मुख्य सामग्रीवर वगळा

जगणं औद्योगिक वसाहतीचं..!

जगणं औद्योगिक वसाहतीचं..!

औद्योगिक वसाहतीत काम करणारा मजूरवर्ग अन् माझे नाते मला नेहमीच खूप जवळचे वाटत आले आहे,का..? माहित नाही.
औद्योगिक वसाहतीत गेलो की,माझी नजर नेहमीप्रमाणे त्या माझ्या प्रत्येक जवळच्या मजूर मित्रांना शोधत असते.कारण या प्रत्येक मित्राच्या आयुष्यामागे प्रत्येकाची एक वेगळी कथा असते,त्यांचं जीवन न अनुभवतासुद्धा फक्त पारखायची कुवत असलेली नजर असली की आपण त्यांच्या या जीवनाशी संवाद करू लागतो...

मला शेतकऱ्याच्या जीवनापेक्षा काही अंशी का होईना यांचं जीवन खूप कष्टी अन् खूप काही सोसायला लावणारे वाटते.म्हणजे शेतकऱ्याचा संघर्ष काही कमी नाही तोही मी अनुभवला आहे,पिढीजात शेतकरी असल्याकारणाने पण आता सध्याची परिस्थिती बघता एकर दोन एकर शेती असलेल्यांनी शेती न केलेलीच मला योग्य वाटते,कारण शेतीत कुठलाही ताळमेळ उरलेला नाही...

असो शेती हा माझा आजच्या लिखाणाचा विषय नाही,
औद्योगिक वसाहतीत गेलं की काही ठराविक वेळेला तुम्हाला कावर्याबावर्या करत फिरणाऱ्या तरुणांच्या नजरा तुम्हाला दिसतील,अर्धवट शिक्षण झालेल्या अन् अलीकडे बऱ्यापैकी सुशिक्षित असलेला तरुणही यात असतो...

पर्याय नाहीये कारण उपलब्ध नसलेला रोजगार अन् दरवर्षी शिक्षण पूर्ण करून जॉबसाठी तयार होणाऱ्या मुलाच्या नवीन बॅचेस,कुठलाही नसलेला ताळमेळ.अनुभवी मुलांना असलेलं प्राधान्य अन् यामुळे फ्रेशर असलेल्या सुशिक्षत मुलांची नौकरीसाठी होत असलेली घुसमट,फजिती अन् त्यांचं हवालदिल होणं.

शेतीतून न झालेली आर्थिक प्रगती,आलेल्या नैसर्गिक आपत्ती,शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,दिवसेंदिवस लोकसंख्या वाढ अन् कमी झालेलं क्षेत्र हे अन् असे अनेक इतर कारणे यामुळे आपल्या पोटापाण्यासाठी शहराकडे वळलेला तरुण वर्ग.आज जेव्हा केव्हा औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी जाणं होतं तेव्हा विविध कंपनीच्या गेटवर कंपनीत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती होण्यासाठी आलेला सुशिक्षित,अशिक्षित,अनुभवी,अनुभव नसलेला मजूर वर्ग बघितला की अनेक प्रश्न पडून जातात...

कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का असेना काम मिळावे म्हणून चालू असलेला संघर्ष बघितला की जुने दिवस आठवतात,अजूनही काही बदलले नाही,त्यावेळेला होणारी अवस्था खूप वाईट असते.दिवसभर काम भेटेल या आशेनं या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर फिरत राहणे,मिळाले तर सहा महिने काम नाही तर पदरी पडलेली निराशा...

अनेकदा कंपनीत काम भेटले तरी मिळणारी तुटपुंजी हजेरी अन् यातून न होणारा उदरनिर्वाह.पुन्हा गावाकडे असलेल्या आई वडिलांना असलेली काळजी,त्यांना यातून पाठवता येईल तितके पैसे पाठवणे अन् कित्येकदा कंपनीत एक वेळचे जेवण भेटते म्हणून त्या एक वेळच्या जेवणावर राहून एक वेळ चहा बिस्कीटवर जगणारी मित्रसुद्धा बघितले.अश्यावेळी आपण काही करू शकत नाही ही जाणीव खूप त्रास देणारी ठरत होती....

या व्यथा न संपणाऱ्या आहे त्यामुळं यावर कितीही लिहले तरी कमीच असेल..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...