मुख्य सामग्रीवर वगळा

ईमेल आणि बरच काही..!

ईमेल आणि बरच काही..!


काळाच्या ओघात जश्या काही गोष्टी बदलत,गेल्या काही काळाच्या पडद्याआड गेल्या तसेच...पण विचार केला तर जरासे वेगळं काही अलीकडे आयुष्याच्या या वळणावर घडत आहे. अन् ते साहजिक आहे वयापरत्वे ते घडणार असतेच,फक्त हे कुणाला आपसुकच कळते,तर कुणाला याचा थांगपत्ताही लागत नाही किंवा कुणाच्या आयुष्यात या सर्व गोष्टींची कधी तजवीज भासतच नाही...
                                                   हो नाहीच भासत कारण त्यांचं जीवन आधिकच तितकं सोयीचं असतं की,नाही वाटत कुठलीही कमतरता त्यांना की कुठलीही उणीव आपल्या आयुष्यात....

हो अलिकडे गेले काही महिने वर्षानुवर्ष कधीही न उघडणारा माझा E-Mail आयडी अलिकडे रोजच मी उगडून बघत असतो.एक दोन वेळा नाही तर दिवसातून जेव्हा सवड मिळत असेल तेव्हा मी तो उघडुन बघत असतो. अलिकडे एक एकवेळ फेसबुक वरती येणं होत नाही,Update राहायला जमत नाही,तितकं तिथे मात्र मी न चुकता रोजची आलेली मेल्स चेक करत असतो एक नाही दोन नाही रोजची कित्येक मेल्स असतात....

कधीतरी कुठल्या ठिकाणी जागा निघाल्या आहेत,मग मी जॉब शोधत आहे म्हणुन आलेला मेल असेल तर कधी कॉलेजमध्ये काही काम निघाले तर त्याचा मेल असेल,कधी कुणालातरी एखाद दोन महिन्यापूर्वी नोकरीसाठी मेल्सद्वारे पाठवलेला माझा Resume,शैक्षणिक कागदपत्रं असेल अन् काल परवा तब्बल दोन महिने वाट पाहून आपले सेलेक्शन नाही झालं याचा E-mail आलेला असेल...दुसऱ्याच घटकेला कुठल्याशा नोकरीसाठी पाठवलेला मेल्स अन् माझं जॉबसाठी शोर्टलिस्ट होणं असेल, कुण्या तिसऱ्या ठिकाणी जागा निघाल्या आहे म्हणून कुण्या साहेबांन आठवणीने मला मेल केलेला असेल....

आपण नेहमीच म्हणतो की कुणालाही E-mail केला की त्या समोरच्या व्यक्तीला पुन्हा फोन करून सांगावे लागते की तुम्हाला मेल केलेला आहे चेक करून तुमची प्रतिक्रिया कळवा...
कारण आपल्याला माहीत असते E-mail कोण तरी वेळेवर बघतो,एखाद दुसरा दिवस उजाडला की मग तो कालपर्वाचा शिळा झालेला मेल बघितला जातो.
अलिकडे या बाबतीत मी अपवाद ठरतो आहे,घटकेघटकेला मी मेल्स चेक करत राहत असतो.प्रत्येक मेल सोबत नव्याने अनेक आशा,आकांशा असतात म्हणुन हल्ली मेल्सची वाट बघायला आवडते....

गेल्या काही महिन्यात अवघ्या जगात कुठेकुठे मेल्स पाठवले असतील अन् कुठून कुठून मेल्स आले असतील याला अंदाज नाही पण छान आहे ही मेल्सची दुनिया.कित्येक वेळा आनंदाचे काही क्षण देऊन जाते,कधीतरी दुःख तर,कधी फक्त आशेच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवते....

अलिकडे Trashbox सहज भरून जातो,दिवसातून एखाद दोनवेळा तो रिकामा करावा अगदी अन् कधीतरी काही मेल्स Outbox मध्ये कायमचे पडून राहतात Important असे काही मेल्स येतात पण ते हुलकावणी देऊन जातात....

बघुयात मेल्सच्या या काळात किती दिवस अजुन प्रत्येक गोष्टीसाठी वाट बघायची आहे,सध्यातरी मला मेल्सची दुनिया जवळची वाटते इतर सर्व माध्यमांपेक्षा...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड