मुख्य सामग्रीवर वगळा

स्ट्रीट लाईट अन् कैफाच्या दुनियेत..!

स्ट्रीट लाईट अन कैफाच्या दुनियेत...

फार काही नाही पण अलिकडे मला सांजवेळी सूर्य अस्ताला गेला की काहीही कारण नसताना घराबाहेर पडावेसे वाटते.म्हणजे मनाचा विचार केलातर एक कारण असते पण ते कारण कित्येकांना कारण वाटणार नाही...कैफात जीवन जगणारे असेच असतात,त्यांना नेहमीच त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं बघायचं असतं,नेमकं माझ्या बाबतीत मनाचा समतोल सोबतच इतर विचार केला की काही गोष्टी अश्याच घडतात...

तर काही वर्षांपूर्वी मी एक लेख असाच लिहून ठेवला आहे की माणसाचं आयुष्यही सांजेच्यावेळी असो किंवा भर मध्यरात्री चमकणाऱ्या त्या स्ट्रीट लाईटच्या उजेडासारखे असते...कधीतरी पुढे चालून कॉम्प्युटरमध्ये माझ्या लिखाणाच्या काही फाईल सेव्ह करून ठेवायच्या झाल्यातर मी या स्ट्रीट लाईटच्या उजेडावार अन् त्याखाली बसून किंवा त्याच्या सावलीत चालणाऱ्या,त्या विचार करणाऱ्या व्यक्तीवर लिहून ठेवणार आहे....

मला आयुष्यात फार प्रिय कुठली माणसे असतील तर ती तीच आहे जी सूर्य अस्ताला गेला की,फिरून घरी परतत असताना न चुकता स्ट्रीट लाईटच्या स्विचचे बटन चालू करतात,पहाटे बरोबर सकाळी फिरायला आले की पुन्हा बंद करतात. का..?  माहित नाही पण स्ट्रीट लाईटच्या उजेडात मला माझं वर्तमान काळातील आयुष्य जरा विचार करायला लावत असते,कधीतरी भूतकाळाचा तर कधी भविष्यकाळाचा...

अलिकडे स्ट्रीट लाईटच्या खाली अनेक पंख आलेल्या त्या माश्या पडत्या पावसात,त्या स्ट्रीट लाईटच्या उजेडात खेळत असतात.त्यांचं आयुष्य ते किती साधारण पंख आले की फारतर आठ ते नऊ तासाचे पण त्यांचं हे बेफिकिर राहून झीमझीम पडणाऱ्या पावसात त्या उजेडाच्या आसपास भटकणं चालू असतं...
अश्यावेळी मी आपलं बसलेलो असतो नुकत्याच फुलांनी फुललेल्या गुलमोहराच्या झाडाखाली,झाडाच्या फांद्या दाट झाल्या असल्या कारणाने तो पडता पाऊसही लागत नाही.पुन्हा माझं स्ट्रीट लाईटच्या उजेडात आपलं विचार करणे चालुच असतं,इतक्या वर्षामध्ये फार काही बदल झाले नाही,जसा मी या अश्या कैफात जगायला लागलो...

तेव्हापासून फक्त अलिकडे तीन चार वर्षांपूर्वी खांबावर पिवळ्या प्रकाशाचा लाईट होता,आता त्याची जागा निळसर पांढऱ्या प्रकाशाने घेतलेली आहे.हो एक आहे,या निळसर पांढऱ्या प्रकाशात मला विचार करायला जरासं डिस्टर्ब होतं... का..?
माहित नाही पण त्या पिवळ्या रंगाच्या प्रकाशात जरा छान वाटायचं अन् एकांताची जाणीव फार सहज होवून जायची...

असो आता तो मित्रही फारसा भेटत नाही,जो या अश्याच स्ट्रीट लाईटच्या उजेडात खुर्चीवर बसून काही तरी टिपत वॉचमन म्हणून आपली ड्युटी करत असायचा. त्याच गुलमोहराच्या झाडाखाली बसून माझ्यासारखा एखाद दुसरा भेटायचा,मग त्याचा काही क्षणाचा दोघांनाही विरंगुळा अन् मग रस्त्यावर येणारे,जाणारे स्ट्रीट लाईटच्या उजेडात अस्तित्वाच्या खुणा शोधणारे भेटून जायचे....
मलाही काही क्षण पुन्हा मग मित्रासवे स्ट्रीट लाईटच्या उजेडात विचार विचार अन् विचार करायला भेटायचं...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...