मुख्य सामग्रीवर वगळा

जगण्यातुन_हरवलेली_लेक_मृगा....

सायंकाळ झाली दीड-दोन वर्षाची मृगा अंगणात असलेल्या लाल मातीत खेळण्यात रमली होती.तिच्या बाजुला तिच्यावर लक्ष ठेवायला तीचा आज्जा खाटेवर बिड्या फुकीत बसला होता....

गल्लीत पिंपळाच्या झाडाखाली मृगाचा बा चिंतेत डोक्याला हात लावून मावळत्या सुर्याला पाहात होता,सांज सरेनाशी झाली होती त्याला  दुपारपासुन उपाशी होता,एक-एक तास त्याला एक दिवसा सारखा वाटत होता....

अधुन-मधुन बायकोला कळा येत असल्या की याच्या जीवाला धडकी भरायची,गावच्याला दावखाणा नसल्यानं बाळंतपण गावच्या म्हाताऱ्या बायकाच करत असायच्या,दिवस मावळतीला आला चहुकडे अंधार पसरला होता.

तश्या सुमीच्या वेदना वाढल्या होत्या कळा,तीव्र झाल्या होत्या अन् आता तिला राहवत नव्हतं,अतोनात हाल अपेष्टा सहन करत ती वेळ आली अन् सुमी बाळंत झाली.अन् तिने सुटकेचा निःश्वास सोडला होता..‌‌.

घरात बाळ रडण्याचा आवाज आला,अन् मृगाच्या बा च्या डोळ्यांतुन अश्रुंचा दांड वाहु लागला. आजी नातवाला घेऊन तिच्या लेकाकडे आली, मृगाचा बा त्या लाल मासाच्या गोळ्याकडं बघत राहिला.व आसवांचे टिपुस गाळत बसला सर्विकडे आनंद झाला होता....

सुमी निपचित पडुन होती,आता तिच्या बाजुला तिचा लेक तिच्या जवळ होता,सासूबाईंची नातवाची दृष्ट काढायची हौस चालू होती.मृगाचा बा गावभर पोरगं झाला या आनंदात साखर वाटत होता...

या सर्वात मृगाचा विसर सर्वांना पडला होता,परक्याची लक्ष्मी आताच परकीच झाली होती.दीड-दोन वर्षांच्या या लेकराला कुणी जेवायला पण बोलत नव्हतं,ते मात्र लाल मातीत खुश होतं कारण त्याला या मातीत खेळायला ती खायला आज अडवणार कुणी नव्हतं...

मृगाचा आजा नातू झाल्याच्या आनंदात गावच्या बाजुला असलेल्या वस्तीत गेला होता,गावरान दारू प्यायला.आज त्याला अडवायला लेक पण नव्हता,त्याचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता...

जसा जसा अंधार पडत गेला मृगाचे डोळे लागत गेले,शेवट कंटाळुन मृगा घरात आली.आजीना दिलेला फिका वरण-भात खाऊन,तिच्या माय जवळ येऊन झोपुन राहीली शांत.तिला नको होती कुठली गोष्ट अन् नको बाहुली सोबत झोपायला....

दिवसभर खेळून खेळून दमलेली मृगा शांत झोपली होती,तिची माय मात्र जागेपणी लेकाचे स्वप्न रंगवत त्याच्या स्वप्नात रंगली होती.यात तीलापण थोडा का होईना मृगाचा विसर पडला होता..‌‌..

#जगण्यातुन_हरवलेली_लेक_मृगा...‌

Written by:Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...