मुख्य सामग्रीवर वगळा

गाव पोरका झाला..!

गाव पोरका झाला..!

पितृपक्ष संपला पण पितृपक्षातील उन्हं अजूनही पहाटेच्या पहारे शरिराची काहीली काहीली करून जात आहे.अश्या या भरउन्हात पहाटे दहाच्या सुमाराला गावच्या जुन्या येशीतुज जाणं होतं,येशीत मधोमध असलेल्या मुंज्याला शिवनामायचे पाणी तांब्यात आणून त्याला न्हांनुंन घेतलं,कपूरची एक वडी तिथं जाळली की त्याचा येणारा सुगंध अनुभवत,यशीत डोकं टेकवून उतरतीच्या दिशेनं पावलं चालू लागली..!

गावातले गुरखे रानाला,डोंगराला,धरण पाळेला असलेल्या हिरव्या कुरणाच्या रानात गाय,म्हशी,बकऱ्या चरायला घेऊन निघाले.डोईवर बांधलेलं उपरणे,कंबराला बांधलेली छोटी कुऱ्हाड,तारेच्या पिशीत भाकरीचं पेंडकं अन खांद्यात अडकवलेला रेडू घेऊन येशीतून रांनच्या वाटेला लागलं की त्यांना न्याहाळणं होतं,दूरवर त्यांच्या पावलांनी उधळलेली धुळ आसमंतात त्यांचं सकाळच्या प्रहरी अस्तित्व निर्माण करते...

गावच्या नव्या तरण्या सुना हौसे खातर नदीच्या तीरावर धुने धुवायला म्हणून निघायच्या,येशीतून दहाच्या सुमाराला यांचा ऐकू येणारा गलका.नदीच्या तीरावर गुळगुळीत झालेल्या दगडांवर धुणे धुण्याचा येणारा आवाज अन् ऐकायला हव्या अश्या त्यांच्या गप्पा,माहेरच्या आठवणी,शाळेच्या,मैत्रिणींच्या आठवणी,माहेराला धुने धुवायला म्हणून नदी तीरावर जायला लागते म्हणून तिथल्या वेगळ्या आठवणी,सासू सासर्यांचे कौतुक,चकाट्या अन या सर्वात अधून मधून येणारा महादेवाच्या मंदिरातील घंटेचा नाद अन् मग तिकडं आपोआपच वळणारी पावलं...

नदीच्या तीराने पांदीच्या रस्त्यानं अनवाणी पायांनी चालणं काही वेगळंच सुख देतं,पांदीच्या दोन्ही बाजूंनी असणारी घाणेरीची फुलझाडे,नदीच्या कडेला असलेली बेसरमाची वाढलेली झाडे अन् डोक्यावर असलेला गुलमोहरांच्या झाडांचा मंडप,हातात अगरबत्ती,तेलाची कुप्पी घेऊन निघालं दहा पंधरा मिनिटांत नदीची खळखळ ऐकत महादेवाच्या मंदिरात जाणं होतं.
उंच उंच वडाची झाडं,पिंपळाची झाडं,बेलाची झाडं,कौटाची झाडं पुरातन काळातील मंदिर असल्यानं उंच असलेली दगडी कमान,कमानीला दोन्ही बाजूंनी दिवा ठेवायला असलेली दिव्यांची रास,एकांगाला दीपमाळ...

मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली अतिप्राचीन पिंड,तांब्याचा नागफना,पिंडीच्या लिंगावर मधोमध पडणारी पितळी घागरीतील शिवनामायच्या पाण्याची धार अन रातराणीच्या फुलांचा येणारा सुगंध,पिंडीवर वाहीलेली बेल पत्र,जास्वंदीची वाहिलेली पाने,फुले अन् या सर्व वातावरणात मनोभावे प्रार्थना करून आपलं पूजाआर्चा करणं.
पुढे शनिदेवाच्या मंदिरात शनी देवाला कुप्पीत आणलेलं तेल वाहून मनोभावे पाय पडून घंटीचा नाद ऐकत कितीवेळ मंदिराच्या प्रांगणात आपली समाधी लावून बसून राहणं...

पक्षांच्या चिवचिव करण्याचा ऐकू येणारा नाद,घंटीचा नाद,टाळ्यांचा नाद,भजनाचा आवाज,अन् हे सर्व ऐकू येत असतानासुध्दा आपलं मन एकाग्र चित्ताने देवाचे नामस्मरण करत राहणं,या नामस्मरणात आपली समाधी लागणं हेच सुख असावं कदाचित जीवनात.

अन् मग एका त्या अभंगाचा प्रत्यय येणं होतं...

समाधि श्रवण करिती निशिदिनीं । त्यांसि चक्रपाणि देईल भेटी !!१!!
समाधि श्रवणाचा धरील जो विश्वास । नाहीं नाहीं दोष पातकांचा !!२!!
समाधि विरक्ताची पतिता वाराणसी । कोटि कुळें त्याची उद्धरील !!३!!
जो कोणी बैसेल समाधिश्रवणा । तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे !!४!!
स्वहित साधन सांगितलें येथें । परिसा भागवत लेखकु जाला !!५!!
नामा म्हणे हरि बोलिलों तुझिया बळें।वाहिलीं तुळसीदळें स्वामीलागीं!!६!!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...