मुख्य सामग्रीवर वगळा

ईमेल आणि बरच काही..!

ईमेल आणि बरच काही..!


काळाच्या ओघात जश्या काही गोष्टी बदलत,गेल्या काही काळाच्या पडद्याआड गेल्या तसेच...पण विचार केला तर जरासे वेगळं काही अलीकडे आयुष्याच्या या वळणावर घडत आहे. अन् ते साहजिक आहे वयापरत्वे ते घडणार असतेच,फक्त हे कुणाला आपसुकच कळते,तर कुणाला याचा थांगपत्ताही लागत नाही किंवा कुणाच्या आयुष्यात या सर्व गोष्टींची कधी तजवीज भासतच नाही...
                                                   हो नाहीच भासत कारण त्यांचं जीवन आधिकच तितकं सोयीचं असतं की,नाही वाटत कुठलीही कमतरता त्यांना की कुठलीही उणीव आपल्या आयुष्यात....

हो अलिकडे गेले काही महिने वर्षानुवर्ष कधीही न उघडणारा माझा E-Mail आयडी अलिकडे रोजच मी उगडून बघत असतो.एक दोन वेळा नाही तर दिवसातून जेव्हा सवड मिळत असेल तेव्हा मी तो उघडुन बघत असतो. अलिकडे एक एकवेळ फेसबुक वरती येणं होत नाही,Update राहायला जमत नाही,तितकं तिथे मात्र मी न चुकता रोजची आलेली मेल्स चेक करत असतो एक नाही दोन नाही रोजची कित्येक मेल्स असतात....

कधीतरी कुठल्या ठिकाणी जागा निघाल्या आहेत,मग मी जॉब शोधत आहे म्हणुन आलेला मेल असेल तर कधी कॉलेजमध्ये काही काम निघाले तर त्याचा मेल असेल,कधी कुणालातरी एखाद दोन महिन्यापूर्वी नोकरीसाठी मेल्सद्वारे पाठवलेला माझा Resume,शैक्षणिक कागदपत्रं असेल अन् काल परवा तब्बल दोन महिने वाट पाहून आपले सेलेक्शन नाही झालं याचा E-mail आलेला असेल...दुसऱ्याच घटकेला कुठल्याशा नोकरीसाठी पाठवलेला मेल्स अन् माझं जॉबसाठी शोर्टलिस्ट होणं असेल, कुण्या तिसऱ्या ठिकाणी जागा निघाल्या आहे म्हणून कुण्या साहेबांन आठवणीने मला मेल केलेला असेल....

आपण नेहमीच म्हणतो की कुणालाही E-mail केला की त्या समोरच्या व्यक्तीला पुन्हा फोन करून सांगावे लागते की तुम्हाला मेल केलेला आहे चेक करून तुमची प्रतिक्रिया कळवा...
कारण आपल्याला माहीत असते E-mail कोण तरी वेळेवर बघतो,एखाद दुसरा दिवस उजाडला की मग तो कालपर्वाचा शिळा झालेला मेल बघितला जातो.
अलिकडे या बाबतीत मी अपवाद ठरतो आहे,घटकेघटकेला मी मेल्स चेक करत राहत असतो.प्रत्येक मेल सोबत नव्याने अनेक आशा,आकांशा असतात म्हणुन हल्ली मेल्सची वाट बघायला आवडते....

गेल्या काही महिन्यात अवघ्या जगात कुठेकुठे मेल्स पाठवले असतील अन् कुठून कुठून मेल्स आले असतील याला अंदाज नाही पण छान आहे ही मेल्सची दुनिया.कित्येक वेळा आनंदाचे काही क्षण देऊन जाते,कधीतरी दुःख तर,कधी फक्त आशेच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवते....

अलिकडे Trashbox सहज भरून जातो,दिवसातून एखाद दोनवेळा तो रिकामा करावा अगदी अन् कधीतरी काही मेल्स Outbox मध्ये कायमचे पडून राहतात Important असे काही मेल्स येतात पण ते हुलकावणी देऊन जातात....

बघुयात मेल्सच्या या काळात किती दिवस अजुन प्रत्येक गोष्टीसाठी वाट बघायची आहे,सध्यातरी मला मेल्सची दुनिया जवळची वाटते इतर सर्व माध्यमांपेक्षा...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...