मुख्य सामग्रीवर वगळा

हल्ली मी शाळेत जातो

हल्ली शेताच्या कामामुळे तालुक्याच्या घरापासून आमच्या गावाच्या रस्त्याने बरेचदा ये जा होत असते...

सकाळ झाली की माझी तिकडे जाण्याची गरबड चालु होऊन जाते,मी सकाळी शाळेत मुले जातात त्या वेळेला घरून निघतो....

रस्त्याने अनेक मुलं अनवाणी चालत असता कुणी मक्काच्या पिशवीचे केलेले ते दप्तर घेऊन,तर कोणी चांगले दप्तर घेऊन. सकाळी रस्त्याने हे मुले खुप छान भासत असता,अगदी रस्त्याने बागडणारी एक रंगाची फुलपाखरेच जणू ....

मी पण त्यांच्या शाळेत जाण्याचा एक हिस्सा व्हावं म्हणून बसवुन घेतो दररोज दोन जणांना शाळेपर्यंत पोचविण्यासाठी. अलीकडे या मुलांची अन् माझी चांगलीच मैत्री झाली आहे,ते लांबूनच दिसले की दादा मला...दादा मला...
असे ओरडतात मग मी सगळ्यांना तर नाही घेऊन जाऊ शकत पण दोघांना घेऊन जात असतो....

या त्यांच्या सोबतच्या प्रवासासोबत एक प्रश्न मला पडतो मी कॉलेजला जातो,तिथे मुलांना सिटी मधुन घेऊन जायला-सोडवायला कॉलेजच्या बस आहेत....

तश्या या जिल्हा परिषदेच्या शाळेला असाव्या असे वाटते,कारण गरीबाची पोर या गरीब सरकारच्या गरीब शाळेत जातात.माहीत नाही शिक्षणाची किती ओढ त्यांना असते पण घरुन पिशवीत घेतलेला डब्बा त्यांचा नेहमी रिकामा असतो,जो घरी येतांना शाळेतील भेटणाऱ्या खिचडीनं भरलेला असतो....

सरकार खुप काही करत आहे फक्त या मुलांची ये-जा करण्यासाठी काहीतरी करावं थंडीत मुलं खुप दूरदूर वरून वस्त्यांवरून येत असतात अनवाणी पायांनी....

हल्ली ते चित्र पण बघायला भेटत नाही एक पेन्सिल वर एक मुलगी अन् एक मुलगा बसलेला आहे अन् म्हणत आहे स्कूल चले हम....

ती पेन्सिल तरी घेऊन आलीय या गरीब मुलांना शाळेपर्यंत पण त्यांचा प्रवास हा अजुन संपला नाहीये....

#हल्ली_मी_पण_मुलांसोबत_शाळेत_जातो....

Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...