मुख्य सामग्रीवर वगळा

आसऱ्या आई अन् तरणी लेक..!

आसऱ्या आई अन् तरणी लेक..!



सकाळ सरली दहाच्या ठोक्याला पावले झाडांच्या पडसावलीत तापलेल्या जमिनीवर सावरत सावलीच्या आधारे नदीच्या वाटेनं चालत होती.दहा मिनटे झाले,वीस झाले,बारा वाजले तरीही पावलं चालत होती,रस्त्यानं अधुनमधून गुलमोहराच्या फुलांच्या सड्याखेरिच काहीही नजरी पडत नव्हतं....

रस्त्याच्या एकांगी नदीच्या तीराला बेश्रमाचे वाढलेले झाडं त्याला आलेले आकाशी निळसर फुलामुळे जीव खालीवर होत होता. कारण ते दिसायला खूप भयावह अन् काळजाला धडकी भरवणार होतं,अश्यातूनही वाट काढत महादेवाच्या मंदिरासमोर नदी थडीवर नदीत जाणाऱ्या पायऱ्यावर घटकाभर बसून राहिलो...

का बसलो..?, कश्यासाठी बसलो..? काय भेटलं बसून..? याला उत्तरे नव्हते,फक्त मनाला विरंगुळा अन् एकांतात काही काळ समाधी लागेल म्हणुन बसून राहिलो होतो...
समाधी लागणे काही माझ्या हातचे नव्हते,कारण मनात चालू असलेल्या असंख्य अडचणी,त्यांनी केलेली प्रश्न,त्यांना दिलेली उत्तरे अन् अजुन भूतकाळ,वर्तमान काळ अन् सोबतच खायला उठलेला भविष्यकाळ.बाकी प्रश्न,प्रश्न,उत्तरे,मनाची खोटी समज अन् हजारो हालचाली एका ठिकाणी राहून संपूर्ण विश्वात भटकून येण्याची भावना...

कितीवेळ डबक्यारुपी झालेल्या नदीला न्याहाळत राहणं,झाडांच्या आत चिमण्यांचे चिवचिव करून भुर..! करून उडून जाणे.
नदीच्या एकांगाला असलेला देवीआईचा आसराचा फाटका तुटक्या काटकीचा संसार,दुसरीकडे देवीला वाहिलेली चोळी,बांगडी अन् चिखलात मुरलेले बोळके,बाळके आसराईच्या वरल्या अंगाला असलेल्या बोडक्या बाभळीला नवसाचे बांधलेले चिंदके अन् साडीचे काठ फाडून बांधलेली पिसं...

आसऱ्याचे बोणे फेडायला आलेली नुकतीच तरुणपणात येणारी लेक,डोक्यावरचा पदर सावरत तिला घेऊन येणारी माय,अन् नदीच्या डबक्यात तरुणपणात आलेल्या लेकीचे जावळे आसऱ्याआईला दाखवून तिने डबक्यात सोडून दिले अन् तिच्या भानावलेल्या नजरेत नकळत माझी नजर गुंतून जाणे...
एकीकडे तरणीभांड लेकीच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना अन् एकीकडे आजच्या वर्तमान काळाला घेऊन मला उज्वल भविष्याची चिंता...

डब्ब्यात असलेल्या दही भाताला जसं आईनं त्या लेकिवरून उतरवून फेकावे,तसं बोडक्या बाभळीवर असलेले कावळे कावकाव करून उडून जावे अन् लेकीला कावळा शिवावा तसा कावळा आसऱ्याआई जवळून भुरकन आसमंतात काळानिळा होत,आकाशी होवून गुडूप होवुन जावा...

आसऱ्याआई मायलेकीला सुटका देऊ करते ही भावना अन् उद्या तरण्या लेकीच्या पोटी येणारं लेकरू पुन्हा आसऱ्याआईचे पाय पडायला घेऊन येईल मायची आसऱ्याआईला हाक,(वचन) हे चक्र असच चालत राहणार...

आज मी आहे,उद्या दुसरा कुणी नदी तीरावर या क्षणांना न्याहाळत राहणार.उद्या तरणी लेक आई होवुन येणार,तिच्या लेकीला घेऊन तिची आई कुठं असेन याचा ठाव नाय अन् माझं काय मला आत्ताच भविष्याची चिंता...
मग काय सगळं सारखच आहे,फक्त कुठे कारण बदलून ती चिंता नाहीशी केली जात आहे फक्त चिंते पल्याड श्रद्धा असेल इतकचं..

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...