मुख्य सामग्रीवर वगळा

#एक्झिट_जगण्यातली_काही_दिवसांची

#overwhelmed...

काही दिवसांपूर्वी हा शब्द ऐकला अन् मी तो गुगल केला.मला या शब्दाची या शब्दा बद्दल जाणुन घेण्याची आतुरता लागली,मग काय सर्च करत बसलो....

खुप गोष्टी या शब्दाशी जोडलेल्या भेटत गेल्या,हा शब्द कुठेतरी रोजच्या जगण्यातला नसला तरी रोज या शब्दाचा अनुभव,केव्हा त्या परिस्थितीला अनुभवत असतो आपण हे समजले....

अलिकडच्या काळात त्याच एकटेपण त्याला आवडायला लागले आहे,नको त्या गोष्टीशी अन् कीतिही ठरवून सुद्धा हा एकांत पणा अन् त्याची सवय करून घेणं त्याने सोडलं नाहीये....

म्हणजे ते मनाच्या हालचालीसाठी खुप वाईट
आहे पण याचं व्यसन जडल की माणूस शुन्यात स्वतःला शोधायला लागतो,मग त्याचं एकटेपण त्याच्या मनावर स्वार होत जात.तो बऱ्यापैकी या जाळ्यात गुंतत जात असतो,कधी तो कायमचा गुंतून जातो कधीही बाहेर न येण्यासाठी नकळत....

हल्ली त्याचा ठराविक माणसांशी अन् ठराविक वेळेतच संवाद होत असतो,इतर वेळी जेव्हा तो माणसांच्या घोळक्यात जाऊन बसतोना तेव्हा तो मोजकेच बोलत असतो.तेव्हा त्याच्या मनाशीच त्याचा संवाद चालू असतो....

मनाशी संवाद अन् मनाला विचारांनी त्रास करून तो विसावलेला असतो मनाने व शरीराने सुद्धा, त्या बंदिस्त खोलीत जिच्या आत कदाचितच सूर्यकिरणेही जात असेलच....काय करतो ? माहीत नाही.

एक मात्र आहे त्याचं वाचन अन् लेखन त्याच्या मनावर इतकं हावी झालं आहे की,त्याला रात्री झोप लागत नसली की अधाश्यासारखे तो फक्त वाचत सुटत असतो...

वाचन कोणत असत तर काहीतरी मोटिवेट करणार,नाहीतर असं काही जे त्याला शुन्यातुन बाहेर काढण्यास मदत करेल.पण सभोवतालची परिस्थिती त्याच्या मनावर इतकी स्वार झाली आहे की नाही होत त्याच्याने....

कधीतरी हक्काच्या मैत्रिणींशी त्याचा संवाद फुलत असतो,पण त्याच रीतेपण तो काही मनावरून उतरू देत नसतो.एक मन संवादात असत अन् एक शोधत असत एकांतात एकटेपणात स्वतःलाच...

झुरत असतं,चावत असतं आतल्या आत स्वतःलाच संवादात त्यांच्या सांभाळून घेणं,सांगणंही त्याला कळत असत‌.पण सांगण अन् प्रत्यक्षात करणे याला शक्य नसत...

घरातला संवाद रोजच्या नॉर्मल बोलण्या पुरताच त्याच्यासाठी आहे,झालाच कधी पुढे तर तो स्वतः टाळत असतो त्याला.अन् शून्यात असलेल्या त्याच्या जागेला,त्याच्या जगण्याला बघत असतो तो एकटा मनातल्या मनात खचत....

रोज रोज अंधाऱ्या खोलीतलं एकांतपण त्याच्या मनावर इतकं परिणाम करून गेलं आहे की, उजेडात गेल्यावरही तो सावरत असतो स्वतःला. जगापासुन चाचपडत असतो काहीतरी निराशेच्या गर्तेत हरवून गेल्यासारखं जगाकडे बघत मनातल्या मनातच....

मग सरळ रस्त्याने ठोकर लागणंही असो त्याला आपणच चुकीचं चालतो आहे,हे ही मान्य करता येत नाही.मनालाच सांगत असतो तो रस्त्यात  दगड आला आहे,पण मी बाजुला झालो नाही कारण तो रस्त्यात आला आहे मी नाही त्याच्या..‌..

#एक्झिट_जगण्यातली_काही_दिवसांची...

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ