नेहमीप्रमाणे मी अन् आई सायंकाळी भाजीमंडी मध्ये भाजीपाला आणायला गेलो. भाजीपाला आणायला आई सोबत जायचं म्हंटल की मला खूपच जीवावर येतं . कारण आई ४-५ भाज्या घ्यायला कमीत कमी एक तास तरी लावते. म्हणजे भाव वगैरे करत नाही पण व्यवस्थित नीटनेटक सगळं कसं. पण हल्लीना मला आई बरोबर भाजीपाला घ्यायला जाण्यास आवडायला लागलं होते. म्हणजे आई मंडीत गेली की मी तिथंच गाडी लाऊन आजूबाजूच्या लोकांना न्याहाळत बसायचो. कोण कसा बोलतो?कोण काय करतो? कोणाचं कुठे लक्ष आहे?मज्जा यायची यात तर नेहमी प्रमाणे आई गेली मी गाडी लाऊन निरीक्षण करत बसलो होतो.आपण म्हणतो जागतिक मंदी चालू आहे पण इथ असं काही दिसत नव्हते.रोजच्या जीवनातील लागणाऱ्या वस्तू घेणं समजु शकतो पण लोकांची चैन काही कमी झाली नव्हती. म्हणजे ते देशी दुकानातून दारू पिउन येणारे तरुण,म्हातारी माणसे मस्त कुठलही टेन्शन नसलेली भासत होती. मस्त एक एक शेंगदाणा खात खात गेट बाहेर आले की बाजूला पचकन थुंकत चहूकडे बगत चालत होते,जस की काय आम्ही खुप मोठं कार्य करून आलो. बाजूलाच एक वाइन शॉप पण होत जिथं जरा हाय प्रोफाईल लोकं भारी मधली दारू घेऊन पार्सल कागदात पॅक करून ते पण निघायचे. बाजूलाच काही टपरीवर बसलेली लोक त्यांचे विषय ऐकण्यात मज्जा येत कुणी राजकारण, कुणी घरचं टेन्शन,कॉलेज ची मुलं काही अभ्यास, काही ही अशी ती तशी गोष्टी करत बसलेले,कुणी मात्र कामा निमित्त बसलेलं. कुणी बटर विकत, कुणी करदोरे, लाह्या,बत्तशे,मुरमुरे ,शेव विकत होतं. एकुण काय तर आपला देश किती वेग वेगळे रूप आपल्याला एका सार्वजनिक ठिकाणी दाखुन देतो. हा विचार करत बसलो तितक्यात आई आली होती अन् आता घरी निघायचं होतं.....मग प्रश्न पडून जातो #incrediable India हाच का ?
लिखित: भरत सोनवणे,(सौमित्र). औंरगाबाद.
गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..! काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा