मुख्य सामग्रीवर वगळा

#एक्झिट_जगण्यातली_काही_दिवसांची

#overwhelmed...

काही दिवसांपूर्वी हा शब्द ऐकला अन् मी तो गुगल केला.मला या शब्दाची या शब्दा बद्दल जाणुन घेण्याची आतुरता लागली,मग काय सर्च करत बसलो....

खुप गोष्टी या शब्दाशी जोडलेल्या भेटत गेल्या,हा शब्द कुठेतरी रोजच्या जगण्यातला नसला तरी रोज या शब्दाचा अनुभव,केव्हा त्या परिस्थितीला अनुभवत असतो आपण हे समजले....

अलिकडच्या काळात त्याच एकटेपण त्याला आवडायला लागले आहे,नको त्या गोष्टीशी अन् कीतिही ठरवून सुद्धा हा एकांत पणा अन् त्याची सवय करून घेणं त्याने सोडलं नाहीये....

म्हणजे ते मनाच्या हालचालीसाठी खुप वाईट
आहे पण याचं व्यसन जडल की माणूस शुन्यात स्वतःला शोधायला लागतो,मग त्याचं एकटेपण त्याच्या मनावर स्वार होत जात.तो बऱ्यापैकी या जाळ्यात गुंतत जात असतो,कधी तो कायमचा गुंतून जातो कधीही बाहेर न येण्यासाठी नकळत....

हल्ली त्याचा ठराविक माणसांशी अन् ठराविक वेळेतच संवाद होत असतो,इतर वेळी जेव्हा तो माणसांच्या घोळक्यात जाऊन बसतोना तेव्हा तो मोजकेच बोलत असतो.तेव्हा त्याच्या मनाशीच त्याचा संवाद चालू असतो....

मनाशी संवाद अन् मनाला विचारांनी त्रास करून तो विसावलेला असतो मनाने व शरीराने सुद्धा, त्या बंदिस्त खोलीत जिच्या आत कदाचितच सूर्यकिरणेही जात असेलच....काय करतो ? माहीत नाही.

एक मात्र आहे त्याचं वाचन अन् लेखन त्याच्या मनावर इतकं हावी झालं आहे की,त्याला रात्री झोप लागत नसली की अधाश्यासारखे तो फक्त वाचत सुटत असतो...

वाचन कोणत असत तर काहीतरी मोटिवेट करणार,नाहीतर असं काही जे त्याला शुन्यातुन बाहेर काढण्यास मदत करेल.पण सभोवतालची परिस्थिती त्याच्या मनावर इतकी स्वार झाली आहे की नाही होत त्याच्याने....

कधीतरी हक्काच्या मैत्रिणींशी त्याचा संवाद फुलत असतो,पण त्याच रीतेपण तो काही मनावरून उतरू देत नसतो.एक मन संवादात असत अन् एक शोधत असत एकांतात एकटेपणात स्वतःलाच...

झुरत असतं,चावत असतं आतल्या आत स्वतःलाच संवादात त्यांच्या सांभाळून घेणं,सांगणंही त्याला कळत असत‌.पण सांगण अन् प्रत्यक्षात करणे याला शक्य नसत...

घरातला संवाद रोजच्या नॉर्मल बोलण्या पुरताच त्याच्यासाठी आहे,झालाच कधी पुढे तर तो स्वतः टाळत असतो त्याला.अन् शून्यात असलेल्या त्याच्या जागेला,त्याच्या जगण्याला बघत असतो तो एकटा मनातल्या मनात खचत....

रोज रोज अंधाऱ्या खोलीतलं एकांतपण त्याच्या मनावर इतकं परिणाम करून गेलं आहे की, उजेडात गेल्यावरही तो सावरत असतो स्वतःला. जगापासुन चाचपडत असतो काहीतरी निराशेच्या गर्तेत हरवून गेल्यासारखं जगाकडे बघत मनातल्या मनातच....

मग सरळ रस्त्याने ठोकर लागणंही असो त्याला आपणच चुकीचं चालतो आहे,हे ही मान्य करता येत नाही.मनालाच सांगत असतो तो रस्त्यात  दगड आला आहे,पण मी बाजुला झालो नाही कारण तो रस्त्यात आला आहे मी नाही त्याच्या..‌..

#एक्झिट_जगण्यातली_काही_दिवसांची...

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...