मुख्य सामग्रीवर वगळा

सिग्नल लाईफ....

माझ्यातला माणूस जेव्हा हरवतो विचारांच्या त्या खोल दरीत मग मी येऊन जातो त्याला शोधायला माणसांच्या गर्दीत. नेहमी प्रमाणे आजची सकाळ झाली,परीक्षा चालु असल्यामुळे सकाळी लवकरच कॉलेजला निघालो. तसा वेळ खूप बाकी होता पण मला या माणसांच्या गर्दीत रमायला खूप आवडत. मग काय सकाळी जरा लवकरच निघालो होतो,मी तालुक्याच्या गावाचा असल्या मुळे इथ फारसं येणं होत नाही. पण आज लवकर आल्या मुळे या सिग्नलला थांबलो न्याहाळत तिथल्या गर्दीला.सकाळीच कंपनीत जाणारे माणसं,कुणी रात्रपाळी करून कंपनीतून वापस येणारे,शेजारीच असेलल्या हॉस्पिटल मध्ये जाणारे सर्व डॉक्टर, परिचारिका यांना मी बगत होतो. बाजूला चालू असलेल्या चहाच्या टपरीवर चालू असलेले वेगवेगळे संवाद ही ऐकत होतो. पंक्चर कडणाऱ्या माणसाची ती छोट्याश्या रिक्षात थाटलेली त्याची दुकान. ये जा करणाऱ्या रिक्षा,जवळच विमानतळ असल्या मुळे तेथून आकाशात उडणाऱ्या विमानाचा आवाज शहर जिवंत असल्याचा अनुभव देत होते. अन् एकदमच मला माझ्या दोन वर्षापूर्वीच्या दिवसांची आठवण आली,कारण हा सिग्नल त्या वेळी माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा एक भाग होता. हा विचार करत असतानाच मोठ्याने आवाज करत एक Ambulance आली अन् काळजात काही वेळासाठी धडकी भरली. मग काय मनात तिच्या आतल्या माणसासाठी  मी प्रार्थना करू लागलो,हे शहर अस काही झाल्यावर पण थांबत नाही याची मात्र खंत वाटली, अन् मी पुन्हा जुन्या आठवणीत गेलो. तेव्हा मी पण इथच एका नामांकित कंपनीत काम करायचो जे खूप मेहणीतीच असत, त्यामुळे कंपनीतील प्रत्येक माणसाबद्दल मला नेहमीच आदर वाटतो, का तर ते मी अनुभवलं आहे जगलो आहे. सकाळीच सहा वाजता थंडीत कुडकुडत मी गाडीवर जायचो,कंपनीत कुणी पायी तर कुणी सायकल वर यायचं,मी शक्य त्यांना गाडीवर बसून घेत असायचो. पायात असलेले ते दोन कीलोचे बुट आपण किती वजनदार,महत्त्वाचे काम करत आहे हे नेहमी आठवण करून द्यायचे. मी पण जगत होतो, अनुभवत होतो त्या जगण्याला.सकाळी या सिग्नलला खूप गर्दी असते पण रात्री जेव्हा नाईट शिफ्ट साठी जायचो तेव्हा वर्दळ थोडी कमी भासायची. पण शहर कधी बंद होयचंच नाही ते चालूच असायचं,ते हॉस्पिटल ही चालू असायचं. अन् त्या रिक्षापण चालूच असायच्या पण त्यांच्या भेटण्याच्या वेळी मात्र माझ्या वेगवेगळ्या असायच्या. एकूण काय तर छान होते ते दिवस आजही काही वेगळं नाही. पण हे मात्र नक्की होत की या सिग्नल ने मला खूप काही शिकवलं होते, अन् हे शहरही कधी बंद होत नव्हत. भले सिग्नल लागलं की काही वेळासाठी ते शहर थांबत जिथं माणसे मात्र कधीच नाही थांबत शहर मात्र थांबत....
ठिकाण: धूत हॉस्पिटल,जालना रोड चिकलठाणा M.I.D.C Road,Aurangabad.
#LifeofSignal....
लिखित:भारत सोनवणे(सौमित्र).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...