मुख्य सामग्रीवर वगळा

गिरगांव भोंगे..!

गिरगांव भोंगे..!

#गिरगांवभोंगे...

मी ऐकलं होतं की एक काळ होत जेव्हा मुंबईत घड्याळी नव्हत्या,तेव्हा मुंबई घड्याळाच्या ठोक्यावर न चालता गिरगावचा वसाहतीमध्ये असलेल्या गिरण्यावर असलेल्या भोंग्यावर चालायची.गिरगावच्या अन् आसपासच्या परिसरातील सर्व गिरण्या हळू हळू बंद पडल्या अन् हा परिसर खुप भकास,भयानक भासू लागला.

बंद पडलेल्या गिरण्यांचा परिसर इतका भकास जाणवू लागला की,रातच्याला इकडे कुत्रेही भटकायला येईना झालं जे एखादं आलं ते रातभर इवळून पार मरायला यायचं.बंद पडलेल्या गिरण्या अन् त्याचे मोठमोठाले गोडावून तर काळाच्या आड आपलाही एक काळ होता याची हजेरी देत,भिंतींच्या पोपड्यासंगत स्वराज्याचा बुरुज ढासळला जावा तश्या या इतिहासाच्या खुणा मागे सोडत पडत राहिल्या...

पुढे याच गिरण्या अनेक कारणांनी चर्चेत राहिल्या,कधीतरी कुणाचा रातोरात त्यांच्या गर्भात एखाद्या अर्भकाला मारून टाकावं तसं भोसकून मारून टाकलं गेलं अन् गिणती करता येणार नाही अशे कित्येक चेहरे ईथल्या चुप्या नशेच्या आहारी जावून आपल्याच हाताने पोटात खंजीर खुपसून काचेच्या तसबीरित जावून बसले.आता खरं काय,खोटं काय कित्येक गरिबांच्या कित्येक श्रीमंत लोकांनी इथे माना मुर्गळल्या...

कधी काय तर कधी काय,एक दिवस मग अशीच ती श्रीदेवी सुद्धा आपसूक आपल्यातून निघून गेली अन् त्या दिवशी म्हणे अख्या मुंबईत एकच गाणं ऐकू येत होतं, "कशी काळाची चाहुल आली बाग सुखाची करपून गेली"...
पण हे ही त्या चाकरमाण्याना मान्य नव्हते,कारण त्यांना हे सर्व सवयीचे झाले होते जेव्हा गिरगाव अन् आसपास असलेल्या गिरण्या अश्या एकाकी बंद पडू लागल्या होत्या....

गिरण्या बंद झाल्या,भोंगे बंद झाले,पण मुंबई चालू राहिली,घड्याळ तिचं काम करत राहिली अन् काटे फिरत राहिले या काट्यांनी मात्र लोकांना हेरले अन् आता याच काट्यांसोबत मुंबईची पब्लिक सुध्दा चालू लागली...
सगळं मागे पडलं मुंबईची ती पब्लिक,सुतगिरणी,गिरगाव,भोंगे पण घड्याळ मात्र वेळेला जागुन चालत आहे,चालत राहिल...

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...