मुख्य सामग्रीवर वगळा

Henry David Thoreau....


तो मला आज भेटला, ऐकुन खूप होतो त्याच्याबद्दल पण कधी वाचले नव्हते त्याला आज जेव्हा त्याच्या जन्मदिनी सर्वच एका पेक्षा एक सरस लेख त्याच्यासाठी लिहत होते, तेव्हा मी काहीच 

लिहू शकत नाही...


नाही... खरेतर हे शक्यच नाही, पण मग सूरवात कुठून करायची हे सुचत नाहिये म्हणजे त्यांच्याबद्दल, त्यांना वाचण्यात लोकांच्या उभ्या हयाती गेल्या त्यांना मी आज एक दिवसात कसे ओळखू  शकतो...
दिवसभर त्याच्याविषयी जे हातात पडल ते अधाश्यासारखे वाचून संपवत होतो...
इतक्यात ते मला उलगडलेले पूर्णपणे की मीच त्यांना जाणून घेण्यात विचाराने अपूर्ण आहे याचे उत्तर मलाच माहीत नाही, किंवा मलाही कळाले नाही अजुन तरी...

आज जे भेटलं ते सरसर वाचून मोकळे होऊन जायचे आहे, मग बऱ्याच आकृती मनात येईल त्या जश्या वाटेल तश्या एका कॅनव्हासवर उतरवायच्या आहे... तो राग आहे की आनंद माहीत नाही कदाचित आज खूप काही भेटलं आहे, हाती लागले आहे त्याचं गणित उलगडत नाहीये, म्हणून असलेली विचित्र Excitement असेल पण ती उलगडणारी नाहीये.

म्हणूनच आज कॅनव्हासवर खूप काही मनातले उतरवणार आहे,ते चित्ररूपात मी किती सरसपणे उतरवू शकेल माहीत नाही पण त्यांना ते उमगले असतेच हे मात्र खरे...

सांजेच्यावेळी जेव्हा भर पावसात काळ्याशार ढगांतून पाऊस बरसू लागलाय अन् मी फक्त खिडकीच्या पडद्या आडुन बसून त्याला बघत बसलोय. कधी ग्रेस आठवून जात होते तर कधी त्यांच्या कविता...
पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने..!

आज जेव्हा थोरो उलगडू लागले होते बरोबरच या लेखांमध्ये ग्रेसही दिसू लागले होते, काय असेल या दोघांचे साम्य मला माहीत नाही... पण नजरेच्या कॅनव्हास मध्ये एकच आकृती वेळोवेळी काढली जात होती कधीतरी तिला ग्रेसांच्या आठवणीत रंगवून टाकत होतो, तर कधी थोरोंचा आज नव्याने उलगडनारा इतिहास लेखन, कविता यांची आकृती काढत होतो...

हेन्री डेव्हिड थोरो, अमेरिकेतील एक लेखक, कवी आणि विचारवंत.
जन्म: १२ जुलै १८१७ मृत्यु: ६ मे‌ १८६२ आधुनिक अमेरिकेचा महत्त्वाचा लेखक म्हणून थोरो यांना ओळखले जाते.ते आपल्या वाॅल्डन पुस्तकासाठी जे की निसर्गाच्या सनिध्यातील साध्या राहणिमानाबद्दल आहे.ते नेहमीच पुस्तकांसाठी चर्चेत राहिले
कंकाॅर्ड येथे आरंभीचे काही शिक्षण झाल्यानंतर हार्व्हर्ड विद्यापीठातून १८३७ मध्ये ते पदवीधर झाले.त्यानंतर थोडे दिवस शिक्षकाची नोकरी केल्यानंतर पेन्सिल तयार करण्याच्या वडिलांच्या व्यवसायात ते त्यांना साहाय्य करू लागले. कंकाॅर्ड आणि मेरिमॅक ह्या नद्यांतून त्यांनी नौकाभ्रमण केले...

"आपला पिंड शिक्षकाचा नसून कवीचा आहे, ह्याची जाणीव ह्या नौकाभ्रमणाच्या अनुभवातून त्यांना झाली आणि ते कविता करू लागले. १८३७ च्या सुमारास विख्यात अमेरिकन निबंधकार आणि विचारवंत एमर्सन ह्याच्याशी त्याचे घनिष्ठ स्नेहसंबंध जुळुन आले, त्यांच्या विचारांचा प्रभाव थोरोंवर पडला होता.

मग सुरू होतो प्रवास एकांताचा थोरोंना 'स्व' येणारा विचार मग पुढे एका झोपडीत एकांतवासात त्यांनी आपले जगलेले जीवन... यातुन त्यांच्या निसर्गोपासनेमागे मानव आणि निसर्ग ह्यांच्यातील मूलभूत आणि निकटच्या नात्याची त्यांना होणारी जाणीव,त्यामुळे जुन्या काळाची काही अंगे त्यांना महत्त्वपूर्ण वाटु लागली.माणुस अन् निसर्ग यांच्यातील तफावत त्यांना उलगडु लागली अन् त्यातुन निर्माण होवू लागला एक लेखक,कवी आणि विचारवंत अमेरिकन समाजापुढे एक साधेसुधे जीवन कसे जगावे याचा आदर्श त्यांनी दाखवून दिला...

पुढे क्षयाच्या विकाराने थोरो यांचे कंकाॅर्ड येथे निधन झाले.पुढे त्यांच्या कविता,प्रवासवर्णने,टिपणवह्या असे त्याचे काही साहित्य त्याच्या मरणोत्तर प्रकाशित झाले.त्यांच्या समग्र लेखनाच्या अनेक संपादित आवृत्त्या निघाल्या. त्यांपैकी विसाव्या खंडांत प्रसिद्ध केलेली वॉल्डन आवृत्ती विशेष प्रसिद्ध ठरली आहे."
जीवनपट:अ.र.कुलकर्णी.

आज वाचनात आलेले त्यांच्यासाठीचे हे पत्र...


माय डियर थोरो ,

वॉल्डन च्या किनारी झालेली भेट अजून स्मरणात आहे...माहित नाही आपण तेव्हा नेमकं कशाविषयी बोललो,तू उगीच झाडाखाली बसून झाडाचं पान झालेलास,आणि मी रंग शोधत होतो तुझ्यात,झाडात,तलावामध्ये...

तुला माहितेय मला हा तलाव,ही झाडे हे सगळे खूप खूप आपलेसे वाटतात इतके की आपण स्वतःला ओळखत नाही आहोत,पण ह्यांना ओळखतो. इथला सूर्यप्रकाश पण माझ्या सांगण्यावरून, झाडांवरून माझ्या कॅनव्हास वर पसरतो आणि तू शोधत असलेला साधेपणा, ह्या साधेपणाचा रंग,माझेच रंग कधी स्वतःच लावून घेतात खरंच मलाच कळत नाही...

    वॉल्डन च्या किनाऱ्यावर त्या रम्य क्षणांची आठवण म्हणून हे पत्र लिहल,उद्या परत जाडजूड कॅनव्हास घेऊन सूर्यप्रकाश रंगवायला जाईन. तुला माहितीये,आपण झुरिक मध्ये इम्प्रेशिनिसम विषयी बोलताना बोललेलो की," तुझ्या दिसण्यापेक्षा तुझं असणं काढायला जमलं ना की खरं चित्र बोलू लागत.."

   तुझं असणं कळवत रहा...

                                         तुझा...
                                        व्हॅन गाॅग

Written by,

Bharat Sonwane...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ