मुख्य सामग्रीवर वगळा

आसऱ्या आई अन् तरणी लेक..!

आसऱ्या आई अन् तरणी लेक..!



सकाळ सरली दहाच्या ठोक्याला पावले झाडांच्या पडसावलीत तापलेल्या जमिनीवर सावरत सावलीच्या आधारे नदीच्या वाटेनं चालत होती.दहा मिनटे झाले,वीस झाले,बारा वाजले तरीही पावलं चालत होती,रस्त्यानं अधुनमधून गुलमोहराच्या फुलांच्या सड्याखेरिच काहीही नजरी पडत नव्हतं....

रस्त्याच्या एकांगी नदीच्या तीराला बेश्रमाचे वाढलेले झाडं त्याला आलेले आकाशी निळसर फुलामुळे जीव खालीवर होत होता. कारण ते दिसायला खूप भयावह अन् काळजाला धडकी भरवणार होतं,अश्यातूनही वाट काढत महादेवाच्या मंदिरासमोर नदी थडीवर नदीत जाणाऱ्या पायऱ्यावर घटकाभर बसून राहिलो...

का बसलो..?, कश्यासाठी बसलो..? काय भेटलं बसून..? याला उत्तरे नव्हते,फक्त मनाला विरंगुळा अन् एकांतात काही काळ समाधी लागेल म्हणुन बसून राहिलो होतो...
समाधी लागणे काही माझ्या हातचे नव्हते,कारण मनात चालू असलेल्या असंख्य अडचणी,त्यांनी केलेली प्रश्न,त्यांना दिलेली उत्तरे अन् अजुन भूतकाळ,वर्तमान काळ अन् सोबतच खायला उठलेला भविष्यकाळ.बाकी प्रश्न,प्रश्न,उत्तरे,मनाची खोटी समज अन् हजारो हालचाली एका ठिकाणी राहून संपूर्ण विश्वात भटकून येण्याची भावना...

कितीवेळ डबक्यारुपी झालेल्या नदीला न्याहाळत राहणं,झाडांच्या आत चिमण्यांचे चिवचिव करून भुर..! करून उडून जाणे.
नदीच्या एकांगाला असलेला देवीआईचा आसराचा फाटका तुटक्या काटकीचा संसार,दुसरीकडे देवीला वाहिलेली चोळी,बांगडी अन् चिखलात मुरलेले बोळके,बाळके आसराईच्या वरल्या अंगाला असलेल्या बोडक्या बाभळीला नवसाचे बांधलेले चिंदके अन् साडीचे काठ फाडून बांधलेली पिसं...

आसऱ्याचे बोणे फेडायला आलेली नुकतीच तरुणपणात येणारी लेक,डोक्यावरचा पदर सावरत तिला घेऊन येणारी माय,अन् नदीच्या डबक्यात तरुणपणात आलेल्या लेकीचे जावळे आसऱ्याआईला दाखवून तिने डबक्यात सोडून दिले अन् तिच्या भानावलेल्या नजरेत नकळत माझी नजर गुंतून जाणे...
एकीकडे तरणीभांड लेकीच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना अन् एकीकडे आजच्या वर्तमान काळाला घेऊन मला उज्वल भविष्याची चिंता...

डब्ब्यात असलेल्या दही भाताला जसं आईनं त्या लेकिवरून उतरवून फेकावे,तसं बोडक्या बाभळीवर असलेले कावळे कावकाव करून उडून जावे अन् लेकीला कावळा शिवावा तसा कावळा आसऱ्याआई जवळून भुरकन आसमंतात काळानिळा होत,आकाशी होवून गुडूप होवुन जावा...

आसऱ्याआई मायलेकीला सुटका देऊ करते ही भावना अन् उद्या तरण्या लेकीच्या पोटी येणारं लेकरू पुन्हा आसऱ्याआईचे पाय पडायला घेऊन येईल मायची आसऱ्याआईला हाक,(वचन) हे चक्र असच चालत राहणार...

आज मी आहे,उद्या दुसरा कुणी नदी तीरावर या क्षणांना न्याहाळत राहणार.उद्या तरणी लेक आई होवुन येणार,तिच्या लेकीला घेऊन तिची आई कुठं असेन याचा ठाव नाय अन् माझं काय मला आत्ताच भविष्याची चिंता...
मग काय सगळं सारखच आहे,फक्त कुठे कारण बदलून ती चिंता नाहीशी केली जात आहे फक्त चिंते पल्याड श्रद्धा असेल इतकचं..

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड