मुख्य सामग्रीवर वगळा

तिचा फुलनारा संसार...


#परसदारच्या_अंगणातला_फुलणारा_तिचा_संसार....


नेहमीप्रमाणेच सांजवेळ झालेली आकाशात ढगांची गर्दी होऊ बघत आहे... काही वेळातच पाऊस येणार याची चिन्हे दिसू लागतात,पाऊस येऊ लागतो.
परसदारच्या अंगणात असलेल्या जाईच्या वेलाची फुले सोसाट्याचं सुटलेलं वावधन,पावसामुळे जमिनीवर बरसु लागतात
व आपलं फुलणारं बाळसं तिथेच सोडवून देतात...

पावसाचा अंदाज घेऊन तो ही वेताची केलेली छोटीशी कुरकुली घेऊन,परसदारी असलेल्या जाईच्या वेलावरील फुलणाऱ्या फुलांना सकाळी पुजेत देवाला वाहण्यासाठी तोडून आणायला गेला...
हल्ली तीच फुले पावसात पडून मातीत खराब होऊन जातात,त्यामुळे हे सर्व ही एकच भावना त्या फुलांना तोडण्यामागची त्याची असते...

ऐरवी सांज ढळुन काळोख पसरलेला,पाऊसही आता बऱ्यापैकी बरसू लागलेला असतो. सांजवेळी आईने हातपाय धुवून,डोक्यातील केसांचा अंबाडा घालुन देव्हाऱ्यात दिवा लावावा. तसे घरात प्रसन्नमय वातावरण निर्माण होते अन् अलिकडे आजारी असलेली आई यावेळी चेहर्यावर तेजस्विता असलेली,प्रसन्नमय दिसु लागते... जसजसा ढगांचा काळोख,प्रसन्न दिव्यांचा उजेड घरात पसरु लागतो आणि घरातली सायंकाळची कामं सुरू होतात...

सर्व स्वयंपाक झाला,जेवणाची ताटे डायनिंग टेबलवर आली की सर्वच जेवणासाठी येतात घरात असलेला तो,ती अन् आई जेवन करून तो,आई त्यांच्या बेडरूममध्ये निघून जातात. ती भांडीकुंडी आवरुन,थोडेफार अस्थव्यस्थ झालेल्या केसांना सावरत बाल्कनीत असलेल्या सोफ्यावर आई,वडिलांना,बालपणीच्या दिवसांना आठवत काहीवेळ बसलेली असते...

आतापर्यंत बाहेर पडणारा पाऊसही कमी झालेला भासतो,बरीच वेळ झालेली असते.ती झोपायला म्हणुन बेडरूममध्ये जाते तो अजुनही पुस्तक वाचत बसलेला असतो...

भव्य अशा दिवाणावर तिच्या बाजूने असलेल्या व्हाइट बेडशीट कव्हरवर तिने एक जुनी जाडसर गोधडी अंथरावी,जी बऱ्यापैकी तिला मायेची उब देत असते. हे ती तेव्हाच करते,जेव्हा तिचे ते आठ दिवस चालू असतात नकळत त्यालाही अंदाज येतो...
ती थकलेली असल्यामुळे गुड् नाईट म्हणून अंथरलेल्या गोधडीवर झोपी जाते. तो मात्र दिव्याच्या मंद उजेडात कीतीवेळ तिच्या चेहऱ्यावर असलेल्या तेजाकडे,तेजस्वी सौंदर्याकडे बघत बसलेला असतो.
तिचं ते खुललेल सौंदर्य दुरूनच अनुभवत असतो...

नेहमीची पहाट होते,रात्री केव्हा डोळा लागला त्यालाही समजलेलं नसतं...
अर्थात आज देवपूजा त्याला करावी लागणार असते,कारण तिच्या या दिवसात सकाळची पुजा तोच करत असतो. कीचनमध्ये माठाच्या खाली असलेल्या छोट्या वाटीत थेंब थेंब पडणार्या पाण्यात रात्रीच भिजवत ठेवलेली जाईची फुलं आतापर्यंत बऱ्यापैकी ताजीतवान असतात...

तो सुई,दोरा घेऊन त्यांना छानपैकी देव्हार्याजवळ बसुन ओवु लागतो,तितक्यात ती अंघोळ करून त्याच्या समोरून स्वत:ला सावरत बाजुच्या खोलीत जाते. तो तिला बघत बसतो कारण काय माहित नाही,या दिवसात प्रत्येक स्री खूप सुंदर दिसत असते... स्त्री नेहमीच सुंदरच आहे सौंदर्याने आणि विचारानेसुद्धा पण लोकांनी तिचे समाजात आखलेले चित्र काही औरच आहे,असो तो लिखाणाचा भाग नाही. यावरही कधीतरी सविस्तर लिहल...

एरवी तो तिला कामाच्या व्यापात वेळ देऊ शकत नाही,पण हे असे छोटे छोटे सुटून जाणारे क्षण ते दोघेही नेहमी साजरे करतात. कारण हेच ते विशेष प्रेम असते,या दिवसात तिचं सौंदर्य हे अजून खुललेलं असतं,नजरेने नजरेशी घरात दोघांचे हे प्रेमाचे खेळ चालुच असतात. नेहमीच त्याची नजर तिने चुकवत राहावी अन् तो तिला नजरेत कैद करत रहावा हा खेळ चालूच असतो,हे क्षण अनुभवणं सुंदर आहे...

आतापर्यंत त्याचीही देवासाठी लागणारी माळ तयार करून झालेली असते,आता मात्र त्याचा विचार बदललेला आहे. त्याच्या माळेचे रूपांतर गजर्यामध्ये व्हावे. तिलाही त्याचं सुख,प्रेम अनुभवायला मिळावं,म्हणून तो इतके नक्कीच करू शकतो...

गजरा आणि तिला आवडणारा आलं घातलेला चहा तो हॉलमध्ये घेऊन येतो,तिच्या केसात त्यानं तो गजरा माळावा अन् चहा देऊन तो पुन्हा पूजेला येऊन बसतो...
ती सुंदर दिसतच असते,सोबत चेहऱ्यावरील तिचा तो आनंद बघण्या जोगता असतो,तो ही मनोभावे देवपुजा करु लागतो.

हे सर्व सुख पडद्याआड असलेली आई नकळत अनुभवत असते,एका आईला अजुन तरी काय अपेक्षा असावी. तिचा घटका दोन घटकांचा राहिलेला तो संसार असतो,पण या संसाराला पेलणारी दोन आपसात प्रेम असणारी व्यक्ती तिच्या उत्तरार्धात तिच्या आयुष्यात असतात...

मग नकळत कधीतरी,हे सुख बघवुन तिच्या डोळ्यातही आपसुकच आनंदाश्रु तरळुन जातात....

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...