मुख्य सामग्रीवर वगळा

गिरगांव भोंगे..!

गिरगांव भोंगे..!

#गिरगांवभोंगे...

मी ऐकलं होतं की एक काळ होत जेव्हा मुंबईत घड्याळी नव्हत्या,तेव्हा मुंबई घड्याळाच्या ठोक्यावर न चालता गिरगावचा वसाहतीमध्ये असलेल्या गिरण्यावर असलेल्या भोंग्यावर चालायची.गिरगावच्या अन् आसपासच्या परिसरातील सर्व गिरण्या हळू हळू बंद पडल्या अन् हा परिसर खुप भकास,भयानक भासू लागला.

बंद पडलेल्या गिरण्यांचा परिसर इतका भकास जाणवू लागला की,रातच्याला इकडे कुत्रेही भटकायला येईना झालं जे एखादं आलं ते रातभर इवळून पार मरायला यायचं.बंद पडलेल्या गिरण्या अन् त्याचे मोठमोठाले गोडावून तर काळाच्या आड आपलाही एक काळ होता याची हजेरी देत,भिंतींच्या पोपड्यासंगत स्वराज्याचा बुरुज ढासळला जावा तश्या या इतिहासाच्या खुणा मागे सोडत पडत राहिल्या...

पुढे याच गिरण्या अनेक कारणांनी चर्चेत राहिल्या,कधीतरी कुणाचा रातोरात त्यांच्या गर्भात एखाद्या अर्भकाला मारून टाकावं तसं भोसकून मारून टाकलं गेलं अन् गिणती करता येणार नाही अशे कित्येक चेहरे ईथल्या चुप्या नशेच्या आहारी जावून आपल्याच हाताने पोटात खंजीर खुपसून काचेच्या तसबीरित जावून बसले.आता खरं काय,खोटं काय कित्येक गरिबांच्या कित्येक श्रीमंत लोकांनी इथे माना मुर्गळल्या...

कधी काय तर कधी काय,एक दिवस मग अशीच ती श्रीदेवी सुद्धा आपसूक आपल्यातून निघून गेली अन् त्या दिवशी म्हणे अख्या मुंबईत एकच गाणं ऐकू येत होतं, "कशी काळाची चाहुल आली बाग सुखाची करपून गेली"...
पण हे ही त्या चाकरमाण्याना मान्य नव्हते,कारण त्यांना हे सर्व सवयीचे झाले होते जेव्हा गिरगाव अन् आसपास असलेल्या गिरण्या अश्या एकाकी बंद पडू लागल्या होत्या....

गिरण्या बंद झाल्या,भोंगे बंद झाले,पण मुंबई चालू राहिली,घड्याळ तिचं काम करत राहिली अन् काटे फिरत राहिले या काट्यांनी मात्र लोकांना हेरले अन् आता याच काट्यांसोबत मुंबईची पब्लिक सुध्दा चालू लागली...
सगळं मागे पडलं मुंबईची ती पब्लिक,सुतगिरणी,गिरगाव,भोंगे पण घड्याळ मात्र वेळेला जागुन चालत आहे,चालत राहिल...

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...