मुख्य सामग्रीवर वगळा

सिग्नल लाईफ....

माझ्यातला माणूस जेव्हा हरवतो विचारांच्या त्या खोल दरीत मग मी येऊन जातो त्याला शोधायला माणसांच्या गर्दीत. नेहमी प्रमाणे आजची सकाळ झाली,परीक्षा चालु असल्यामुळे सकाळी लवकरच कॉलेजला निघालो. तसा वेळ खूप बाकी होता पण मला या माणसांच्या गर्दीत रमायला खूप आवडत. मग काय सकाळी जरा लवकरच निघालो होतो,मी तालुक्याच्या गावाचा असल्या मुळे इथ फारसं येणं होत नाही. पण आज लवकर आल्या मुळे या सिग्नलला थांबलो न्याहाळत तिथल्या गर्दीला.सकाळीच कंपनीत जाणारे माणसं,कुणी रात्रपाळी करून कंपनीतून वापस येणारे,शेजारीच असेलल्या हॉस्पिटल मध्ये जाणारे सर्व डॉक्टर, परिचारिका यांना मी बगत होतो. बाजूला चालू असलेल्या चहाच्या टपरीवर चालू असलेले वेगवेगळे संवाद ही ऐकत होतो. पंक्चर कडणाऱ्या माणसाची ती छोट्याश्या रिक्षात थाटलेली त्याची दुकान. ये जा करणाऱ्या रिक्षा,जवळच विमानतळ असल्या मुळे तेथून आकाशात उडणाऱ्या विमानाचा आवाज शहर जिवंत असल्याचा अनुभव देत होते. अन् एकदमच मला माझ्या दोन वर्षापूर्वीच्या दिवसांची आठवण आली,कारण हा सिग्नल त्या वेळी माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा एक भाग होता. हा विचार करत असतानाच मोठ्याने आवाज करत एक Ambulance आली अन् काळजात काही वेळासाठी धडकी भरली. मग काय मनात तिच्या आतल्या माणसासाठी  मी प्रार्थना करू लागलो,हे शहर अस काही झाल्यावर पण थांबत नाही याची मात्र खंत वाटली, अन् मी पुन्हा जुन्या आठवणीत गेलो. तेव्हा मी पण इथच एका नामांकित कंपनीत काम करायचो जे खूप मेहणीतीच असत, त्यामुळे कंपनीतील प्रत्येक माणसाबद्दल मला नेहमीच आदर वाटतो, का तर ते मी अनुभवलं आहे जगलो आहे. सकाळीच सहा वाजता थंडीत कुडकुडत मी गाडीवर जायचो,कंपनीत कुणी पायी तर कुणी सायकल वर यायचं,मी शक्य त्यांना गाडीवर बसून घेत असायचो. पायात असलेले ते दोन कीलोचे बुट आपण किती वजनदार,महत्त्वाचे काम करत आहे हे नेहमी आठवण करून द्यायचे. मी पण जगत होतो, अनुभवत होतो त्या जगण्याला.सकाळी या सिग्नलला खूप गर्दी असते पण रात्री जेव्हा नाईट शिफ्ट साठी जायचो तेव्हा वर्दळ थोडी कमी भासायची. पण शहर कधी बंद होयचंच नाही ते चालूच असायचं,ते हॉस्पिटल ही चालू असायचं. अन् त्या रिक्षापण चालूच असायच्या पण त्यांच्या भेटण्याच्या वेळी मात्र माझ्या वेगवेगळ्या असायच्या. एकूण काय तर छान होते ते दिवस आजही काही वेगळं नाही. पण हे मात्र नक्की होत की या सिग्नल ने मला खूप काही शिकवलं होते, अन् हे शहरही कधी बंद होत नव्हत. भले सिग्नल लागलं की काही वेळासाठी ते शहर थांबत जिथं माणसे मात्र कधीच नाही थांबत शहर मात्र थांबत....
ठिकाण: धूत हॉस्पिटल,जालना रोड चिकलठाणा M.I.D.C Road,Aurangabad.
#LifeofSignal....
लिखित:भारत सोनवणे(सौमित्र).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ