मुख्य सामग्रीवर वगळा

Great भेट....

नेहमी प्रमाणे आज सायंकाळी कॉलेजची INTERNAL EXAM देऊन मी घरी येत होतो. मला माझ्या काही मित्रांना वेरूळ येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात काम झालेल्या त्या स्नानगृहाचे(कुंड) फोटो अन माहिती पाठवायची होती. त्यासाठी मी तेथे भेट देण्यास गेलो या कुंडा बद्दल तशी फारशी माहिती माझाकडे आहे. कारण माझा जन्मच या भूमीत झालाय, तर मी तेथे भेट देण्यास गेलो असता मला काही रशियन पर्यटक दिसलीत.ते काहीसे विचारणा करतांना मी बघितले पण भाषेचा probelm असल्या मुळे ते कुणाला फारसे कळत नव्हते. मी बगितले अन थोडेफार मला समजले त्यांना गाईड हवा होता येथील माहिती मिळवण्यासाठी. पण ते इथ शक्य नव्हते कारण इथे गाईड नसतात,मग काय मला जी काही माहिती होती मी त्यांना सांगितली. मला काही पूर्णपणे इंग्लिश बोलायला जमत नाही पण बऱ्यापैकी जमते अन् माझे बोलणेही त्यांना समजत होते. या मुळे ते खुश झालेत यात मी वेगळे काही केले नव्हते,पण जर अतिथी देवो भव ही शिकवण आपल्याला लहानपणा पासुन दिली जाते ती आपण जपावी,अन् ती मी जपत होतो. कारण त्यांनी बोलून दाखवले की ही माहिती त्यांच्यासाठी खूप मोलाची महत्त्वाची ठरते.अन् त्यांनी न चुकता हे ही सांगितले की तुम्ही लकी आहात की या इथिहासिक वास्तू असलेल्या ठिकाणी तुम्ही आहात.माझासाठी हे खुप मोलाचे ठरते त्यानंतर मी त्यांना वेरूळ लेणी,अजिंठा लेणी अन्  पितळखोरा लेणी या बद्द्दल ही माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी अजिंठा लेणी अन् वेरूळ लेणी यावर खूप अभ्यास ही केला आहे,त्यांना पितळखोरा लेणी ही नवीन होती आता वेळी अभावी तिला ते भेट देऊ शकत नव्हते. पण त्यांनी पुन्हा भारतात आल्यावर नक्कीच मला भेटून त्या लेनीची भेट घेण्याचे promissd ही मला केले. सांगायचे इतकेच की आपल्या देशात भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांना आपण शक्य तितकी मदत करावी,माहिती द्यावी. कारण त्यांना आवडते आपली संस्कृती आपला इतिहास, स्थापत्य कला,शिल्पकाम,चित्रकाम अन् विवध कला. तेव्हा आपण हा भव्य ठेवा जपवुया अन् त्या बद्दलची माहिती सर्वदूर जगभरात देऊया आजची झालेली ही एक भेट अविस्मरणीय असेल माझासाठी थँक्यु सर अन् मॅम नक्कीच पुन्हा एकदा भेटू...

Today in Ellora, a leading scientist from the Russian Archeology Department met with Vasya

Aleksandriuk...

@vasya Aleksandriuk

#incredibleindia....

#अतुल्यभारत....

शब्दांकन:भारत सोनवणे (सौमित्र),(औंरगाबाद).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...