मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याची गणितं..!

आयुष्याची गणितं..!


सांज सरली सूर्य अस्ताला गेला अन् माझी सायंकाळी घरासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात,टेकडीच्या रानात फिरण्याची वेळही संपली तसा मी परतीच्या वाटेला लागलो...
सध्या अलिकडच्या काळात आयुष्यात काही फार घडत नाहीये,येणारा प्रत्येक दिवस सारखा आहे.हे किती दिवस अजुन असे चालणार आहे याचंही उत्तर नाहीये माझ्याकडे,म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सध्याच्या माझ्या या अवस्थेला आणि सोबतच पडणाऱ्या प्रश्नांना कुठलीच उत्तरे नाहीये...

मी काय करतोय..?
मला काय करायचं आहे..?
मी कश्यासाठी जगतोय..?
अन् या सर्वांशी लागून असलेला अन् सर्वात छळनारा प्रश्न हा आहे की,
मला भविष्यात काय करायचं आहे..?
सोबतच मी कुठल्या भरवश्यावर भविष्याकडे अन् आयुष्याच्या पुढील स्थिर काळाकडे बघतो..?

तर असे अन् अनेक प्रश्न हल्ली मनात मनाकडून येत असतात.मग त्याला बुडत्याला काडीचा आधार म्हणतो तसं मनचेच ठरलेले उत्तरं,ज्यातून फक्त क्षणिक समाधान मिळत असते.परंतु सध्या मनाला इतर चुकीच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी हे ही नसे थोडके...
असो माझं चालायचंच....

तर नेहमीप्रमाणे मी परतीच्या वाटेवर चालत होतो,लिखाणात क्षण साधायला जमत असल्याकारणाने अलिकडे माझी नजर सतत काहीतरी शोधत असते,ज्यावर मी काहीतरी लिहू शकेल.
कित्येकदा मनात खूप काही येऊन कागदावर उतरवन्यापूर्वी मी ते विसरून जातो,पण कधी काही क्षण आपल्या आपण जगत असलेल्या क्षणांवरती,परिस्थितीशी मिळते जुळते अन् घाव घालणारे ठरतात...

त्यामुळे कधी कधी लिखाणात ते क्षण साधायला जमणे हे फार दुःखाचं वाटतं....

तर मी माझ्या वाटेनं चाललो होतो,माझ्या सारखी तरुण मुलं मैदानात व्हॉलीबॉल,फुटबॉल,क्रिकेट खेळत होती,काही तरुण जोडपी,तरुण,तरुणी एव्हॅनिंग वॉकसाठी ट्रेकवरती झपझप चालत होती,एरवी माझी Exercise झाली अन् मी हळुवार चालत हे सर्व दृश्य न्याहाळत होतो...

तितक्यात दोन लहानगे ट्रेकवरती पळताना दिसले,साधारण चार- पाच वर्षांची असावी गोड,चुणचुणीत मस्त नाईट टी शर्ट,पँट, शूज घातलेली ती मुलं मी दुरूनच न्याहाळत होतो.आता दोघांमध्ये शर्यत लागलेली एका ठराविक अंतरपर्यंत सर्वात आदी कोण जाते,दोघेही पळू लागले अन् त्यातील एकजण म्हंटला की बस मी आता थकलो,उर्वरित शर्यत उद्या अन् दोघेही धापा टाकत जवळच असलेल्या बेंचवरती जावून बसली....

बस इतकचं मी बघितलं अन् डोक्यात विचारांची तिडीक सुरू झाली अन् मग समोर बघितलेले हे क्षण लिखाणात कसे साजरे होतात आणि डोक्याला कसे विचार करायला भाग पाडतात याची प्रचिती येते.मग ऐन तारुण्यात असा आलेला थकवा अन् आयुष्याची घडी बसवताना आजचे क्षण उद्यावर ढकलता येतात का..?
ते शक्य होते का..?
होणारी फरफट अन् वेळोवेळी चुकीचे होणारे निर्णय यांना सावरता येतं का..?
असे प्रश्न डोळ्याला समोर दिसू लागतात अन् मनाला विचारांचा नकोसा वाटणारा तो क्षण....

खूपवेळा वाटतं की थकलो आहे आता पण तारुण्याच्या उंबरठ्यावर अन् या जीवनाच्या शर्यतीत थांबता येणं शक्य नाहीये,सोबतच काही क्षण विश्रांतीही नकोय....
आयुष्य स्थिर होण्यापर्यंत मन स्थिर ठेवायचं आहे अन् अजुन खूप काही....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड