मुख्य सामग्रीवर वगळा

पाचूचे बेट...

पाचूचे बेट..!


काळ आहे इ.स. १८४१ सालचा युरोपियन लोकांच्या धाडशी समुद्र सफरी ऐन भरात असण्याचा हा काळ.एकदाका जहाज समुद्र सफरीवर निघाले मग काही महिने किंवा वर्ष उलटुन जायचे तरीही समुद्रसफर चालू असायची,परतीची वाट त्यांना तेव्हाच खुणावत असायची जेव्हा आपण परत जाताना काहीतरी चांगला ऐवज घेऊन जावू...
नाहीतर त्यांना हे समुद्रात भटकत राहणे योग्य वाटायचं पण त्यांचा परतीच्या ठिकाणावर,बंदरावर झालेला अपमान त्यांना नकोसा वाटायचा...

तर अश्याच हजारो सफरीं पैकी ही एक सफर,जी संपूर्ण सहा महीने जमिनीला न बघता चालू होती अन् आता "डॉली" नामक जहाजावरील सर्व खलाशी पुन्हा एकदा जमीन बघण्यास आतुर झाले होते.जहाजाचे कॅप्टन काही केल्या जहाजेचा नांगर टाकण्यासाठी तयार नाहीये,अखेर खूप विनवण्या अन जहाजावरील सामान,खाद्य संपल्यामुळे व त्यांच्या इतर कामाच्या वेगळ्या भागामुळे अखेर  नांगर टाकले गेले आणि ते पॉलिनेशियन बेटांवर पोहचले...

अन् मग इथून सुरू होतो तो रंजक प्रवास कादंबरीचा....

एकोणिसाव्या शतकातील न्यूयॉर्क येथील प्रसिद्ध लेखक आणि तनमनाने दर्यावर्दी असलेले "हर्मन मेलव्हिल" यांनी १८४१ मध्ये अमेरिकेतील दक्षिणी समुद्राची सफर केली,या सफरीच्या दुसऱ्या वर्षात ते पॉलिनेशियन बेटांवर पोहोचले.

प्रवासाला आणि त्या जहाजेवरील जीवनाला कंटाळलेला हा हर्मन मेलव्हिल कथेचा नायक अन् कादंबरीचा लेखकसुद्धा आहे.या जीवनाला,प्रवासाला कंटाळून तो जहाजावरुन पळून जाऊन त्या बेटांवरच राहायचा बेत आखतो,कित्येक दिवस तो या सर्व तयारीत असतो अखेर पळून जाण्याचा दिवस येतो यावेळी  बोटीवरचा अजून एक जण त्याच्या बरोबर साथ द्यायला तयार होतो...

कॅप्टनच्या परवानगीने ते जहाजातून उतरता अन् पाऊस चालू होतो,याचा फायदा घेत ते दूर पळून जातात.बेटावर निसर्गाच्या सान्निध्यात फळं,कंद खात मस्त राहू अशी त्यांनी केलेली कल्पना, या कल्पनेच्या आधारे ते उंच उंच डोंगर,कोरदार खडके,मांडीपर्यंत असलेल्या गवतातून वाट काढीत डोंगर चढू लागतात,मध्येच असंख्य झरे,नाले,उभ्या असलेल्या पहाडी रांगा,पांध्या अन् मिळेल त्या वाटेनं ते ठरलेल्या उंच डोंगरावर चढू लागतात अनेक वेळा घसरता,पडता पण चालत राहता...

डोंगरात आल्यावर झालेली त्यांची निराशा,खाण्यासाठी त्यांना कंदमुळे,फळ भेटलेच नाही.मग जे काही आणले त्यावर त्यांचे दिवस पुढे जाऊ लागले,डोंगर,दऱ्या ओलांडून,भुके तहानलेले राहून ते शेवटी पोहचतात त्या बेटावरच्या नरभक्षक “टैपी” लोकांच्या प्रदेशात.आता आपले दिवस भरले अशी कल्पना त्यांच्या मनात येते पण त्या आदिवासींनी त्यांना ठार मारलं नाहीच,उलट त्यांचं चांगलं स्वागत केलं,पाहुणचार केला,त्यांच्या दुखण्यावर उपचार केले.

काही दिवस राहून अन् मग निघू असा विचार केल्यावर मात्र त्यांच्यापुढे नवीन अडचनी समोर उभ्या राहिल्या,ते आदिवासी त्यांना सोडायलाच तयार नव्हते.ते आदिवासी आपला प्रेमाने पाहुणचार करतायत का पुढेमागे बळी देणाऱ्याची तयारी अश्या द्विधा मनःस्थितीत दोघं तिथे राहिले,बरेच महिने राहिले...

युरोपियन खलाशीनीं जशी “टैपी” लोकांची प्रतिमा रंगवली होती तसे ते क्रूर नव्हते.या आदिवासिंची संस्कृती जवळून बघितली तेव्हा त्यांना ते जाणवलं की,युरोपियन लोकांपेक्षा हे लोक खूप मागास असले तरी निसर्गाशी एकरूप झालेले आहेत,त्यांचा त्यांचा दिनक्रम आनंदाने जगतायत.

तथाकथित “प्रगत”, “धार्मिक” जगापेक्षा त्यांची समाजव्यवस्था उलट कमी समस्यांची आहे.युरोपियन लोकांमुळेच उलट इथे रोगराई वाढते आहे असं त्याचं मत बनलं.लेखकाला या बेटावरचं जग कसं दिसलं,"टैपी" लोकांचं खानपान,धार्मिक विधी, मनोरंजनाची साधनं,स्त्रीपुरुष समाजरचना,प्राणिवैविध्य, झाडं-झुडपं असं त्याला जे जे काही दिसलं,जसं दिसलं त्याचं वर्णन त्याने या कादंबरीत केलं आहे...

त्यांच्या या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जीवनाचा त्यांच्यावर किती परिणाम झाला आहे अन् ते कुठलीही आधुनिक सुविधा नसताना त्यांच्या जीवनात किती सुखी आहे‌‌.आपण सर्वकाही असूनही आपले जीवन अडचणी,आरोग्याच्या समस्या यांनी बरबटले आहे...
नक्कीच वाचायला हवी अशी ही कादंबरी आहे....

 “टैपी” समाजातील स्त्रियांचा मला या ठिकाणी नक्कीच उल्लेख करावासा वाटतो कारण त्यांच्या उल्लेखाशिवाय हा लेख अधुरासा आहे...
त्याचं राहणीमान अन् रोजचे जीवन इतके सुंदर अन् विचार करायला लावणारे आहे की,मी नकळत “टैपी” समाजाचे नेतृत्व करणारी ती तरुणी "फयावे" या ठिकाणी मी तिला कादंबरीची नायिका म्हणेल जिच्या प्रेमात खुद्द लेखक पडले आहेत.तिची प्रतिमा,तिच्या केलेल्या सुंदर वर्णनानुसार डोळ्यांनी कल्पनेत या ठिकाणी मलाही अनुभवयाला मिळते...

"लेखकाच्या आयुष्याचं प्रतिबिंब उतरलेली ही कादंबरी.वास्तव घटनांना दिलेला मुक्त आणि कलात्मक साज हे या कादंबरीचे उद्दिष्ट आहे,हाच या कादंबरीचा गाभा आहे.
मेलव्हीलने मांडलेल्या संवेदनशील आणि रोमहर्षक अनुभवाची नाळच वाचकांना या कादंबरीशी बांधून ठेवते"...
                                                     - केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस.

पुस्तकाचे नाव- “टैपी”
लेखकाचे नाव- "हर्मन मेलव्हिल"
अनुवादित पुस्तकाचे नाव- "पाचूचे बेट"
अनुवाद लेखक- "भानू शिरधनकर"
पृष्ठ संख्या- "१६७"

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड