मुख्य सामग्रीवर वगळा

सिग्नल लाईफ....

माझ्यातला माणूस जेव्हा हरवतो विचारांच्या त्या खोल दरीत मग मी येऊन जातो त्याला शोधायला माणसांच्या गर्दीत. नेहमी प्रमाणे आजची सकाळ झाली,परीक्षा चालु असल्यामुळे सकाळी लवकरच कॉलेजला निघालो. तसा वेळ खूप बाकी होता पण मला या माणसांच्या गर्दीत रमायला खूप आवडत. मग काय सकाळी जरा लवकरच निघालो होतो,मी तालुक्याच्या गावाचा असल्या मुळे इथ फारसं येणं होत नाही. पण आज लवकर आल्या मुळे या सिग्नलला थांबलो न्याहाळत तिथल्या गर्दीला.सकाळीच कंपनीत जाणारे माणसं,कुणी रात्रपाळी करून कंपनीतून वापस येणारे,शेजारीच असेलल्या हॉस्पिटल मध्ये जाणारे सर्व डॉक्टर, परिचारिका यांना मी बगत होतो. बाजूला चालू असलेल्या चहाच्या टपरीवर चालू असलेले वेगवेगळे संवाद ही ऐकत होतो. पंक्चर कडणाऱ्या माणसाची ती छोट्याश्या रिक्षात थाटलेली त्याची दुकान. ये जा करणाऱ्या रिक्षा,जवळच विमानतळ असल्या मुळे तेथून आकाशात उडणाऱ्या विमानाचा आवाज शहर जिवंत असल्याचा अनुभव देत होते. अन् एकदमच मला माझ्या दोन वर्षापूर्वीच्या दिवसांची आठवण आली,कारण हा सिग्नल त्या वेळी माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा एक भाग होता. हा विचार करत असतानाच मोठ्याने आवाज करत एक Ambulance आली अन् काळजात काही वेळासाठी धडकी भरली. मग काय मनात तिच्या आतल्या माणसासाठी  मी प्रार्थना करू लागलो,हे शहर अस काही झाल्यावर पण थांबत नाही याची मात्र खंत वाटली, अन् मी पुन्हा जुन्या आठवणीत गेलो. तेव्हा मी पण इथच एका नामांकित कंपनीत काम करायचो जे खूप मेहणीतीच असत, त्यामुळे कंपनीतील प्रत्येक माणसाबद्दल मला नेहमीच आदर वाटतो, का तर ते मी अनुभवलं आहे जगलो आहे. सकाळीच सहा वाजता थंडीत कुडकुडत मी गाडीवर जायचो,कंपनीत कुणी पायी तर कुणी सायकल वर यायचं,मी शक्य त्यांना गाडीवर बसून घेत असायचो. पायात असलेले ते दोन कीलोचे बुट आपण किती वजनदार,महत्त्वाचे काम करत आहे हे नेहमी आठवण करून द्यायचे. मी पण जगत होतो, अनुभवत होतो त्या जगण्याला.सकाळी या सिग्नलला खूप गर्दी असते पण रात्री जेव्हा नाईट शिफ्ट साठी जायचो तेव्हा वर्दळ थोडी कमी भासायची. पण शहर कधी बंद होयचंच नाही ते चालूच असायचं,ते हॉस्पिटल ही चालू असायचं. अन् त्या रिक्षापण चालूच असायच्या पण त्यांच्या भेटण्याच्या वेळी मात्र माझ्या वेगवेगळ्या असायच्या. एकूण काय तर छान होते ते दिवस आजही काही वेगळं नाही. पण हे मात्र नक्की होत की या सिग्नल ने मला खूप काही शिकवलं होते, अन् हे शहरही कधी बंद होत नव्हत. भले सिग्नल लागलं की काही वेळासाठी ते शहर थांबत जिथं माणसे मात्र कधीच नाही थांबत शहर मात्र थांबत....
ठिकाण: धूत हॉस्पिटल,जालना रोड चिकलठाणा M.I.D.C Road,Aurangabad.
#LifeofSignal....
लिखित:भारत सोनवणे(सौमित्र).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...