नेहमीप्रमाणे मी अन् आई सायंकाळी भाजीमंडी मध्ये भाजीपाला आणायला गेलो. भाजीपाला आणायला आई सोबत जायचं म्हंटल की मला खूपच जीवावर येतं . कारण आई ४-५ भाज्या घ्यायला कमीत कमी एक तास तरी लावते. म्हणजे भाव वगैरे करत नाही पण व्यवस्थित नीटनेटक सगळं कसं. पण हल्लीना मला आई बरोबर भाजीपाला घ्यायला जाण्यास आवडायला लागलं होते. म्हणजे आई मंडीत गेली की मी तिथंच गाडी लाऊन आजूबाजूच्या लोकांना न्याहाळत बसायचो. कोण कसा बोलतो?कोण काय करतो? कोणाचं कुठे लक्ष आहे?मज्जा यायची यात तर नेहमी प्रमाणे आई गेली मी गाडी लाऊन निरीक्षण करत बसलो होतो.आपण म्हणतो जागतिक मंदी चालू आहे पण इथ असं काही दिसत नव्हते.रोजच्या जीवनातील लागणाऱ्या वस्तू घेणं समजु शकतो पण लोकांची चैन काही कमी झाली नव्हती. म्हणजे ते देशी दुकानातून दारू पिउन येणारे तरुण,म्हातारी माणसे मस्त कुठलही टेन्शन नसलेली भासत होती. मस्त एक एक शेंगदाणा खात खात गेट बाहेर आले की बाजूला पचकन थुंकत चहूकडे बगत चालत होते,जस की काय आम्ही खुप मोठं कार्य करून आलो. बाजूलाच एक वाइन शॉप पण होत जिथं जरा हाय प्रोफाईल लोकं भारी मधली दारू घेऊन पार्सल कागदात पॅक करून ते पण निघायचे. बाजूलाच काही टपरीवर बसलेली लोक त्यांचे विषय ऐकण्यात मज्जा येत कुणी राजकारण, कुणी घरचं टेन्शन,कॉलेज ची मुलं काही अभ्यास, काही ही अशी ती तशी गोष्टी करत बसलेले,कुणी मात्र कामा निमित्त बसलेलं. कुणी बटर विकत, कुणी करदोरे, लाह्या,बत्तशे,मुरमुरे ,शेव विकत होतं. एकुण काय तर आपला देश किती वेग वेगळे रूप आपल्याला एका सार्वजनिक ठिकाणी दाखुन देतो. हा विचार करत बसलो तितक्यात आई आली होती अन् आता घरी निघायचं होतं.....मग प्रश्न पडून जातो #incrediable India हाच का ?
लिखित: भरत सोनवणे,(सौमित्र). औंरगाबाद.
समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा