मुख्य सामग्रीवर वगळा

लेखक आणि मित्र

#प्रत्येकाच्या_आयुष्यात_असावा_असाही_एक_मित्र..!

रात्रीचे जेवण झाले की नेहमीप्रमाणे शतपावली करण्यासाठी मी बाहेर फिरायला म्हणजे घराच्या आसपास असलेल्या परिसरात फिरायला जात असायचो. काही दिवसांपासून कोरोना आला आणि माझे सांजवेळी फिरायला जाणेही मी बंद केले...

सांजवेळी फिरायला जाणे कसले ते एक निमित्तमात्र असायचे त्या एका मित्राला भेटायला जाण्यासाठीचे...
एक वेळ होती जेव्हा आयुष्य म्हणजे मित्र आणि मित्र म्हणजे आयुष्य इतकीच काय ती जीवनाची व्याख्या केलेली,त्यामुळे असंख्य मित्र केलेली होती. सर्वांना वेळ देणे,त्यांच्या सानिध्यात राहणे यातच दिवस कसे निघून जायचे समजायचे नाही.

आपण जसे म्हणतो की,आयुष्यात काही चढउतार येतात आणि आपण आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने बघू लागतो तसेच काही दिवस माझ्याही आयुष्यात आले. हे दिवस विचार केला तर फार लवकर माझ्या आयुष्यात आले,ते स्वीकारून आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देत आयुष्य जगायचे होते.

यात झाले काय की नकळत का होईना किंवा कामाच्या व्यापात हे सर्व मित्र मी सोडून दिले किंवा बळजबरी सोडावे लागले,पण आज जेव्हा आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन मागे बघतोना तेव्हा वाटते की मित्र सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता...

आजही हे सर्व मित्र भेटतात सर्व विचारपूस होते आणि पुन्हा आपले आयुष्य,आपले प्रॉब्लेम्स,आपले सुख यात मी गुंतून जातो. काही हक्काचे मित्र अजूनही जपवून ठेवले आहे जे आयुष्यात कुठल्याही वेळी कायम सोबत असतील,हे मित्र फक्त हातावर मोजण्या इतकेच आहे,दोन्ही हातावर नाहीतर फक्त एकाच हातावर इतकेच. यातही मी विचार करत असतो की कोण योग्य, कोण अयोग्य वगैरे वगैरे....

पण काय आहेना सध्या मित्र वगैरे या गोष्टींना आयुष्यात फार स्थान नाही,असेलही तर त्यांना ठरवून मी तितकासा वेळ देऊ शकत नाहीये. इतकं सर्व मी पर्सनली करून ठेवलं आहे माझं आयुष्य... नको वाटतो माझ्यामुळे त्यांना झालेला त्रास अन् हे नेहमीच मी जपवत असतो,जपवत आलोय...

वरती सांगितल्याप्रमाणे सांजवेळी फिरायला जाणे कसले ते एक निमित्तमात्र असायचे त्या एका मित्राला भेटायला जाण्यासाठीचे. 

हो अलीकडे एक मित्राबरोबर रोजचे उठणे बसणे होत असायचे,फार काही मोठा नव्हता तो सामान्य पण मनातले सर्व काही त्याच्याशी शेअर करू शकतो असा हा मित्र...

सेम आयुष्य आहे दोघांचे,त्याचेही कमवण्याचे दिवस आहे वय फार नाही माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा आहे. एकाच शाळेत असल्यामुळे त्याची माझी ओळख झालेली,शाळा संपली व संपर्क तुटला तो थेट या दिवसापर्यंत,तोही त्याच्या नियतीने आखून दिलेल्या आयुष्यात व्यस्त आणि मी पण...

नेहमीप्रमाणे सायंकाळच्या वेळी जेवण झाले की मी फिरायला जातो,माझ्या त्या आवडत्या जागी अन् नकळत एक दिवस कळते की तो तिथे वॉचमन म्हणून काम करतो...मेहनती आहे,आयुष्यात काय वाईट,काय चांगले हे त्याला कळते त्यामुळे मलाही फार काही वाटले नाही अन् मी पण तितका पर्सनली विचार कधी
केला नाही त्याच्याबद्दल,जाणून बुजून मला तो करायलाही नाही आवडत...

अलीकडे रोज भेट होत असते माझंही रोजचे फिरायला जाणे, Facebookवर तो मला add असल्यामुळे माझ्या तोडक्या-मोडक्या लिखाणाबद्दल त्याला माहीत होते.तो नियमित वाचतोही पण कधी रीअॅक्ट होत नसतो,त्याने बोलण्यात खूप वेळा सांगितले की छान लिहतो कविता,लेख नेहमीच वाचत असतो तुझी.

हे ऐकुन आनंद झाला कारण,असे अनपेक्षित कौतुक होत असले तर आनंद होतोच...

मग काय नियमित होणारी भेट एरवी,तो त्याच्या मित्रांमध्ये असला की त्यांचे बिनधास्त बोलणे वगैरे असायचे हे मी खूप वेळा दुरून बघायचो. पण मी जेव्हा त्याच्या सोबत बोलायचो त्यावेळी मोजके विषय,एकमेकांची होणारी नित्याची विचारपूस इतकेच.कुठेतरी नकळत मनाला वाटायचे की,हा बोलतांना आपली रिस्पेक्ट ठेऊन कुठेतरी बोलत असतो...(पण हे का ? मी तर त्याचा मित्रच आहेना)

मी काही कुणी मोठा किंवा नवोदित वगैरे नव्हतो पण त्याच्यासोबत बोलतांना हे खूप वेळा मला वाटायचे,कळायचे.
कदाचित तो करत असलेला जॉब यामुळे हे सर्व त्याला ज्ञात असेल का ?  असेही खूप वेळा वाटायचे,कारण दिवसभरात बऱ्याच मोठमोठ्या लोकांना तो बोलायचा प्रामाणिकपणे,पूर्ण मेहनत,इमानदारीने तो त्याची ही नोकरी करत होता अन् म्हणून मला खूप वेळा त्याच्याशी बोलतांना केलेल्या निरिक्षणातून त्याच्या रिस्पेक्ट देऊन बोलण्याबद्दल खूप काही वाटुन जायचे....

पुढे खूप वेळा त्याची माझी भेट,रोजचे होणारे बोलणे,ठरलेले विषय छान वाटायचे...
लेखन म्हंटले की प्रतिक्रिया येतच असतात,त्यामुळे खूप वेळा मला त्याच्या समोर प्रतिक्रीयेसाठी वाचक वर्गाचे येणारे फोन अन् त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर असलेले समाधान,आनंद तो न्याहाळत बसायचा.

मी पण त्याच्या चेहर्याकडे बघून फोनवर बोलत असायचो,काहीवेळ बोलणे झाले की त्याने घेतलेला हातात हात अन् कौतुकाची दिलेली शाब्दीक पोचपावती...
वाह...!

यापेक्षा अजून एक लेखकाला काय हवे असते एका मित्राकडून,खरे सुख तर यापुढील त्याच्या माझ्या झालेल्या संवादात असायचे. या संवादात तो जे काही बोलयचा ते एक जाणकार लेखक आपल्या लिखाणाला प्रतिक्रिया देतात,तसे असायचे.

त्याच्या चेहऱ्यावर असणारा माझ्या लिखानासाठीचा आनंद,जितका मला एक वाचकाचा फोन आल्यावर आनंद होत असायचा,त्याच्या काही पट मी त्या फोनला प्रतिउत्तर देतांना तो मित्र जेव्हा माझ्या चेहऱ्यावरील हावभाव बघत असायचा तेव्हा त्याच्या चेहर्यावर आपसूक माझ्यासाठी असलेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसायचा...
पुढे तो नकळत बोलून जायचा,
भाई खरे आयुष्य जगतोय तू...
आयुष्यातील सुख,समाधान काय असेल तर ते हेच...
तुझा चाहतावर्ग तुझी इतकी आपुलकीने दखल घेतो याला तोड नाही...

बस्स अजून काय हवंय भाई...
तुझी ही प्रतिक्रिया लिखाणाला बळ देते रे,भेटुयात सर्व ठीक झाले की तुर्ताच तु पण काळजी घे....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ