मुख्य सामग्रीवर वगळा

ईमेल आणि बरच काही..!

ईमेल आणि बरच काही..!


काळाच्या ओघात जश्या काही गोष्टी बदलत,गेल्या काही काळाच्या पडद्याआड गेल्या तसेच...पण विचार केला तर जरासे वेगळं काही अलीकडे आयुष्याच्या या वळणावर घडत आहे. अन् ते साहजिक आहे वयापरत्वे ते घडणार असतेच,फक्त हे कुणाला आपसुकच कळते,तर कुणाला याचा थांगपत्ताही लागत नाही किंवा कुणाच्या आयुष्यात या सर्व गोष्टींची कधी तजवीज भासतच नाही...
                                                   हो नाहीच भासत कारण त्यांचं जीवन आधिकच तितकं सोयीचं असतं की,नाही वाटत कुठलीही कमतरता त्यांना की कुठलीही उणीव आपल्या आयुष्यात....

हो अलिकडे गेले काही महिने वर्षानुवर्ष कधीही न उघडणारा माझा E-Mail आयडी अलिकडे रोजच मी उगडून बघत असतो.एक दोन वेळा नाही तर दिवसातून जेव्हा सवड मिळत असेल तेव्हा मी तो उघडुन बघत असतो. अलिकडे एक एकवेळ फेसबुक वरती येणं होत नाही,Update राहायला जमत नाही,तितकं तिथे मात्र मी न चुकता रोजची आलेली मेल्स चेक करत असतो एक नाही दोन नाही रोजची कित्येक मेल्स असतात....

कधीतरी कुठल्या ठिकाणी जागा निघाल्या आहेत,मग मी जॉब शोधत आहे म्हणुन आलेला मेल असेल तर कधी कॉलेजमध्ये काही काम निघाले तर त्याचा मेल असेल,कधी कुणालातरी एखाद दोन महिन्यापूर्वी नोकरीसाठी मेल्सद्वारे पाठवलेला माझा Resume,शैक्षणिक कागदपत्रं असेल अन् काल परवा तब्बल दोन महिने वाट पाहून आपले सेलेक्शन नाही झालं याचा E-mail आलेला असेल...दुसऱ्याच घटकेला कुठल्याशा नोकरीसाठी पाठवलेला मेल्स अन् माझं जॉबसाठी शोर्टलिस्ट होणं असेल, कुण्या तिसऱ्या ठिकाणी जागा निघाल्या आहे म्हणून कुण्या साहेबांन आठवणीने मला मेल केलेला असेल....

आपण नेहमीच म्हणतो की कुणालाही E-mail केला की त्या समोरच्या व्यक्तीला पुन्हा फोन करून सांगावे लागते की तुम्हाला मेल केलेला आहे चेक करून तुमची प्रतिक्रिया कळवा...
कारण आपल्याला माहीत असते E-mail कोण तरी वेळेवर बघतो,एखाद दुसरा दिवस उजाडला की मग तो कालपर्वाचा शिळा झालेला मेल बघितला जातो.
अलिकडे या बाबतीत मी अपवाद ठरतो आहे,घटकेघटकेला मी मेल्स चेक करत राहत असतो.प्रत्येक मेल सोबत नव्याने अनेक आशा,आकांशा असतात म्हणुन हल्ली मेल्सची वाट बघायला आवडते....

गेल्या काही महिन्यात अवघ्या जगात कुठेकुठे मेल्स पाठवले असतील अन् कुठून कुठून मेल्स आले असतील याला अंदाज नाही पण छान आहे ही मेल्सची दुनिया.कित्येक वेळा आनंदाचे काही क्षण देऊन जाते,कधीतरी दुःख तर,कधी फक्त आशेच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवते....

अलिकडे Trashbox सहज भरून जातो,दिवसातून एखाद दोनवेळा तो रिकामा करावा अगदी अन् कधीतरी काही मेल्स Outbox मध्ये कायमचे पडून राहतात Important असे काही मेल्स येतात पण ते हुलकावणी देऊन जातात....

बघुयात मेल्सच्या या काळात किती दिवस अजुन प्रत्येक गोष्टीसाठी वाट बघायची आहे,सध्यातरी मला मेल्सची दुनिया जवळची वाटते इतर सर्व माध्यमांपेक्षा...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...