मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणींतील हमारा बजाज अन् औरंगाबादकरांची दिवाळी..!

आठवणींतील हमारा बजाज अन् औरंगाबादकरांची दिवाळी..!



आठवणींतील हमारा बजाज अन् औरंगाबादकरांची दिवाळी..!

१९८५ साली औरंगाबाद येथे बजाज कंपनीचा प्लांट उभारण्यात आला आणि औरंगाबाद शहराला एक नवीन ओळख मिळण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून बजाज उद्योग समूहाचा जेव्हा-जेव्हा विचार केला जातो तेव्हा-तेव्हा अनावधानाने औरंगाबाद शहराचे नाव येतेच. इतकं जवळचं नातं हे बजाज उद्योग समूह अन् औरंगाबादकरांचे आहे.

बजाज उद्योग समूहाने औरंगाबाद शहराचा विकास असो किंवा, वाईट राजकारण असो किंवा वाईट अर्थकारण, शहराचा वाईट काळ हे सगळे दिवस पाहिले. परंतु या अश्या वाईट काळातही बजाज कंपनी सामान्य औरंगाबादकरांच्या सोबतीनेच होती.

औरंगाबाद शहर पर्यटन क्षेत्रात "पर्यटन राजधानी" म्हणून आपले स्थान कायम ठेवून होतीच. परंतु आता नव्याने "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही औरंगाबाद शहराची वेगळी ओळख झाली होती.  

तिला कारणीभूत औरंगाबाद शहराच्या लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये बजाज, व्हिडिओकॉन, लुपिन लिमिटेड, गरवारे, कॉस्मोफिल्म, फायझर, वोखार्डट, कोलगेट, जॉन्सन अँड जॉन्सन अश्या अनेक कंपन्या ज्या त्या काळात औरंगाबाद शहराच्या धर्तीवर उभारल्या गेल्या.
ज्यां कंपन्यांनी औरंगाबादकरांना खूप काही देऊ केलं. औरंगाबाद शहराला नावारूपास आणले अन् त्या कंपन्यांचीसुद्धा कायम भरभराट झाली.

नव्वदीच्या दशकात औरंगाबाद शहराची बऱ्यापैकी अर्थव्यवस्था ही औद्योगिक वसाहतीत नव्याने निर्माण झालेल्या कंपन्यांनवर अवलंबून होती. यात मुख्यत्वे बजाज कंपनी ही त्यावेळी औरंगाबाद शहरासाठी खूप महत्त्वाची कंपनी होती,जी आजही आहे. आता तिच्या सोबतीने शेकडो कंपन्या आजमितीला शहराच्या चहूबाजूने औद्योगिक वसाहतीत उभारल्या गेल्या आहे.

औरंगाबाद शहरातील काही जुने लोकं आजही म्हणतात की, दिवाळीच्या दिवसांमध्ये जोवर बजाज कंपनीतील कामगारांना बोनस मिळत नाही तोवर शहराची बाजारपेठ ही थंडावलेली असायची. ज्या दिवशी दिवाळीचा बोनस कंपनीतून कामगारांना मिळत असायचा त्या दिवशी बाजारपेठ बघण्यासारखी फुललेली असायची.

अर्थात औरंगाबाद शहराचे अर्थकारण हे या कंपनीच्या चक्रावर फिरत असायचे. इतका रोजगार त्यावेळी बजाज माध्यमातून कामगारांना बजाज कंपनी देत होती. त्यामुळेच कदाचित औरंगाबादकरांचे "हमारा बजाज"शी एक भावनिक नाते आहे.

असो बजाज कंपनीला घेऊन मी औरंगाबाद शहराची ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक जूनी ओळख थोडक्यात सांगितली. आजमितीला अश्या अनेक कंपन्या या औरंगाबाद शहराशी जोडल्या गेल्या आहेत. पुढे काळानुरूप काळाच्या ओघात वर सांगितल्या त्यातील बऱ्याच कंपन्या बंदही पडल्या.

पण त्यांच्या आठवणी मात्र आजही औरंगाबादकरांच्या मनात ताज्या आहेत. औरंगाबाद शहराला एक नवीन ओळख देण्याचं काम यासर्व कंपन्या आणि आता नव्यानं उभारल्या गेलेल्या सर्व कंपन्या करत आहे.

माझ्यामते जवळजवळ बऱ्यापैकी औरंगाबाद शहराची अर्थव्यवस्था, आर्थिक उलाढाल ही औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या कंपन्यांच्या बळावर औरंगाबाद शहर करत आहे.
आशिया खंडात एक नवी ओळख औरंगाबाद शहराला नव्वदीच्या दशकातच "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब सिटी" ही ओळख वाळूज एमआयडीसी, चिखलठाण एमआयडीसी, चितेगाव एमआयडीसी, रेल्वे स्टेशन परिसरातील एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी यांनी तर दिली.

परंतु आता नव्याने उभारलेली अवघ्या आशिया खंडातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हणजेच पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहत, ऑरिक सिटीसारखे भव्यदिव्य प्रोजेक्ट्स यामुळे ही ओळख औरंगाबाद शहराला मिळालेली आहे.

औरंगाबाद शहर फक्त ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल एरियासाठी मर्यादित न राहता फार्मा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपलं स्वंतत्र नाव उभे करत आहे. आज देशा-परदेशातील नामांकित फार्मा कंपन्या या औरंगाबाद शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीत आपले प्लांटस उभे करत आहे काही वर्षानूवर्ष चालू आहेत.

आयटी क्षेत्रातसुद्धा आपल्या शहराचा आलेख हळूहळू का होईना गेले काही वर्ष उंचावता आहे. बऱ्याच छोट्या-छोट्या कंपन्या या औरंगाबाद शहरात आयटी पार्कमध्ये आपली नावे करत आहेत.

हे सगळं बघता आणि औरंगाबाद शहराचे अर्थकारण बघता रिअल इस्टेट क्षेत्रातसुध्दा शहर कसे मागे राहील. गेल्या दोन दशकात औरंगाबाद शहरातील नागरिकांनी रिअल इस्टेट विश्वात केलेली गुंतवणूक आणि त्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे उभे राहिलेले असंख्य प्रोजेक्ट्स, फ्लॅट सिस्टम, रो-हाऊसेस यांच्या गगनाला भिडलेल्या किंमती हे सगळं विचार करायला लावणारं आहे. आपले शहर कोणत्या दिशेनं वाटचाल करत आहे हा ही विचार अश्यावेळी मनात येऊन जातो.

आशिया खंडात सर्वाधिक महाग घरांच्या किंमती असो किंवा जागेच्या किंमती यांची नोंद असलेल्या यादीतसुद्धा औरंगाबाद शहर पुणे शहराची बरोबरी करू बघत आहे.

Written by
Bharat Sonwane .
एम. बी. ए. (उत्पादन आणि विपणन व्यवस्थापन.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड