मुख्य सामग्रीवर वगळा

जगणं औद्योगिक वसाहतीचं..!

जगणं औद्योगिक वसाहतीचं..!

औद्योगिक वसाहतीत काम करणारा मजूरवर्ग अन् माझे नाते मला नेहमीच खूप जवळचे वाटत आले आहे,का..? माहित नाही.
औद्योगिक वसाहतीत गेलो की,माझी नजर नेहमीप्रमाणे त्या माझ्या प्रत्येक जवळच्या मजूर मित्रांना शोधत असते.कारण या प्रत्येक मित्राच्या आयुष्यामागे प्रत्येकाची एक वेगळी कथा असते,त्यांचं जीवन न अनुभवतासुद्धा फक्त पारखायची कुवत असलेली नजर असली की आपण त्यांच्या या जीवनाशी संवाद करू लागतो...

मला शेतकऱ्याच्या जीवनापेक्षा काही अंशी का होईना यांचं जीवन खूप कष्टी अन् खूप काही सोसायला लावणारे वाटते.म्हणजे शेतकऱ्याचा संघर्ष काही कमी नाही तोही मी अनुभवला आहे,पिढीजात शेतकरी असल्याकारणाने पण आता सध्याची परिस्थिती बघता एकर दोन एकर शेती असलेल्यांनी शेती न केलेलीच मला योग्य वाटते,कारण शेतीत कुठलाही ताळमेळ उरलेला नाही...

असो शेती हा माझा आजच्या लिखाणाचा विषय नाही,
औद्योगिक वसाहतीत गेलं की काही ठराविक वेळेला तुम्हाला कावर्याबावर्या करत फिरणाऱ्या तरुणांच्या नजरा तुम्हाला दिसतील,अर्धवट शिक्षण झालेल्या अन् अलीकडे बऱ्यापैकी सुशिक्षित असलेला तरुणही यात असतो...

पर्याय नाहीये कारण उपलब्ध नसलेला रोजगार अन् दरवर्षी शिक्षण पूर्ण करून जॉबसाठी तयार होणाऱ्या मुलाच्या नवीन बॅचेस,कुठलाही नसलेला ताळमेळ.अनुभवी मुलांना असलेलं प्राधान्य अन् यामुळे फ्रेशर असलेल्या सुशिक्षत मुलांची नौकरीसाठी होत असलेली घुसमट,फजिती अन् त्यांचं हवालदिल होणं.

शेतीतून न झालेली आर्थिक प्रगती,आलेल्या नैसर्गिक आपत्ती,शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,दिवसेंदिवस लोकसंख्या वाढ अन् कमी झालेलं क्षेत्र हे अन् असे अनेक इतर कारणे यामुळे आपल्या पोटापाण्यासाठी शहराकडे वळलेला तरुण वर्ग.आज जेव्हा केव्हा औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी जाणं होतं तेव्हा विविध कंपनीच्या गेटवर कंपनीत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती होण्यासाठी आलेला सुशिक्षित,अशिक्षित,अनुभवी,अनुभव नसलेला मजूर वर्ग बघितला की अनेक प्रश्न पडून जातात...

कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का असेना काम मिळावे म्हणून चालू असलेला संघर्ष बघितला की जुने दिवस आठवतात,अजूनही काही बदलले नाही,त्यावेळेला होणारी अवस्था खूप वाईट असते.दिवसभर काम भेटेल या आशेनं या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर फिरत राहणे,मिळाले तर सहा महिने काम नाही तर पदरी पडलेली निराशा...

अनेकदा कंपनीत काम भेटले तरी मिळणारी तुटपुंजी हजेरी अन् यातून न होणारा उदरनिर्वाह.पुन्हा गावाकडे असलेल्या आई वडिलांना असलेली काळजी,त्यांना यातून पाठवता येईल तितके पैसे पाठवणे अन् कित्येकदा कंपनीत एक वेळचे जेवण भेटते म्हणून त्या एक वेळच्या जेवणावर राहून एक वेळ चहा बिस्कीटवर जगणारी मित्रसुद्धा बघितले.अश्यावेळी आपण काही करू शकत नाही ही जाणीव खूप त्रास देणारी ठरत होती....

या व्यथा न संपणाऱ्या आहे त्यामुळं यावर कितीही लिहले तरी कमीच असेल..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...