मुख्य सामग्रीवर वगळा

गोष्टी_अव्यक्त नात्याच्या पलिकडची व्यक्त होऊपाहणा

हल्ली तुझं माझं हे अव्यक्त नात कुठेतरी एकमेकांशी व्यक्त करण्यासाठी दोघांमध्ये प्रयत्न चालु आहे की काय असे वाटत असते.म्हणजे मला इतक्या दिवस असे वाटायचं की मी एकटाच हा प्रयत्न करत असावा....

पण असे नाही अलीकडे तुही एक पाऊल पुढे टाकले आहे,माझ्या पुढे एक स्टेप गेलीय कुठेतरी मनातच मी माझ्या मनाला शाबासकी दिली की अखेर जाणीव झाली आहे...

खरच सांगु हे अव्यक्त नात आहेना तेच भावतं मला,म्हणजे इथे काय होते तुझ्याबद्दल नाही माहीत पण मी खुप काळजी करत असतो तुझी तुझ्याबद्दल कायम विचार करत असतो अन् तुझ्यासाठी कीत्येकदा मी स्वतःला हरवत असतो प्रत्येकवेळा आयुष्यात...

अलीकडे कुठेतरी यात बदल झाला आहे तेव्हा एकच सांगेल,जितका वेळ हे अव्यक्त नात समजुन घ्यायला घेतला आहेना तितकाच accept करायला घेईल तु पण विचार कर अन् तुझा निर्णय घे....

कारण वेळ खुप कमी आहे अन् कदाचित काही निर्णय तुला वेळेला निभावुन नेण्यासाठी माझ्या व्यतिरिक्तही घ्यायला लागल,जिथे मी नसतांना तू खुश असेल तर मला चालेल....

फक्त स्पष्टपणे तसे व्यक्त करत चल अन् हे अव्यक्त नात व्यक्त करायचं आहे त्यासाठी एक भेट तर होणारच आहे त्या वळणावर,पण त्या वेळा उत्तरात हा नकार नसेल...

हवे तर आयुष्यभर एक छान मित्र अन् मैत्रीण बनुन राहू नेहमी,म्हणजे तुझा वेळ अन् तु ठरवून भेटत जाऊ फक्त कधीतरी तो तू दिलेला माझा हक्काचा वेळ असत जाईल माझ्यासाठी...

या वेळेला आपल्या सोबत कुठलेही नाते असणार नाही फक्त तू अन् मी सोबत तुझ्या अव्यक्त नात्यातील अन् आता व्यक्त होऊ पाहत असणाऱ्या माहीत नसलेल्या नात्यांची वीण असेल....
सोबत असेल माझा आवडीच्या कॉफी सोबत जी अलीकडे तुझी सुद्धा आवडती झाली आहे,ऐकलंय की तु तुझ्या मनातल्या माझ्या बद्दलच्या गोष्टी या कॉफीशी शेअर करत असतेस हे खुप आवडले आहे....

#गोष्टी_अव्यक्त_नात्याच्या_पलिकडची_व्यक्त_होऊ_पाहणारी....

bharat.sonawane.374

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...