मुख्य सामग्रीवर वगळा

तिचा फुलनारा संसार...


#परसदारच्या_अंगणातला_फुलणारा_तिचा_संसार....


नेहमीप्रमाणेच सांजवेळ झालेली आकाशात ढगांची गर्दी होऊ बघत आहे... काही वेळातच पाऊस येणार याची चिन्हे दिसू लागतात,पाऊस येऊ लागतो.
परसदारच्या अंगणात असलेल्या जाईच्या वेलाची फुले सोसाट्याचं सुटलेलं वावधन,पावसामुळे जमिनीवर बरसु लागतात
व आपलं फुलणारं बाळसं तिथेच सोडवून देतात...

पावसाचा अंदाज घेऊन तो ही वेताची केलेली छोटीशी कुरकुली घेऊन,परसदारी असलेल्या जाईच्या वेलावरील फुलणाऱ्या फुलांना सकाळी पुजेत देवाला वाहण्यासाठी तोडून आणायला गेला...
हल्ली तीच फुले पावसात पडून मातीत खराब होऊन जातात,त्यामुळे हे सर्व ही एकच भावना त्या फुलांना तोडण्यामागची त्याची असते...

ऐरवी सांज ढळुन काळोख पसरलेला,पाऊसही आता बऱ्यापैकी बरसू लागलेला असतो. सांजवेळी आईने हातपाय धुवून,डोक्यातील केसांचा अंबाडा घालुन देव्हाऱ्यात दिवा लावावा. तसे घरात प्रसन्नमय वातावरण निर्माण होते अन् अलिकडे आजारी असलेली आई यावेळी चेहर्यावर तेजस्विता असलेली,प्रसन्नमय दिसु लागते... जसजसा ढगांचा काळोख,प्रसन्न दिव्यांचा उजेड घरात पसरु लागतो आणि घरातली सायंकाळची कामं सुरू होतात...

सर्व स्वयंपाक झाला,जेवणाची ताटे डायनिंग टेबलवर आली की सर्वच जेवणासाठी येतात घरात असलेला तो,ती अन् आई जेवन करून तो,आई त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातात. ती भांडीकुंडी आवरुन,थोडेफार अस्थव्यस्थ झालेल्या केसांना सावरत बाल्कनीत असलेल्या सोफ्यावर आई,वडिलांना,बालपणीच्या दिवसांना आठवत काहीवेळ बसलेली असते...

आतापर्यंत बाहेर पडणारा पाऊसही कमी झालेला भासतो,बरीच वेळ झालेली असते.ती झोपायला म्हणुन बेडरूममध्ये जाते तो अजुनही पुस्तक वाचत बसलेला असतो...

भव्य अशा दिवाणावर तिच्या बाजूने असलेल्या व्हाइट बेडशीट कव्हरवर तिने एक जुनी जाडसर गोधडी अंथरावी,जी बऱ्यापैकी तिला मायेची उब देत असते. हे ती तेव्हाच करते,जेव्हा तिचे ते आठ दिवस चालू असतात नकळत त्यालाही अंदाज येतो...
ती थकलेली असल्यामुळे गुड् नाईट म्हणून अंथरलेल्या गोधडीवर झोपी जाते. तो मात्र दिव्याच्या मंद उजेडात कीतीवेळ तिच्या चेहऱ्यावर असलेल्या तेजाकडे,तेजस्वी सौंदर्याकडे बघत बसलेला असतो.
तिचं ते खुललेल सौंदर्य दुरूनच अनुभवत असतो...

नेहमीची पहाट होते,रात्री केव्हा डोळा लागला त्यालाही समजलेलं नसतं...
अर्थात आज देवपूजा त्याला करावी लागणार असते,कारण तिच्या या दिवसात सकाळची पुजा तोच करत असतो. कीचनमध्ये माठाच्या खाली असलेल्या छोट्या वाटीत थेंब थेंब पडणार्या पाण्यात रात्रीच भिजवत ठेवलेली जाईची फुलं आतापर्यंत बऱ्यापैकी ताजीतवान असतात...

तो सुई,दोरा घेऊन त्यांना छानपैकी देव्हार्याजवळ बसुन ओवु लागतो,तितक्यात ती अंघोळ करून त्याच्या समोरून स्वत:ला सावरत बाजुच्या खोलीत जाते. तो तिला बघत बसतो कारण काय माहित नाही,या दिवसात प्रत्येक स्री खूप सुंदर दिसत असते... स्त्री नेहमीच सुंदरच आहे सौंदर्याने आणि विचारानेसुद्धा पण लोकांनी तिचे समाजात आखलेले चित्र काही औरच आहे,असो तो लिखाणाचा भाग नाही. यावरही कधीतरी सविस्तर लिहल...

एरवी तो तिला कामाच्या व्यापात वेळ देऊ शकत नाही,पण हे असे छोटे छोटे सुटून जाणारे क्षण ते दोघेही नेहमी साजरे करतात. कारण हेच ते विशेष प्रेम असते,या दिवसात तिचं सौंदर्य हे अजून खुललेलं असतं,नजरेने नजरेशी घरात दोघांचे हे प्रेमाचे खेळ चालुच असतात. नेहमीच त्याची नजर तिने चुकवत राहावी अन् तो तिला नजरेत कैद करत रहावा हा खेळ चालूच असतो,हे क्षण अनुभवणं सुंदर आहे...

आतापर्यंत त्याचीही देवासाठी लागणारी माळ तयार करून झालेली असते,आता मात्र त्याचा विचार बदललेला आहे. त्याच्या माळेचे रूपांतर गजर्यामध्ये व्हावे. तिलाही त्याचं सुख,प्रेम अनुभवायला मिळावं,म्हणून तो इतके नक्कीच करू शकतो...

गजरा आणि तिला आवडणारा आलं घातलेला चहा तो हॉलमध्ये घेऊन येतो,तिच्या केसात त्यानं तो गजरा माळावा अन् चहा देऊन तो पुन्हा पूजेला येऊन बसतो...
ती सुंदर दिसतच असते,सोबत चेहऱ्यावरील तिचा तो आनंद बघण्या जोगता असतो,तो ही मनोभावे देवपुजा करु लागतो.

हे सर्व सुख पडद्याआड असलेली आई नकळत अनुभवत असते,एका आईला अजुन तरी काय अपेक्षा असावी. तिचा घटका दोन घटकांचा राहिलेला तो संसार असतो,पण या संसाराला पेलणारी दोन आपसात प्रेम असणारी व्यक्ती तिच्या उत्तरार्धात तिच्या आयुष्यात असतात...

मग नकळत कधीतरी,हे सुख बघवुन तिच्या डोळ्यातही आपसुकच आनंदाश्रु तरळुन जातात....

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ