मुख्य सामग्रीवर वगळा

गिरगांव भोंगे..!

गिरगांव भोंगे..!

#गिरगांवभोंगे...

मी ऐकलं होतं की एक काळ होत जेव्हा मुंबईत घड्याळी नव्हत्या,तेव्हा मुंबई घड्याळाच्या ठोक्यावर न चालता गिरगावचा वसाहतीमध्ये असलेल्या गिरण्यावर असलेल्या भोंग्यावर चालायची.गिरगावच्या अन् आसपासच्या परिसरातील सर्व गिरण्या हळू हळू बंद पडल्या अन् हा परिसर खुप भकास,भयानक भासू लागला.

बंद पडलेल्या गिरण्यांचा परिसर इतका भकास जाणवू लागला की,रातच्याला इकडे कुत्रेही भटकायला येईना झालं जे एखादं आलं ते रातभर इवळून पार मरायला यायचं.बंद पडलेल्या गिरण्या अन् त्याचे मोठमोठाले गोडावून तर काळाच्या आड आपलाही एक काळ होता याची हजेरी देत,भिंतींच्या पोपड्यासंगत स्वराज्याचा बुरुज ढासळला जावा तश्या या इतिहासाच्या खुणा मागे सोडत पडत राहिल्या...

पुढे याच गिरण्या अनेक कारणांनी चर्चेत राहिल्या,कधीतरी कुणाचा रातोरात त्यांच्या गर्भात एखाद्या अर्भकाला मारून टाकावं तसं भोसकून मारून टाकलं गेलं अन् गिणती करता येणार नाही अशे कित्येक चेहरे ईथल्या चुप्या नशेच्या आहारी जावून आपल्याच हाताने पोटात खंजीर खुपसून काचेच्या तसबीरित जावून बसले.आता खरं काय,खोटं काय कित्येक गरिबांच्या कित्येक श्रीमंत लोकांनी इथे माना मुर्गळल्या...

कधी काय तर कधी काय,एक दिवस मग अशीच ती श्रीदेवी सुद्धा आपसूक आपल्यातून निघून गेली अन् त्या दिवशी म्हणे अख्या मुंबईत एकच गाणं ऐकू येत होतं, "कशी काळाची चाहुल आली बाग सुखाची करपून गेली"...
पण हे ही त्या चाकरमाण्याना मान्य नव्हते,कारण त्यांना हे सर्व सवयीचे झाले होते जेव्हा गिरगाव अन् आसपास असलेल्या गिरण्या अश्या एकाकी बंद पडू लागल्या होत्या....

गिरण्या बंद झाल्या,भोंगे बंद झाले,पण मुंबई चालू राहिली,घड्याळ तिचं काम करत राहिली अन् काटे फिरत राहिले या काट्यांनी मात्र लोकांना हेरले अन् आता याच काट्यांसोबत मुंबईची पब्लिक सुध्दा चालू लागली...
सगळं मागे पडलं मुंबईची ती पब्लिक,सुतगिरणी,गिरगाव,भोंगे पण घड्याळ मात्र वेळेला जागुन चालत आहे,चालत राहिल...

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...