मुख्य सामग्रीवर वगळा

स्ट्रीट लाईट अन् कैफाच्या दुनियेत..!

स्ट्रीट लाईट अन कैफाच्या दुनियेत...

फार काही नाही पण अलिकडे मला सांजवेळी सूर्य अस्ताला गेला की काहीही कारण नसताना घराबाहेर पडावेसे वाटते.म्हणजे मनाचा विचार केलातर एक कारण असते पण ते कारण कित्येकांना कारण वाटणार नाही...कैफात जीवन जगणारे असेच असतात,त्यांना नेहमीच त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं बघायचं असतं,नेमकं माझ्या बाबतीत मनाचा समतोल सोबतच इतर विचार केला की काही गोष्टी अश्याच घडतात...

तर काही वर्षांपूर्वी मी एक लेख असाच लिहून ठेवला आहे की माणसाचं आयुष्यही सांजेच्यावेळी असो किंवा भर मध्यरात्री चमकणाऱ्या त्या स्ट्रीट लाईटच्या उजेडासारखे असते...कधीतरी पुढे चालून कॉम्प्युटरमध्ये माझ्या लिखाणाच्या काही फाईल सेव्ह करून ठेवायच्या झाल्यातर मी या स्ट्रीट लाईटच्या उजेडावार अन् त्याखाली बसून किंवा त्याच्या सावलीत चालणाऱ्या,त्या विचार करणाऱ्या व्यक्तीवर लिहून ठेवणार आहे....

मला आयुष्यात फार प्रिय कुठली माणसे असतील तर ती तीच आहे जी सूर्य अस्ताला गेला की,फिरून घरी परतत असताना न चुकता स्ट्रीट लाईटच्या स्विचचे बटन चालू करतात,पहाटे बरोबर सकाळी फिरायला आले की पुन्हा बंद करतात. का..?  माहित नाही पण स्ट्रीट लाईटच्या उजेडात मला माझं वर्तमान काळातील आयुष्य जरा विचार करायला लावत असते,कधीतरी भूतकाळाचा तर कधी भविष्यकाळाचा...

अलिकडे स्ट्रीट लाईटच्या खाली अनेक पंख आलेल्या त्या माश्या पडत्या पावसात,त्या स्ट्रीट लाईटच्या उजेडात खेळत असतात.त्यांचं आयुष्य ते किती साधारण पंख आले की फारतर आठ ते नऊ तासाचे पण त्यांचं हे बेफिकिर राहून झीमझीम पडणाऱ्या पावसात त्या उजेडाच्या आसपास भटकणं चालू असतं...
अश्यावेळी मी आपलं बसलेलो असतो नुकत्याच फुलांनी फुललेल्या गुलमोहराच्या झाडाखाली,झाडाच्या फांद्या दाट झाल्या असल्या कारणाने तो पडता पाऊसही लागत नाही.पुन्हा माझं स्ट्रीट लाईटच्या उजेडात आपलं विचार करणे चालुच असतं,इतक्या वर्षामध्ये फार काही बदल झाले नाही,जसा मी या अश्या कैफात जगायला लागलो...

तेव्हापासून फक्त अलिकडे तीन चार वर्षांपूर्वी खांबावर पिवळ्या प्रकाशाचा लाईट होता,आता त्याची जागा निळसर पांढऱ्या प्रकाशाने घेतलेली आहे.हो एक आहे,या निळसर पांढऱ्या प्रकाशात मला विचार करायला जरासं डिस्टर्ब होतं... का..?
माहित नाही पण त्या पिवळ्या रंगाच्या प्रकाशात जरा छान वाटायचं अन् एकांताची जाणीव फार सहज होवून जायची...

असो आता तो मित्रही फारसा भेटत नाही,जो या अश्याच स्ट्रीट लाईटच्या उजेडात खुर्चीवर बसून काही तरी टिपत वॉचमन म्हणून आपली ड्युटी करत असायचा. त्याच गुलमोहराच्या झाडाखाली बसून माझ्यासारखा एखाद दुसरा भेटायचा,मग त्याचा काही क्षणाचा दोघांनाही विरंगुळा अन् मग रस्त्यावर येणारे,जाणारे स्ट्रीट लाईटच्या उजेडात अस्तित्वाच्या खुणा शोधणारे भेटून जायचे....
मलाही काही क्षण पुन्हा मग मित्रासवे स्ट्रीट लाईटच्या उजेडात विचार विचार अन् विचार करायला भेटायचं...

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...