मुख्य सामग्रीवर वगळा

"गाफील"

गाफील..!

मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य हा प्रकार आहे,यात बऱ्यापैकी लेखन अनेक लेखकांनी केलेलं आहे.जे कल्पनेतून आपल्याला वास्तव जीवनाकडे घेऊन जाते किंवा वास्तव जीवन कसे जगावे हे शिकवते तर कधी हेच कल्पित साहित्य आपलं अनुकरण करते....

मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य या प्रकारात बऱ्यापैकी लेखन केलेले "सुहास शिरवळकर" यांचे "गाफील" हे पुस्तक काल वाचले.एकूण "२९१" पानांचे असलेले हे पुस्तक आपल्याला पुस्तकाचा नायक फिरोजसोबत अनेक वळणांवर फिरून आणते...
"सुहास शिरवळकर" यांनी कल्पित साहित्य प्रकारात लिहलेले हे खूप उंचीचे अन् प्रत्येकाने "सुहास शिरवळकर" यांचे समग्र साहित्य वाचताना आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे जे की आपण एकदा पुस्तक वाचायला घेतले की शेवटपर्यंत बसल्याजागी बसून ठेवते...


फिरोज इराणी नावाचं पात्र किंवा या पुस्तकाचा नायक या पुस्तकातील तीन कथा किंवा त्यांच्या आयुष्यात नसत्या लफड्यात पडल्यामुळे आलेली ही तीन वळणे आहे,जी प्रत्येकवेळा पुस्तकाच्या नावाप्रमाणे "गाफील" राहिल्यामुळे नेहमीच झालेली त्याची फसगत आणि सगळं जीवावर आलं तरी त्यातून सहीसलामत आणि मालामाल होऊन बाहेर पडणारा असा हा फिरोज...!

 सुशिंचं कुठलेही पुस्तक वाचतांना एक बाब लक्षात येते की,पुस्तकातील कुठलाही प्रसंग ते इतक्या सुंदर पद्धतीने शब्दबद्ध करतात की तो प्रसंग अक्षरशः डोळ्यांसमोर घडतो आहे असे वाटायला लागते आणि त्यामुळेच त्यांचे पुस्तक वाचतांना अजुनच खूप छान वाटते... 

अमर विश्वास सारखा वकील त्यातून कोर्टाच दर्शन आम्हाला सुशिंनी दाखवलं,सोबतच दारा बुलंदसारखं पात्र रेखाटून त्यांनी राजस्थानचं जे चित्रण केलंय ते त्यांच्या कल्पनाशक्तीची उंची दाखवतं.मुंबई मधील काही रहिवासी भागांचे केलेलं वर्णन तर हुबेहूब माझ्या कल्पनेशी इतकं मिळतं जुळते आहे की अगदी आपण ते सर्व ठिकाण बघितले अन् हा सर्व प्रसंग अनुभवला आहे असे काही क्षण वाटते.

निखळ साधं तत्वज्ञान असो,समाजाचं भयानक रूप असो किंवा प्रेम,रोमांच,वेश्या वसाहतीचे केलेलं वर्णन,उल्लेख,शेवटपर्यत न संपणारा थरार,वासना,सूड या भावना कथेतून मांडण्याची त्यांची लकब अगदी लाजवाब म्हणावी अशीच आहे. 

खरेतर माझ्या आयुष्यात सू.शि. जरा उशीराच आले पण त्यांनी लिहलेले पुस्तके अन् ते वाचताना येणारी मज्जा आजही अनुभवयाला येते."समांतर" असो किंवा "गाफील" एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे ही पुस्तके आहे,लवकरच समग्र सू.शि. वाचून पूर्ण करायचं आहे.
कारण प्रत्येक पुस्तकात पुढे काय होईल आणि हे पुस्तक त्या पुस्तकापेक्षा छान असेल याची जाणीव होत असतेच....

Written by
Bharat sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड