मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणींना उजाळा बाजारातल्या

नेहमीप्रमाणे मी अन् आई सायंकाळी भाजीमंडी मध्ये भाजीपाला आणायला गेलो. भाजीपाला आणायला आई सोबत जायचं म्हंटल की मला खूपच जीवावर येतं . कारण आई ४-५ भाज्या घ्यायला कमीत कमी एक तास तरी लावते. म्हणजे भाव वगैरे करत नाही पण व्यवस्थित नीटनेटक सगळं कसं. पण हल्लीना मला आई बरोबर भाजीपाला घ्यायला जाण्यास आवडायला लागलं होते. म्हणजे आई मंडीत गेली की मी तिथंच गाडी लाऊन आजूबाजूच्या लोकांना न्याहाळत बसायचो. कोण कसा बोलतो?कोण काय करतो? कोणाचं कुठे लक्ष आहे?मज्जा यायची यात तर नेहमी प्रमाणे आई गेली मी गाडी लाऊन निरीक्षण करत बसलो होतो.आपण म्हणतो जागतिक मंदी चालू आहे पण इथ असं काही दिसत नव्हते.रोजच्या जीवनातील लागणाऱ्या वस्तू घेणं समजु शकतो पण लोकांची चैन काही कमी झाली नव्हती. म्हणजे ते देशी दुकानातून दारू पिउन येणारे तरुण,म्हातारी माणसे मस्त कुठलही टेन्शन नसलेली भासत होती. मस्त एक एक शेंगदाणा खात खात गेट बाहेर आले की बाजूला पचकन थुंकत चहूकडे बगत चालत होते,जस की काय आम्ही खुप मोठं कार्य करून आलो. बाजूलाच एक वाइन शॉप पण होत जिथं जरा हाय प्रोफाईल लोकं भारी मधली दारू घेऊन पार्सल कागदात पॅक करून ते पण निघायचे. बाजूलाच काही टपरीवर बसलेली लोक त्यांचे विषय ऐकण्यात मज्जा येत कुणी राजकारण, कुणी घरचं टेन्शन,कॉलेज ची मुलं काही अभ्यास, काही ही अशी ती तशी गोष्टी करत बसलेले,कुणी मात्र कामा निमित्त बसलेलं. कुणी बटर विकत, कुणी करदोरे, लाह्या,बत्तशे,मुरमुरे ,शेव विकत होतं. एकुण काय तर आपला देश किती वेग वेगळे रूप आपल्याला एका सार्वजनिक ठिकाणी दाखुन देतो. हा विचार करत बसलो तितक्यात आई आली होती अन् आता घरी निघायचं होतं.....मग प्रश्न पडून जातो #incrediable India हाच का ?
लिखित: भरत सोनवणे,(सौमित्र). औंरगाबाद.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...