या वेळेला कधी कधी मी शहरात फिरायला निघतो पायी,या मुळे होते काय की आपल्या पासून दुरावलेल्या,त्या खुप दिवसांपासून अनोळखी असलेल्या शहराची आपल्याला नव्यानं ओळख होते.
ती कॉलनी,तो चौक,तो नाका,ते दिवस तरुण- तरुणींनी गजबजलेलं कॉलेज रात्री मात्र शांत अन् विरहाच्या वाटा भेट देणार भासते. ते मंदिर,ते मस्जिद कुणाचा गरिबांचा सहारा होत असते, कुण्या गल्लीने तो गुराखी त्याचं काम करतोय. मी मात्र भटकतोय एकटा एकटा न्याहाळत त्या अनोख्या अन् रौद्र रुप धारण केलेल्या शहराला.तो स्मशान तर काळजात धडकी भरवत आहे, मोडकळीस आलेला त्याचा ही एक जीव येतोय अन् एक जातोय,पण तो ही अजून उभा आहे अनेकांच्या शेवटच्या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी. ते बसस्टँड मात्र निपचित पडलय कधीच एक दोन तासाला एखादी परी भेटायला येत आहे, मग अनेकांच्या झोपा खुश करून जात आहे,अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणत आहे.
सर्व शहर फिरतोय,मग नेहमीच्या त्या सोसायटी जवळ मी आलो जिथं आज पण काही वेगळे नव्हते.वाचमन झोपलाय खुर्ची वर कधीचाच त्यालाही थंडी वाजत असावी,पण जगणे अन् कर्तव्याची विण कुणाला चुकणार,हातपाय पार थरथर करताय तरी तो पार पाडतो आहे कर्तव्य त्याचे.
आजही काही अनोखे नव्हते सोसायटी मध्ये एका पाठोपाठ एक असलेल्या त्या सहा खिडक्या बंद आहे,सातवी खिडकी मात्र अजूनही नेहमी प्रमाणे उघडीच आहे.ती अजुनही टेबल वर नाईटलेंपच्या उजेडात तिच्या छोट्याश्या लायब्ररीत वाचन करत बसली आहे, नेहमी येतो ती कधीपण वाचतच असते.खरच अनोळखी आहे ती पण तिच्या या रोजच्या सवयी मुळे पाऊले आपोआप तिला भेटण्या म्हणुन की काय कधी त्या ध्यासाने इकडे वळतात. ती केसांना सावरत अन् मधीच कॉफीचा एखादा किस घेत पूर्णपणे त्या पुस्तकात हरवून गेलेली असते दहा मिनिट, पंचवीस मिनिट, चाळीस मिनिट झाले मी तिला न्याहाळत आहे,ती अजुनही वाचतेय.कधीतरी म्हणजे एक सहा महिन्यां पूर्वी ऐकले होते मैत्रिणीकडून ती मानसशास्त्रचा अभ्यास करत असते,तेच काही तरी वाचत असावी बहुतेक,मग कुठे उमगले तिला या अभ्यासात इतकं का आवड असावी. पण कधी कधी तिच्यासाठी खंत ही वाटते की, तिच्या या वाचन प्रेमानं तिला कधी मानसिक दृष्ट्या तिच्या मनावर पुस्तकाने ताबा मिळवला अन् ती तशी वागली तर.पण मग नको असे विचार अन् मी तिथेच थांबतो,ती मात्र अजूनही वाचत असते अन् मग मनात ही येते. जसे मला लिहण्याच भान नसले की मला पण नाही कळत काळ,वेळ मी लिहत राहतो माझी लेखणी मला खुणावत राहते लिहत रहा लिहत रहा. असच काही तिचही असेल नाही का ? मी पण मनातच तिला म्हणतो वाचत रहा,वाचत रहा अन् एक गोड हसू चेहऱ्यावर आणत तिथून निघून जातो.
असे खूप मित्र मैत्रिणी आहेत जे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी आहोरात्र अभ्यास करत असतात.झोपेला मारत अन् स्वप्नांना जागवत ती जगत असता ती स्वप्न अन् माझा ही प्रवास संपतो, मी ही उलट्या दिशेनं जातो रात्र अन् थंडी आता मला भेटायला आली आहे.तिने मात्र आता झोपावे कारण रात्र खुप झाली आहे उद्याचा दिवस तिचाच आहे.....
#तीएकअनोळखीलायब्ररीतीलपुस्तकीवेडीअन्मीएकशहरहिंडणारा....
लेखन: भारत लक्ष्मण सोनवणे (सौमित्र). औरंगाबाद.
समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा