मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याची गणितं..!

आयुष्याची गणितं..!


सांज सरली सूर्य अस्ताला गेला अन् माझी सायंकाळी घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात,टेकडीच्या रानात फिरण्याची वेळही संपली तसा मी परतीच्या वाटेला लागलो...
सध्या अलिकडच्या काळात आयुष्यात काही फार घडत नाहीये,येणारा प्रत्येक दिवस सारखा आहे.हे किती दिवस अजुन असे चालणार आहे याचंही उत्तर नाहीये माझ्याकडे,म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याच्या माझ्या या अवस्थेला आणि सोबतच पडणाऱ्या प्रश्नांना कुठलीच उत्तरे नाहीये...

मी काय करतोय..?
मला काय करायचं आहे..?
मी कश्यासाठी जगतोय..?
अन् या सर्वांशी लागून असलेला अन् सर्वात छळनारा प्रश्न हा आहे की,
मला भविष्यात काय करायचं आहे..?
सोबतच मी कुठल्या भरवश्यावर भविष्याकडे अन् आयुष्याच्या पुढील स्थिर काळाकडे बघतो..?

तर असे अन् अनेक प्रश्न हल्ली मनात मनाकडून येत असतात.मग त्याला बुडत्याला काडीचा आधार म्हणतो तसं मनचेच ठरलेले उत्तरं,ज्यातून फक्त क्षणिक समाधान मिळत असते.परंतु सध्या मनाला इतर चुकीच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी हे ही नसे थोडके...
असो माझं चालायचंच....

तर नेहमीप्रमाणे मी परतीच्या वाटेवर चालत होतो,लिखाणात क्षण साधायला जमत असल्याकारणाने अलिकडे माझी नजर सतत काहीतरी शोधत असते,ज्यावर मी काहीतरी लिहू शकेल.
कित्येकदा मनात खूप काही येऊन कागदावर उतरवन्यापूर्वी मी ते विसरून जातो,पण कधी काही क्षण आपल्या आपण जगत असलेल्या क्षणांवरती,परिस्थितीशी मिळते जुळते अन् घाव घालणारे ठरतात...

त्यामुळे कधी कधी लिखाणात ते क्षण साधायला जमणे हे फार दुःखाचं वाटतं....

तर मी माझ्या वाटेनं चाललो होतो,माझ्या सारखी तरुण मुलं मैदानात व्हॉलीबॉल,फुटबॉल,क्रिकेट खेळत होती,काही तरुण जोडपी,तरुण,तरुणी एव्हॅनिंग वॉकसाठी ट्रेकवरती झपझप चालत होती,एरवी माझी Exercise झाली अन् मी हळुवार चालत हे सर्व दृश्य न्याहाळत होतो...

तितक्यात दोन लहानगे ट्रेकवरती पळताना दिसले,साधारण चार- पाच वर्षांची असावी गोड,चुणचुणीत मस्त नाईट टी शर्ट,पँट, शूज घातलेली ती मुलं मी दुरूनच न्याहाळत होतो.आता दोघांमध्ये शर्यत लागलेली एका ठराविक अंतरपर्यंत सर्वात आदी कोण जाते,दोघेही पळू लागले अन् त्यातील एकजण म्हंटला की बस मी आता थकलो,उर्वरित शर्यत उद्या अन् दोघेही धापा टाकत जवळच असलेल्या बेंचवरती जावून बसली....

बस इतकचं मी बघितलं अन् डोक्यात विचारांची तिडीक सुरू झाली अन् मग समोर बघितलेले हे क्षण लिखाणात कसे साजरे होतात आणि डोक्याला कसे विचार करायला भाग पाडतात याची प्रचिती येते.मग ऐन तारुण्यात असा आलेला थकवा अन् आयुष्याची घडी बसवताना आजचे क्षण उद्यावर ढकलता येतात का..?
ते शक्य होते का..?
होणारी फरफट अन् वेळोवेळी चुकीचे होणारे निर्णय यांना सावरता येतं का..?
असे प्रश्न डोळ्याला समोर दिसू लागतात अन् मनाला विचारांचा नकोसा वाटणारा तो क्षण....

खूपवेळा वाटतं की थकलो आहे आता पण तारुण्याच्या उंबरठ्यावर अन् या जीवनाच्या शर्यतीत थांबता येणं शक्य नाहीये,सोबतच काही क्षण विश्रांतीही नकोय....
आयुष्य स्थिर होण्यापर्यंत मन स्थिर ठेवायचं आहे अन् अजुन खूप काही....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...