मुख्य सामग्रीवर वगळा

"गाफील"

गाफील..!

मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य हा प्रकार आहे,यात बऱ्यापैकी लेखन अनेक लेखकांनी केलेलं आहे.जे कल्पनेतून आपल्याला वास्तव जीवनाकडे घेऊन जाते किंवा वास्तव जीवन कसे जगावे हे शिकवते तर कधी हेच कल्पित साहित्य आपलं अनुकरण करते....

मराठी साहित्य विश्वात कल्पित साहित्य या प्रकारात बऱ्यापैकी लेखन केलेले "सुहास शिरवळकर" यांचे "गाफील" हे पुस्तक काल वाचले.एकूण "२९१" पानांचे असलेले हे पुस्तक आपल्याला पुस्तकाचा नायक फिरोजसोबत अनेक वळणांवर फिरून आणते...
"सुहास शिरवळकर" यांनी कल्पित साहित्य प्रकारात लिहलेले हे खूप उंचीचे अन् प्रत्येकाने "सुहास शिरवळकर" यांचे समग्र साहित्य वाचताना आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे जे की आपण एकदा पुस्तक वाचायला घेतले की शेवटपर्यंत बसल्याजागी बसून ठेवते...


फिरोज इराणी नावाचं पात्र किंवा या पुस्तकाचा नायक या पुस्तकातील तीन कथा किंवा त्यांच्या आयुष्यात नसत्या लफड्यात पडल्यामुळे आलेली ही तीन वळणे आहे,जी प्रत्येकवेळा पुस्तकाच्या नावाप्रमाणे "गाफील" राहिल्यामुळे नेहमीच झालेली त्याची फसगत आणि सगळं जीवावर आलं तरी त्यातून सहीसलामत आणि मालामाल होऊन बाहेर पडणारा असा हा फिरोज...!

 सुशिंचं कुठलेही पुस्तक वाचतांना एक बाब लक्षात येते की,पुस्तकातील कुठलाही प्रसंग ते इतक्या सुंदर पद्धतीने शब्दबद्ध करतात की तो प्रसंग अक्षरशः डोळ्यांसमोर घडतो आहे असे वाटायला लागते आणि त्यामुळेच त्यांचे पुस्तक वाचतांना अजुनच खूप छान वाटते... 

अमर विश्वास सारखा वकील त्यातून कोर्टाच दर्शन आम्हाला सुशिंनी दाखवलं,सोबतच दारा बुलंदसारखं पात्र रेखाटून त्यांनी राजस्थानचं जे चित्रण केलंय ते त्यांच्या कल्पनाशक्तीची उंची दाखवतं.मुंबई मधील काही रहिवासी भागांचे केलेलं वर्णन तर हुबेहूब माझ्या कल्पनेशी इतकं मिळतं जुळते आहे की अगदी आपण ते सर्व ठिकाण बघितले अन् हा सर्व प्रसंग अनुभवला आहे असे काही क्षण वाटते.

निखळ साधं तत्वज्ञान असो,समाजाचं भयानक रूप असो किंवा प्रेम,रोमांच,वेश्या वसाहतीचे केलेलं वर्णन,उल्लेख,शेवटपर्यत न संपणारा थरार,वासना,सूड या भावना कथेतून मांडण्याची त्यांची लकब अगदी लाजवाब म्हणावी अशीच आहे. 

खरेतर माझ्या आयुष्यात सू.शि. जरा उशीराच आले पण त्यांनी लिहलेले पुस्तके अन् ते वाचताना येणारी मज्जा आजही अनुभवयाला येते."समांतर" असो किंवा "गाफील" एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे ही पुस्तके आहे,लवकरच समग्र सू.शि. वाचून पूर्ण करायचं आहे.
कारण प्रत्येक पुस्तकात पुढे काय होईल आणि हे पुस्तक त्या पुस्तकापेक्षा छान असेल याची जाणीव होत असतेच....

Written by
Bharat sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...