मुख्य सामग्रीवर वगळा

सीमांतनी भाग-३

सिमांतनी भाग-३

रात्रीची भाकर खावून झाली अन् सिमांतनीने भांड्यांचा गराडा परसदारच्या अंगणात घेऊन ती भांडे घासायला बसली.तिच्या जोडीला आता सासूबाई भांडे नारळाच्या काथीने रखुंड्यात घासून देत होती अन् सिमांतनी ते भांडे हिसळून भांड्याच्या घमिल्यात टाकत होती...

एरवी सिमांतनीचा सासरा बाहेर टाकलेल्या लाकडी बाजीवर खोकलत निपचित पडला होता,बिड्यांच व्यसन आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजण्यापर्यंत त्याला घेऊन आलं होतं.तो चेहऱ्यानं पार कृश झाला होता,काळा पडला होता,खोकून खोकून पार छातीचा भाता झाल्यागत त्याची छाती उघडी पडली होती...

सिमांतनीच्या दादल्याने मधल्या घराच्या वळकटीत चटई अंथरली अन् गादी टाकून,अंगावर गोधडीचे पांघरूण घेऊन तो दिव्याच्या उजेडाकडे तर कधी त्याच्या सावलीकडे बघत सिमांतनीची वाट बघत लोळत पडला होता...
दिवसभराच्या बकऱ्या राखणीच्या कामामुळे त्याला त्याच्या बायकोशी बोलायलासुद्धा फुरसद नसायची अन् रानात दिवसभराचा वखत कसा निघुन जातो याचीही त्याला कल्पना यायची नाही...

अलिकडे सिमांतनीच्या या अडेलतडेल दिवसांत मात्र त्याला आपली तिला वेळ न देण्याची चुकी कळू लागली होती अन् तिला कमीतकमी या दिवसांत तरी आपल्याकडून हे शब्दांचे प्रेम मिळावे म्हणून तो प्रयत्नशील असायचा.गेले काही दिवस ते दोघेही हा प्रेमाचा सहवास अनुभवत खुश होते,त्यातच येणाऱ्या बाळाची लागलेली चाहूल बाळाचा विषय निघाला की दोघेही या आनंदाने,कल्पनेने खुश होवून जायचे...

सिमांतनीचे भांडी घासून झाले अन् तिने सासूबाईंना बैठकीच्या खोलीत रजई अंथरूण त्यावर अंथरूण टाकून दिले,झोपेच्या वेळेला लागणारा लिंबाचा काढा देऊन सिमांतनीने सासूबाई झोपी गेल्यावर थंडी वाजू नई म्हणून सिमांतनीच्या आईनं दिलेली रघ सासूबाईंच्या अंगावर टाकून तिनं मोहरल्या दारचे कडी कोंडे लावून दिवा मालवला अन् ती झोपायला म्हणून तिच्या खोलीत गेली...

अजूनही तिचा दादला तिची वाट बघत लोळत पडला होता,ती आल्याचं बघून त्यांना एक मंद स्मित हास्य देत तिच्याकडे अन् एकवार तिच्या पोटाकडे बघत त्याने तिला बसायला खूनवले.हिवाळ्याचे दिवस असल्याने घरावरचे पत्र पार गारठून गेले होते अन् कुठं कुठं ते रीसायलासुद्धा लागले होते.

आता दोघेही अंथरुणावर अंग टाकून गप्पा मारत बसले होते,गप्पांचा विषय काय असावा..?
आपल्या बाळाचे आयुष्य अन् त्याचे भविष्य कसे उज्वल ठरेल,त्याला शहराच्या शाळेला टाकायचं राहील म्हणून लागणारा पैका अन् त्याचं नियोजन कसं करायचं अन् होणारं बाळ कुणावर असल यावर तर त्याचे प्रेमळ वाद नियमित होत असायचे.दोघेही वयाने लहान असल्यामुळे कदाचित असेल पण आईबाप होण्याची दोघांना लागलेली चाहूल अलिकडे त्यांना शहाणं करत होती अन् यामुळे आपसात असलेलं त्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच होते....

दिवभरच्या थकव्यातून रात्रीच्या झोपे अगोदरच्या त्यांच्या या रोजच्या गप्पा त्यांना त्यांचा थकवा विसरायला भाग पाडायच्या.बराच वेळ झाला होता अन् दोघांनाही आता झोप येत होती,म्हणून दोघेही अंगावर पांघरून घेऊन झोपले होते...

फळीवर ठेवलेली चिमणी विझू की मिनमिनू करत होती अन् याच उजेडात दोघेही झोपी गेले होते आता दोघांची सावली एक झाली होती अन् त्यांच्या आयुष्यातील एक रात्र जसा सूर्य अस्ताला जावा तशी अंधाराकडे कलत उद्याच्या उजेडाकडे निघाली होती....

क्रमशः

(लेखन भरत सोनवणे नावाने कॉपी राईट ©® असल्या कारणाने नावासहित शेअर करा..!)

Written by,
©®Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...