मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणीतली पाऊलवाट...

#आठवणीतल्या_पाऊलवाटा...!


आज दिवसभर अंगावर ब्लँकेट घेऊन खिडकीतून संथपणे पडणारा पाऊस बघत बसलो होतो. पावसात कुठलाही जोर नव्हताच आता श्रावण महिन्यातील पावसाचे वेध लागले आहे. निसर्ग पूर्णपणे त्याच्या सौंदर्याची मुक्तपणे उधळण करतोय नदी,नाले,बऱ्यापैकी भरल्यामुळे पाणी वाहते झाले आहे. अभयारण्यातील झरेही कुठेकुठे वाहू लागले आहे,श्रावणात ते पूर्णपणे रौद्ररूप धारण करणार याची जाणीव अलिकडे काही दिवस होतेय...

श्रावणाची चाहूल लागली म्हणजे मग आठवण येते भद्रा मारुती पायी दर्शन दिंडी सोहळ्याची,दर शुक्रवारप्रमाणे चारही शुक्रवार कन्नड ते भद्रा मारुती पायी दर्शन मी अनुभवत असतो...यावर्षी कोरोना असल्यामुळे हे दर्शन अनुभवता येणार नाहीये आणि सोबत वेरूळ लेणी डोंगर ते शासकीय विश्रामगृह परिसरात रात्रीच्या दीड ते अडीच यावेळेत केलेला ट्रॅक,सोबतीला निसर्गाचे स्वर्गरूपही यावेळी अनुभवायला मिळणार नाही याचेही दुःख आहे...

तर चला आज या स्वर्गरूप अनुभवायला देणाऱ्या प्रवासाबद्दल थोडक्यात लिहण्याचा प्रयत्न करतो...


दर सालाबादाप्रमाणे पायी चालत रात्रीच्या एक-सव्वा दरम्यान मी वेरूळ लेणीच्या पायथ्याशी असलेल्या गेटवर येऊन पोहचलेलो असतो.
तेथील सेक्युरिटी गार्डची परवानगी घेऊन वेरूळ लेणी मधून डोंगर मार्गाकडे जाणाऱ्या वाटेला आपण शिस्तीत चालत चालत जायचे आहे. रात्री काळाकुट्ट अंधार असल्यामुळे विजार(बॅटरी) सोबत असू द्यायची, सोबत कुणी जाणकार असल्यास चांगलेच कारण इथे बऱ्याच वेळेला वाट चुकते,दिशाभूल होते...काहीवेळ चालले की,सिमेंटचा बांधलेला रस्ता संपणार आहे आणि डोंगराची वाट लागणार आहे.त्या वाटेने सांभाळून वर चालत आले की पुन्हा एकदा वनखात्याच्या आदीपत्या खाली बांधलेल्या सिमेंटचा बांधलेला चांगला रस्ता आपल्याला लागणार आहे...

एरवी आपल्याला रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीच्या पलिकडे असलेले वेरुळ लेणीचे स्ट्रीट लाईटमधील विहंगम दृश्य अनुभवायला मिळते,जे डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. या ठीकाणी हवेतील गारवा,निसर्गातील शांतता आणि लेणीतुन दिसणारी भगवान बुद्धांची शांतभाव मुद्रेत असलेली मूर्ती कितीवेळ हे सर्व सुख अनुभवावे असे वाटत असते.


नकळत पुढिल प्रवासाच्या ओढीने आपण तेथुन मार्गक्रमण करतो,आतापर्यंत हातातील विजारी(बॅटरी) चालू झालेली असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणाऱ्या नाल्यांमधून वाहणाऱ्या नितळ पाण्याचा आवाजही आपल्या कानी पडत असतो. हे सर्व अनुभवत असतांना फार वेळेस मी एकटा असतो,त्यामुळे मनाला मिळणारी शांतता,एकांत,हवेतील गारवा,वाहत्या पाण्याचा आवाज हे अनुभवायला खूप सुंदर वाटत असते....

आता पर्यंत आपण डोंगरात बरेच वर आलेलो असतो आणि आता अजून एक सुंदर दृश्य आपल्याला अनुभवायला मिळणार असते. ते म्हणजे खुल्ताबाद घाटरस्ता रात्रीचे दीड-पावणे दोन वाजलेले आहे नकळत चालणारे पावले विसाव्यासाठी पुन्हा थांबतात आणि हे विहंगम दृश्य डोळ्यात कैद केले जाते. घाटामध्ये चमकणारी गाड्यांची लाईट असलेली रांग,जय भद्राच्या घोषणांनी दुमदुमलेला घाट अधिक रौद्र तर कधी धुक्याची चादर अंगावर घेऊन सौंदर्याचे दर्शन देणारा घाट हे दृश्य सुंदर कितीवेळ बघत बसावे असे असते...

हवेतील गारवा आणि डोंगर रांगेच्या विरुद्ध दिशेने बघितले की जिथवर नजर जाईल तिथवर काळाकुट्ट अंधार,नाल्यातील वाहत्या पाण्याचा आवाज, रातराणीच्या फुलांचा अनुभवायला येणारा दरवळ आणि गवताची हिरवळ कितीवेळ पाठ लांब केली की,पुन्हा पुढील प्रवास सुरू होतो...

पुढे चालत गेले की वन विभागाने बांधलेला एक छोटेखानी लोखंडी दरवाजा आपल्याला बघण्यास भेटतो,जो चहूकडून फिरता आहे. इथून अजून एक दृश्य अनुभवयाला मिळतं ते म्हणजे वेरूळ लेणीला अभिषेक घालणारा,वेरूळ लेणीच्या माथ्यावरून वाहणारा धबधबा. दूरवर डोंगरातून वाहणारे सर्व पाणी इथे एकत्रित येऊन धबधबा रुपात वेरूळ लेणीच्या पल्याड पडत असते,काळ्याकुट्ट अंधारात चमकणारे हे पांढरे शुभ्र पाणी पुन्हा एकदा स्वर्ग अनुभवण्याचा आनंद देत असते...

काहीवेळ पुन्हा एकदा खडतर प्रवास सुरू होतो,पावलांना सावरत सावरत मार्ग शोधत झाडांच्या घनदाट जंगलातून आपण चालू लागतो,किरर्र अंधारात आपल्याला दूरवर प्रकाश नजरेस पडतो हा आनंद अनुभवणे अप्रतिम असते. पुढे चालत गेले की,डांबरी रस्ता तयार करण्यात आलेला आहे त्या रस्त्याने आपण येऊन पोहचतो ते थेट शासकीय विश्राम गृहाजवळ ज्याची बांधणी ही कदाचित पूर्णपणे इंग्रज काळातील ऐतिहासिक असावी असा अंदाज वाटतो...



रात्रीच्या वेळी विश्राम गृहाच्या बाहेर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली ज्याला चहूकडुन ओट्यासारखे केले आहे तिथे विश्रांतीसाठी मी थांबत असतो.तब्बल एक तास ठरवुन मी येथे थांबतो,छान वाटत असते संथ वाहणारी हवा,एकांतपणा,एकाकी मन अन् मनात येणाऱ्या भन्नाट कल्पना.

खूप वेळ झाडाला पाठ लावून बसले की पाय मोकळे होतात आणि मग मी त्या विश्राम गृहाला अधिक निरखून बघू लागतो,त्याच्या भिंतींना स्पर्श करू लागतो,खिडकीच्या मोठाल्या काचेच्या तावदानांच्या मध्ये मी नजरेने निरखून विश्राम गृहातील आतील नजारा बघतो...या प्रवासात सर्वाधिक सुंदर टप्पा कुठला असेल माझ्यासाठी तर तो हाच आतमध्ये असलेली लाकडाचे टेबल,खुर्च्या स्ट्रीट लाईटच्या पिवळ्या उजेडात त्या जुन्या वस्तू अजून जुन्या वाटायला लागतात. मी त्यांना पुन्हा पुन्हा निरखून बघू लागतो...

हे सर्व सोडावे वाटत नसते पण पुढे भद्रा मारुती दर्शनाची लागलेली ओड काही स्वस्थ बसु देत नाही आणी पावले पुढच्या दिशेने चालु लागतात. स्ट्रीट लाईटच्या उजेडात चमकणारा डांबरी रस्ता,काचेचे मोठाले विश्रामगृह यांना बघत वाट संपत जात असते. मग नकळत हवेत शांतता पसरते,रस्त्याने मोठाली वडाची झाडे दिसू लागतात आणि स्मशानभूमीचा तो परिसर नजरेस पडतो...

हा परिसर मला मात्र कधी भितीदायक वाटला नाही,कुठेतरी येथे  आपला इतिहास दफन झालेला आहे याची जाणीव सतत होत असते. मग एका मागोमाग सर्व राजे,राण्या,बादशाह आठवू लागतात आणि आपला वैभवशाली इतिहास आठवू लागतो,मग नकळत मी त्या ठिकाणी असलेल्या दर्गेत बाहेरूनच नतमस्तक होतो...

कुठेतरी एक-दीड तासांचा हा प्रवास मनाला शांतता,एकांत आणि खूप काही देऊन जाणारा असतो. याच परिसरात मलिक अंबरची कबर आहे,तिच्यावर एकदा नजर टाकावी आणि  निसर्गसंपन्न परिसराला अनुभवत या पायवाटेने पुढे चालत रहावं बस्स.दहा मिनिटांनी एक मोठी कमान आपल्याला दिसते,इथेच आपला हा प्रवास संपलेला असतो जो स्वर्गाचा अनुभव आपल्याला देत असतो...
कमानीच्या बाहेर निघाले की मग भद्रा मारुती मंदिराचे एक-दीड किलोमीटरच्या अंतराने आपल्याला दर्शन होते....

Written by
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...