोलीत गेली...

अजूनही तिचा दादला तिची वाट बघत लोळत पडला होता,ती आल्याचं बघून त्यांना एक मंद स्मित हास्य देत तिच्याकडे अन् एकवार तिच्या पोटाकडे बघत त्याने तिला बसायला खूनवले.हिवाळ्याचे दिवस असल्याने घरावरचे पत्र पार गारठून गेले होते अन् कुठं कुठं ते रीसायलासुद्धा लागले होते.

आता दोघेही अंथरुणावर अंग टाकून गप्पा मारत बसले होते,गप्पांचा विषय काय असावा..?
आपल्या बाळाचे आयुष्य अन् त्याचे भविष्य कसे उज्वल ठरेल,त्याला शहराच्या शाळेला टाकायचं राहील म्हणून लागणारा पैका अन् त्याचं नियोजन कसं करायचं अन् होणारं बाळ कुणावर असल यावर तर त्याचे प्रेमळ वाद नियमित होत असायचे.दोघेही वयाने लहान असल्यामुळे कदाचित असेल पण आईबाप होण्याची दोघांना लागलेली चाहूल अलिकडे त्यांना शहाणं करत होती अन् यामुळे आपसात असलेलं त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच होते....

दिवभरच्या थकव्यातून रात्रीच्या झोपे अगोदरच्या त्यांच्या या रोजच्या गप्पा त्यांना त्यांचा थकवा विसरायला भाग पाडायच्या.बराच वेळ झाला होता अन् दोघांनाही आता झोप येत होती,म्हणून दोघेही अंगावर पांघरून घेऊन झोपले होते...

फळीवर ठेवलेली चिमणी विझू की मिनमिनू करत होती अन् याच उजेडात दोघेही झोपी गेले होते आता दोघांची सावली एक झाली होती अन् त्यांच्या आयुष्यातील एक रात्र जसा सूर्य अस्ताला जावा तशी अंधाराकडे कलत उद्याच्या उजेडाकडे निघाली होती....

क्रमशः

(लेखन भरत सोनवणे नावाने कॉपी राईट ©® असल्या कारणाने नावासहित शेअर करा..!)

Written by,
©®Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड