मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याची गणितं..!

आयुष्याची गणितं..!


सांज सरली सूर्य अस्ताला गेला अन् माझी सायंकाळी घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात,टेकडीच्या रानात फिरण्याची वेळही संपली तसा मी परतीच्या वाटेला लागलो...
सध्या अलिकडच्या काळात आयुष्यात काही फार घडत नाहीये,येणारा प्रत्येक दिवस सारखा आहे.हे किती दिवस अजुन असे चालणार आहे याचंही उत्तर नाहीये माझ्याकडे,म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याच्या माझ्या या अवस्थेला आणि सोबतच पडणाऱ्या प्रश्नांना कुठलीच उत्तरे नाहीये...

मी काय करतोय..?
मला काय करायचं आहे..?
मी कश्यासाठी जगतोय..?
अन् या सर्वांशी लागून असलेला अन् सर्वात छळनारा प्रश्न हा आहे की,
मला भविष्यात काय करायचं आहे..?
सोबतच मी कुठल्या भरवश्यावर भविष्याकडे अन् आयुष्याच्या पुढील स्थिर काळाकडे बघतो..?

तर असे अन् अनेक प्रश्न हल्ली मनात मनाकडून येत असतात.मग त्याला बुडत्याला काडीचा आधार म्हणतो तसं मनचेच ठरलेले उत्तरं,ज्यातून फक्त क्षणिक समाधान मिळत असते.परंतु सध्या मनाला इतर चुकीच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी हे ही नसे थोडके...
असो माझं चालायचंच....

तर नेहमीप्रमाणे मी परतीच्या वाटेवर चालत होतो,लिखाणात क्षण साधायला जमत असल्याकारणाने अलिकडे माझी नजर सतत काहीतरी शोधत असते,ज्यावर मी काहीतरी लिहू शकेल.
कित्येकदा मनात खूप काही येऊन कागदावर उतरवन्यापूर्वी मी ते विसरून जातो,पण कधी काही क्षण आपल्या आपण जगत असलेल्या क्षणांवरती,परिस्थितीशी मिळते जुळते अन् घाव घालणारे ठरतात...

त्यामुळे कधी कधी लिखाणात ते क्षण साधायला जमणे हे फार दुःखाचं वाटतं....

तर मी माझ्या वाटेनं चाललो होतो,माझ्या सारखी तरुण मुलं मैदानात व्हॉलीबॉल,फुटबॉल,क्रिकेट खेळत होती,काही तरुण जोडपी,तरुण,तरुणी एव्हॅनिंग वॉकसाठी ट्रेकवरती झपझप चालत होती,एरवी माझी Exercise झाली अन् मी हळुवार चालत हे सर्व दृश्य न्याहाळत होतो...

तितक्यात दोन लहानगे ट्रेकवरती पळताना दिसले,साधारण चार- पाच वर्षांची असावी गोड,चुणचुणीत मस्त नाईट टी शर्ट,पँट, शूज घातलेली ती मुलं मी दुरूनच न्याहाळत होतो.आता दोघांमध्ये शर्यत लागलेली एका ठराविक अंतरपर्यंत सर्वात आदी कोण जाते,दोघेही पळू लागले अन् त्यातील एकजण म्हंटला की बस मी आता थकलो,उर्वरित शर्यत उद्या अन् दोघेही धापा टाकत जवळच असलेल्या बेंचवरती जावून बसली....

बस इतकचं मी बघितलं अन् डोक्यात विचारांची तिडीक सुरू झाली अन् मग समोर बघितलेले हे क्षण लिखाणात कसे साजरे होतात आणि डोक्याला कसे विचार करायला भाग पाडतात याची प्रचिती येते.मग ऐन तारुण्यात असा आलेला थकवा अन् आयुष्याची घडी बसवताना आजचे क्षण उद्यावर ढकलता येतात का..?
ते शक्य होते का..?
होणारी फरफट अन् वेळोवेळी चुकीचे होणारे निर्णय यांना सावरता येतं का..?
असे प्रश्न डोळ्याला समोर दिसू लागतात अन् मनाला विचारांचा नकोसा वाटणारा तो क्षण....

खूपवेळा वाटतं की थकलो आहे आता पण तारुण्याच्या उंबरठ्यावर अन् या जीवनाच्या शर्यतीत थांबता येणं शक्य नाहीये,सोबतच काही क्षण विश्रांतीही नकोय....
आयुष्य स्थिर होण्यापर्यंत मन स्थिर ठेवायचं आहे अन् अजुन खूप काही....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...