मुख्य सामग्रीवर वगळा

आसऱ्या आई अन् तरणी लेक..!

आसऱ्या आई अन् तरणी लेक..!



सकाळ सरली दहाच्या ठोक्याला पावले झाडांच्या पडसावलीत तापलेल्या जमिनीवर सावरत सावलीच्या आधारे नदीच्या वाटेनं चालत होती.दहा मिनटे झाले,वीस झाले,बारा वाजले तरीही पावलं चालत होती,रस्त्यानं अधुनमधून गुलमोहराच्या फुलांच्या सड्याखेरिच काहीही नजरी पडत नव्हतं....

रस्त्याच्या एकांगी नदीच्या तीराला बेश्रमाचे वाढलेले झाडं त्याला आलेले आकाशी निळसर फुलामुळे जीव खालीवर होत होता. कारण ते दिसायला खूप भयावह अन् काळजाला धडकी भरवणार होतं,अश्यातूनही वाट काढत महादेवाच्या मंदिरासमोर नदी थडीवर नदीत जाणाऱ्या पायऱ्यावर घटकाभर बसून राहिलो...

का बसलो..?, कश्यासाठी बसलो..? काय भेटलं बसून..? याला उत्तरे नव्हते,फक्त मनाला विरंगुळा अन् एकांतात काही काळ समाधी लागेल म्हणुन बसून राहिलो होतो...
समाधी लागणे काही माझ्या हातचे नव्हते,कारण मनात चालू असलेल्या असंख्य अडचणी,त्यांनी केलेली प्रश्न,त्यांना दिलेली उत्तरे अन् अजुन भूतकाळ,वर्तमान काळ अन् सोबतच खायला उठलेला भविष्यकाळ.बाकी प्रश्न,प्रश्न,उत्तरे,मनाची खोटी समज अन् हजारो हालचाली एका ठिकाणी राहून संपूर्ण विश्वात भटकून येण्याची भावना...

कितीवेळ डबक्यारुपी झालेल्या नदीला न्याहाळत राहणं,झाडांच्या आत चिमण्यांचे चिवचिव करून भुर..! करून उडून जाणे.
नदीच्या एकांगाला असलेला देवीआईचा आसराचा फाटका तुटक्या काटकीचा संसार,दुसरीकडे देवीला वाहिलेली चोळी,बांगडी अन् चिखलात मुरलेले बोळके,बाळके आसराईच्या वरल्या अंगाला असलेल्या बोडक्या बाभळीला नवसाचे बांधलेले चिंदके अन् साडीचे काठ फाडून बांधलेली पिसं...

आसऱ्याचे बोणे फेडायला आलेली नुकतीच तरुणपणात येणारी लेक,डोक्यावरचा पदर सावरत तिला घेऊन येणारी माय,अन् नदीच्या डबक्यात तरुणपणात आलेल्या लेकीचे जावळे आसऱ्याआईला दाखवून तिने डबक्यात सोडून दिले अन् तिच्या भानावलेल्या नजरेत नकळत माझी नजर गुंतून जाणे...
एकीकडे तरणीभांड लेकीच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना अन् एकीकडे आजच्या वर्तमान काळाला घेऊन मला उज्वल भविष्याची चिंता...

डब्ब्यात असलेल्या दही भाताला जसं आईनं त्या लेकिवरून उतरवून फेकावे,तसं बोडक्या बाभळीवर असलेले कावळे कावकाव करून उडून जावे अन् लेकीला कावळा शिवावा तसा कावळा आसऱ्याआई जवळून भुरकन आसमंतात काळानिळा होत,आकाशी होवून गुडूप होवुन जावा...

आसऱ्याआई मायलेकीला सुटका देऊ करते ही भावना अन् उद्या तरण्या लेकीच्या पोटी येणारं लेकरू पुन्हा आसऱ्याआईचे पाय पडायला घेऊन येईल मायची आसऱ्याआईला हाक,(वचन) हे चक्र असच चालत राहणार...

आज मी आहे,उद्या दुसरा कुणी नदी तीरावर या क्षणांना न्याहाळत राहणार.उद्या तरणी लेक आई होवुन येणार,तिच्या लेकीला घेऊन तिची आई कुठं असेन याचा ठाव नाय अन् माझं काय मला आत्ताच भविष्याची चिंता...
मग काय सगळं सारखच आहे,फक्त कुठे कारण बदलून ती चिंता नाहीशी केली जात आहे फक्त चिंते पल्याड श्रद्धा असेल इतकचं..

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...