मुख्य सामग्रीवर वगळा

गोष्टी_अव्यक्त नात्याच्या पलिकडची व्यक्त होऊपाहणा

हल्ली तुझं माझं हे अव्यक्त नात कुठेतरी एकमेकांशी व्यक्त करण्यासाठी दोघांमध्ये प्रयत्न चालु आहे की काय असे वाटत असते.म्हणजे मला इतक्या दिवस असे वाटायचं की मी एकटाच हा प्रयत्न करत असावा....

पण असे नाही अलीकडे तुही एक पाऊल पुढे टाकले आहे,माझ्या पुढे एक स्टेप गेलीय कुठेतरी मनातच मी माझ्या मनाला शाबासकी दिली की अखेर जाणीव झाली आहे...

खरच सांगु हे अव्यक्त नात आहेना तेच भावतं मला,म्हणजे इथे काय होते तुझ्याबद्दल नाही माहीत पण मी खुप काळजी करत असतो तुझी तुझ्याबद्दल कायम विचार करत असतो अन् तुझ्यासाठी कीत्येकदा मी स्वतःला हरवत असतो प्रत्येकवेळा आयुष्यात...

अलीकडे कुठेतरी यात बदल झाला आहे तेव्हा एकच सांगेल,जितका वेळ हे अव्यक्त नात समजुन घ्यायला घेतला आहेना तितकाच accept करायला घेईल तु पण विचार कर अन् तुझा निर्णय घे....

कारण वेळ खुप कमी आहे अन् कदाचित काही निर्णय तुला वेळेला निभावुन नेण्यासाठी माझ्या व्यतिरिक्तही घ्यायला लागल,जिथे मी नसतांना तू खुश असेल तर मला चालेल....

फक्त स्पष्टपणे तसे व्यक्त करत चल अन् हे अव्यक्त नात व्यक्त करायचं आहे त्यासाठी एक भेट तर होणारच आहे त्या वळणावर,पण त्या वेळा उत्तरात हा नकार नसेल...

हवे तर आयुष्यभर एक छान मित्र अन् मैत्रीण बनुन राहू नेहमी,म्हणजे तुझा वेळ अन् तु ठरवून भेटत जाऊ फक्त कधीतरी तो तू दिलेला माझा हक्काचा वेळ असत जाईल माझ्यासाठी...

या वेळेला आपल्या सोबत कुठलेही नाते असणार नाही फक्त तू अन् मी सोबत तुझ्या अव्यक्त नात्यातील अन् आता व्यक्त होऊ पाहत असणाऱ्या माहीत नसलेल्या नात्यांची वीण असेल....
सोबत असेल माझा आवडीच्या कॉफी सोबत जी अलीकडे तुझी सुद्धा आवडती झाली आहे,ऐकलंय की तु तुझ्या मनातल्या माझ्या बद्दलच्या गोष्टी या कॉफीशी शेअर करत असतेस हे खुप आवडले आहे....

#गोष्टी_अव्यक्त_नात्याच्या_पलिकडची_व्यक्त_होऊ_पाहणारी....

bharat.sonawane.374

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ