मुख्य सामग्रीवर वगळा

सिमांतनी भाग-२

सीमांतनी भाग-२

अस्ताला गेलेला सूर्य अन् पूनवेचा उगवता चंद्र,कोरा चहा घश्याखाली नेऊन सोडला अन् सिमांतीने दोन्ही हात टेकवत वाढलेला पोटाचा घेर सावरत पडवीत ठेवलेल्या चहाच्या कपांना अन सकाळपासून सांजवेळेपर्यंत पडलेल्या भांड्याच्या गराड्यास मोकळ्या परसदारच्या अंगणात घासायला म्हणून घेऊन आली.

पोटूशी बाई असल्यानं चिरायची कामं सबबीने तिची सासूबाई तिला करू देत नव्हती यामागे काळजी कितपत होती अन् विचारांची अंधश्रद्धा किती हे कळून चुकलंच होतं.त्याला पर्याय नव्हता काही का असेना काही कामांपासून सिमांतनीची तूर्ताच तरी सुटका झाली होती...

सिमांतनी मोकळ्या अंगणात भांडे घासत बसली होती,मनात आपल्या बाळाचा चालू असलेला विचार अन् बाळासाठी असलेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत असायचा,भांडी हिसळत असतांनाचा आवाच अंगणातुन महुरच्या घरापर्यंत जायचा अन् भांड्याचा आवाज जसजसा वाढायचा तसतसा सिमांतनीच्या दादल्याच्या चकरा काळजीने आत बाहेर चालू असायच्या...

घमील्यात असलेल्या पाण्यात पूनवेचा उगवता चंद्र हलत्या पाण्यात हलताना तिला दिसत होता,कित्येकवेळ त्याला न्याहाळत ती भांडे घासत राहिली.दिवसभरच्या कामामुळे तिच्या कंबराला हल्ली कळ लागलेली जाणवायची,सडपातळ बांधा असलेली ती उंच असल्यानं अन् कंबर आधीच इतभर असेल त्यात या दिवसभरात अंगावर येणारे काम दिवसभर कसेतरी ती रेटत करायची.
सांजेच्या प्रहरी कंबर दम मारायची नाही अन् कधी एकदा धरतीला पडते असं सिमांतनीला व्हायचं...

भांडे घासूस्तोवर तिच्या सासूबाईन चुल्हंगणावर पिठलं करायला टाकलं होतं, दगडी खलबत्यात केलेला लसूण मिरचीच्या कुटून केलेल्या ठेश्याचा परतल्याचा वास साऱ्या घरात मावत होता.त्या ठसक्यात तिच्या सासऱ्याला खोकल्याची उबळ आली अन् म्हतारा म्हतारीच्या आई बापांचा उद्धार करत पडवीत येऊन बसला...

लोखंडी डब्ब्यात असलेलं पीठ लाकडी परातीत घेऊन सिमांतनी भाकरी बडवत बसली,एकिकडे लालबुंध झालेला चुल्हीचा अंगारा अन् त्यावर भाकरी शेकत भाकरी करणं चालू होत्या,दुसरीकडे पिठलं आळत होतं. पिठलं आळत असतानाचा आवाज सिमांतनीला खूप आवडायचा मग ती न चुकता अश्यावेळी भाकरी बडवायला बसायची.

भाकरी झाल्या सिमांतनीचा दादला,सासरा म्हतारीवर कोकलतच भाकरी खायला बसली,एकीकडे सिमांतनी भाकरी बडवत होती अन् तिची सासूबाई डोक्यावरचा पदर सावरत बाप लेकाला वाढून देत होती.दोघेही जेवत होती त्यांचे उरकले अन् मग दोघी सासू सूना भाकर खायला म्हणून बसल्या...

एकीकडे दोघी भाकर खात होत्या एकीकडे सिमांतनीचा दादला चौकटीजवळ बसून तिला न्याहाळत आईशी रानातल्या गप्पा हानत बसला होता.म्हातारा आपला बिडी शिलगुन पडवीत असलेल्या रेडूवर  आठ वाजेच्या बातम्या ऐकत झुरके मारत बसला होता...

भाकर खावून झाली उरलेली कामं आवरून सिमांतनी चुल्हीचा आहार विझवायला म्हणून माजघरात आली अन् बघती तर काय चुल्हीच्या एकांगाला ठेवलेल्या तव्यावर असलेला विस्तव चांदवं पडल्यागत हसत होता...
अन् हसत होता,सिमांतनी त्याच्याकडे बघून आपल्या वाढत्या पोटाकडे बघत मनातच हसू लागली अन् कितीवेळ त्या तव्याकडे बघू लागली,पल्याड असलेल्या वळकटीतून तिचा दादला तिचं हे सुंदर सौंदर्य बघत होता अन् ती तो खुलून गेलेला हसरा तवा....

क्रमशः

( लेखन भरत सोनवणे नावाने कॉपी राईट ©® असल्याने नावासहीत शेअर करा...)

Written by,
©®Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड