कधी कधी काय होते कुणास ठाऊक क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊन बसते,मग होकरांचे रूपांतर नाकारत होऊनच बसते. चीड चीड होते, सहवासाचे अन् श्वसनाचे गणितं चुकता अन् मन एकाकी होऊन बस तासनतास एकच विचार करू लागते. जणू ते ध्यासालाच लागते की नाही आता हे मला मिळवायचे आहे यासाठी मग माझी वाट मला बदलायला लागली तरी चालेल,माझे आयुष यासाठी झोकून द्यायलाही मी तयार होऊन जातो. मग नसतोच कुठला स्वार्थ या साठी किंवा नसते कुठली आर्थिक अपेक्षा.बस खुप खुप लिहायचं आहे त्या विषयावर कारण,आज जे प्रश्न मला पडलेय ज्याचे अपेक्षित उत्तर मी खुप शोधूनही मला भेटले नाहीत. त्या प्रश्नांना मलाच उत्तर शोधायची गरज आहे कारण उद्या ही प्रश्न उद्या कुणाला पडले,कुणाला असा अनुभव आला तर तो नको मझासारखा हरवून जायला. या आभासी पण ओळखीच्या हक्काच्या माणसांच्या विश्वात जिथे कधी कधी एकांत हा मनावर राज्य करायला लागतो,व्यक्त होणारी भिंत ओसाड पडते अन् शेवाळ साचून ती ती कधी घसर्डी होऊन धोक्याची होते.का होते असे समजत नाही म्हणून लिहायचं आहे तिच्यासाठी,ती या आंतरजालातील एक असा भाग आहे तिचा ऑनलाईन सहवास काही मर्यादित वेळे साठी जरी लाभला,तिच्यासाठी मनात अनेक प्रश्न येऊन जातात. अन् मग हे जग इतकं कठोर कसे होऊन जाते की इथही तिनं आपल्याला भेटाव,मग तोच विचार अन् वेड्या मनाला एक निमित्त ऑनलाईन विश्वात एक आलेला तो संदेश जो विचारांच्या दिशा बदलून टाकतो.....
#ऑनलाईनसंदेशविचारकाहीतरीकरण्याचीवृत्ती.
लिखाण: भारत सोनवणे (सौमित्र).
गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..! काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा